𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮
19.4K subscribers
6.7K photos
153 videos
938 files
2.71K links
Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.
Download Telegram
❤️ सर्व एकच ठिकाणी देऊन Final List पर्यंत घेऊन जाणारी महाराष्ट्रातील एकमेव Batch.....🧠

🏆प्रमुख मार्गदर्शक:Adv Dr Ajit Kakde


🏆Upsc Marks

🥇Essay 136
🥈Ethics 116
🥉Anthro 272


❤️Orientation Videos❤️

https://youtu.be/YMQfZ9nutp0?si=dy4wUA7ePwN_UExb

❤️Demo Video❤️

https://youtu.be/8jPRclBeKHU?si=p6SIGp4XjVN_9q1S

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
6💯2🔥1
राजकीय इतिहास


✔️(अ) सातवाहन राजवंश


सातवाहन राजवंश हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश होय. त्याचा इतिहास अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. सातवाहनांच्या पूर्वीचा महाराष्ट्राचा इतिहास आपणांस फारसा माहीत नाही. त्यापूर्वीच्या अशोकाच्या साम्राज्यात महाराष्ट्र सामील झाला होता खरा, पण त्याकाळी तेथे रठिक, भोजक आणि पेतेनिक हे लहानमोठे सरंजामदार सत्ताधारी होते, एवढीच माहिती अशोकाच्या लेखांवरून आपणांस मिळते. त्यांपैकी एकाही व्यक्तीचे नाव आपणांस माहीत होत नाही, मग त्यांच्या कारकीर्दीतील घटना कशा समजणार? सातवाहनांच्या उदयापासून आपणांस महाराष्ट्राचा राजकीय इतिहासच नव्हे तर त्यांच्या राज्यातील राज्यशासन पद्धति, धार्मिक व सामाजिक परिस्थिति, स्थापत्य, शिल्प व चित्रकला, साहित्यनिर्मिति इत्यादिकांविषयी थोडीबहुत माहिती मिळू लागते, यात त्या राजवंशाचे महत्त्व आहे.

✔️हा राजवंश केवळ कालक्रमाने पहिला नाही तर कर्तृत्वानेही तो अग्रेसर आहे. त्याचे राज्य दक्षिण भारताच्या बहुतांश भागावर पसरले होते एवढेच नाही तर काही कालखंडांत मध्य भारताचाही कांही भाग त्याच्या अमलाखाली आला होता. या राजवंशाचे विस्तृत साम्राज्य साडेचार शतके कमीअधिक प्रमाणात टिकून राहिले, यातही त्याचे वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी सामान्यतः भारतीय राजवंश दोन अडीच शतकेच टिकत असत. साडेचारशे वर्षे अव्याहतपणे राज्य करीत असलेला भारतीय सम्राटवंश दुसरा झाला नाही.

✔️सातवाहनांनी विस्तृत प्रदेशांवर दीर्घकाळ राज्य केले यातच त्यांची बहादुरी नाही. त्यांनी आपल्या काळात संस्कृत व प्राकृत वाङमय, स्थापत्य, शिल्प व चित्रकला यांत संस्मरणीय अशी प्रगति केली, व्यापारउदीमांस उत्तेजन देऊन जनतेला समृद्धीचे व सौख्याचे जीवन प्राप्त करून दिले, परकीयांशी प्राणपणाने लढून आपले स्वातंत्र्य परत मिळविले आणि स्वदेशाला भाग्याचे दिवस पुनः दाखविले. या सर्व कारणांमुळे सातवाहन राजवंशाला महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे.

