The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
१ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे (भारत) National Doctor's Day....

१ जुलै हा दिवस भारतात ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी झाला. डॉ. रॉय यांना भारतरत्न पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. वयाच्या ८० व्या वर्षी म्हणजे १ जुलै १९६२ रोजी डॉ. रॉय यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दिवसाला अनुसरूनच भारतात १ जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो.
🔲🔲🔲
‘डॉक्टर आणि रुग्ण, त्यांचे नातेवाईक’ ही मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे. काहीवेळेस रुग्ण दगावला जातो, परिणामी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या रुग्णालय तोडफोडीच्या घटना घडतात. हे अत्यंत चुकीचे आहे. एखादे गंभीर उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी खुद्द रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना विश्वासात घेणे तसेच डॉक्टर सुद्धा माणूसच आहे... तो त्याच्या परीने रुग्णाचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरांना पण समजून घेणे संयम ठेवणे गरजेचे असते. या घटना घडू नयेत म्हणून ही दरी कमी होणे आणि एकमेकांत विश्वासाचे नाते निर्माण होणे आवश्यक आहे.
Forwarded from NACE Academy
RBI Group-B Officer Notification...👆👆👆
Forwarded from Jayendra Walunj
ASO जागा वाढल्या..☺️👍
शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव
----------------------------------
केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने 2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

कापूस 5150, 5450 (लांब धागा), भात 1750, तूर 5675, मूग 6975, उडीद 5600 रुपये झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. तर 14 पिकांचा हमीभाव दीडपटीने वाढविण्यासही मंजूर देण्यात आली आहे. या निर्णयामुळे धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली असून, 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या निर्मिती खर्चापेक्षा जास्त देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय घेणारी मंत्रिमंडळ समितीमध्ये या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.

यापूर्वी धानासाठी 1550 किंमत देण्यात येत होती, तर आता यामध्ये वाढ होऊन 1750 रुपये करण्यात आली आहे. मूग 5575 वरून आता 6975 तर उडीदची आता 5400 किंमत होती ती 5600 करण्यात आली आहे. तूरदाळ 5450 वरून आता 5675 याची किंमत देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. देशातील 25 कोटी लोक शेतीशी निगडित आहेत. 10 वर्षांनंतर याच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

या 14 पिकांच्या हमीभावात वाढ (क्विंटलमागील दर)-
कापूस- 4320 रुपये (आधी), 5450 रुपये (आता)
भुईमूग- 4450 रुपये (आधी), 4890 रुपये (आता)
सोयाबीन- 3050 रुपये (आधी), 3399 रुपये (आता)
ज्वारी (हायब्रीड)- 1700 रुपये (आधी), 2430 रुपये (आता)
बाजरी- 1425 रुपये (आधी), 1950 रुपये (आता)
भात- 1550 रुपये (आधी), 1750 रुपये (आता)
तूर- 5450 रुपये (आधी), 5675 रुपये (आता)
मूग- 5575 रुपये (आधी), 6975 रुपये (आता)
उडीद- 5400 रुपये (आधी), 5600 रुपये (आता)
मका- 1425 रुपये (आधी), 1700 रुपये (आता)
सूर्यफूल- 4100 रुपये (आधी), 5388 रुपये (आता)
Forwarded from TOPPER 777 Chalu Ghadamodi (pathan Idris Khan)
दि. 29 जून 2018 चे चालू घडामोडी चे 10 प्रश्न आणि उत्तरे.
लेखक- पठाण इद्रीस खान (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व Topper 777 चे लेखक )
मो. 9420218840
@pathanidris
@Topper777
t.me/topper777
मराठमोळ्या गावंडेंकडे अॅमेझॉन, हॅथवे, जेपी मॉर्गनच्या कंपनीची धुरा
-------------------------------
अॅमेझॉन , बर्कशायर व जेपी मॉर्गन यांनी हेल्थ केअर कंपनी स्थापन केली असून सीईओपदी नावाजलेले डॉक्टर व लेखक अतुल गावंडे यांची नियुक्ती केली आहे.

