Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
राज्यात आतापर्यंत सरोज खापर्डे सर्वाधिक पाच वेळा राज्यसभेवर
https://www.loksatta.com/mumbai/congress-saroj-khaparde-get-rajya-sabha-seat-for-five-times-so-far-zws-70-2954736/
https://www.loksatta.com/mumbai/congress-saroj-khaparde-get-rajya-sabha-seat-for-five-times-so-far-zws-70-2954736/
Loksatta
राज्यात आतापर्यंत सरोज खापर्डे सर्वाधिक पाच वेळा राज्यसभेवर ; प्रफुल्ल पटेल पाचव्यांदा तर संजय राऊत चौथ्यांदा रिंगणात
राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे पाचव्यांदा तर शिवसेनेचे संजय राऊत हे चौथ्यांदा राज्यसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
🚨एमपीएससी’च्या दुखण्यामागचा रोग
#MPSC #Descriptive #mains
लेखामधील काही मोजका भाग- 👇
एकतर वस्तुनिष्ठ-बहुपर्यायी प्रश्न काढण्याचे काम जिकिरीचे आणि कंटाळवाणे आहे. दिलेल्या घटकांवर योग्य संदर्भग्रंथांतून अथवा आधारभूत स्रोतातून प्रश्न शोधून काढणे, आयोगाने दिलेल्या तीन स्वतंत्र रंगांच्या कागदांवर ते प्रश्न अचूक इंग्रजी आणि मराठी वाक्यरचनेनुसार (भाषांतरासहित) लिहिणे, योग्य उत्तराचा पर्याय ठळकपणे मांडणे/ अधोरेखित करणे (येथूनच उत्तरतालिका तयार होते), जेथून योग्य उत्तर निवडले आहे त्याचा ठोस संदर्भ/ स्रोत यांची छायांकित प्रत प्रत्येक प्रश्नाला जोडणे आणि अखेरीस हे सगळे काम आयोगानेच पुरविलेल्या लिफाफ्यात योग्य रितीने सिलबंद करून आयोगाच्या कार्यालयात पोहचवणे… हे काम वेळखाऊ आणि क्षमतेची कसोटी पाहणारे आहे. फक्त एका विशिष्ट घटकावरचे २५ प्रश्न काढायला त्यांना दोन-दोन दिवस लागत होते. या कामाबद्दल आयोगाने माझ्या प्राध्यापक मित्राला प्रत्येक प्रश्नामागे जे मानधन दिले तेही अगदी तुटपुंजे होते.
🚨 ही खरी भीती...😇👇 (एखाद्या स्थानिक प्रकाशनाच्या पुस्तकातून अनेक प्रश्न का येतात..?) 🤔👇
आज स्पर्धा परीक्षेच्या👉 "बाजारात "असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. बेतासबात असलेल्या अनेक खासगी प्रकाशकांनी स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके छापली आहेत. त्यात सगळी आयती माहिती असते. ही माहिती खात्रीशीर असेलच, असे नाही. परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न काढणारी तज्ज्ञ मंडळी जर वेळ वाचवण्यासाठी या अशा प्रकाशकांच्या पुस्तकांचा आधार घेत असतील, तर वारंवार प्रश्न रद्द करण्याची नामुष्की आयोगावर ओढावणारच, यात शंका नाही. आयोगाच्या परीक्षेसाठी घटकनिहाय प्रश्न काढणारी तज्ज्ञ मंडळी (प्रामुख्याने ते शिक्षण क्षेत्रातील असतात) भाषांतर किंवा संदर्भासाठी इतरांची मदत घेत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
https://www.loksatta.com/opinion/mpsc-exam-system-change-objective-question-style-options-pmw-88-2952358/
#MPSC #Descriptive #mains
लेखामधील काही मोजका भाग- 👇
एकतर वस्तुनिष्ठ-बहुपर्यायी प्रश्न काढण्याचे काम जिकिरीचे आणि कंटाळवाणे आहे. दिलेल्या घटकांवर योग्य संदर्भग्रंथांतून अथवा आधारभूत स्रोतातून प्रश्न शोधून काढणे, आयोगाने दिलेल्या तीन स्वतंत्र रंगांच्या कागदांवर ते प्रश्न अचूक इंग्रजी आणि मराठी वाक्यरचनेनुसार (भाषांतरासहित) लिहिणे, योग्य उत्तराचा पर्याय ठळकपणे मांडणे/ अधोरेखित करणे (येथूनच उत्तरतालिका तयार होते), जेथून योग्य उत्तर निवडले आहे त्याचा ठोस संदर्भ/ स्रोत यांची छायांकित प्रत प्रत्येक प्रश्नाला जोडणे आणि अखेरीस हे सगळे काम आयोगानेच पुरविलेल्या लिफाफ्यात योग्य रितीने सिलबंद करून आयोगाच्या कार्यालयात पोहचवणे… हे काम वेळखाऊ आणि क्षमतेची कसोटी पाहणारे आहे. फक्त एका विशिष्ट घटकावरचे २५ प्रश्न काढायला त्यांना दोन-दोन दिवस लागत होते. या कामाबद्दल आयोगाने माझ्या प्राध्यापक मित्राला प्रत्येक प्रश्नामागे जे मानधन दिले तेही अगदी तुटपुंजे होते.