✔️पण या राजवंशाच्या इतिहासाची साधने अत्यल्प आहेत. साधारणपणे राजवंश जितका प्रचीन तितकी त्याच्या इतिहासाची साधने कमी, असा प्रकार भारतीय इतिहासात आढळतो. तेव्हा सातवाहन राजवंश दक्षिण भारतात सर्वांत प्राचीन असल्यामुळे त्याच्याविषयी माहिती देणारी साधने अत्यल्प असली तर नवल नाही. तशात प्राचीन काळी भारतीयांनी इतिहास लिहून ठेवण्याची खबरदारी न घेतल्यामुळे तो अनेक साधनांवरून कणाकणाने जमवावा लागतो. पुराणांत सातवाहन काल अखेरपर्यंत राजवंशावली दिल्या आहेत खऱ्या, परंतु गेल्या दीड हजार वर्षात त्यांत अनेक पाठभेद घुसल्यामुळे त्यायोगे खऱ्या इतिहासाच्या ज्ञानाला साहाय्य होण्याऐवजी अडथळाच जास्त होतो. तथापि, गेली दीडशे वर्षे भारतीय व परदेशीय संशोधकांनी अविरत परिश्रमाने ऐतिहासिक साधने जमवून व उपलब्ध साधनांचा चिकित्सक रीतीने अभ्यास करून सातवाहन राजवंशाचा बराचसा इतिहास जमविला आहे. तो येथे द्यावयाचा आहे.

✔️कोणत्याही राजवंशाच्या इतिहासाविषयी विचार करताना प्रथम प्रश्न उपस्थित होतो तो त्याच्या कालाचा. सातवाहनांच्या बाबतीत हा प्रश्न फार जटिल बनला आहे आणि त्याविषयी विविध मते प्रचलित झाली आहेत.

@MpscMadeSimple
#MpscMains
#MpscPrelims
#MpscHistory
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🙏43🔥1
#Oracle of The Day


*सन्मानाने जगावे पण*
*कोणाला तुच्छ न समजावे*
*पैसा जरी अनमोल परी*
*कधीतरी माणसाने माणसाचे*
*हळवे हृदय ही पाहावे..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯107🔥1
❤️"धुरंधर"- सर्व एकच ठिकाणी देणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच

✔️Limited Seats
✔️Enroll now

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👌3🔥1
Carpe Diem


✔️2025 हे वर्ष संपत आले आहे.
यामध्ये आपण खूप संघर्ष केला आहे.

✔️संघर्ष स्वतःसोबत, स्वतःच्या परिस्थिती सोबत,वेळोवेळी अपमानित करणाऱ्या समाजा सोबत,टोमणे मारणाऱ्या मित्रां सोबत,यशात अडथळे निर्माण करणाऱ्या System सोबत आणि कठीण काळात सोडून जाणाऱ्या व्यक्तीसोबत....🧠

✔️क्षमते पेक्षा ही जास्त संघर्ष आपण केलेला आहे.त्यामुळे या पेक्षा कठीण काळ आता कधीच येणार नाही.

✔️थोडा संयम ठेवून संघर्षाची लढाई अशीच चालू ठेवा.2026 हे आपल्या यशाचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहल्याशिवाय राहणार नाही.

✔️सर्वांना नवीन वर्षाच्या यशस्वी शुभेच्छा 💐💐💐

- Ex Asst Comndt Adv Dr Ajit D Kakde

@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
18👍4🔥2🙏2
न्या.रानडे:आधुनिक महाराष्ट्राचे जनक

