Devendra Fadnavis
🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: LIVE | Our leader, Hon’ble PM Narendra Modi Ji addressing our Nation 🇮🇳 #OperationSindoor https://www.youtube.com/live/qPGNVcM8VOA?si=L0wzvJ0By4boZTtY https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/…
Full_Video_Hon_PM_Modiji’s_Address_to_the_Nation,_12_05_2025.mp4
48.3 MB
Devendra Fadnavis
🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संबोधनानंतर माध्यमांशी संवाद 🕤 रा. ९. २२ वा | १२-०५-२०२५ 📍नागपूर. #Maharashtra #NarendraModi #OperationSindoor https://www.youtube.com/live/iZfK6v…
Full_Video_माध्यमांशी_संवाद,_नागपूर_12_05_2025.mp4
26 MB
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणिकेचा विमोचन समारंभ येथे उपस्थिती 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनकी स्वातंत्र्यवीर सावरकर इनके स्मरणिका विमोचन समारोह में उपस्थिति 🕡 संध्या. ६.३५ वा. | १२-५-२०२५📍वर्धा…
CMO Maharashtra Tweets:
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणिकेचा विमोचन कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तसेच उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळी कलाटणी मिळाली. इंग्रजांच्याच अनेक कागदपत्रांतून आणि पत्रांमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून त्यांना सर्वाधिक भीती वाटायची, हे स्पष्ट होते. स्वातंत्र्यवीर सावरकर संपूर्ण भारतात बंड उभे करु शकतात, म्हणून त्यांना कारागृहातून बाहेर येऊ देऊ नका, असे उल्लेख मिळतात. स्वातंत्र्यवीर म्हणून अनेक क्रांतिकारक घडवत असताना काळ्या पाण्याच्या दोन शिक्षा एकत्रित झालेले एकमेव नायक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. अंदमानच्या कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा कणखर बाणा त्यांच्या 'माझी जन्मठेप' या आत्मकथेमध्ये वाचायला मिळतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कारागृहातून बाहेर आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाचे दुसरे पर्व सुरु झाले. यामध्ये त्यांनी जातीभेदाविरोधात लढा उभारला, जात्युच्छेदक निबंध लिहिले, पतितपावन मंदिराच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकालादेखील मंदिर प्रवेशाचा अधिकार आहे, हे सांगितले. यासोबतच आता अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषेतील सर्वच महत्त्वाचे शब्द, भाषाशुद्धी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिली, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येथील स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळत राहिली पाहिजे, नवीन पिढीमध्ये विज्ञाननिष्ठा रुजवता आली पाहिजे, यासाठी आपण सर्वच प्रयत्न करु.
यावेळी मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #SwatantryaVeerSavarkar
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मरणिकेचा विमोचन कार्यक्रम येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले तसेच उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला वेगळी कलाटणी मिळाली. इंग्रजांच्याच अनेक कागदपत्रांतून आणि पत्रांमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून त्यांना सर्वाधिक भीती वाटायची, हे स्पष्ट होते. स्वातंत्र्यवीर सावरकर संपूर्ण भारतात बंड उभे करु शकतात, म्हणून त्यांना कारागृहातून बाहेर येऊ देऊ नका, असे उल्लेख मिळतात. स्वातंत्र्यवीर म्हणून अनेक क्रांतिकारक घडवत असताना काळ्या पाण्याच्या दोन शिक्षा एकत्रित झालेले एकमेव नायक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. अंदमानच्या कारागृहातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा कणखर बाणा त्यांच्या 'माझी जन्मठेप' या आत्मकथेमध्ये वाचायला मिळतो, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कारागृहातून बाहेर आल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनाचे दुसरे पर्व सुरु झाले. यामध्ये त्यांनी जातीभेदाविरोधात लढा उभारला, जात्युच्छेदक निबंध लिहिले, पतितपावन मंदिराच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकालादेखील मंदिर प्रवेशाचा अधिकार आहे, हे सांगितले. यासोबतच आता अभिजात दर्जा मिळालेल्या मराठी भाषेतील सर्वच महत्त्वाचे शब्द, भाषाशुद्धी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिली, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येथील स्मारकाच्या माध्यमातून नवीन पिढीला प्रेरणा मिळत राहिली पाहिजे, नवीन पिढीमध्ये विज्ञाननिष्ठा रुजवता आली पाहिजे, यासाठी आपण सर्वच प्रयत्न करु.
