AKSHARNAMA
867 subscribers
4.01K photos
3 videos
4.29K links
मराठीतलं पहिलंवहिलं डिजिटल डेली फीचर्स पोर्टल
Download Telegram
‘वक्फ’चा इतिहास, आधुनिक भारतामधील कायदे, त्यांत होत गेलेले बदल, नवीन कायद्यामधील वादाचे मुद्दे, आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका… - श्रीनिवास जोशी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7469
नवीन बिलामधील तिन्ही वादग्रस्त मुद्दे घटनाबाह्य आहेत, असे अनेक कायदे-पंडित म्हणत आहेत. आता यावर सर्वोच्च न्यायालय काय म्हणते आहे, यावर सगळ्यांची नजर लागून राहिलेली आहे. या कार्यक्रमात शेवटी आपण हा ‘लॅंड-जिहाद’ आहे का, याचा अंदाज घेऊ. त्यासाठी भारतात सुपीक जमीन किती आणि वक्फ बोर्डांकडे जमीन किती, हे पाहू. भारतात साधारण चाळीस ते पन्नास कोटी एकर सुपीक जमीन आहे, असे कृषिमंत्रालयाचे म्हणणे आहे...
‘हिंदाडी विस्तारवादा’चा आज उदंड झालेला दशानन, हा ह्या सगळ्या पाताळयंत्री आंतरप्रक्रियांचे एक रूप आहे! - सलील वाघ
https://www.aksharnama.com/client/article_detail/7470
जोवर सामाजिक आणि भाषिक सौदार्हाचे वातावरण देशभर, महाराष्ट्रात होते, तोवर त्रिभाषासूत्राचा विचार तितका खुपला नाही, जाचक वाटला नाही. पण आता सत्तेच्या अरेरावीचा जो स्तर, दर्जा आपल्याला दिसतो, त्या खुनशी वातावरणात हा त्रिभाषासूत्राचा विचार प्रचंड अनैतिक, अत्यंत त्याज्य आणि रद्दणीय झालेला आहे. मराठी भाषेच्या मुळावर उठलेला हा हिंदीधार्जिणा विचार अगदी खडबडून जागे होऊन तातडीने झटकून टाकला पाहिजे...
‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ - पोलीस-नक्षल-सरकार-भांडवलदार यात चिरडल्या गेलेल्या सर्वसामान्य आदिवासींचे म्हणणे ठासून सांगणारे, त्यांचा आवाज उजागर करणारे संशोधन - कुसुमताई अलाम
https://www.aksharnama.com/client/article_detail/7471
महाराष्ट्रात अतिसुरक्षित समुदायातील माडिया हा समुदाय या भागात आहे. हा समुदाय नक्षलप्रभावित परिसरात पोलीस-नक्षल संघर्षात होरपळून निघालाच आहे, पण आता खाण संघर्षात पिचला जातोय. त्याचा जीवनसंघर्ष मांडणारे तरुण लेखक-संशोधक अविनाश पोईनकर लिखित ‘सुरजागड : विकास की विस्थापन?’ हे पुस्तक वाचून प्रत्येक लोकशाहीवादी माणूस अस्वस्थ होईल...
पहलगाम हल्ल्याच्या संदर्भात राजकीय नेते कसे वागले, पत्रकार कसे वागले, सोशल मीडिया कसा वागला, त्याला लोकांचा प्रतिसाद कसा मिळाला? - श्रीनिवास जोशी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7472
देशाच्या रक्षणाचे मुद्दे अतिशय कॉम्प्लिकेटेड असतात. जे सरकार प्रश्न हाताळत आहे, त्याला थोडी ‘स्पेस’ द्यायची असते. अशा वेळी थोडा काळ टीका रोखून धरायची असते. कुणीही कसलाही संयम पाळायला तयार नाही. कुणालाच काहीही पडलेलं नाही. कुणीच कुणाला सोडायला तयार नाही. हिंदीमधली जी म्हण यू-ट्यूबवर वापरली जात आहे, ती अगदी खरी आहे : ‘आपदा में अवसर ढूंढना’!...
