🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.93K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
🔹स्वच्छ सर्वेक्षणात देशात सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्राला

स्वच्छतेच्या कामगिरीत महाराष्ट्र हे देशात दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. महाराष्ट्रातील ९ शहरांना स्वच्छता पुरस्कार जाहीर झाला आहे, यातील ६ शहरांना राष्ट्रीय स्तरावरील स्वच्छता पुरस्कार तर ३ शहरांना विभागस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
देशात सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेत.
#current
1) नागपूर हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात देशातील नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैली असणारे शहर ठरले.

2) नवी मुंबई हे शहर घनकचरा व्यवस्थापनात देशातील सर्वोत्तम ठरले आहे.

3) मराठवाड्यातील परभणी हे शहर स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिसादात उत्कृष्ट ठरले.

4) भिवंडी शहरास गतिमान मध्यम शहर हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

5) राज्याची राजधानी असलेल्या शहरांना स्वच्छ सर्वेक्षणात पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये बृहन्मुंबई शहरास सर्वोत्कृष्ट राजधानीचे स्वच्छ शहर असा पुरस्कार जाहीर झाला आहे.

6) भुसावळ शहरास गतिमान लहान शहर हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

7) देशातील विभागनिहाय पुरस्कारात महाराष्ट्राला पश्चिम विभागात ३ पुरस्कार जाहीर झाले आहेत.

8) सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराला पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट स्वच्छ शहराचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

9) नागरिक प्रतिसादाच्या बाबतीत दिला जाणारा पुरस्कार अमरावती जिल्ह्यातील शेंदुरजना घाट या शहराला मिळाला आहे.

10) पुणे जिल्ह्यातील सासवड या शहराला नाविन्यपूर्ण व उत्कृष्ट कार्यशैलीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
@eMPSCguidance
1-6-2018.pdf
1.9 MB
MPSC वेळापत्रक सद्यस्थिती
😍 Earn ₹2000 in Few Minutes😍

Follow These Steps
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

1⃣खालील लिंक वरून Phone Pay App Install करा

https://phon.pe/ru_dheecmig6

2⃣ नंतर तुमचा UPI ID त्यामध्ये सेट करा आणि काही वेळात 75 ₹ तुमच्या Account वर जमा होतील.

3⃣नंतर तुमच्या कोणत्याही 5 मित्रांच्या Phone Pay App ने काही पैसे पाठवा,
पाठवल्यानंतर 250 ₹ तुमच्या अकाउंटला जमा होतील.

https://phon.pe/ru_dheecmig6

🤑Exciting Offers on Phone Pay 👇👇👇👇👇👇👇👇👇

👌500₹ Cashbak on Mobile Recharge 👌

💰250₹ Cashback on Electricity Bill💰

💰250₹ Cashback on Bustickets💰

💰500₹ Cashback on DTH Recharge

🤩50₹ Cashback on Money Transfer🤩

🤩🤩🤩🤩🤩🤩🤩🤩

👍👍👍👍👌👌👌👌👌
This link to Install -
https://phon.pe/ru_dheecmig6
💰Tez App द्वारे काही रक्कम एकमेकांना पाठवा .
नंतर एक 🎁Coupan भेटेल,
ते💰Scratch💰 करा आणि बसून पैसे जिंका🤩

Install Tez App Here👇
https://g.co/tez/QJ1Gj
प्रधानमंत्री पीक विमा योजना
#gs4
♦️भारताचे लोकसंख्या धोरण♦️

* राष्ट्रीय लोकसंख्या धोरण १९७६ –
घोषणा १६ एप्रिल १९७६ रोजी केंद्रीय स्वास्थ्य व कुटुंबराज्य मंत्री डॉ. करणसिंग यांनी मांडले.

* उद्दिष्टे व उपाययोजना :

१) योग्य कायदा करून विवाहाचे किमान वय मुलींसाठी 18 वर्ष व मुलांसाठी 21 वर्षांपर्यंत वाढवणे.
२) निर्बीजीकरण प्रोत्साहनासाठी दिल्या जाणाऱ्या राशीत वाढ करणे.
दोन मुलांनंतर कुटुंब नियोजन केल्यास १५० रुपये, तीन मुलांनंतर केल्यास १०० रुपये चार मुलांनंतर केल्यास ७० रुपये.

३) राज्य शासनांना अनिवार्य निर्बीजीकरण कायदे करण्याची अनुमती द्यावी.

४) २००१ वर्षांपर्यंत लोकसभा व राज्य विधानसभा यामधील प्रतिनिधित्व १९७१ च्या जनगणनेनुसार निश्चित करावे.

५) केंद्रीय व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लहान कुटुंब संकल्पना स्वीकारण्यासाठी प्रोत्साहनपर लाभ द्यावेत.

६) राज्यांना त्यांच्या कुटुंबनियोजन कार्यक्रमासाठी केंद्राकडून निधी मिळावा.

* १९७६ चे लोकसंख्या धोरण हे जास्त काळ टिकले नाही.
१९७७ साली निवडणुका झाल्या व सत्तेत आलेल्या सरकारने २९ जून १९७७ रोजी वरील धोरणातील, कुटुंबनियोजन कार्यक्रमात जी सक्ती करण्यात आली होती, ती रद्द केली.

