The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
#SSE

Cutoff अंदाज व्यक्त करण्यासाठी आपण मागच्या 2-3 दिवसांपासून राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्कोर Data Collection करत आहोत..
सध्या राज्यसेवा ची जाहिरात कमी असली तरीही नुकतीच MPSC चे अध्यक्ष यांनी दिलेल्या मुलाखतीत मुख्य परीक्षेच्या वेळी जागा वाढतात असे सूतोवाच केले आहे, त्यानुसार -

1. आमच्या मते, सध्या 230 ते 240 स्कोर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी 13 मे पर्यंत संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करावी आणि त्यानंतरच राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास करावा..

2. सध्या 240+ स्कोर असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनी पूर्णपणे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करावा..या वेळेस मुख्य परीक्षा ऑगस्टमध्ये प्रस्तावित असल्याने आतापासून तयारी सुरू केल्यास निश्चितच चांगले यश मिळेल.

3. ज्यांनी संयुक्त पूर्व परीक्षेचा फॉर्म भरला नाही त्यांनी CDPO, अभियांत्रिकी सेवा आणि इतर सरळसेवा परीक्षेची तयारी सुरू करावी..
ज्यांचा पूर्णपणे फोकस राज्यसेवाच आहे, त्यांनी स्वविवेकबुद्धीने योग्य तो निर्णय घ्यावा..

http://telegram.me/thempscupdate
दि. 14 एप्रिल, 2018 रोजी केलेली पोस्ट...👆👆👆

टीम @thempscupdate आणि @nacepune अकॅडमी चा अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला...😊😊👍👍
Forwarded from The MPSC Update ©
दि. 14 एप्रिल, 2018 रोजी केलेली पोस्ट...👆👆👆

टीम @thempscupdate आणि @nacepune अकॅडमी चा अंदाज पुन्हा एकदा अचूक ठरला...😊😊👍👍
आत्मविश्वास आणि संघर्ष करण्याची तुमची तयारी असेल तर तुमची आर्थिक, सामाजिक परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती तुम्हाला हरवू शकत नाही..
IB & RAW officers posted to two very important Positions..
१ जुलै राष्ट्रीय डॉक्टर्स डे (भारत) National Doctor's Day....

१ जुलै हा दिवस भारतात ‘डॉक्टर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ रोजी झाला. डॉ. रॉय यांना भारतरत्न पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. वयाच्या ८० व्या वर्षी म्हणजे १ जुलै १९६२ रोजी डॉ. रॉय यांचा मृत्यू झाला. त्यामुळे या दिवसाला अनुसरूनच भारतात १ जुलै रोजी डॉक्टर्स डे साजरा केला जातो.
🔲🔲🔲
‘डॉक्टर आणि रुग्ण, त्यांचे नातेवाईक’ ही मोठी दरी निर्माण होऊ लागली आहे. काहीवेळेस रुग्ण दगावला जातो, परिणामी डॉक्टरांना मारहाण झाल्याच्या रुग्णालय तोडफोडीच्या घटना घडतात. हे अत्यंत चुकीचे आहे. एखादे गंभीर उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यापूर्वी डॉक्टरांनी खुद्द रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना विश्वासात घेणे तसेच डॉक्टर सुद्धा माणूसच आहे... तो त्याच्या परीने रुग्णाचा जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईकांनी डॉक्टरांना पण समजून घेणे संयम ठेवणे गरजेचे असते. या घटना घडू नयेत म्हणून ही दरी कमी होणे आणि एकमेकांत विश्वासाचे नाते निर्माण होणे आवश्यक आहे.
Forwarded from NACE Academy
RBI Group-B Officer Notification...👆👆👆
Forwarded from Jayendra Walunj
ASO जागा वाढल्या..☺️👍
शेतकऱ्यांसाठी खूशखबर ; 14 पिकांना मिळणार दीडपट हमीभाव
----------------------------------
केंद्र सरकारने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊल उचलण्यास सुरवात केली असून, आज (बुधवार) झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत खरिप पिकांसाठी दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली. सरकारने 2018-19 साठी 14 पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

कापूस 5150, 5450 (लांब धागा), भात 1750, तूर 5675, मूग 6975, उडीद 5600 रुपये झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली आहे. तर 14 पिकांचा हमीभाव दीडपटीने वाढविण्यासही मंजूर देण्यात आली आहे. या निर्णयामुळे धानाच्या हमीभावात 200 रुपये प्रति क्विंटलने वाढ झाली असून, 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्या निर्मिती खर्चापेक्षा जास्त देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला. आर्थिक व्यवहारासंबंधी निर्णय घेणारी मंत्रिमंडळ समितीमध्ये या निर्णयाला मंजूरी देण्यात आली आहे.

यापूर्वी धानासाठी 1550 किंमत देण्यात येत होती, तर आता यामध्ये वाढ होऊन 1750 रुपये करण्यात आली आहे. मूग 5575 वरून आता 6975 तर उडीदची आता 5400 किंमत होती ती 5600 करण्यात आली आहे. तूरदाळ 5450 वरून आता 5675 याची किंमत देण्यात आली आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयाचा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. देशातील 25 कोटी लोक शेतीशी निगडित आहेत. 10 वर्षांनंतर याच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 12 हजार कोटींचा बोजा पडणार आहे.

या 14 पिकांच्या हमीभावात वाढ (क्विंटलमागील दर)-
कापूस- 4320 रुपये (आधी), 5450 रुपये (आता)
भुईमूग- 4450 रुपये (आधी), 4890 रुपये (आता)
सोयाबीन- 3050 रुपये (आधी), 3399 रुपये (आता)
ज्वारी (हायब्रीड)- 1700 रुपये (आधी), 2430 रुपये (आता)
बाजरी- 1425 रुपये (आधी), 1950 रुपये (आता)
भात- 1550 रुपये (आधी), 1750 रुपये (आता)
तूर- 5450 रुपये (आधी), 5675 रुपये (आता)
मूग- 5575 रुपये (आधी), 6975 रुपये (आता)
उडीद- 5400 रुपये (आधी), 5600 रुपये (आता)
मका- 1425 रुपये (आधी), 1700 रुपये (आता)
सूर्यफूल- 4100 रुपये (आधी), 5388 रुपये (आता)
Forwarded from TOPPER 777 Chalu Ghadamodi (pathan Idris Khan)
दि. 29 जून 2018 चे चालू घडामोडी चे 10 प्रश्न आणि उत्तरे.
लेखक- पठाण इद्रीस खान (स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व Topper 777 चे लेखक )
मो. 9420218840
@pathanidris
@Topper777
t.me/topper777