बर्कशायर हॅथवे, अॅमेझॉन.कॉम आणि जे.पी. मॉर्गन चेस या जगातील तीन आघाडीच्या कंपन्या एकत्र येऊन नवीन आरोग्य कंपनी सुरु करणार आहेत. या कंपनीच्या प्रमुखपदी त्यांनी अतुल गावंडे या मराठी माणसाची नियुक्ती केली आहे. अतुल गावंडे हे वैद्यकीय क्षेत्रातील प्राध्यापक असून आरोग्य क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींवर त्यांनी नेहमीच टीका केली आहे.

अमेरिकेत बॉस्टन शहरात या कंपनीचे कार्यालय असेल. या कंपनीच्या स्थापनेमागे खोऱ्याने नफा कमावण्याचा उद्देश नाही असे तिन्ही कंपन्यांनी प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे. आपल्या अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना कमी दरात चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात हा नव्या कंपनीच्या स्थापनेमागे उद्देश आहे.

बर्कशायर, अॅमेझॉन आणि जेपी मॉर्गन चेस यांनी जानेवारी महिन्यात या नव्या कंपनीची घोषणा केली होती. पेशाने डॉक्टर असलेले अतुल गावंडे स्वत: उत्तम लेखक आहेत. ब्रिगहॅम अँड वुमन्स हॉस्पिटलमध्ये ते नोकरी करतातत. एंडोक्राईन शस्त्रक्रियेचे ते तज्ञ आहेत. हार्वड टीएच चान स्कूल, हार्वड मेडिकल स्कूलमध्ये ते प्राध्यापक आहेत. बिंग मॉर्टल : मेडिसीन अँड व्हॉट मॅटर्स इन द एन्ड हे २०१४ मध्ये त्यांनी लिहिलेले पुस्तक प्रचंड चर्चेचा विषय ठरले होते.

या पुस्तकातून त्यांनी वृद्धांच्या दयनीय अवस्थेवर प्रकाश टाकला होता. बर्कशायर हॅथवे ही प्रसिद्ध गुंतवणूक तज्ञ वॉरेन बफे यांची कंपनी आहे. अॅमेझॉनचे जेफ बेझोस आणि जेपी मॉर्गनचे जामी डायमॉन यांच्यासोबत मिळून बफे ही नवीन कंपनी सुरु करण्यावर काम करत होते. नव्या कंपनीमध्ये ज्या उमेदवारांची निवड झाली आहे ते आपल्यापरीने उत्तम योगदान देतील आणि वैद्यक क्षेत्रातील वाढत्या किंमतींवर नियंत्रण मिळवतील अशी अपेक्षा बफे यांनी व्यक्त केली.

प्रमुख म्हणून अतुलची आम्ही निवड केली असून तो त्याची जबाबदारी उत्तमपरीने निभावेल यावर मला, जामी आणि जेफला पूर्ण विश्वास आहे असे बफे यांनी सांगितले. अमेरिकेत आरोग्य सेवेचा खर्च उद्योगांवर भारी पडत आहे असे बफे यांनी सांगितले. कमी किंमतीत आरोग्य सेवा देण्याचा हेतू असल्यामुळे कंपनी यशस्वी होईल याची खात्री देता येत नाही असे बफे म्हणाले. बर्कशायर, अॅमेझॉन आणि जेपी मॉर्गन या तिन्ही कंपन्यांच्या संयुक्त उपक्रमामुळे १० लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

Source : महाराष्ट्र टाइम्स
----------------------------------
Forwarded from TOPPER 777 Chalu Ghadamodi (pathan Idris Khan)
june 2018 che 300 question .pdf
10.9 MB
जून 2018 चे चालू घडामोडी चे 300 प्रश्न आणि उत्तरे.
लेखक- पठाण इद्रीस खान (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व Topper 777 चे लेखक )
मो. 9420218840
@pathanidris
@Topper777
t.me/topper777
१८५४ - कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
१९३७ - दुसऱ्या चीन-जपान युद्धास प्रारंभ.
१९१४ - अनिल विश्वास, ज्येष्ठ संगीतकार यांचा जन्म.
१८५४ - गेऑर्ग झिमॉन ओम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
१९९९ - एम. एल. जयसिंहा, माजी क्रिकेट खेळाडू फलंदाज यांचे निधन.
★★ प्रा. रविंदर दहिया ★★

● भारतीय वंशाचे वैज्ञानिक आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमीच चमकताना दिसतात, त्यातीलच एक नाव म्हणजे प्रा. रवींदर दहिया.