यावेळी मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री पंकज भोयर व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #SwatantryaVeerSavarkar
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis arrives for the Discussion on 'Empowerment of Cooperatives and Government's Policy' 🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे 'सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण या विषयीचा परिसंवाद' येथे आगमन 🔸मुख्यमंत्री देवेंद्र…
CMO Maharashtra Tweets:
'सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे 'दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह बँक लि'. आयोजित 'सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण' परिसंवाद कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करून त्यात प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र ‘प्रकरणे’ समाविष्ट करावी लागतील. या दृष्टीने लवकरच सहकार कायद्यात बदल करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सहकारी बँकांनी कोअर बँकिंग प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे ‘फिस्कल कन्सोलिडेशन’च्या कालावधीतही या बँका टिकून राहिल्या असून उत्तम सेवा देत आहेत. पुणे जिल्ह्यातील सुपे गावात 12 मे 1875 रोजी सावकारांविरोधात झालेला उठाव ही सहकार क्षेत्राची सुरुवात मानली जाते. त्या ऐतिहासिक घटनेला आज 150 वर्षे पूर्ण झाली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात प्रथमच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून देशभरातील सहकारी चळवळीला नवे बळ दिले आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने 10,000 गावांतील सहकारी संस्थांना प्रशिक्षण देऊन त्यांचे ‘बिझनेस मॉडेल’ तयार करण्यात येत आहे. यामुळे ‘ॲग्री बिझनेस’ला नवी दिशा मिळत आहे. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच उपपदार्थांचे उत्पादन सुरू केल्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यास मदत झाली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल धोरण व किमान आधारभूत किंमत यामध्ये वेळोवेळी बदल करून साखर उद्योगाला सहकार्य केले आहे. शेतकऱ्यांचे कारखाने शेतकऱ्यांकडेच राहावे, ही राज्य शासनाची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सहकारी सूतगिरण्यांना विजेच्या दरांमुळे स्पर्धेत अडचणी येतात, मात्र राज्य शासन अनुदान देत असल्याने सर्व सूतगिरण्यांना सौरऊर्जेवर वळविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांची विजेची समस्या दूर होणार आहे. सहकार क्षेत्रातून प्रक्रिया उद्योगांनाही चालना दिली पाहिजे. सध्या राज्यातील एकूण सहकारी संस्थांपैकी 50% सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यांच्यासाठी सहकार कायद्यात स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबईत नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी स्वयं पुनर्विकासासाठी 17 प्रकारच्या सवलती देण्यात येत आहेत. या उपक्रमासाठी आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य शासनाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सहकारी बँकांमधून होण्यासाठी अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. शरद पवार, दि महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक, व्यवस्थापकीय संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
'सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉईंट, मुंबई येथे 'दि महाराष्ट्र स्टेट कॉ. ऑपरेटिव्ह बँक लि'. आयोजित 'सहकाराचे सक्षमीकरण आणि शासनाचे धोरण' परिसंवाद कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सहकार क्षेत्राशी निगडित असलेल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करून त्यात प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र ‘प्रकरणे’ समाविष्ट करावी लागतील. या दृष्टीने लवकरच सहकार कायद्यात बदल करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. सहकारी बँकांनी कोअर बँकिंग