स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
28.9K subscribers
4.82K photos
169 videos
1.22K files
3.93K links
स्पर्धा परीक्षेतील विध्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या संदर्भात चालवलेली एक राज्य व्यापी चळवळ.
संपर्क : 8668378583
Twitter : @Mpsc_Andolan

Facebook-https://www.facebook.com/mpscandolan/
Download Telegram
धन्यवाद दादा आपण पाठपुरावा करत आहात
आता जाऊ द्या ना घरी....
आमच्या घरचे रोज कॉल वर रडतात. सरकार #कोटा ला बस पाठवणार आहे मग आम्ही काय पाप केल आहे. का आमचा विचार होत नाहीये? मुलांची मनस्थिती खुप खराब होत चालली आहे लवकर निर्णय घ्यावा
@CMOMaharashtra @RRPSpeaks @satyajeettambe @OfficeofUT @AUThackeray @harshdudhe_MT #म https://t.co/ogzHiITcfL
🇮🇳लॉकडाउन मुळे घरी बसल्या-बसल्या स्पर्धा परीक्षा विध्यार्थ्यांसाठी अभिनव व मोफत उपक्रम 🇮🇳
तरी सर्व विध्यार्थ्यांनी चॅनेलच्या खालील link वर जाऊन मोफत lecture चा लाभ घ्यावा. मागील सर्व lectures खालील लिंकवर उपलब्ध आहेत.🙏

**अभिनव नवभारत चॅनेल : https://www.youtube.com/channel/UCS8QY37QgEKzmgck9FDauNQ

👉PSI कायदा संपूर्ण series :
https://www.youtube.com/playlist?list=PLABA7Q4eobiVJS6TRQ7Q7VyvTYJ_Jucz-

👉Polity ची संपूर्ण series :

https://www.youtube.com/playlist?list=PLABA7Q4eobiXCWHkQyTe2a2WHR85oWl7H

👉Science विज्ञान ची चालू असलेली lecture series:

https://www.youtube.com/playlist?list=PLABA7Q4eobiVU-LCyRbRvcPxBWl98Nq0h

👉Economics चालू lecture series :
https://www.youtube.com/playlist?list=PLABA7Q4eobiUPKNx6Gnn1dwxjaBLoIsgf

👉महाराष्ट्र भूगोल :

https://www.youtube.com/playlist?list=PLABA7Q4eobiUORfhDHtGfdWViSFTCDbcU

👉चालू घडामोडी =
https://www.youtube.com/playlist?list=PLABA7Q4eobiVfPgZ48R9yjw08be6MiSt1

👉राज्यसेवा मुख्य minor कायदे :
https://www.youtube.com/playlist?list=PLABA7Q4eobiXLB0G1WGn-M4DmhMBojfsq

👉मुलाखती साठी आवश्यक :https://www.youtube.com/playlist?list=PLABA7Q4eobiX66kbqMF3V9Wg0eYUL3_iV

👉विचारधारा मोटिवेशनल विडिओ :
https://www.youtube.com/playlist?list=PLABA7Q4eobiXKS1UDmlvycSBRp57XVOPO
मित्रांनो आपल्या लढ्याला यश आलेच. आता विध्यार्थ्यांनी आपल्या जिल्ह्यातील कलेक्टर ला कॉल करून आपण कुठे अडकला आहात ती माहीत द्यावी व सुखरूप घरी पोहचावे🙏🙏

Join us @mpscandolan
* राज्य सरकारच्या मुख्य सचिवांचे निर्देश
जागत थैमान घातलेय कोरोनाला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन घोषित करण्यात आला. मात्र यामुळे राज्यात विविध ठिकाणी इतर राज्यातील आणि महाराष्ट्रातील जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील विविध कामगार,पर्यटक,विद्यार्थी अडकले असल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मात्र आता या लोकांना आपल्या गावी जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून घोषित केले आहे. यामुळे ज्या ठिकाणी कामगार,पर्यटक आणि विद्यार्थी अडकलेले आहे. त्यानी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात संपर्क साधून परवानगी साठी अर्ज दाखल करायचा आहे.
काय आहे मार्गदर्शक सूचना वाचा
मुख्यमंत्री सचिवालय( जनसंपर्क कक्ष)