‘ऐवज’ म्हणजे किमती जिन्नस, जो नेहमी जपून ठेवला जातो. हे पुस्तकही त्याच्या नावाप्रमाणेच बहुमोल ठेवा आहे! - आ. श्री. केतकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7473
अभिव्यक्तीस्वातंत्र्याची जाण आणि तिचे महत्त्व जाणणाऱ्या एका कलाकाराच्या आठवणींचा ठेवा म्हणजे अमोल पालेकर यांचे ‘ऐवज : एक स्मृतिबंध’ हे पुस्तक. ‘ऐवज’ म्हणजे किमती जिन्नस, जो नेहमी जपून ठेवला जातो. हे पुस्तकही त्याच्या नावाप्रमाणेच बहुमोल ठेवा आहे. यात लेखकाने त्याच्या लहानपणीच्या आठवणींपासून नाटक-चित्रपट कारकिर्दीपर्यंतचे अनुभव सांगितले आहेत… तेही ‘जसे घडले तसे’ या स्वरूपात, मात्र ते कालानुक्रमे नाहीत.
आपल्याच मातीत वाढलेले तंत्रज्ञ जर जागतिक कीर्तीची स्थापत्यरचना करू शकतात, तर ‘मी का नाही?’ ही जाणीव आपल्या भावी पिढीमध्ये वाढावी, हा माझ्या कथेमागचा मूळ उद्देश आहे... - अभिजीत केतकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7474
इतिहासकारांनी शोधलेल्या संदर्भांची शृंखला एखाद्या कथेद्वारे जोडून त्यांचा मला समजलेला अर्थ वाचकासमोर मांडणाऱ्याची माझी भूमिका आहे. देवळाच्या पायरीवरचा पुष्परचनाकार फुलाफुलातून दोरा ओवून हार बनवतो, त्याचप्रमाणे विखुरलेल्या ऐतिहासिक घटनापुष्पांना गुंफून मी एक हार बनवला आहे एवढंच. हाराचं सौंदर्य वाढावं म्हणून त्यात काही काल्पनिक आणि प्रसंगरूपी पात्रं ओवली आहेत, परंतु खरं मूल्य आणि शोभा त्या फुलांचीच आहे...
वाचनाने सत्य आणि असत्याचा फरक कळतो. परिणामी धार्मिक उच्छाद मांडणाऱ्या संस्था, संघटनांचे अस्तित्व आपोआप धोक्यात येते! - अमित इंदुरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7475
या लढाईला देशाला वैचारिक गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवून देण्याची लढाई किंवा एक महत्त्वपूर्ण आंदोलन म्हणून याकडे बघितले पाहिजे. अर्थात ही लढाई विचारांची असल्यामुळे यात कोणत्याही धारदार शस्त्रांची गरज पडणार नाही. ही लढाई जिंकण्याकरता या देशातील महापुरुषांचे मानवतावादी विचार आपल्याला शस्त्र म्हणून वापरावे लागतील...
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने काय करावे? : तीन मोठे सैनिकी अधिकारी आणि दोन संरक्षणतज्ज्ञ यांच्या दृष्टीकोनातून... - श्रीनिवास जोशी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7476
पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेचा प्रश्न तयार झाला आहे. एक स्ट्राँग नेता म्हणून मोदीजींनी आपली प्रतिमा तयार केलेली आहे. आपण सत्तेवर आलो, तर एकसुद्धा हल्ला होणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं. या पार्श्वभूमीवर उरी, पठाणकोट, पुलवामा आणि आता पहलगाम असे हल्ले झालेले आहेत. उरी आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईक्स केले, तरी पहलगाम हल्ला झालाच. आता काहीतरी निर्णायक करायचा दबाब त्यांच्यावर आहे...
