The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
# लक्ष्मीकांत देशमुख -

सनदी अधिकारी असूनही लिखाणासाठी वेळ कसा काढता, असा प्रश्न अनेकजण विचारतात. उलट प्रशासनात काम करताना अनुभवाचे दालन समृद्ध होते. त्यामुळे लेखनाला अधिव वाव मिळतो. लेखन आणि प्रशासन माझ्या आयुष्याच्या दोन बाजू आहेत' असे प्रांजळपणे सांगत लेखनप्रपंच मांडणाऱ्या लक्ष्मीकांत देशमुख यांना उदगीर (जि. लातूर) येथील नियोजित ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा सन्मान मिळाला आहे. मूळचे नांदेड जिल्ह्यातील देशमुख तडफदार सनदी अधिकारी म्हणून परिचित आहेत. अप्पर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी पदानंतर सध्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे संचालकपदी कार्यरत आहेत. इयत्ता आठवीत असताना देशमुख यांची पहिली बालकथा प्रसिद्ध झाली. कॉलेजात कथालेखनाला अधिक धुमारे फुटले. त्यांची आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा वेध घेणारी 'इन्किलाब विरुद्ध जिहाद' कादंबरी विशेष गाजली आहे. 'अंधेरनगरी', 'ऑक्टोपस', 'सलोनी' या कादंबऱ्यांनाही वाचकांची पसंती लाभली. 'पाणी पाणी', 'नंबर वन', 'अंतरीच्या गूढगर्भी', 'अग्निपथ', 'कथांजली', 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या कथासंग्रहांमुळे देशमुखांचे लेखनकौशल्य चर्चेत आले. ललित लिखाण प्रत्येक लेखकाची हातोटी असते. देशमुखांच्या लिखाणाला वास्तवतेची जोड मिळाली. जिल्हाधिकारी असताना दररोज शेकडो लोकांच्या गाठीभेटी होत आणि त्यांचे प्रश्न जवळून पाहत. टँकरचे पाणी मिळवण्यासाठी गावागावात उसळलेली झुंबड त्यांच्या साहित्यिक मनाला अस्वस्थ करणारी होती. त्यातूनच 'पाणी पाणी' सारखा कथासंग्रह आकारास आला. स्त्रीभ्रूणहत्या का घडतात याचा शोध घेताना कौटुंबिक आणि सामाजिक अंगांचा त्यांनी समरसून अभ्यास केला. त्याचे प्रतिबिंब 'सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' या कथासंग्रहात दिसते. मुस्लिम समुदायाचे प्रश्न आणि जागतिक प्रश्नाचे कुतूहल त्यांच्या मनात कायम आहे. या विषयावर सखोल चिंतन करुन उत्तम कादंबरी लिहिण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संतांची भूमी असल्यामुळे देशमुखांना मराठवाड्याचा नितांत आदर वाटतो. मागील साठ वर्षात सर्वसामान्यांच्या प्रश्नावर साहित्यिक एकत्र आले नाहीत ही खंत त्यांना बोचते. हिंंदी-उर्दू साहित्यिकांनी एकत्र येऊन प्रेमचंद यांच्या नेतृत्वाखाली सामान्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला होता. असाच प्रयत्न मराठवाड्यातील साहित्यिकांनी करावा असा त्यांचा प्रयत्न आहे. लेखन आणि प्रशासन यांचा एकत्रित आविष्कार साहित्य चळवळीला नवा आयाम देईल अशी अपेक्षा.
10 डिसेंबर हा दिवस जागतिक पातळीवर "मानवी हक्क दिन " म्हणून 1948 पासून साजरा करण्यात येत आहे.

वर्ष 2017 चे घोषवाक्य- "Let's stand up for Equity, Justice and Human dignity ".
Answer of above question given by "Team MPSC Mantra" is wrong...
४ थे विधान चुकीचे आहे. दुसरे नाही...
सर्वात कमी Voting value Sikkim ची आहे आणि गोवा विधानसभा सदस्यांची नाही