The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
mindmapcharts@PolityMM.pdf
17 MB
#Polity : संपूर्ण रिविजन

http://t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#Polity #Current #MP
राज्यसभा सदस्यांची निवड कशी होते..?

1. संविधानातील चौथ्या अनुसूचिनुसार 28 घटकराज्ये व 3 केंद्रशासित प्रदेश ( असे ज्या ठिकाणी विधानसभा अस्तित्वात आहे ) प्रत्येकी सदस्यसंख्या ठरवली आहे.
उदा. महाराष्ट्र - 19

2. दर 2 वर्षांनी एक-तृतीयांश (1/3rd) उमेदवार 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात.

3. विधानसभा मध्ये उपलब्ध असलेल्या सदस्य संख्येनुसार त्या त्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी "पहिल्या पसंतीची पदे" मिळणे आवश्यक आहे...👇

4. नुकतीच महाराष्ट्रात👉 एकूण 6 जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होणार आहे, त्यात प्रत्येक उमेदवाराला

पहिल्या पसंतीची मते = 288
------------------------- + 1
( एकूण जागा + 1)

उदा. 288/(6+1) = 41.14+ 1 = 42
म्हणजे प्रत्येक उमेदवाराला निवडून येण्यासाठी 42 आमदारांची मते मिळणे आवश्यक आहे.


अधिक माहितीसाठी Join 👇 करा..

http://t.me/politymm1
Forwarded from MPSC
जा. क्र. 036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2022 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या निकालाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8429
उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यात काय असणार?
उत्तराखंड सरकार तसेच देसाई समितीने समान नगरी कायदा लागू करण्याच्या मुख्य उद्देशाबाबत याआधीच स्पष्टीकरण दिलेले आहे. हा अहवाल तयार करताना लैंगिक समानता हा प्रमुख मुद्दा समोर ठेवून काम करण्यात आले. राज्यात राहणाऱ्या नागरिकांसाठी समान नागरी कायद्यासह वारसा हक्काच्या बाबतीत महिला आणि पुरुषाला समान हक्क देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सरकारने सांगितलेले आहे.

बहुपत्नीत्व, इद्दत, हलाल याला हद्दपार?
राज्यातील मुस्लीम महिलांकडून केल्या जाणाऱ्या मागणीला प्रतिसाद म्हणून बहुपत्नीत्व, इद्दत, हलाल याला हद्दपार केले जाईल. तर मुलगा आणि मुलीच्या लग्नाच्या वयात कोणताही बदल करण्यात येणार नाही. तसेच लिव्ह इन रिलेशनशीपबाबतही या कायद्यात काही तरतुदी करण्यात येतील. लिव्ह इन रिलेशनशीप सुरू झाल्यानंतर तसेच हे नाते समाप्त झाल्यानंतर तशी माहिती देणे अनिवार्य करण्यात येणार आहे.
🚨शस्त्र परवाना कसा मिळतो?

शस्त्र परवाना काढण्यासाठी ठरावीक नमुन्यातील अर्ज भरून तो पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल करावा लागतो. बहुसंख्य परवाने संरक्षणाचे कारण देऊन घेण्यात येतात. याशिवाय शेतीच्या पिकाच्या संरक्षणासाठीही अग्निशस्त्र परवाना मिळतो. पण त्याचे प्रमाण फार कमी आहे. अग्निशस्त्र परवान्यासाठी रहिवासी पुरावा, छायाचित्र, कोणते अग्निशस्त्र घेणार याची माहिती, दोन व्यक्तींकडून चारित्र्य प्रमाणपत्र, वैद्याकीय प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्रे, उत्पन्नाचा दाखला, जन्म प्रमाणपत्र तसेच शस्त्रासाठी आवश्यक असलेल्या कारणाची माहिती आदी गोष्टी पोलिसांना द्याव्या लागतात. शॉटगन, हँडगन आणि स्पोर्टगन या तीन प्रकारच्या बंदुकासाठी परवाना मिळतो. अर्जानंतर पोलीस मुख्यालयात प्रक्रिया सुरू होते. पोलिसांकडून संबंधित व्यक्तीचा पूर्वइतिहास तपासला जातो. स्थानिक पोलिसांकडून अहवाल मागवला जातो. त्याबाबत मुंबईत विशेष शाखा तर स्थानिक पातळीवर संबंधित यंत्रणांकडून माहिती घेतली जाते. यावेळी अर्ज करणाऱ्याची मुलाखतही घेतली जाते. अधिकारीदेखील अर्जदाराच्या कागदपत्रांसह आणि संबंधित तपासणीवर समाधानी असतील, तर अर्जदाराला बंदुकीचा परवाना दिला जातो.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#Padma #awards #BharatRatna : "भारतरत्न" संपूर्ण माहिती 👇👇👇👇