* १९७५ मध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने आणीबाणी जाहीर केली व या काळात १९७६ च्या लोकसंख्या धोरणाला संसदेत मान्यता देण्यात आली. संजय गांधी यांच्यामुळे या धोरणात सक्तीच्या कुटुंबनियोजनाचा समावेश करण्यात आला. या काळात मोठय़ा प्रमाणावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्यात.
♦️लोकसंख्या धोरण २०००

११ मे २००० रोजी भारताची लोकसंख्या १०० कोटी झाली.
जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने २.४ % क्षेत्रफळ असलेल्या या देशात जगातील १६ % लोकसंख्या राहत होती.

लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आणण्यासाठी दुसरे लोकसंख्याविषयक धोरण जाहीर करण्यात आले.

* पार्श्वभूमी –

१९९३ साली एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. या समितीने आपला अहवाल १९९४ मध्ये सादर केला व त्यानुसार पुढे २००० सालचे लोकसंख्या धोरण ठरविण्यात आले.

🔶 लोकसंख्या धोरण २००० ची महत्त्वाची उद्दिष्टय़े –
१) अल्पकालीन उद्दिष्ट – संततीनियमनासाठी आवश्यक साधनांचा पुरवठा करणे. आरोग्याच्या पायाभूत सुविधा एकात्मिक सेवा पुरविणे.

२) मध्यकालीन उद्दिष्ट – प्रत्येक जोडप्याला दोन मुले – यासाठी प्रोत्साहन देणे.

३) दीर्घकालीन उद्दिष्ट – लोकसंख्येचे २०४५ पर्यंत स्थिरीकरण करणे.

* शिफारशी –
१) १४ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे.

२) शाळेतील गळतीचे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील प्रमाण २० टक्क्य़ांपेक्षा कमी आणावे.

३) जननदर नियंत्रणासाठी व संतती नियमनासाठी याबाबत सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी विशेष व्यवस्था निर्माण करावी.

४) फक्त दोन मुले असलेल्या व निर्बीजीकरण करून घेतलेल्या दारिद्य्ररेषेखालील दाम्पत्यांच्या नावे ५००० रुपयांची विमा पॉलिसी उघडावी.

५) १८ वर्षांपेक्षा उशिरा विवाह करणाऱ्या मुलींना बक्षीस देणे तसेच २१ वर्षांनंतर मातृत्व स्वीकारणाऱ्या मुलींना बक्षीस देणे.

६) माता मृत्युदराचे प्रमाण दर एक लाख जिवंत जन्मामागे १०० पेक्षा कमी आणावा.

७) ८०% प्रसूती संस्थात्मक पद्धतीने व १०० टक्के प्रसूती या प्रशिक्षित व्यक्तींच्या उपस्थितीत व्हाव्यात.

८) जन्म, मृत्यू, विवाह, गर्भधारणा यांचे १०० टक्के नोंदणीचे लक्ष साध्य करावे.

९) ग्रामीण भागात रुग्णवाहिका सेवा पुरविण्यासाठी विशेष फंड व कमी व्याजदराचे कर्ज उपलब्ध करून द्यावे.

१०) पंचायत समिती व जिल्हा परिषदांना लहान कुटुंब धोरण राबविण्यासाठी बक्षिसे द्यावीत.
🔶लोकसंख्याविषयक महत्वाचे🔶

1. जनगणना - गृह मंत्रालयांतर्गत
2. जनगणना प्रारंभ - 1872
3. जनगणना आयुक्त पद निर्मिती - 1881
4. जनगणना अधिनियम - 1948
5. कुटुंब नियोजन कार्यक्रमास सुरुवात - 1952

6. जन्म - मृत्यू नोंदणी अधिनियम - 1969

7. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग स्थापना - 1993

8. पहिले लोकसंख्या धोरण - 1976

9. दुसरे लोकसंख्या धोरण - 2000



🔶लोकसंख्या विषयक सिद्धांत🔶

1. माल्थसचा लोकसंख्याविषयक सिद्धांत
- प्रबंधाचे नाव - An essay on the principles of Population

लोकसंख्या "भूमितीय पद्धतीने" (2,4,6,8.....) वाढते , तर अन्नधान्य उत्पादन "अंकगणितीय पद्धतीने"(1,2,3,4....) वाढते.

Channel Link
@mpscguidance


t.me/mpscguidance
जगभरातील 31% गरीब बालक भारतात  आहेत :- OPHI अहवाल

*ऑक्सफोर्ड पॉवर्टी अँड ह्यूमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) ने “2017 ग्लोबल मल्टी-डायमेन्शनल पोव्हर्टी इंडेक्स (MPI) अहवाल प्रसिद्ध केला.

* अहवाल जगभरातील 23 देशांबाबत अद्ययावत MPI अंदाज प्रदान करतो._

*यावेळी प्रथमच* प्रत्येक देशासाठी दारिद्रयरेषेखाली जगणार्‍या बालकांविषयी माहिती प्रसिद्ध केली आहे.