खरे तर सतीश आळेकरांनी या नाटकाचे नाव ‘ठकीशी संवाद’ याऐवजी ‘मध्यमवर्गाचे महानिर्वाण’ असे त्यांच्या अगोदरच्या नाटकाच्या धर्तीवर ठेवायला हवे होते! - ​​​​​​​​माया पंडित
https://www.aksharnama.com/client/article_detail/7477
संहितेतील हे विविध अर्थ आजची कलाकारांची पिढी कसे पाहते? त्यांच्या दृष्टीला हे नाटक, त्यातले विविध व्यंगार्थ कसे दिसतात? तरुण दिग्दर्शक अनुपम बर्वे याने या नाटकाचे सारे व्यंगार्थ ज्या पद्धतीने संहितेत अचूकपणे टिपून बाहेर साकारले आहेत, त्याच्या ‘दृष्टी’ला आणि ‘कर्ते’पणाला खरोखरीच दाद द्यायला हवी. अनुपमने अत्यंत कल्पकपणे नाटकातील अनेक आशयसूत्रे प्रखरपणे बाहेर काढली आहेत...
आता अंतिम समयी तरी आपण आयुष्यात निश्चितपणे काय केलेत हे सांगा, असे ठकी विचारते, आणि एका फालतू विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधकाची ते सांगता सांगता पुरेवाट होते! - सतीश बागल
https://www.aksharnama.com/client/article_detail/7478
साहित्यिक/विचारवंतानी २०१४ नंतरच्या काळात काही निश्चित भूमिका घेतलेली दिसत नाही, हे वारंवार नाटकाच्या निमित्ताने पुढे येत राहते. यातच नाटकाचे यश आहे. मात्र असे प्रत्यक्ष न म्हणता त्याचे फक्त सूचन केले आहे. भारतातील व्यवस्थेवर भाष्य करताना सलमान रश्दी यांनी त्यांच्या ‘मिडनाईट्स चिल्ड्रेन’मध्ये १५ ऑगस्ट १९४७ला जन्मलेले सलीम सिनाई हे पात्र उभे केले होते, तसेच काहीसे हे पात्र आहे. संपूर्ण नाटकभर निरर्थकता आणि अर्थपूर्णता, त्याचप्रमाणे क्षुल्लक आणि गंभीर यातील तणाव जाणवत राहतो.
नमस्कार वाचकहो,
‘अक्षरनामा’ची पत्रकारिता केवळ तुम्हा वाचकांच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. त्यामुळे आम्हाला तुमच्या सक्रिय पाठबळाची नितांत गरज आहे.
कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ काही फारसा बरा नाही. तरीही आम्ही गेल्या आठ वर्षांपासून ‘अक्षरनामा’ हे ऑनलाईन मराठी फीचर पोर्टल चालवतो आहोत. दुर्दैवाने अजूनही वाचकांचा वर्गणीबाबत फारसा समाधानकारक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे जून २०२४पासून ‘अक्षरनामा’ आम्ही साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित करत आहोत, आणि ‘अक्षरनामा’ची वर्गणीही निम्म्यावर आणली आहे.
-------------------------------------------
‘अक्षरनामा’ची वर्गणी -
➡️ मासिक : २५० रुपये
➡️ अर्धवाषिक : १२०० रुपये
➡️ वार्षिक : २५०० रुपये.
-------------------------------------------
तुम्ही अशी वर्गणी भरू शकता :

ऑनलाईनसाठी वर्गणी भरण्यासाठी -
https://bit.ly/3R43BMd
-------------------------------------------
नेट बँकिंगद्वारे वर्गणी भरण्यासाठी -
Bank Name - AKSHARNAMA ONLINE PORTAL
SBI A\C – 41042874215
IFSC – SBIN0007124 -------------------------------------------
Gpayद्वारे वर्गणी भरण्यासाठी -
सोबतचा QR कोड स्कॅन करूनही तुम्ही वर्गणी भरू शकता.
