Devendra Fadnavis
4.23K subscribers
80.9K photos
13.6K videos
2.76K files
7.64K links
श्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून
Download Telegram
CM Shri Devendra Fadnavis Tweets:

‘UMEED’ CSR Initiative: Health, Education, and Hope for All!

It was truly delightful to inaugurate the Dhanvantari Medical Camp and to distribute cycles and school kits under RBL Bank’s ‘UMEED’ CSR initiative, in association with the Government of Maharashtra in Nagpur.

Such social initiatives provide essential support to those in need, with bicycle distribution helping girls in rural areas attend school regularly and improve education quality. Recently, cycles were given to students in the remote village of Kavande, Gadchiroli, bringing joy and fulfilment.

Also Dhanvantari Health Check-up Camp offers free eye exams, spectacles, and other health services, promoting better health for the girls. Such efforts not only empower young girls but also strengthen the community’s future. Continued support through these programmes is essential to drive lasting positive change.

MLA Pravin Datke, MLA Sandip Joshi, RBL bank officials, and other dignitaries were present.

#Maharashtra #Nagpur #Inaugurate

https://x.com/Dev_Fadnavis/status/1931335083526648288
CM Shri Devendra Fadnavis speech begins

🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:

मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:

LIVE | डॉ. प्रमोद चौधरी यांच्याद्वारे लिखित 'पैलतीरावरुन... तर असं झालं’ या पुस्तकाचे प्रकाशन

🕢 संध्या. ७.३६ वा. | ७-६-२०२५📍पुणे.

#Maharashtra #Pune #BookLaunch

https://www.youtube.com/live/kkf9YOFQMIU?si=eJwlwtjzzUQCD5JU

https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1633888433977156

https://x.com/Dev_Fadnavis/status/1931352702250012869
Devendra Fadnavis
CMO Maharashtra Tweets: 🔸 Inauguration of the 'Vidarbha Paani Parishad' organized by Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, National Service Scheme and Jan Kalyankari Samiti, Nagpur at the hands of CM Devendra Fadnavis 🔸 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
CMO Maharashtra Tweets:

'लोकसहभागातून राज्यात अनेक गावे जलदृष्ट्या सक्षम'
'पाण्याच्या नैसर्गिक साठ्यांचे रक्षण, हे जलसंधारणाचे प्रमुख उद्दिष्ट'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) आणि जनकल्याणकारी समितीद्वारे आयोजित ‘विदर्भ पाणी परिषद’ या अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रमाचे उदघाटन केले. या परिषदेमार्फत जलसंवर्धनासंबंधी व्यापक विचारमंथनास प्रारंभ झाला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

विदर्भ पाणी परिषदेच्या माध्यमातून एक सकारात्मक आणि परिवर्तनशील विचार पुढे येत आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून ही परिषद होत आहे याचा आनंद व्यक्त करत त्यांनी शैक्षणिक संस्थांच्या सामाजिक सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. नद्यांनी मानवाला जीवन दिले, संस्कृती दिली आणि शाश्वततेचा मार्ग दाखवला. मात्र आज केवळ 1% गोड्या पाण्यावर संपूर्ण मानवजातीचे भवितव्य अवलंबून आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ऑपरेशन सिंदूर' भारताने सिंधू जल करार थांबवण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची आठवण करून दिली. त्यांनी स्पष्ट केले की, आता देशाला जलसुरक्षेच्या दृष्टीने जलसंवर्धन, पर्जन्यजल संचयन आणि जलपुनर्वापर या तीन गोष्टींवर विशेष लक्ष द्यावे लागेल. विदर्भातील शेतकरी आत्महत्यांच्या मुळाशी असलेल्या अपुऱ्या सिंचन व्यवस्थेवर त्यांनी प्रकाश टाकला. पूर्व विदर्भात मुबलक पर्जन्यमान असूनही पश्चिम विदर्भात अजूनही दुष्काळाचे सावट आहे, याकडेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष वेधले.

राज्य शासनाने गोसिखुर्दसारख्या मोठ्या प्रकल्पांसह अनेक लहान-मोठ्या सिंचन योजनांसाठी महत्त्वाची पावले उचलल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्याचा 52% भूभाग अवर्षणप्रवण असल्याने जलयुक्त शिवार, छोट्या सिंचन योजना आणि स्थानिक जलसंधारणाचे उपाय हे मोठ्या धरणांइतकेच महत्त्वाचे आहेत. जलयुक्त शिवार अभियानातून लोकसहभागातून जलसंपन्न गावे उभी राहिली असून, ₹700 कोटींचा निधी थेट जनतेने दिला, ही बाब शासनासाठी प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

निसर्गाच्या संतुलनाविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, नैसर्गिक जलसाठ्यांचे रक्षण हे केवळ पर्यावरणीय जबाबदारी नसून, भविष्यातील पिढ्यांसाठी दिलेला वचनबद्धतेचा शब्द आहे. प्रक्रिया न झालेले सांडपाणी नद्यांमध्ये न सोडता, एसटीपीच्या (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) माध्यमातून त्याचा पुनर्वापर करण्यावर भर देण्यात येत आहे.

पाण्यावरून जिल्हास्तरीय संघर्ष टाळायचा असेल, तर जलपुनर्वापर हेच भविष्यातील उत्तर आहे, असे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाचा विशेष उल्लेख केला. या प्रकल्पातून 500 किलोमीटर लांबीची नवीन नदी निर्माण होणार असून, ती मराठवाडा व विदर्भासाठी जीवनरेषा ठरेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यासोबतच तापी पुनर्भरण प्रकल्पाद्वारे 22 टीएमसी पाणी उपलब्ध होणार असून, उत्तर महाराष्ट्रातील खारपानपट्ट्यातील भागांमध्येही नवा विकासाचा मार्ग खुला होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी नमूद केले.

यावेळी आ. परिणय फुके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू व इतर मान्यवर उपस्थित होते.

#Maharashtra #DevendraFadnavis #Nagpur
CMO Maharashtra Tweets:

📕मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते इथेनॉल मॅन डॉ. प्रमोद चौधरी यांच्याद्वारे लिखित 'पैलतीरावरून... तर असं झालं’ पुस्तकाचे प्रकाशन
📕मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इनके करकमलों से इथेनॉल मैन डॉ. प्रमोद चौधरी द्वारा लिखित 'पैलतीरावरुन... तर असं झालं' पुस्तक का विमोचन

🕖 6.45pm | 7-6-2025📍Pune | संध्या. ६.४५ वा. | ७-६-२०२५📍पुणे.

#Maharashtra #DevendraFadnavis #Pune