✔️पुण्याच्या सार्वजनिक सभेने मात्र राजकीय जागृतीचे कार्य अतिशय हिरीरीने व सातत्याने केले. याचे श्रेय बऱ्याच अंशी या सभेचे चिटणीस गणेश वासुदेव जोशी आणि त्यांचे प्रेरणास्थान असलेले न्या. रानडे यांना आहे. दादाभाईप्रमाणे रानड्यांचा पैचारिक पिंड ब्रिटिश उदारमतवादावर पोसला गेला होता; आणि आपल्या सार्वजनिक जीवनाचा प्रारंभही त्यांनी समाजसुधारणा कार्याने केला. परंतु समाजजीवनाच्या कोणत्याही एका अंगावरच लक्ष केंद्रित न करता, त्यांनी आपल्या समन्वयात्मक व व्यापक दृष्टीकोनामुळे समाजजीवनाच्या सर्व अंगोपांगाचे परीक्षण केले आणि सर्वांगीण सुधारणेचा पुरस्कार केला. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिनिष्ठा, उपयुक्ततावाद, मानवतावाद व लोकशाही या तत्त्वांची बैठक त्यांनी सर्वांगीण सुधारणेला दिली. कोणतीही सुधारणा ही बाह्य वस्तू नाही व म्हणून वरून लादलेली सुधारणा चिरस्थायी होऊ शकत नाही असे सांगून, विवेकबुद्धीच्या आधारे उत्क्रांतीच्या मार्गाने सुधारणा घडवून आणण्याचा त्यांनी आग्रह धरला. आधुनिक विचारांच्या अनुषंगाने भारतीय समाजव्यवस्थेला इष्ट असे वळण सावकाशपणे देणे श्रेयस्कर आहे ही त्यांची श्रद्धा होती. मात्र बुद्धिनिष्ट भूमिकेतून समाज सुधारणेवा पुरस्कार करताना त्यांच्या उपजत अशा समतोल, सहिष्णु व समन्वयात्मक प्रवृत्तीमुळे परंपरानिष्ठ समाजावर लोकहितवादींप्रमाणे ते टीकेचे आसूड ओढू शकले नाहीत. तसेच अनिष्ट चालीरीती टाकून याच्या असे सांगताना जुनी चांगली मूल्ये त्यांनी त्याज्य मानली नाहीत, उलट ती टिकवून धरण्याचा प्रयत्न त्यांनी केला. यामुळे एखादे वेळी परंपरेशी नको ती तडजोड करण्याची पाळी त्यांच्यावर आली.

न्या. रानज्यांच्या सामाजिक विचाराप्रमाणे त्यांच्या राजकीय विचारांचा उगमही पाश्चात्य उदारमतवादात होता, व्यक्तिस्वातंत्र्य, नागरिकांचे मूलभूत हक्क, घटनात्मक शासनपद्धती, कायद्याचे राज्य, लोकशाही, सनदशीर राजकरण व उत्क्रांतीच्या मार्गाने विकास ही उदारमतवादी मूल्ये त्यांनी पुरस्कृत केली. जास्तीत जास्त लोकांचे अधिकाधिक सुख हे राज्यशासनाचे कर्तव्य आहे असे मानून कल्याणकारी राज्याचा विचार त्यांनी प्रतिपादित केला. इंग्रजी राजवट हे ईश्वरी वरदान आहे असे त्यांनी मानले नाही, परंतु इंग्रजी राजवटीमुळे आधुनिक युगाचा परिचय होण्याची संधी योगायोगाने भारतीयांना लाभली आहे, तिचा देशोन्नतीसाठी पुरेपूर फायदा करून घ्याचा व पाश्चात्यांच्या प्रागतिक विचारांच्या अनुषंगाने भारतात सुधारणा मजवून आणावी अशी त्यांची भूमिका होती. परकीय राज्यकर्त्यांकडून मूलभूत राजकीय अधिकार मिळविण्याचे साधन म्हणून लोकजागृतीचे व लोकशिक्षणाचे महत्त्व त्यांनी ताडले आणि म्हणूनच सार्वजनिक सभेमार्फत जनतेच्या गाडाऱ्याऱ्यांची व मागण्यांची निवेदने त्यांनी वेळोवेळी सरकारकडे धाडण्यास प्रेरणा दिली. दक्षिणेत १८७५-७६ साली झालेल्या शेतकऱ्यांच्या दंग्यांचे मूळ कारण सारावसुलीचे कडक धोरण आहे हे त्यांनी सभेमार्फत माहिती गोळा करून सरकारच्या निदर्शनास आणून दिले. फौजदारी खटल्यात ज्यूरींचे हक्क, रेल्वे उतारूंच्या तक्रारी, म्युनिसिपालटीत लोकनिर्वाचित सदस्यांचा अंतर्भाव, संस्थानिक व सरकार यांचे परस्पर संबंध अशा अनेक विषयांवरही त्यांच्या प्रोत्साहनामुळे सार्वजनिक सभेने सरकारकडे वेळोवेळी सूचना पाठविल्या. १८७७ साली वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करणारा कायदा करण्याचा सरकार प्रयत्न करीत असता, त्याला विरोध करण्याच्या हेतूने पत्रकारांना संघटित करण्यासाठी सार्वजनिक काकांनी देशभर दौरा केला. महाराष्ट्रातील दुष्काळांचे मूळ कारण धान्यांची टंचाई हे नसून दारिद्र्य हे आहे व या दारिद्र्यायाला सरकारचे आर्थिक धोरण जबाबदार आहे हे सिद्ध करणारे अहवाल सभेने प्रकाशित केले. तसेच दिल्ली दरबाराचे वेळी सभेमार्फत ब्रिटिश राजसत्तेला मानपत्र पाठवून त्यातून भारतीयांच्या राजकीय हक्कांची मागणी करण्यामागील प्रेरणा न्या. रानडे यांची होती. सरकारला प्रजेच्या दुःसह परिस्थितीची जाणीव करून देऊन ती सुधारण्यास प्रवृत्त करणे आणि राजकीय हक्कांची जाणीव जनतेला करून देऊन ते संपादन करण्यासाठी सनदशीर मार्गाने चळवळ करण्यास प्रवृत्त करणे असे न्या. रानड्यांचे सार्वजनिक सभेमार्फत चालविलेल्या कार्याचे दुहेरी उद्दिष्ट होते.

ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या न्यायप्रियतेवरील श्रद्धेने रानड्यांना अंधश्रद्ध बनविले नाही. राज्यकत्यांनी चालविलेल्या अर्थशोषणाची त्यांना पूर्ण जाणीव होती व त्याच्या समाजावरील दुष्परिणामांचीही त्यांना कल्पना होती. म्हणून यावर स्वदेशीचा तोडगा त्यांनी सुचविला आणि देशी उद्योग सुरू करण्याचे आवाहन त्यांनी देशबांधवांना केले.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
8👌1
तसेच ब्रिटिश उदारमतवादात अनुस्यूत असलेले आर्थिक क्षेत्राबाबतचे शासकीय तटस्थेचे तत्त्व भारताला हानीकारक ठरल्याचे ओळखून, भारतात हे तत्त्व लागू केले जाऊ नये, उलटपक्षी सरकारने येथील उद्योगांना व व्यापाराला संरक्षण व उत्तेजन देण्याचे धोरण अंगिकारावे असे आवाहन त्यांनी केले. यावरुन न्या. रानळ्यांचा उदारमतवाद डोळस होता हे सिद्ध होते.

अशा प्रकारे न्या. रानख्यांनी सामाजिक, आर्थिक व राजकीय सुधारणा एकसमयावच्छेदेकरून व्हायला पाहिजेत असा आग्रही विचार मांडला आणि त्यादृष्टीने कार्य केले. आपल्या लिखाणाने व भाषणांनी त्यांनी अचेतन झालेल्या महाराष्ट्रीय समाजात नवविचारांचे रक्त ओतून समतोल विवेकी सुधारणेचा मार्ग दाखविला. प्रार्थना समाज, सार्वजनिक सभा, वक्तृत्त्वोत्तेजक सभा, औद्योगिक परिषद इत्यादी संस्थांद्वारा महाराष्ट्रीय समाजाला त्यांनी बहिर्मुख, समाजाभिमुख बनविले, व संस्थात्मक कार्याची उभारणी केली. राजकीय अधिकारांची जाणीव निर्माण करून व ते प्राप्त करण्याचे मार्ग दाखवून महाराष्ट्रात त्यांनी राष्ट्रवादाचा भक्कम पाया घातला. म्हणूनच ते 'आधुनिक महाराष्ट्राचे जनक' अगर 'महाराष्ट्रातील आधुनिक राष्ट्रवादाचे प्रवर्तक' ठरतात. "महाराष्ट्र देश ज्यावेळी एक थंड गोळा होऊन पडला होता.... त्या थंड गोळ्यास कोणत्या रीतीने उब दिली असता तो पुन्हा सजीव होईल व हातपाय हलवू लागेल याचा रात्रंदिवस एकसारखा विचार करून अनेक दिशांनी, अनेक उपायांनी, अनेक रीतींनी त्यास पुन्हा सजीव करण्याचे दुर्धर काम अंगावर घेऊन त्याकरिता जिवापाड जर कोणी मेहनत केली असेल तर ती प्रथमतः माधवरावजींनीच केली, असे गौरवोद्‌गार मतभिन्नतेमुळे त्यांच्यावर अधूनमधून टीकेचे प्रहार करणाऱ्या टिळकांनी काढून त्यांच्या मौलिक योगदानाचे पुरेपूर माप त्यांच्या पदरी टाकले आहे. सरकारी नोकरीमुळे रानज्यांच्या सार्वजनिक कार्यावर अनेक बंधने पहली, देशसेवेला पूर्णतः वाहून घेणेही त्यांना जमले नाही. परंतु आजन्म देशसेवेचे कठोर व्रत घेणाऱ्या व्यक्तींचे मोल मोकळ्या मनाने मान्य करण्याचे मोठेपण मात्र त्यांच्या ठिकाणी निश्चितच होते. १८७९ साली राष्ट्रीय शिक्षण प्रसाराच्या हेतूने पुण्याला शाळा काढण्याचा टिळक आगरकरांचा संकल्प त्यांच्या कानी आला तेव्हा, "आजवर सार्वजनिक कार्य सरकारी नोकरीतील मंडळींनी फावल्या वेळी केले. ही तरुण मुले ते जीवनकार्य म्हणून करणार आहेत, त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. असे उद्‌गार त्यांनी काढले. यावरुन सार्वजनिक सेवाकार्य जीवनकार्य म्हणून अंगिकृत करण्याचे महत्त्व व निकड ते ओळखून होते हे स्पष्ट दिसते.