-------------------------------------------
- संपादक,
www.aksharnama.com
E-Mail – editor@aksharnama.com
अजून भारताने अधिकृतरित्या ‘युद्ध’ही घोषित केलेले नाही, पण भारतीय टीव्ही मीडियाने मात्र पाकिस्तानला बेचिराख करून टाकले आहे! - अनिरुद्ध राम निमखेडकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7479
सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अतिशय तणावपूर्ण टप्प्यावर आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील काही दहशतवादी तळांवर ‘टार्गेटेड स्ट्राइक’ केल्यामुळे राजकीय आणि लष्करी पातळींवर तीव्र हालचाली सुरू आहेत. तथापि, या कारवाईनंतरही भारताने अधिकृतरित्या ‘युद्ध’ घोषित केलेले नाही, पण भारतीय टीव्ही मीडिया मात्र युद्धाचे वातावरण निर्माण करत आहे...
महात्मा गांधींची हत्या पं. नेहरू आणि सरदार पटेल या दोन नेत्यांसाठी फार मोठा धक्का होता. दोघांनी मतभेद बाजूला सारून एकदिलाने काम करायचे ठरवले, पण... (पूर्वार्ध) - अभय दातार
https://www.aksharnama.com/client/article_detail/7480
आपल्या आणि पटेल यांच्यातील मतभेदांबाबतचे एक सविस्तर टिपण नेहरूंनी ६ जानेवारी १९४८ रोजी म. गांधींना सादर केले. हिंदू-मुस्लीम प्रश्न आणि आर्थिक धोरण यांच्याबाबत आपल्यात मतभेद आहेत, ही बाब त्यांनी या टिपणात नोंदवली. अय्यंगारांच्या भेटीचा उल्लेख करत पंतप्रधान यांना सरकारच्या कारभारातील बाबींची चौकशी किंवा देखरेख करण्याचा अधिकार आहे किंवा नाही, हा मुद्दा उपस्थित केला. तसा तो नसेल तर पंतप्रधान हे केवळ नामधारी ठरतील...
---------------
देश उभारणीच्या कार्यात पटेल प्रांतिक पातळीवरच्या नेतृत्वाला आपले सहकारी मानत आणि देशासमोरील आव्हाने कशी एकमेकांमध्ये गुंतलेली होती, याचे पक्के भान त्यांना होते (उत्तरार्ध) - अभय दातार
https://www.aksharnama.com/client/article_detail/7481
‘आता थांबायचं नाय!’ : कुटुंबासोबत बसून चित्रपटगृहात पाहावा, असा एक नितळ, प्रामाणिक चित्रपट - संदेश कुडतरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7482
आता थांबायचं नाय!’ या मराठी चित्रपटाची मला जमेची बाजू वाटते, ती ही की, या चित्रपटात एकच एक विशिष्ट नायक नाही. इथे अनेक जण नायक आहेत. खलनायकही बरेच आहेत. त्या दृष्टीने पाहता ही कुणा एका माणसाच्या विजयाची कथा न राहता ती एका समाजाच्या विजयाची कथा होते. त्यामुळेच अधिक तीव्रतेने भिडते. खूप हसवते आणि बऱ्याच ठिकाणी हसवता हसवता डोळ्यांत पाणीही आणते. चित्रपट कुठेही मेलोड्रॅमॅटिक न होता प्रामाणिक आणि निरागस वाटत राहतो...
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून एका बाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला अमेरिका, अशा ‘पाटा-वरवंट्या’खाली युरोप चिरडला जात आहे - मोहन द्रविड
https://www.aksharnama.com/client/article_detail/7483
युरोपमधील एके काळच्या दोन सामर्थ्यवान देशांतल्या निवडणुका नुकत्याच जवळजवळ एकाच वेळी पार पडल्या. दोन्ही देशांत सत्ताधारी पक्षांचा दारुण पराभव झाला. त्यावरून ‘सत्ताधारी पक्षांविरुद्ध बंड’ (anti-incumbancy) असं उथळ निरीक्षण राजकीय विश्लेषकांनी केलं आहे. हे बंड कुठल्या एका पक्षाविरुद्ध नसून परिस्थितीविरुद्ध होतं. आणि या परिस्थितीला सर्व मुख्य पक्ष जबाबदार आहेत, या भावनेतून जनतेनं सर्वच मुख्य पक्षांना झिडकारलं...
