🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
14.3K subscribers
11.1K photos
79 videos
3.83K files
2.92K links
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव

www.mpscexpress.com
Download Telegram
दि . 27 सप्टेंबर
स्थळ : शनिवारवाडा येथे
सर्वांनी एकत्र या

@eMPSCguidance
सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी महत्वाची संदर्भ पुस्तके pdf स्वरूपात download करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mpscguidance.blogspot.in/2012/10/free-ebooks-download.html
◆ जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना, 'आयुष्मान भारत' ◆

● पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडची राजधानी रांचीतून जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य योजनेचा शुभारंभ करतील.

● पंतप्रधान जन आरोग्य योजना (पीएमजएवाय) म्हणजेच आयुष्मान भारत या योजनेंतर्गत देशातील दहा कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना म्हणजेच जवळपास 50 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येला या योजनेचा फायदा होणार आहे.

● या योजनेमुळे लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण मिळेलं, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे उपचार करता येतील.

● मोदींनी यावर्षी स्वातंत्र्य दिनाला लालकिल्ल्यावरील भाषणातून या योजनेची घोषणा केली होती.

● भारतात आरोग्य सेवा क्षेत्रात नवनवीन तंत्र विकसित होत असली तरी देशातील एक मोठा वर्ग या सेवांपासून आणि उपचारांपासून वंचित आहे.

● सरकारी रुग्णालयांमध्ये योग्य उपचार मिळत नाही आणि खाजगी रुग्णालयांचा खर्च गरीबांना झेपत नाही.

● सरकारी पातळीवरुन सातत्याने प्रयत्न करण्यात येतात, मात्र वाढत्या लोकसंख्येमुळे हे आव्हानात्मक काम बनत चाललं आहे.

● याच प्रयत्नांचा भाग म्हणून मोदी सरकारने आयुष्मान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आणली आहे.

● सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात आरोग्यावर जीडीपीच्या 1.13 टक्के खर्च केला जातो.

● तर हाच आकडा चीनमध्ये 2.45 टक्के आणि थायलंडमध्ये 2.90 टक्के एवढा आहे.

● नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशनच्या रिपोर्टनुसार, ग्रामीण भागातील 85.9 टक्के आणि शहरी भागातील 82 टक्के लोकसंख्येकडे कोणतंही आरोग्य विमा संरक्षण नाही.

● पैसे नसल्यामुळे देशात दरवर्षाला 66 लाख भारतीयांना उपचार घेणं शक्य होत नाही, ज्यामुळे ते विविध आजारांचा सामना करतात.

● तर ग्रामीण भागातील 24.9 टक्के शहरी भागातील 18.2 टक्के गरीब कुटुंबांना रुग्णालयाच्या खर्चासाठी कर्ज घ्यावं लागतं.

Join @spardhapariksha95

● दुर्दैवी बाब म्हणजे देशातील 17.3 टक्के लोकसंख्येला त्यांच्या एकूण कमाईचा 10 टक्के खर्च फक्त आरोग्यावर करावा लागतो, ज्यामुळे गरीबी कधीही पाठ सोडत नाही.

◆ आयुष्यमान भारत : कोण आहेत योजनेचे लाभार्थी? ◆

● 2011 च्या सामाजिक, आर्थिक जनगणनेनुसार, ग्रामीण भागातील 8.3 कोटी आणि शहरी भागातील 2.33 कोटी कुटुंबाचा यामध्ये समावेश आहे.

● जवळपास 50 कोटी जनतेला या योजनेचा फायदा होईल.

● नॅशनल हेल्थ एजन्सीने (एनएचए) राष्ट्रीय आरोग्य विमा अंतर्गत आयुष्मान भारत आरोग्य योजनेची वेबसाईटही लाँच केली आहे, ज्याअंतर्गत आपण या योजनेचे लाभार्थी आहोत का, याची पडताळणी करता येईल.

● वेबसाईटसोबतच एक फोन नंबरही देण्यात आला आहे, शिवाय रुग्णालयांमध्ये आयुष्मान मित्र असतील, जे लाभार्थ्यांना मार्गदर्शन करतील.
♦️जपानमध्ये ‘जेबी’ वादळ
#Current
• जपान राष्ट्रास ‘जेबी’ वादळाचा तडाखा बसला असून गेल्या पंचवीस वर्षांतील जपानमधील हे सर्वांत मोठे वादळ आहे.

• जेबी जपानच्या किनाऱ्यास धडकले तेव्हा वाऱ्यांचा वेग २११ किमी प्रतितास एवढा होता.

• जेबीमुळे अतिवृष्टी, वेगवान वारे आणि भूस्खलन होऊन ११ लोकांचे प्राण गेले असून ३०० लोक जखमी झाले आहेत. यापूर्वी  वर्ष १९९३ मध्ये जपानमध्ये असे विनाशकारी वादळ आले होते.
♦️विषबाधेमुळे 5 कीटकनाशकांवर बंदी
#Current
किटनाशक फवारणीमुळे शेतमजुरांना होत असलेल्या विषबाधेची दखल घेऊन कृषी आणि जलसंधारण विभागाने 5 घातक कीटकनाशकांवर 2 महिन्यांसाठी बंदी घातली आहे.

बंदी घातलेली कीटकनाशके -
प्रोफेनोफॉस 40 टक्के आणि सिप्रेमेंथ्रीन 4 टक्के ईसी, फिप्रोनिल 40 टक्के आणि इमीडॅक्लोप्रिड 40 टक्के डब्ल्यू जी, ऍसिफेट 75 टक्के एसपी, डीफेंथीरोन 50 टक्के डब्ल्यूपी आणि मोनोक्रोटोफॉस 36 टक्के एसएल.
📄मराठी व्याकरण सराव प्रश्नपत्रिका
-गुट्टे अकॅडेमी
👆👆👆👆👆👆👆👆
@eMPSCguidance
PSI INTERVIEW 2.pdf
2.7 MB
📚PSI मुलाखतीचे अपेक्षित प्रश्न व उत्तरे