* अहवालानुसार, 103 देशांमधील निम्म्या बहु आयामीरीतीने गरीब लोकांना लहान मुलं आहेत.

*दारिद्रयरेषेखाली बालकांविषयी जागतिक स्वरूप*

* 103 निम्न व मध्यम उत्पन्न घेणार्‍या देशांमध्ये, एकूण लोकसंख्येत 34% बालकांचे प्रमाण आहे - परंतु त्यापैकी 48% गरीब आहेत.

* प्रत्येक 5 बालकांपैकी जवळजवळ दोन (एकूण 37% किंवा 689 दशलक्ष) बहु आयामीरीतीने गरीब आहेत. 
* भारतासह 36 देशांत, कमीत कमी अर्ध्या बालकांचा MPI गरिबीत आहे.
* इथिओपिया, नायजर आणि दक्षिण सुदान मध्ये 90% बालके MPI गरीब आहेत.

*जागतिक MPI चे स्वरूप*

* जगभरात जवळपास 1.45 अब्ज लोक MPI गरिबीत जगत आहेत. त्यापैकी 26.5% लोक सर्वेक्षण केलेल्या 103 देशांत आहेत.
* चड, बुरकीना फासो, नायजर, इथिओपिया, दक्षिण सुदान, नायजेरिया, युगांडा आणि अफगाणिस्तान हे जगातले सर्वात गरीब प्रदेश आहेत.

*जागतिक MPI आणि भारत*

* भारतात सर्वाधिक 295 दशलक्ष वंचित लोकसंख्या आहे आणि जगातल्या बहुआयामी गरीब बालकांपैकी 31% एवढे भारतामध्ये राहतात.

*एकूण लोकसंख्येनुसार बहु-आयामीरितीने गरीब बालकांची संख्या लक्षात घेतली तर 103 देशांमध्ये भारत 37 व्या स्थानी आहे.*

*बहु-आयामीरितीने(Multi dimensional Poverty Index )गरीब बालक म्हणजे कोण?*

_"बहु-आयामीरितीने गरीब" बालक म्हणजे गरिबीच्या आरोग्य, शिक्षण आणि जीवनमानाचा स्तर या तीन विषयात वर्गीकृत केलेल्या दहा निर्देशकांपैकी कमीतकमी एक तृतीयांश निर्देशकांमध्ये ते बालक कमी मूल्यांकीत केले गेले आहे._
• एकूण लोकसंख्येशी असलेले हिंदू लोकसंख्येचे प्रमाण 0.7% नी घटले .
• शीख लोकसंख्येचे प्रमाण 0.2% नी घटले .
• बौद्ध लोकसंख्येचे प्रमाण 0.1% नी घटले .
• मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण 0.8% नी वाढले .
• ख्रिश्चन आणि जैन धर्माच्या लोकसंख्येत कोणताही महत्वपूर्ण बदल झाला नाही.

जॉइन » @mpscguidance
एकूण मुस्लिम लोकसंख्येचा विचार केल्यास आसाममध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. 2001 मध्ये 30.09% असलेले प्रमाण आता 34.2% एवढे झाले. बांगलादेशातून येणार्‍या निर्वासितांमुळे मुख्यतः ही वाढ झाली.
नागरी वसाहतीचा आकारानुसार क्रम : शहर > नगर > महानगर > सन्नगर
दशलक्षी शहरे :
» १० लाख पेक्षा जास्त लोकसंख्या असलेली शहरे.
» देशात ५३ शहरे.
» महाराष्ट्रात ६.
१) बृहन मुंबई,
२) पुणे,
३) नागपूर,
४) नाशिक,
५) वसई विरार,
६) औरंगाबाद
जॉइन » @mpscguidance
» २००१-११ या दशकातील नागरी लोकसंख्येत वाढ : महाराष्ट्र : २४% आणि भारत : ३२%
» २००१-११ या दशकातील ग्रामीण लोकसंख्येत वाढ : महा. १०% आणि भारत : १२ %
नागरी लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक दर » रायगड

नागरी लोकसंख्या
» महाराष्ट्र : ४५.२३ (२००१ : ४२.%)
» सर्वाधिक
१) मुंबई शहर
२) मुंबई उपनगर
३) पुणे
४) नागपूर

» सर्वात कमी
१) गडचिरोली
२) शिंधुदुर्ग
३) हिंगोली

जॉइन » @mpscguidance

स्थलांतरच्या प्रकारानुसार उतरता क्रम
१) ग्रामीण ते ग्रामीण
२) ग्रामीण ते शहरी
३) शहरी ते शहरी
४) शाहरी ते ग्रामीण

जॉइन » @mpscguidance

» भारताची लोकसंख्या तिसर्‍या ते सातव्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या एकत्रित लोकसंखेपेक्षाही जास्त आहे. (अमेरिका, इंडोनेशिया, ब्राझिल, पाकिस्तान, बांग्लादेश)
» उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रची लोकसंख्या अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.
» एकट्या उत्तरप्रदेशाची लोकसंख्या ब्राझिलच्या लोकसंख्येएवढी आहे.
T.me/mpscguidance