The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
अशा अनेक वाटा पोरांना खुणावत असतात.
पण, त्यांच्या नकळत्या वयात आपण त्या वाटा बंद करतो. एकच वाट त्याला दाखवतो किंवा तीच दिसेल, अशी व्यवस्था करतो. आणि मग 'फोकस्ड' काम करायचं. एकदम 'एकच तारा समोर आणि पायतळी अंगार'! अरे, कशाला एकच तारा समोर. अवघं आकाश आहे समोर. मस्त सगळं बघ. सगळ्यातली मजा घे. धमाल कर. ठरव आयुष्यात काय करायचंय!

जगायला असे किती पैसे लागतात? आणि, हव्या त्या वाटेने छान पैसे मिळतातच. अगदी ओला-उबेर चालवणारा महिन्याला लाखभर रूपये मिळवतो. पुस्तकं विकणारे लोक आनंदात जगू शकतात. स्पर्धा परीक्षा करणा-या पोरांना वेगवेगळ्या रंगात सोडा विकणारा गडीही मस्त नोटा छापतो. पैसे मिळतात कुठेही आणि जगायला फार काही पैसे लागत नसतात. आपल्याला आपल्या टर्म्सवर जगता येणं महत्त्वाचं.

'फोकस्ड' याला मी तर एकारलेले असे म्हणतो. आता एखादा चिमुरडा आठवीत असतानाच कोट्याला आयआयटी तयारीला जाईल, तर त्याचं बिचा-याचं आयुष्य काय असणार आहे पुढं? तो झाला अथवा नाही झाला तरी! मुलांना हवं ते करता आलं पाहिजे. करू दिलं पाहिजे. आणि, काही केलंस वा काही नाही झालास, तरी काही बिघडत नाही, हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. एका साच्यातनं काढून सगळ्यांनी एकसाची व्हावं, असा मूर्खाग्रह त्या पोरांचं अख्खं आयुष्य बरबाद करत असतो. शिवाय, त्यातून त्या त्या क्षेत्रांना हवं असणारं टॅलेंट मिळत नाही, ही आणखी वेगळीच सामाजिक समस्या.

आनंदानं जगता येणं आणि आपल्याला हवं ते करता येणं हेच महत्त्वाचं असेल, तर जगण्यापुरते पैसे मिळवणे ही फार मोठी अडचण नसते. पण, नस्त्या प्रतिष्ठेच्या- सामाजिक धारणांच्या ओझ्यामुळे आपण ही संधी घेतच नाही. लोकांनी आपल्याला सॅल्यूट ठोकावा, वरचे पैसे मिळावेत आणि नोकरी कायमस्वरूपी असावी या असल्या फालतू आकर्षणापोटी स्पर्धा परीक्षांचं खूळ आपण तयार करून ठेवलं आहे.

दरवर्षी दोनेक हजार मुलं सरकारी अधिकारी होत असतील. गेल्या दहा वर्षांत अशी वीस-पंचवीस हजार मुलं अधिकारी झाली असतील. कुठं गेली ती मुलं? आज तुमच्या समाजाचे खरेखुरे आयकॉन कोण आहेत? ते वेगळेच आहेत. वेगवेगळ्या वाटा चोखाळणारे आहेत. निवृत्त झालेल्या आयएएस अधिका-यांना विचारा. मग ते तुम्हाला त्यांच्या एकाकीपणाच्या कथा सांगतील. याउलट सृजनशील माणसं निवृत्तीनंतरच्या वयात अधिकच बहरलेली दिसतील. मग ते, बाबा आढाव असोत की आमच्या ज्योती सुभाष. जयंत नारळीकर असोत की रतन टाटा किंवा सुनील गावसकर. भालचंद्र नेमाडे असोत की तारा भवाळकर वा यशवंत मनोहर.

'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार' असलं एकारलेपण तुमच्या मुलांना देऊ नका. त्यांच्या पायतळी अंगार पसरवू नका. आणि, समोर अवघं आकाश खुणावत असताना, त्यांना एकाच ता-यावर 'फोकस' करायला सांगू नका.

विजय तेंडुलकर म्हणाले होते ते खरं.
माणसानं मांजरासारखं असायला पाहिजे. किचनच्या ओट्यावर दिसेल त्या भगुन्यात (पातेल्यात) तोंड घालायला हवं. एका भगुन्यात तोंड घातलं की जिभेला काही चव लागते. लगेच दुस-या भगुन्यावरचं झाकण पायानं दूर सारायचं आणि त्यात तोंड घालायचं.
सगळ्या चवी बघा लेको.
आयुष्य छान आहे.


तुमच्या मुला-मुलींना मोठेपणी काही करू नका. मुळात त्यांना असलं मोठंच करू नका की जे त्यांचं बालसुलभ कुतुहल संपवून टाकेल!
कोणत्याही साच्यात टाकू नका मुलांना.
त्यांना जगायला शिकू द्या. त्यांना जगू द्या.

मग बघा, घरोघरी आनंदाचे झरे सापडतील.

🚨 हा लेख जास्तीत जास्त Share करा..🙏
The MPSC Update © pinned «🚨स्पर्धा परीक्षेचे वास्तव..👇 'यूपीएससी'मध्ये चमकलेल्या पोरा-पोरींच्या कौतुकाच्या बातम्या सध्या गावभर सुरू आहेत. जोडीला 'कोचिंग क्लासेस'च्या मोठमोठ्या जाहिराती झळकत आहेत. बापाने जमीन विकली आणि पोरगी अधिकारी झाली; टेम्पोचालकाचा पोरगा कलेक्टर झाला, वगैरे बातम्यांचा…»
Read: महाराष्ट्राला मिळणार पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ; मुंबई-पुणे प्रवास आता फक्त अडीच तासांत होणार!