प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. त्यामुळे ‘फिस्कल कन्सोलिडेशन’च्या कालावधीतही या बँका टिकून राहिल्या असून उत्तम सेवा देत आहेत. पुणे जिल्ह्यातील सुपे गावात 12 मे 1875 रोजी सावकारांविरोधात झालेला उठाव ही सहकार क्षेत्राची सुरुवात मानली जाते. त्या ऐतिहासिक घटनेला आज 150 वर्षे पूर्ण झाली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रात प्रथमच स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन करून देशभरातील सहकारी चळवळीला नवे बळ दिले आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने 10,000 गावांतील सहकारी संस्थांना प्रशिक्षण देऊन त्यांचे ‘बिझनेस मॉडेल’ तयार करण्यात येत आहे. यामुळे ‘ॲग्री बिझनेस’ला नवी दिशा मिळत आहे. सहकारी साखर कारखान्यांनी साखरेबरोबरच उपपदार्थांचे उत्पादन सुरू केल्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यास मदत झाली आहे. केंद्र सरकारने इथेनॉल धोरण व किमान आधारभूत किंमत यामध्ये वेळोवेळी बदल करून साखर उद्योगाला सहकार्य केले आहे. शेतकऱ्यांचे कारखाने शेतकऱ्यांकडेच राहावे, ही राज्य शासनाची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
सहकारी सूतगिरण्यांना विजेच्या दरांमुळे स्पर्धेत अडचणी येतात, मात्र राज्य शासन अनुदान देत असल्याने सर्व सूतगिरण्यांना सौरऊर्जेवर वळविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांची विजेची समस्या दूर होणार आहे. सहकार क्षेत्रातून प्रक्रिया उद्योगांनाही चालना दिली पाहिजे. सध्या राज्यातील एकूण सहकारी संस्थांपैकी 50% सहकारी गृहनिर्माण संस्था आहेत. यांच्यासाठी सहकार कायद्यात स्वतंत्र प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे. मुंबईत नागरिकांना हक्काचे घर मिळावे यासाठी स्वयं पुनर्विकासासाठी 17 प्रकारच्या सवलती देण्यात येत आहेत. या उपक्रमासाठी आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्य शासनाचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सहकारी बँकांमधून होण्यासाठी अभ्यास करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी स्पष्ट केले.
यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. शरद पवार, दि महाराष्ट्र स्टेट कॉ-ऑपरेटिव्ह बँकेचे प्रशासक, व्यवस्थापकीय संचालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची दहशतवादाविरोधात अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका...
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनकी आतंकवाद के खिलाफ बेहद आक्रामक और स्पष्ट भूमिका...
(नागपूर | 12-5-2025)
#Maharashtra #Nagpur #OperationSindoor
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची दहशतवादाविरोधात अत्यंत आक्रमक आणि रोखठोक भूमिका...
मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी इनकी आतंकवाद के खिलाफ बेहद आक्रामक और स्पष्ट भूमिका...
(नागपूर | 12-5-2025)
#Maharashtra #Nagpur #OperationSindoor
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
दहशतवादी कृत्य करणारे आणि त्यांचे आका यांच्याकडे एकत्रित पाहिले पाहिजे, याच्याशी कसलीही तडजोड नाही...
आतंकवादी कृत्य करने वालों और उनके आकाओं को एक ही नजर से देखा जाना चाहिए, इससे किसी भी प्रकार का समझौता नहीं...
(नागपूर | 12-5-2025)
#Maharashtra #Nagpur #OperationSindoor
दहशतवादी कृत्य करणारे आणि त्यांचे आका यांच्याकडे एकत्रित पाहिले पाहिजे, याच्याशी कसलीही तडजोड नाही...
आतंकवादी कृत्य करने वालों और उनके आकाओं को एक ही नजर से देखा जाना चाहिए, इससे किसी भी प्रकार का समझौता नहीं...
(नागपूर | 12-5-2025)
#Maharashtra #Nagpur #OperationSindoor
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
चर्चा झाली तर पाकव्याप्त काश्मिरवरच होणार...!
चर्चा अगर होगी, तो सिर्फ पाक अधिकृत कश्मीर पर ही होगी...!
(नागपूर | 12-5-2025)
#Maharashtra #Nagpur #OperationSindoor
चर्चा झाली तर पाकव्याप्त काश्मिरवरच होणार...!
चर्चा अगर होगी, तो सिर्फ पाक अधिकृत कश्मीर पर ही होगी...!
(नागपूर | 12-5-2025)
#Maharashtra #Nagpur #OperationSindoor