पहलगामच्या पलीकडे जाऊन आपण दहशतवादाविरुद्धच्या युद्धात कसे योगदान देऊ शकतो आणि ‘काश्मिरीयत’ची भावना व काश्मीरच्या लोकांसोबत ‘राष्ट्रीय एकता’ कशी मजबूत करू शकतो? - अभय वैद्य
https://www.aksharnama.com/client/article_detail/7484
पहलगाम दुर्घटनेमुळे काश्मीरमधील पेच आणखी वाढला आहे. त्याच वेळी हेही ध्यानात घ्यायला हवे की, दहशतवादाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी केवळ लष्करी कारवाई पुरेशी ठरणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य स्थिती पुन्हा प्रस्थापित करण्यात आणि काश्मीर व इतर प्रदेशांतील लोकांमधील दुरावा संपवण्यात भारताच्या नागरी समाजाची भूमिका महत्त्वाची आहे...
स्पर्धा परीक्षांच्या कृष्णविवरातून बाहेर कसे पडावे, हे सांगणारा उत्कृष्ट आणि मार्गदर्शक संदर्भग्रंथ - राहुल विद्या माने
https://www.aksharnama.com/client/article_detail/7485
‘मी अधिकारी’ हे संशोधनात्मक पुस्तक स्पर्धा परीक्षेच्या कृष्णविवरावर प्रकाशझोत टाकून त्यातून बाहेर पडण्याचे दृष्टीकोन बदलाचे गुरुत्वाकर्षण बल वाढवण्याचे काम करते. अपयशामुळे सर्वांच्या उपेक्षेचे धनी झालेल्यांच्या निराशेवर फुंकर घालण्याचा हा कौतुकास्पद प्रयत्न आहे. ही कहाणी विजिगीषू जिद्दीने निराशेवर मात करून पुढे आलेल्या आणि आपला स्वतंत्र मार्ग शोधणाऱ्या लढवय्यांची आहे...
युद्ध हाच पाकपुरस्कृत आतंकवादावरील उपाय आहे का? तज्ज्ञ काय म्हणतात पहा... - श्रीनिवास जोशी
https://www.aksharnama.com/client/article_detail/7486
इतिहास बघितला तर आतंकवाद आणि प्रादेशिक अस्वस्थता हे प्रश्न काही दशके टिकले तरी ते कायमस्वरूपी नसतात. ज्या देशाचा आर्थिक विकास होत राहतो, तोच देश शेवटी या बाबतीत यशस्वी होतो. आज पाकिस्तान भिकारी झाला आहे. जसा जसा पाकिस्तान आर्थिक गर्तेत चालला आहे, तसा तसा कश्मीर घाटीमधील त्याचा पाठिंबा कमी कमी होत गेला आहे. भारतासारख्या संपन्न होत चाललेल्या देशाचा हात सोडून पाकिस्तानसारख्या भिकारी देशाबरोबर कोण जाईल?...
काम्यूने ‘निरर्थकता’ आणि ‘अस्तित्ववाद’ या आपल्या तात्त्विक विचारधारेचा उपयोग “दि आऊटसायडर” या कादंबरीत उत्तमरित्या केला आहे! - अरुण नेरुरकर
https://www.aksharnama.com/client/article_detail/7487
सगळ्यापासून दुरावलेला, समाजासाठी अपरिचित असणारा नायक ‘त्रयस्थ’ असणार, हे स्वाभाविक आहे. काम्यूने तो ‘जसा’ आहे, ‘तसा’ वाचकांसमोर सादर केला आहे. काम्यू नायक मेर्सोकडे एक ‘त्रयस्थ’ म्हणून पाहतो. मेर्सो खरंच कसा आहे, हे ठरवण्याचे दायित्व वाचकांचे आहे. काम्यू म्हणाला होता : ‘meursqult is the only christ we deserve’...