🚨देशातील दोन महत्त्वपूर्ण शहारातील प्रवास अधिक जलद व्हावा यासाठी वंदे भारत या रेल्वे चालवण्यात येतात. येत्या दोन वर्षांत तब्बल ४०० वंदे भारत रेल्वे संपूर्ण देशभरात चालवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. देशात वाराणसी ते नवी दिल्ली, नवी दिल्ली ते कटरा आणि हावडा ते रांची या रेल्वेमार्गांवर वंदे भारत रेल्वे धावत आहेत.

https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-to-get-first-vande-bharat-express-the-mumbai-pune-journey-will-now-take-just-two-and-a-half-hours-msr-87-2958682/
Forwarded from The MPSC Update ©
#inspirational : शुभ प्रभात..✌️
#EnB 🚨आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन

👉जागतिक पर्यावरण दिन 👉1972 पासून साजरा केला जातो.

👉दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो

🚨2019 ची संकल्पना(Theme) - Beat air pollution

🚨2020 ची संकल्पना (Theme)- "Biodiversity" and "Time for Nature"

🚨2021 ची संकल्पना (Theme)- "Ecosystem Restoration"

🚨2022 ची संकल्पना (Theme)- ‘Only One Earth’, which focuses on living sustainably in harmony with nature.
विश्लेषण : अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत अकस्मात वाढ कशी झाली?

देशाची खनिज इंधनावरील वीजनिर्मिती क्षमता ही २ लाख ३५ हजार ९२९ मेगावॉट असून त्यापैकी कोळशावर चालणाऱ्या औष्णिक वीजप्रकल्पांची क्षमता २ लाख २६८७ मेगावॉट आहे. देशात एकूण १७३ कोळशावर आधारित वीजप्रकल्प असून तेच प्रामुख्याने वीजमागणी पूर्ण करतात. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ३ हजार ९१० मेगावॉट वीजपुरवठा करण्यात आला. त्यापैकी ६९ टक्के वीज ही कोळशावर आधारित औष्णिक वीजप्रकल्पांतून पुरवण्यात आली.
https://www.loksatta.com/explained/explained-sudden-increase-in-unconventional-energy-production-print-exp-0622-abn-97-2959338/
#EnB धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य

अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम २००६ नुसार, वनवासी अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी यांच्या हक्कांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील क्षेत्रात वन्यजीव संवर्धनासाठी वनहक्क कायद्याच्या कलम दोन(ब)नुसार धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणे अपेक्षित होते. या निर्णयामुळे वन्यजीवांसाठी संरक्षित अधिवास उपलब्ध होणार आहे. राज्यात ४९ अभयारण्ये आणि सहा राष्ट्रीय उद्याने असे एकूण ५५ संरक्षित क्षेत्र आहेत. या सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते.


https://www.loksatta.com/nagpur/maharashtra-becomes-first-state-to-declare-endangered-wildlife-habitats-scsg-91-2961465/
#SnT #Noro विश्लेषण : केरळमध्ये दोन मुलांमध्ये आढळलेला नोरोव्हायरस काय आहे?
https://www.loksatta.com/explained/explained-what-is-the-norovirus-two-cases-found-in-kerala-know-the-symptoms-and-prevention-abn-97-2961773/

नोरोव्हायरस काय आहे?

नोरोव्हायरस सर्व वयोगटातील लोकांना संक्रमित करतो. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) नुसार, नोरोव्हायरस हा एक संसर्गजन्य विषाणू आहे जो संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधून, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने पसरतो. रोगाचा प्रादुर्भाव सहसा क्रूझ जहाजांवर, नर्सिंग होममध्ये आणि इतर बंद जागांवर होतो.

या विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन असल्यामुळे एखाद्याला या विषाणूचा अनेकदा संसर्ग होऊ शकतो. नोरोव्हायरस अनेक जंतुनाशकांना प्रतिरोधक आहे आणि ६० डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात हा विषाणू टिकून राहू शकतो. म्हणूनच फक्त वाफवलेले अन्न किंवा क्लोरीनच्या पाण्यामुळे हा विषाणू मरत नाही. हा विषाणू सामान्य हँड सॅनिटायझर्सच्या वापरानंतरही टिकून राहू शकतो.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
mindmapcharts@PolityMM.pdf
17 MB
#Polity : संपूर्ण रिविजन

http://t.me/politymm1
चालू घडमोडी +अर्थ @
The MPSC Update ©
#combined #Prelims2021
🚨 आपल्या मा.आयोगाला काही बोलू नका रे बाप्पा..🤫😷 ( गंभीर दखल घेतली जाईल.!!! 😇)
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#Imp #SSE राज्यसेवा पूर्व परीक्षेत अतिशय महत्त्वाचे टॉपिक म्हणजे - 👇

"प्राचीन व मध्ययुगीन भारत" या दोन्ही टॉपिकवर साधारणतः 7 ते 8 प्रश्न फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेत विचारले जातात..

त्याअनुषंगाने काही महत्त्वाचे मुद्दे आजपासून पाहूया..

👇👇👇👇
Forwarded from Pawan Mali
प्राचीन_भारत_नोट्स,_पवन_सर,भाग_1.pdf
16.6 MB
प्राचीन भारत नोट्स, पवन सर,भाग 1