Devendra Fadnavis
4.39K subscribers
83.7K photos
14.7K videos
2.99K files
8.06K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

समाजातील सामान्य माणसाच्या मदतीसाठी महामंडळ स्थापन केले, तर त्याचे स्वागत केले पाहिजे.

समाज के सामान्य जनों की मदत के लिए महामंडल की स्थापन हुई, तो उसका स्वागत किया जाना चाहिए।

( मुंबई | 22-8-2025)
#Maharashtra #SocialJustice
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

आमदार डॉ. अतुल भोसले यांनी उघड केलेल्या सत्यामुळे, खरे ‘व्होट चोर’ कोण हे आता स्पष्ट झाले आहे.

विधायक डॉ. अतुल भोसले इनके द्वारा उजागर किये गये सच से अब यह स्पष्ट हो गया है कि असली 'वोट चोर' कौन है?

( मुंबई | 22-8-2025)
#Maharashtra #Mumbai #Election2024
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸CM Devendra Fadnavis chaired the 'CMO Social Sector War Room' Meeting. Minister Aditi Tatkare, MoS Meghna Bordikar and concerned officials were present. 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'मुख्यमंत्री कार्यालय सामाजिक…
CMO Maharashtra Tweets:

जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 'मुख्यमंत्री कार्यालय सामाजिक क्षेत्र वॉर रूम' अंतर्गत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी अमृत 2.0 अभियान, 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून पायाभूत आरोग्य सुविधा, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन या योजनांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी विस्तृत आढावा घेतला.

जनसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध योजना, उपक्रम व अभियानांची अंमलबजावणी करीत असते. या सर्वांचे प्रभावी कार्यान्वयन करण्याची जबाबदारी यंत्रणांची आहे. या योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून जनसामान्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणावे, केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नाही, याबाबत यंत्रणांनी सतर्क रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधितांना दिले.

अमृत 2.0 अभियानाचा आढावा घेत असताना मुख्यमंत्री म्हणाले की, नागरी भागात पाणीपुरवठा, मलनिस्सारण, हरित उद्याने व सरोवर पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र शासनाकडून अमृत अभियानांतर्गत निधी देण्यात येत आहे. नागरी भागात जनसामान्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडवून त्यांचे जीवन सुसह्य करण्याची क्षमता या अभियानात आहे. त्यामुळे यंत्रणांनी 'मिशन मोड'वर या अभियानांतर्गत प्रलंबित असलेली सर्व कामे 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करून, प्रलंबित असलेल्या प्रशासकीय मान्यता तातडीने देण्यात याव्यात.

प्रकल्पात विलंब होऊ नये यासाठी प्रकल्प होऊ घातलेल्या जागेच्या परवानग्या प्राप्त करून घ्याव्यात. त्यानंतरच प्रकल्पाचे काम सुरू करण्यात यावे, अशा सूचना देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, विविध विभाग, यंत्रणांकडून काम सुरू करण्यासाठी संबंधित परवानगी आगाऊ स्वरूपात दिल्यास काम तातडीने सुरू होऊ शकते. टप्पा निहाय कामांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम सुरू करून, तो टप्पा पूर्ण होईपर्यंत पुढील परवानगी प्राप्त करून घ्यावी. नागरिकांना गुणवत्तापूर्ण व सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 'हेल्थ अँड वेलनेस सेंटर' ची कामे पूर्ण करावीत.

आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय क्षेत्रात लोकसंख्येचा विचार करून उपलब्ध मनुष्यबळ आणि भविष्यात लागणाऱ्या मनुष्यबळाचा अभ्यास करावा. यामध्ये विशेषतः पॅरामेडिकलमध्ये लागणाऱ्या मनुष्यबळाचा विचार करावा. नर्सिंग महाविद्यालयांना परवानगी देताना तेथील पायाभूत सुविधा असल्याची खात्री करून घेतल्यानंतर परवानगी देण्यात यावी. आरोग्य क्षेत्रात तातडीने मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी धोरण तयार करावे, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

'प्रधानमंत्री मातृ वंदना योजना' महिला व बालकल्याण विभागाकडे अंमलबजावणीसाठी हस्तांतरित करण्यात आली आहे. या विभागाने मागील प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांचा आढावा घेऊन, त्यांना लाभ देण्याची कार्यवाही पूर्ण करावी. 'प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सोयी सुविधा मिशन' अंतर्गत राज्यात मंजूर असलेल्या विविध कामांसाठी 'नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल' कडे प्रलंबित असलेल्या परवानग्या तातडीने प्राप्त करून घ्याव्यात. आपत्कालीन परिस्थितीत उपयोगात येणाऱ्या तात्पुरत्या रुग्णालयाची सुविधा असणारे 'भीष्म क्यूब' नियमितपणे देखरेखीखाली असावेत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी याप्रसंगी दिले.