🚨 पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात भारतरत्न कुणाकुणाला?

नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यापासून पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे एकेकाळचे अध्यक्ष मदन मोहन मालवीय, माजी पंतप्रधान आणि भाजपा नेते अटल बिहारी वाजपेयी, माजी राष्ट्रपती आणिनेते प्रणव मुखर्जी, आसामी गायक आणि संगीतकार भूपेन हजारिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते नानाजी देशमुख यांचा समावेश आहे.

👉 PM मोदींच्या कार्यकाळात 6 वी & 7 वी भारतरत्न घोषणा : श्री. कर्पूरी ठाकूर व श्री. लालकृष्ण आडवाणी

मालवीय आणि वाजपेयी यांना हा सन्मान २०१५ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्याच्या वर्षभरात मिळाला.
मदन मोहन मालवीय राष्ट्रीय काँग्रेसमधील दिग्गज चेहर्‍यांपैकी एक होते. त्यांनी १९०९, १९१८, १९३२ आणि १९३३ असे चार वेळा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले. त्यांना कायमच संघ परिवाराच्या विचारसरणीचे मानले जायचे. भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य ‘सत्यमेव जयते’ त्यांच्यामुळेच लोकप्रिय झाले.मालवीय हे अखिल भारतीय हिंदू महासभा (१९०६) आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते. त्यांनी १९१९ ते १९३८ पर्यंत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले. संघानुसार काँग्रेसकाळात मालवीय यांना जो सन्मान मिळायला हवा होता तो मिळाला नाही.

अटल बिहारी वाजपेयी भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. लोकसभेच्या नऊ टर्म आणि राज्यसभेच्या दोन टर्मसह चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या संसदीय कारकिर्दीत ते भाजपाचे दिग्गज होते. १९९८ ते २००४ या काळात ते पंतप्रधान पदावर कार्यरत होते. काँग्रेसविरहित सरकारचे वाजपेयी हे पहिले पंतप्रधान होते. ५० हून अधिक वर्ष ते राजकरणात सक्रिय होते.
१९७७ च्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले होते आणि १९९४ मध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये त्यांना “सर्वोत्कृष्ट संसदपटू” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
मोदींनी वाजपेयींच्या कर्तृत्वाची कबुली देणे आणि त्यांना भारतरत्न जाहीर करणे त्यांच्या स्वतःच्या पक्षासाठी महत्त्वाचे होते. मोदींच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे पंतप्रधान म्हणून वाजपेयी यांनी २००२ च्या गुजरात दंगलीत त्यांच्या सरकारच्या भूमिकेवर कुरघोडी केली होती.

२०१९ मध्ये मोदी सरकारने काँग्रेसच्या सर्वात जुन्या दिग्गजांपैकी एक असलेले प्रणव मुखर्जी यांना भारतरत्नसाठी निवडले. मुखर्जी यांनी नागपुरातील संघ मुख्यालयात वार्षिक व्याख्यान देण्याचे निमंत्रण स्वीकारल्यानंतर अवघ्या वर्षभरातच हा पुरस्कार त्यांना मिळाला. मुखर्जी यांची पक्षात अनेक वर्षे मध्यवर्ती भूमिका असूनही, “घराणेशाहीच्या राजकारणा”साठी भाजपाने गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसवर मुखर्जी यांना बाजूला टाकल्याचा आरोप करत, भारतरत्न देऊन सन्मानित केले.
पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत मुखर्जी हे अर्थ आणि गृह यासह काँग्रेस सरकारांतर्गत काही उच्च पदांवर कार्यरत राहिले. २०१२ मध्ये मुखर्जी यांची भारताचे राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली. राहुल गांधी पक्षात समोर आल्याने त्यांना “निवृत्त” करण्याचा हा एक मार्ग म्हणूनही याला पाहिले जात होते.

