🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
महामार्ग बांधणी
CAST Qyalifying व्हावा असं ज्यांना वाटत असेल त्यांनी खालील ग्रुप जॉईन करा👇👇👇👇👇👇

CSAT Qualifying चा मुद्दा आंदोलनातून कोण गायब करतंय???
जाणून घेण्यासाठी जॉईन करा
👇👇👇👇👇👇

https://t.me/joinchat/JK17jk-rsG4gkVcLwpfCpA
📰📓🗞🗞🗞आजची चालू घडामोडी विषयक महत्वाची कात्रणे 👇👇👇👇

https://telegra.ph/LoksattaLokmatmaharashtra-times-10-10
"टीटली चक्रीवादळ"
🔹वंदे मातरम

वन्दे मातरम् या गीताच्या पहिल्या कडव्याला भारतीय संविधानानुसार राष्ट्रीय गीत हा दर्जा मिळालेला आहे.

बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी इ.स. १८८२ मध्ये प्रकाशित केलेल्या त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत लिहिले होते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी प्रेरणागीत बनले. बंकिमचंद्रांनी मागील शतकातील ‘संन्याशांचे बंड' या ऐतिहासिक घटनेवर आधारित ‘आनंद मठ' ही कादंबरी इ.स. १८८२ साली लिहिली. त्यांनी या कादंबरीत वंदे मातरम् हे गीत समाविष्ट केले. या कादंबरीत देशभक्त संन्यासी वंदे मातरम् हे गीत सामूहिकपणे गाताना दाखवले आहे.

१८९६ साली काँग्रेसच्या कलकत्ता येथील राष्ट्रीय अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत गाऊन अख्खे अधिवेशन राष्ट्रभक्तीच्या भावनेने भारावून टाकले. पुढे १९०१ मध्ये पुन्हा काँग्रेसचे अधिवेशन कलकत्त्याला झाले असताना या अधिवेशनात श्री दखिना चरण सेन यांनी या गीताचा सामूहिक अभ्यास करून घेतला. १९०५ मध्ये इंग्रज सरकारने या गीतावर बंदी आणली.

तरीसुद्धा बनारस येथील काँग्रेस अधिवेशनात रवीन्द्रनाथ टागोर यांची पुतणी श्रीमती सरलादेवी यांनी हे गीत गायले. १९०५ मध्ये इंग्रजांनी बंगालचे विभाजन केले. ही घटना बंग-भंग या नावाने इतिहासात नमूद आहे. बंग-भंगच्या विरोधात झालेल्या प्रचंड आंदोलनात वंदे मातरम् हे गीत जागृतीचा शंखनाद बनले. हिदू-मुस्लिम सर्वांनी मुक्त कंठाने याचे गायन केले.

सर्वांनी एकजुटीने केलेल्या या उग्र आंदोलनामुळे इंग्रज सरकार हादरले आणि त्यांना बंगालची फाळणी रद्द करावी लागली. या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा कसा मिळाला, याची गोष्ट पण फार रोमहर्षक आहे.

१९३७ मध्ये राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसने प्रतिपादन केले की वंदे मातमच्या सहा कडव्यांपैकी पहिल्या दोन कडव्यांमध्ये देशाला मातृभूमी म्हणत देशाच्या सृष्टिसौंदर्याचे वर्णन केले असल्यामुळे त्यात मूर्तिपूजेचा काहीही संबंध येत नाही.
परंतु शेवटच्या चार कडव्यांमध्ये काही ठिकाणी मातृभूमीचे हिदूंची देवी दुर्गाच्या रूपात वर्णन केले आहे. म्हणून राष्ट्रीय काँग्रेसने वंदे मातरम् गीताच्या पहिल्या दोन कडव्यांना राष्ट्रगीत म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवला व तो मंजूर पण झाला. परंतु १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस प्रणीत भारत सरकारने फक्त ‘जन गण मन' या गीतालाच राष्ट्रगीत म्हणून घोषित केले. वंदे मातरम्‌ची अवहेलना करणारी ही गोष्ट अनेक नेत्यांना पटली नाही. घटना समिती गठित झाल्यावर वंदेमातरम् याला राष्ट्रगीताचा दर्जा देण्यावर अनेकदा चर्चा झाली.

अखेर घटना समितीचे अध्यक्ष देशभक्त डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी घटना लागू होण्याच्या दोन दिवसापूर्वी २४ जानेवारी १९५० ला घटना समितीत हा ठराव पास करवून घेतला.
Forwarded from Government Job Express
🔍पनवेल महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांची भरती

🔅 वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) - ५ जागा

शैक्षणिक पात्रता - एम.बी.बी.एस

वयोमर्यादा - ४५ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

👉 थेट मुलाखत - २२ ऑक्टोबर २०१८

🔅 स्टाफ नर्स (GNM) - २१ जागा

शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण आणि जीएनएम कोर्स उत्तीर्ण

वयोमर्यादा - ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

👉 थेट मुलाखत - २३ ऑक्टोबर २०१८

🔅 डाटा एंट्री ऑपरेटर कम अकाऊंटंट - ११ जागा

शैक्षणिक पात्रता - बी.कॉम / एम.कॉम, टॅली आणि मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा - ३८ वर्षे (अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

👉 थेट मुलाखत - २५ ऑक्टोबर २०१८

🔅 मुलाखतीचे ठिकाण - क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल जि. रायगड

🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/qiFmgG

🔅 अधिकृत वेबसाईट - https://bit.ly/2PmGzzZ
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
https://t.me/joinchat/AAAAAER22rOjlH8TEb3njw
भूगोल नोट्स 2 ,कैलास भोई सर ,जळगाव
@eMPSCguidance