यावेळी मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Mumbai
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Transforming Lives Through Effective Governance!

Chaired the Social Sector War Room meeting at Sahyadri Guest House, Mumbai today. Reviewed progress of AMRUT 2.0, infrastructure under the 15th Finance Commission, Pradhan Mantri Matru Vandana Yojana and Ayushman Bharat Health Infrastructure Mission. These initiatives directly impact citizens’ quality of life, and Maharashtra must lead in their effective implementation. Directions were issued for coordinated action to ensure people see real improvements.

Under AMRUT 2.0, urban water supply, sewerage, parks and lake rejuvenation works are to be completed on mission mode by 31st March 2026, with approvals prioritised and participation of local self government bodies.

Pending works of Health and Wellness Centres under the National Health Mission must be completed promptly. The Public Health Department and Department of Medical Education has been instructed to plan for current and future manpower, especially paramedical staff. Instructed officials to grant permissions for nursing colleges only after verifying that the essential infrastructure is in place, and a policy should be created to ensure the timely availability of medical personnel.

The Women and Child Development Department must expedite benefits under the Pradhan Mantri Matru Vandana Yojana to all pending beneficiaries. Instructed officials to obtain approvals from the NCDC under the Pradhan Mantri Ayushman Bharat Health Infrastructure Mission at the earliest and 'BHISHM Cubes' be maintained regularly to ensure emergency preparedness.

Through focused coordination, Maharashtra will strengthen public services and ensure citizens experience meaningful improvements in daily life.

Minister Adititai Tatkare, MoS Meghnatai Bordikar and concerned officials were present.

#Maharashtra #Mumbai #SocialWelfare

https://x.com/Dev_Fadnavis/status/1958916895425409273
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

India's journey in space is more than scientific triumphs, they reflect our mission to transform lives through innovation. On National Space Day, we salute our scientists' vision, courage, and brilliance and honour the spirit that made Chandrayaan-3 a historic success.
भारताची अंतराळ-संशोधनयात्रा ही केवळ वैज्ञानिक प्रगती नसून, त्यातून भारतीय समाजजीवनात सकारात्मक बदल घडवून आणणे, हे मूळ उद्दिष्ट आहे!

#राष्ट्रीयअंतराळदिन #National_Space_Day #Maharashtra
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

Some special moments from the ‘SHAKTI संवाद’ organised by the National Commission for Women and the Maharashtra State Women Commission ...

राष्ट्रीय महिला आयोग एवं महाराष्ट्र राज्य महिला आयोग द्वारा संयुक्त रूप से आयोजित 'SHAKTI संवाद' कार्यक्रम के कुछ खास पल…

('SHAKTI संवाद' | मुंबई | 22-8-2025)
#Maharashtra #WomenEmpowerment
CMO Maharashtra Tweets:

महागणेशोत्सव
महाराष्ट्राचा राज्य उत्सव

#Maharashtra #DevendraFadnavis #GaneshUtsav
CMO Maharashtra Tweets:

विश्वास आहे... म्हणून विकास आहे!

छत्रपती संभाजीनगर शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पांतर्गत 900 मि.मी. व्यासाची जलवाहिनी व 26 द.ल.ली क्षमतेच्या फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राचे जलपूजन

#Maharashtra #DevendraFadnavis #ChhatrapatiSambhajinagar
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

नागपुरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. हरेराम त्रिपाठीजी आणि त्यांच्या सहचारिणी यांचा आज पहाटे उत्तरप्रदेशात एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याची घटना ऐकून अतिशय वाईट वाटले.
केवळ कुलगुरू नाही, तर भारतीय दर्शन आणि न्यायशास्त्रातील विद्वान म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. अनेक विषयांवर संशोधन करताना त्यांनी 40 हून अधिक पुस्तके लिहिली होती. महर्षी बादरायण राष्ट्रपती पुरस्कार, शांकर वेदान्त पुरस्कार, पाणिनी सम्मान अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते. संस्कृतच्या सेवेसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. याच महिन्यारंभी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात एका कार्यक्रमासाठी आम्ही एकत्र होतो. आज काळाने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले, यावर विश्वासच बसत नाही. 
मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
त्रिपाठी कुटुंबियांच्या आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
ॐ शांती 🙏