भूपेन हजारिका यांनाही भारतरत्न देण्याची शिफारस केली. ईशान्येतील प्रमुख सांस्कृतिक प्रतिकांपैकी एक असलेले हजारिका यांनी गायक, गीतकार, संगीतकार, चित्रपट निर्माता आणि सांस्कृतिक कार्यकर्ता या सर्व क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी चाहत्यांची मागणी होती. ही मागणी भाजपा सरकारने त्यांना भारतरत्न प्रदान करून पूर्ण केली. हजारिका हे मूळ आसाम राज्याचे होते, त्यामुळे आसाममधील जनतेसाठी ही आनंदाची बाब होती, ही गोष्ट भाजपा सरकारला चांगलीच माहीत होती.

2019 यावर्षी भारतरत्नचे तिसरे प्राप्तकर्ते चंडिकादास अमृतराव देशमुख होते. त्यांना नानाजी देशमुख म्हणूनही ओळखले जाते. देशमुख यांनी शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबनाच्या क्षेत्रात काम केले होते. परंतु, त्यांचे सर्वात मोठे योगदान भाजपाचा अग्रदूत म्हणून जनसंघाला मजबूत करण्यात दिसले.
देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे जनसंघाला मुंबईतील व्यापारी समुदायामध्ये राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या पाठिंबा निर्माण करण्यास मदत झाली. भारतीय जनसंघाचे खजिनदार या नात्याने, लहान उत्तर भारतीय व्यापाऱ्यांच्या पक्षाच्या प्रतिमेपासून ते मुंबई आणि गुजरात या दोन्ही ठिकाणी मोठ्या व्यापाऱ्यांचे समर्थन असलेल्या पक्षापर्यंत विस्तार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

🚨 टीप : 2014 लोकसभा निवडणुकीपूर्वी श्री. सचिन तेंडुलकर (43वे ) यांना #BharatRatna सन्मानाने गौरविण्यात आले.

http://t.me/thempscupdate
#Padma #awards #bharatratna : 2024

49. कर्पूरी ठाकूर
50. लालकृष्ण आडवाणी
51. चौधरी चरणसिंह
52. पी. व्ही. नरसिंह राव
53. एम. एस. स्वामीनाथन

http://t.me/thempscupdate
#mpsc #timetable #sse #prelims2024

28 एप्रिल, 2024

@thempscupdate
#mpsc #timetable #sse #mains2024

14, 15 आणि 16 डिसेंबर, 2024

🚨 #sse #prelims2024 नंतर जवळपास 7.5 महिन्यानंतर राज्यसेवा मुख्य परिक्षा होईल..!

@thempscupdate
Audio
The MPSC Update ©
Audio
#skilltest #groupcmains2023 #typing

FAQs about typing

by pratik Urkude and kunal Nakade

Tax Assistant 2022

Join @thempscupdate
Forwarded from pratik....urkude
7148 (1).pdf
1.1 MB
7148 (1).pdf
The MPSC Update ©
7148 (1).pdf
#typing #skilltest

Important Instructions to Candidates for Marathi and English Typing Skill Test

Join @thempscupdate
Forwarded from History by M.M.
#history #mm भारत सरकारचा कायदा- 1919 ते कॅबिनेट मिशन👆👆 : घटनाक्रम

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
#history #mm सायमन कमिशन
t.me/historymm
Forwarded from History by M.M.
#history #mm नेहरू रिपोर्ट & जिनाचे 14 मुद्दे
t.me/historymm