MPSC Science
67K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शहरीकरणामुळे वाढतोय कॅन्सर

वाढत्या शहरीकरणाबरोबरच जीवनशैलीशी ‌निगडीत आजार, विशेषतः लठ्ठपणा वाढत आहे. लठ्ठपणामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडत जाते. परिणामी कॅन्सरचा धोका वाढत आहे. लठ्ठपणामुळे किमान सहा प्रकारच्या कॅन्सरचा धोका आहे. देशात सध्या एक लाख जणांमागे सरासरी शंभर इतके कॅन्सरचे प्रमाण आहे. पण वाढत्या शहरीकरणामुळे हेच प्रमाण एक लाखात तीनशेवर जाण्याचा धोका टाटा कॅन्सर रुग्णालयातील तज्ज्ञांनी दिला आहे.

देशात वाढत्या शहरीकरणाबरोबर जीवनशैलीशी निगडीत आजारांचे प्रमाण वाढत आहे. बदतल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा वाढत आहे. परिणामी, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक, ऑर्थरायटिस अशा आजारांसोबत कॅन्सरचा धोका वाढतो, असा इशारा टाटा मेमोरिअल सेंटरचे संचालक व प्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ डॉ राजेंद्र बडवे यांनी दिला.

ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात लठ्ठपणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्रामीण भागात लठ्ठपणाशी ‌निगडीत कॅन्सरचे प्रमाण कमी आहे.

शहरांमध्ये एक लाख जणांमध्ये शंभर जणांमध्ये कॅन्सर आढळून येतो, गावांमध्ये हेच प्रमाण एक लाखामध्ये ४५, तर मध्यम गावांमध्ये ६० ते ७० असल्याची आकडेवारी डॉ. बडवे यांनी दिली.

इंग्लंड- अमेरिकेत धोका अधिक

इंग्लंड व अमेरिकेत कॅन्सरचे प्रमाण एक लाखामध्ये तीनशे आहे. भारतात शहरीकरणामुळे भविष्यात हे प्रमाण तीनशेवर जाण्याचा धोका डॉ. बडवे यांनी व्यक्त केला. शहरीकरण गरजेचे आहे, पण त्याचबरोबर आरोग्याचे धोके वाढण्याची शक्यता असल्याने लठ्ठपणावर मात करणे गरजेचे आहे, असे डॉ. बडवे म्हणाले.

ग्रामीण भागात गर्भाशय कॅन्सरचा धोका

वैयक्तिक अस्वच्छता व संसर्गामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचे प्रमाण शहरी भागाच्या तुलनेत तीन ते चार पट आहे. मुंबईत एक लाख महिलांमागे आठ जणींना, तर ग्रामीण भागात ३० जणींना गर्भाशयाचा कॅन्सर आढळतो, याकडे डॉ. बडवे यांनी लक्ष वेधल.
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹ब्राह्मोस क्षेपणास्त्रांचा पल्ला वाढवण्याबाबत एकमत

भारत आणि रशिया यांनी एकत्रितरीत्या विकसित केलेल्या ब्राह्मोस या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांचा पल्ला वाढविण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झाले आहे. सध्या या क्षेपणास्त्राचा पल्ला 300 किलोमीटर इतका आहे. तो वाढवून 500 किंवा त्याहीपेक्षा जास्त करण्याची योजना आहे. यासंबंधीच्या करारावर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी स्वाक्षऱया केल्या.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली. भारताला नुकताच मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेझिम या जागतिक संस्थेमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे भारत कोणत्याही देशाबरोबर क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्याचा करार करू शकतो. या अधिकारांतर्गत भारताने आतापर्यंत इस्रायल आणि अमेरिकेशी करार केला आहे. आता रशियाबरोबरदेखील अशा स्वरुपाचा करार होत आहे.

रशियाबरोबर झालेल्या या नव्या करारामुळे भारताला क्षेपणास्त्र क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. तसेच रशियाकडून आवश्यकता भासल्यास अत्याधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आयात करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. ब्राह्मोस हे लघुपल्ल्याचे, वेगवान आणि जमिनीवरून जमिनीवर किंवा जमिनीवरून समुद्रात मारा करणारे क्षेपणास्त्र असून त्याचा वेग मॅक-3.0 इतका आहे. या क्षेपणास्त्रांची पुढील सुधारित आवृत्ती विकसित करण्याचे प्रयत्न दोन्ही देशांनी सुरू केले आहेत. त्यामुळे लवकरच अतिसंरक्षित लक्ष्यावर अचूक मारा करण्याची क्षमता भारतातील क्षेपणास्त्रांना मिळणार आहे.
Join us @MPSCScience