@MpscMadeSimple
#MpscMains
#MpscPrelims
#MpscHistory
6🔥2
उत्तर लेखन कौशल्य

✔️Answer Writing Skills

✔️Free BootCamp

📹YouTube Live📹

✔️29 Dec 6 PM

📹
YouTube Link
📹

https://youtube.com/live/no38ejoVKIU?feature=share
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
2🔥2👌2
MPSC Exam Mantra
 
✔️We Are HIRING
 
✔️Join Our Team
We Need Fresh Minds!

😄Open Positions😄

✔️Multiple Positions

📞 8983537381
/8788657440
📧
mpscexammantra@gmail.com
📲 [Telegram Handle] @MpscExamMantraoffice

🔴 ज्यांना खरच काही शिकायचं आहे, आपल्या सोबत जोडायचं आहे, विद्यार्थ्यांसाठी काही contribute करायचं आहे त्यांनी नक्की विचार करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥4👌2
Answer Writing Bootcamp Dr Ajit Sir.pdf
20.6 MB
उत्तर लेखन Bootcamp

✔️या Pdf मध्ये खालील बाबींवर सविस्तर चर्चा केलेली आहे.
✔️प्रभावी उत्तर लेखन कसे करावे?
✔️उत्तराची सुरवात कशी करावी?
✔️Types Of Introduction
✔️Smart Answer कसे लिहावे?
✔️उत्तरमधील Hook म्हणजे काय?

@MpscMadeSimple
#MpscMains
#MainsAnswerWriting
#MpscExamMantra
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
4🔥3👌2
#Oracle of The Day


*तुमच्या आयुष्यात तुम्हाला कानात*
*गोष्टी सांगणारे खूप जण भेटतील*
*पण तुम्ही स्वतः ऐकणारे नेहमीच*
*हुशार आणि सजक असले पाहिजे*
*म्हणजे मतभेद नावाचे काटेरी वृक्ष*
*कधी जन्मच घेणार नाही..!!*

⭐️*!! शुभ सकाळ !!*⭐️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔥105💯4👌1
❤️"धुरंधर"- सर्व एकच ठिकाणी देणारी महाराष्ट्रातील एकमेव बॅच

✔️Limited Seats
✔️Enroll now

❤️ Registration

@mpscexammantraoffice

🟢WhatsApp🟢

+918983537381 http://wa.link/ihqc7n

Android App

https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple
@MpscMadeSimple
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
5🔥1🙏1