*प्रशासनाने काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश*

*लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना राज्याचा दिलासा*

*मंत्रालय नियंत्रण कक्ष देखरेख ठेवणार , जिल्हाधिकारी स्थलांतरणाची कार्यवाही करणार*


मुंबई दि ३०: लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरू, विद्यार्थी, यात्रेकरू तसेच इतर नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली असून सर्व जिल्हाधिकारी हे नोडल अधिकारी असतील तसेच मंत्रालयातील नियंत्रण कक्षाद्वारे यावर देखरेख ठेवली जाईल. याबाबतीत अतिशय काळजीपूर्व व जबाबदारीने सर्व यंत्रणांनी अंमलबजावणी करावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ०२२-२२०२७९९०, ०२२-२२०२३०३९ हे दूरध्वनी क्रमांक असून controlroom@maharashtra.gov.in हा ईमेल देण्यात आला आहे.

जिल्ह्यांचे नोडल अधिकारी त्यांच्या जिल्ह्यातील अडकलेल्या व्यक्तींची यादी तयार करून संबंधित इतर जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवतील. परराज्यातील लोकांच्या ये-जासाठी दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते ठरवतील.

जिल्हाधिकारी किंवा संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन यांचे पत्र असल्याशिवाय लोकांच्या कोणत्याही गटाला स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या व्यक्तीना कोविड किंवा इंफ्लूएन्झा सारखी लक्षणे नाहीत त्यानांच केवळ प्रवासाची परवानगी दिली जाईल. लक्षणे असल्यास निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे वैद्यकीय उपचार करण्यात येतील. इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या पत्रात संबंधित व्यक्तीस कुठलेही लक्षण नाही हे स्पष्टपणे लिहिलेले असणे आवश्यक करण्यात आले आहे.

ज्या राज्यात ती व्यक्ती जात आहे तेथील राज्याने ठरवलेल्या नियमांप्रमाणे वागणे व उपचार घेणे त्या व्यक्तीवर बंधनकारक असेल. ज्यांना स्वत:च्या वाहनाने जायचे आहे त्यांच्याकडे देखील अशाच पद्धतीने राज्यांची संमती पत्रे असणे आवश्यक आहे. प्रवाशाना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडे राज्याचा ट्रान्झीट पास असणे व त्यावर सर्व प्रवाशांची नावे व इतर माहिती असणे गरजेचे आहे. यामध्ये वाहनाचा निश्चित मार्ग, कालावधी असणेही बंधनकारक आहे.

पाठपुराव्यासाठी ज्या स्थळी जे प्रवासी उतरणार आहेत तशी यादी त्या त्या राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येणारा आहे. वाहतुकीला वापरण्यात येणारी वाहने जंतुनाशकांनी फवारलेली असावी तसेच वाहनात देखील सोशल डिस्टेंसिंग पाळायचे आहे. महाराष्ट्रात इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाईन कालावधीत राहावे लागेल याची दक्षता जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांनी घ्यावी. आलेल्या सर्व प्रवाशांची प्रथम वैद्यकीय तपासणी होईल. त्यानंतर सबंधित व्यक्तीस घरीच क्वारंटाईन किंवा संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल तसेच त्यांना केंद्र शासनाचे आरोग्यसेतू मोबाईल एप डाऊनलोड करण्यास सांगण्यात येईल जेणे करून त्यांना कायम संपर्कात ठेवता येईल.
#कोरोना_पार्श्वभूमीवर_घरापासून_दूर_असणाऱ्या_लोकांना_घरी_परतण्यासाठी_राज्य_शासनाच्या_मार्गदर्शक_सूचना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला. यावेळी कामानिमित्त घरापासून दूर असणारे अनेक लोक (विस्थापित मजूर, पर्यटक, भाविक, विद्यार्थी व अन्य लोक) आपल्या घरांपासून, राज्यापासून दूर अडकून पडले आहेत. अशातच अडकून पडलेल्या नागरिकांना आपापल्या घरी परतण्यासाठी आपापल्या घरी परतण्यासाठी केंद्रीय गृह खात्याच्या सूचनांनुसार राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपद्धती निश्चित केली आहे.