● त्यांचा विषय इलेक्ट्रॉनिक्स व नॅनोइंजिनीअरिंग हा असला तरी त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी केला आहे.

● त्यांच्या ‘ब्रेनी स्किन’ या विचाराच्या पातळीइतकी संवेदनशीलता असलेली त्वचा तयार करण्याच्या प्रकल्पाला १५ लाख पौंडांचे अर्थसाह्य़ मिळाले आहे.

● दहिया हे सध्या ग्लासगो विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनीअरिंगमध्ये प्राध्यापक असून त्यांनी भविष्यवेधी त्वचा तयार करण्याची संकल्पना प्रथम मांडली.

● त्यात खऱ्या त्वचेतील घटकांची नक्कल करून अतिशय लवचीक , अतिसंवेदनशील त्वचा तयार करण्यात त्यांनी मोठी प्रगती साधली आहे.

● अनेकदा काही कारणांनी अवयव तोडावे लागलेल्यांना नैसर्गिक त्वचेमुळे असणारी संवेदना लाभत नाही, त्यांना ही त्वचा वरदान ठरणार आहे.

● त्याशिवाय संवेदनशीलता असलेली त्वचा धारण करणारे रोबोटही त्यातून तयार करता येणार आहेत.

● थोडक्यात हे कृत्रिम त्वचेचे जग असले तरी त्यात इलेक्ट्रॉनिक व अब्जांश तंत्रज्ञानाच्या मदतीने अभियांत्रिकीची कमाल असणार आहे यात शंका नाही.

● वयस्क लोकांना मदत करण्यासाठी परदेशात रोबोट असतात, त्यात रोबोट व मानव यांच्यातील आंतरक्रिया अधिक संवेदनशीलतेकडे झुकणारी असेल याची हमी माझे संशोधन देते, असे प्राध्यापक दहिया यांचे म्हणणे आहे.

● ब्रेनी स्किनमध्ये मानवी त्वचेप्रमाणेच न्यूरॉन्स असतील.

● तुम्ही तिला स्पर्श केलात की लगेच मेंदूला संदेश जाईल, सिलिकॉन आधारित न्यूरल ट्रान्झिस्टर व ग्राफिनची ही कमाल असणार आहे.

● कार्बनच्या पातळ पापुद्रय़ाइतकी जाड असलेली ही त्वचा अणूच्या जाडीएवढी, पण पोलादापेक्षाही मजबूत असेल.

● या त्वचेमध्ये प्रकाशीय विद्युत घट वापरले जाणार असून त्यातून प्रति चौरस सें.मी.ला २० नॅनोवॅट ऊर्जा उपलब्ध होईल.

● दहिया हे लवचीक इलेक्ट्रॉनिक उपकरणे व संवेदनशीलता तंत्रज्ञानातील तज्ज्ञ आहेत.

● त्यांचे मूळ संशोधन हे इलेक्ट्रॉनिक त्वचा, रोबोटिक यंत्रणा, प्रॉस्थेटिक्स यात आहे.

● त्यांचे एकूण २०० शोधनिबंध व चार पुस्तके प्रकाशित आहेत.

● युरोपीय समुदायाच्या अनेक प्रकल्पांत त्यांनी नेतृत्व केले असून त्यांना मेरी क्युरी फेलोशिप मिळाली आहे.

● वयाच्या चाळिशीतील उत्तम स्कॉटिश वैज्ञानिकांमध्ये त्यांचा समावेश २०१६ मध्ये करण्यात आला आहे.

● मानवी जीवनात वेदना व समस्या भरपूर आहेत, त्या कमी करून अधिक कार्यक्षम कृत्रिम अवयव तयार करतानाच कृत्रिम त्वचेच्या स्पर्शातूनही मायेची ऊब निर्माण करणारे दहिया यांच्यासारखे वैज्ञानिक मानवतेची मोठी सेवा करीत आहेत यात शंका नाही.
◆◆ भारताचे माजी नौदलप्रमुख जयंत नाडकर्णी यांचे निधन ◆◆

● भारताचे माजी नौदलप्रमुख अॅडमिरल जयंत गणपत नाडकर्णी यांचे सोमवारी निधन झाले.