यात समाविष्ट बाबी अशा: .

1. राज्यातून बाहेर जाणारे आणि बाहेरच्या राज्यातून परत येणारे लोक या सर्वांचा समन्वय ठेवण्याची जबाबदारी मंत्रालयात महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ नितीन करीर, महिला बाल विकास प्रधान सचिव आय.ए कुंदन, तसेच संचालक , आपत्ती व्यवस्थापन अभय यावलकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या संदर्भातील कन्ट्रोलरूमचे संपर्क क्रमांक 022-22027990, 022-22023039 असे आहेत. तसेच, ई-मेल आयडी controlroom@maharashtra.gov.in हा आहे.

2. प्रत्येक जिल्ह्याचा जिल्हाधिकारी हा नोडल अधिकारी म्हणजे समन्वय अधिकारी असणार आहे. ज्या लोकांना आपण राहत असलेल्या ठिकाणांहून दुसरीकडे जायचे असेल त्यांनी ते राहत असलेल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण कोठे जाणार आहोत व तत्सम माहिती याची नोंद करायची आहे. यासंदर्भात आवश्यकता वाटल्यास लोकांनी तेथील जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा.
(सोबत राज्यातील जिल्हाधिकारी कार्यालय संपर्क क्रमांक यादी जोडली आहे)

3. जिल्हाधिकारी आपल्या जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या लोकांची जिल्हावार यादी तयार करणार आहेत. हे जिल्हाधिकारी त्यांनी तयार केलेली ही यादी इतर संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार आहेत.

4. परराज्यातील लोकांच्या प्रवासाबाबत दोन्ही राज्ये एकमेकांशी बोलून त्यांची रस्तेमार्गे कशी वाहतूक करायची ते ठरवणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी किंवा संचालक, राज्य आपत्ती व्यवस्थापन याचं पत्र असल्याशिवाय कोणालाही स्थलांतर करण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

5. यानुसार जे लोक प्रवास करणार आहेत, त्यांचं स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. त्यांच्यात लक्षण नसतील तरच त्यांना प्रवास करता येणार आहे. जर संबंधित व्यक्तींमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली तर त्या व्यक्तीस वैद्यकीय उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे इतर राज्यांतील किंवा जिल्ह्यांमधील प्रशासनाच्या परवानगी पत्रात संबंधित व्यक्तीस कोरोनाचे कुठलेही लक्षण नाही, हे स्पष्टपणे लिहिलेलं असणं आवश्यक आहे.

6. स्थलांतर करणारी व्यक्ती जर स्वत:च्या वाहनाने प्रवास करणार असेल तर त्यांच्याकडे पाठवणाऱ्या आणि स्वीकारणाऱ्या जिल्ह्यांची / राज्यांची संमती पत्रे असणं आवश्यक आहे.

7. लोकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांकडेही पाठविणाऱ्या राज्याचा/ जिल्ह्याचा ट्रान्झीट पास असणं आवश्यक आहे. या पासवर प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांची नावे, प्रवासाचा रूट , कालावधी, प्रवासाची तारीख असणंही बंधनकारक आहे. हा पासच नमूद प्रवासासाठीच सर्व शासकीय यंत्रणांकडून ग्राह्य धरला जाईल.

7. स्थलांतरीत होणारे प्रवासी ज्या-ज्या ठिकाणी उतरणार आहेत, त्याबाबतची यादी संबंधित राज्य किंवा जिल्ह्यांना देण्यात येणार आहे. प्रवाशांची वाहतुक ज्या वाहनांमधून करण्यात येणार आहे, ती वाहने सॅनिटायझर वापरून निर्जंतुकीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे.तसेच प्रवाशी बसताना सोशल डिस्टन्स ठेवणे आवश्यक आहे.

8. महाराष्ट्रात इतर राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. आलेल्या सर्व प्रवाशांची सर्वात आधी वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तर प्रवास करून आलेल्या व्यक्तीचा फॉलोअप स्थानिक आरोग्य विभाग ठेवणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीला घरात क्वॉरंटाइन करायचे की, संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवायचे याबाबतचा निर्णयही स्थानिक आरोग्य विभाग घेणार आहे. या व्यक्तींना केंद्र शासनाचे आरोग्य सेतू मोबाईल अँप डाउनलोड करून घेण्याबाबत सांगण्यात येईल, ज्यामुळे या लोकांचा फॉलोउप ठेवणे सोईचे होईल.

- ना. सतेज (बंटी) डी. पाटील
पालकमंत्री, कोल्हापूर
*पुणे जिल्ह्यातून गावी जाण्यासाठी १५ तहसील कार्यालयांप्रमाणे पाससाठी संपर्क क्रमांक व ई-मेल जाहीर*

पुणे – महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील आदेश क्र. डीएमयु/2020/सीआर/92/एम-1 दि. 30/04/2020 रोजीच्या आदेशान्वये कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव लाॅकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार/ पर्यटक/ विद्यार्थी यांना त्यांच्या मुळगावी पाठविणेबाबत आदेश प्राप्त झालेले आहे.

सदर आदेशानुसार परराज्यातील स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या मुळ गावी जाण्याची इच्छा असल्यास महाराष्ट्र शासनाने आवश्यक त्या उपाय योजना करुन कामगारांना मुळ गावी पोहोचविणेकामी वाहतुक व्यवस्था व तदनुषंगिक कार्यवाही करणेबाबत उक्त आदेशान्वये सुचना दिलेल्या असून कामगारांना परत मुळ गावी पाठविणेची परवानगी देणेत आलेली आहे. शासनाने सदर आदेशामध्ये खालील निकष विचारात घेऊन कार्यवाही करणेच्या सुचना दिलेल्या आहे.

१. ज्या कामगारांना आपल्या गावी मुळ परत जावयाचे आहे अशा कामगारांनी आपली नाव नोंदणी संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांचे कार्यालयाकडे नावनोंदणी इमेलदवारे व दुरध्वनी संदेशादवारे करणेत यावी.

२. ज्या लोकांना हालचाल करावयाची इच्छा आहे अशा लोकांची तपासणी केली जाईल आणि कोव्हीड-१९ लक्षणे किंवा लक्षणे न दर्शविणाऱ्यांनाच मुळ गावी जाणेची परवानगी जिल्हा प्रशासनाकडुन देणेत येईल.

३. पुणे जिल्हयातुन इतरत्र म्हणजे त्यांच्या मुळ गावी पाठविणेत येणाऱ्या कामगारांची वैदयकीय तपासणी करण्यात योईल . आणि त्यांच्यामध्ये कोव्हीड-१९ ची कोणतीही लक्षणे नसल्यासच त्यांना मुळ गावी पाटविणेबाबतची विनंती विचारात घेतली जाईल

४. मुळ गावी पतरणाऱ्या कामगारांची संख्या व त्यांची ठिकाणे विचारात घेऊन वाहतुक आराखडा तयार करणेत येईल. व संबंधित जिल्हयाचे जिल्हाधिकारी व राज्य प्रशासनाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर कामगारांना त्यांच्या मुळ गावाकडे रवाना करणेत येईल.