● ते ८६ वर्षांचे होते. जयंत नाडकर्णी भारताचे १४ वे नौदल प्रमुख होते.

● डिसेंबर १९८७ ते नोव्हेंबर १९९० पर्यंत त्यांनी नौदलप्रमुख म्हणून धुरा संभाळली.

● कुलाब्यातील नौदलाच्या आयएनएचएस अश्वनी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

● जयंत नाडकर्णी यांना दोन मुले असून त्यांचा एक मुलगा भारतीय नौदलात रियर अॅडमिरल पदावर कार्यरत आहे. नौदल सेवेतून निवृत्त झाल्यानंतर जयंत नाडकर्णी पुण्यात स्थायिक झाले होते.

● त्यांच्या पत्नी विमल नाडकर्णी यांचे २०१६ मध्ये निधन झाले.

◆join @nmkbeed

● जयंत नाडकर्णी यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी चार वाजता पुण्यातील गोळीबार मैदान येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.
तयारीला लागा, 36 हजार पदांसाठी या महिन्यातच जाहिरात!
--------------------------------
सरकारी नोकरी - पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या 72 हजार जागाच्या नोकरभरतीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील 36 हजार जागांसाठी या महिनाअखेरीस सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत.
सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी महापोर्टलमार्फत घेण्यात येणार आहेत.

31 जुलै अखेरपर्यंत कृषी आणि पदुम, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम, गृह विभाग, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, मृदा व जलसंधारण विभाग या विभागातल्या रिक्त पदांसाठी जाहिरात निघणार आहे. त्यांच्या विभागाच्या विभागप्रमुखांनी 17 जुलैपर्यंत रिक्त पदांची माहिती राज्य सरकारला कळवायची आहे. त्यानंतर महिना अखेरपर्यंत सर्व पदांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. महत्त्वाचं जिल्हा परिषदेच्या सर्व परीक्षा राज्यभरात एकाच दिवशी होणार आहेत.

🔴 कशी असेल परीक्षा?

भरतीसाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी, विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त आणि राज्य स्तरावर त्यांच्या विभागाचे प्रमुख यांची समिती असेल.

यासाठी परीक्षा पद्धती निश्चित झाली आहे. परीक्षेसाठी त्यांच्या जिल्ह्याचा इतिहास, भूगोल, स्थानिक बाबींवर 25 टक्के गुण असतील

गट क आणि गट ब या संवर्गातील सर्व रिक्त पदांसाठी भरती होईल. सर्व परीक्षांसाठी राज्यभरात एकाच दिवशी परीक्षा होणार.

दहा जुलैपर्यंत सर्व रिक्त जागांची माहिती राज्य सरकार संकलित करत आहे.

यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यात येणाऱ्या 36 हजार पदांमध्ये ग्रामविकास विभागातील 11 हजार 5 पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील 10 हजार 568 पदे, गृह विभागातील 7 हजार 111 पदे, कृषी विभागातील 2 हजार 572 पदे, पशुसंवर्धन विभागातील 1 हजार 47 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील 837 पदे, जलसंपदा विभागातील 827 पदे, जलसंधारण विभागातील 423 पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील 90 या पदांसह नगरविकास विभागातील 1 हजार 664 पदांचा समावेश आहे.

🔴 कोणत्या विभागात किती पदे भरणार?

ग्रामविकास विभाग- 11 हजार 5 पदे
आरोग्य विभाग- 10 हजार 568 पदे
गृह विभाग- 7 हजार 111 पदे
कृषी विभाग- 2 हजार 572 पदे
पशुसंवर्धन विभाग- 1 हजार 47 पदे
सार्वजनिक बांधकाम विभाग -837 पदे
जलसंपदा विभाग- 827 पदे
जलसंधारण विभाग- 423 पदे
मत्स्यव्यवसाय विकास विभाग- 90
नगरविकास विभाग- 1 हजार 664 पदे