५. सर्व स्थलांतरीत कामगार, विदयार्थी व पर्यटक यांना आव्हान करणेत येते की, त्यांनी कोणतीही घाईगरबड न करता. संबंधित तालुक्याच्या नियंत्रण कक्षाशी दुरध्वनीवरुन अथवा इमेलदवारे आपली नाव नोंदणी करावी.

तालुका नियंत्रण कक्ष, संपर्क क्रमांक व ई-मेल आयडी ची यादी खालीलप्रमाणे

तहसील कार्यालय हवेली – 020-24472348 – tahsildarhavelipune@gmail.com
अपर तहसील पिंपरी चिंचवड – 020-27642233 – apartahsilpimparichinchwad@gmail.com
तहसील कार्यालय पुणे शहर – 020-24472850 – tahasildarpunecity@gmail.com
तहसील कार्यालय मावळ – 02114-235440 – tahsilmaval@gmail.com
तहसिल कार्यालय मुळशी – 020-22943121 – tehsilmulshi@gmail.com
तहसील कार्यालय शिरुर – 02138-222147 – tahsilshirur@gmail.com
तहसील कार्यालय भोर – 02113-224730 – tahsilbhor@gmail.com
तहसिल कार्यालय वेल्हा – 02130-221223 – tahsilvelhel@gmail.com
तहसील कार्यालय पुरंदर – 02115-222331 – tahsildarpurandar@gmail.com
तहसील कार्यालय जुन्नर – 02132-222047 – tahsil junnar@gmail.com
तहसिल कार्यालय आंबेगाव – 02133-244214 – tahasilambegaonp@gmail.com
तहसिल कार्यालय खेड – 02135-222040 – tahsilkhed@gmail.com
तहसील कार्यालय दौड – 02117-262342 – tahsildaundl@gmail.com
तहसिल कार्यालय इंदापूर – 02111-223134 – indapur tahsil@gmail.com
तहसील कार्यालय बारामती – 02112-224386 – tahsildarbmt@gmail.com
व्यवस्थित मेल करा त्यामध्ये नाव, पुण्यातील पत्ता, मुळगावचा पत्ता, वाहनाची व्यवस्था असल्यास त्याचे तपशील असावेत. शक्यतोवर आधी संबंधित कार्यालयात फोन करून माहिती घ्या मग मेल करा.


काही ठिकाणी नंबर अस्तित्वात नाही असे सांगत असल्यास कलेक्टर ऑफिसमध्ये फोन करून माहिती घ्या.

मित्रांनो, सध्या फक्त मेल करून ठेवा, धावपळ करू नका. संपूर्ण प्रक्रिया होण्यासाठी साधारणतः 3-4 दिवस लागणार आहेत.

collector.pune@maharashtra.gov.in

कलेक्टर ऑफिस
जे विध्यार्थी अडकलेले आहेत ते खूप गोंधळून गेले आहेत. विध्यार्थ्यांन दिलेले नंबर्स बंद येत आहेत. कुठे ई-मेल चुकले आहेत. ई-मेल नक्की कोणाला करायचा आहे. असे अनेक प्रश्न आहेत.त्यात विध्यार्थ्यांनचे हे हाल आहेत तर मजुरांचे काय हाल असतील.

यासाठी आम्ही सरकार कडे एक मागणी केली आहे की पूर्ण महाराष्ट्रसाठी एकच प्रोसेस तयार करावी. एखादे सॉफ्टवेअर तयार करून तिथेच सर्वांनी माहिती जमा करावी जसे की आपण एक्साम फॉर्म भरतो तसे. म्हणजे गोंधळ हा होणार नाही आणि सर्व जण सुखरूप घरी जातील. आम्ही हे लेटर पाठवणार आहोत आपण पण आपल्या मार्गाने यांच्यापर्यंत हे पाठवावे ही नम्र विनंती.

Join us @mpscandolan