🚨 ही खरी भीती...😇👇 (एखाद्या स्थानिक प्रकाशनाच्या पुस्तकातून अनेक प्रश्न का येतात..?) 🤔👇
आज स्पर्धा परीक्षेच्या👉 "बाजारात "असंख्य पुस्तके उपलब्ध आहेत. बेतासबात असलेल्या अनेक खासगी प्रकाशकांनी स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके छापली आहेत. त्यात सगळी आयती माहिती असते. ही माहिती खात्रीशीर असेलच, असे नाही. परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न काढणारी तज्ज्ञ मंडळी जर वेळ वाचवण्यासाठी या अशा प्रकाशकांच्या पुस्तकांचा आधार घेत असतील, तर वारंवार प्रश्न रद्द करण्याची नामुष्की आयोगावर ओढावणारच, यात शंका नाही. आयोगाच्या परीक्षेसाठी घटकनिहाय प्रश्न काढणारी तज्ज्ञ मंडळी (प्रामुख्याने ते शिक्षण क्षेत्रातील असतात) भाषांतर किंवा संदर्भासाठी इतरांची मदत घेत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
https://www.loksatta.com/opinion/mpsc-exam-system-change-objective-question-style-options-pmw-88-2952358/
Loksatta
‘एमपीएससी’च्या दुखण्यामागचा रोग…
अंतिम निकालातील दिरंगाई, निकाल प्रक्रिया न्यायालयीन सुनावणीत अडकणे, पूर्वनियोजित परीक्षांच्या तारखा बदलणे हे प्रकार सर्रास घडतात. त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांवर अभ्यास सोडून रस्त्यावर उतरण्याची वेळ येते.
🚨स्पर्धा परीक्षेचे वास्तव..👇
'यूपीएससी'मध्ये चमकलेल्या पोरा-पोरींच्या कौतुकाच्या बातम्या सध्या गावभर सुरू आहेत. जोडीला 'कोचिंग क्लासेस'च्या मोठमोठ्या जाहिराती झळकत आहेत. बापाने जमीन विकली आणि पोरगी अधिकारी झाली; टेम्पोचालकाचा पोरगा कलेक्टर झाला, वगैरे बातम्यांचा पाऊस पडतोय.
अशावेळी 'कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही", अशी स्थिती असलेल्या पोरा-पोरींकडे कोणाचे लक्ष नाही. स्पर्धा परीक्षांचा बाजार सध्या एवढ्या तेजीत आहे की अशा मुलांकडे लक्ष जाण्याचेही कारण नाही. बाजाराला दरवर्षी नवे नायक मिळतात. हे नायक 'मोटिव्हेशनल स्पीकर' होऊन जातात. त्यांच्या भाषणांनी बाजाराला आणखी नवे बकरे मिळतात. असा हा प्रवास सुरू असतो.
'यूपीएससी'साठी बारा लाख अर्ज आले तर त्यातल्या आठशे लोकांना पोस्ट मिळते. 'एमपीएससी'मध्येही हे असेच प्रमाण आहे. हे आठशे लोक सगळीकडे झळकतात. बाकीच्या लोकांची स्थिती काय आहे, हे कोणी विचारायला जात नाही पुणे, मुंबई, नागपूर आणि दिल्ली ही आपल्याकडे 'यूपीएससी'ची मुख्य सेंटर आहेत. इथं भरपूर विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला येत असतात. त्यांच्यासाठी राहायला खोल्या, पेइंग गेस्ट्स, अभ्यासिका, पुस्तकं, क्लासेस, खाणावळी असा एक वेगळा बाजारच उभा राहिला आहे. कोणी हरो वा जिंको, बाजार तेजीत असतो. दरवर्षी नव्या हीरोंवर गुलाल उधळला जातो आणि त्याचवेळी कोणीतरी गळफास घेऊन आत्महत्या करत असतो. या आत्महत्यांच्या बातम्या लक्षणीय प्रमाणात असूनही त्यांची दखल घेतली जात नाही. बाजार या परीक्षेचा असो अथवा आयपीएलचा, बाजाराला स्टार लागतातच. त्यामुळे चमचमते स्टार महत्त्वाचे. या अशा आत्महत्या होतच राहणार.
वयोमर्यादा संपेपर्यंत पोरं अभ्यास करत असतात. शेवटी ती पोरंही राहात नाहीत, अशा वयाची होतात. वंचित समूहांची वयोमर्यादा अथवा 'ॲटेम्प्टस'ची संख्या यात शिथिलता असल्यामुळे त्यांची स्थिती आणखी भयंकर होते. तिशीच काय चाळीशी उलटलेली अशी अपयशी माणसं या बाजारात रुतलेली असतात. अखेर त्यांचा बाजार उठतो आणि आयुष्यात काय करायचं हा प्रश्न अनुत्तरित राहातो. शनिपारावर बेघर- गरीब लोकांसाठी जे अन्नदान केले जाते, त्या रांगेत ही माणसं दिसतात. सगळेच दोर कापले गेले की अखेरीस ते गळ्याला लागतात. पण, या संदर्भात कोणीच कधी बोलत नाही.
जी मुलं 'क्वालिफाय' होतात, ती फार बुद्धिमान असतात, असं नाही. जी होत नाहीत, ती अपात्र असतात असंही नाही. परीक्षा नावाचं प्रकरण फार विश्वासार्ह असतं, असंच मुळी नाही. काहींचा मटका लागतो. काहींचा लागत नाही. लागला तर एकदम मालामाल. नाही लागला तर आयुष्याची दाणादाण. कोणाचं काही होवो, क्लासेसच्या नव्या इमारती उभ्या राहातात. प्रकाशनं आणि पुस्तक विक्रेते गब्बर होतात. यांच्यासाठी खाणावळी चालवून मेसमालकांची पोटं सुटतात. अभ्यासिका सुरू करणारे विनासायास श्रीमंत होतात.
मुळात, हे घडते कशामुळे?
अमेरिका वा युरोपातल्या देशात सरकारी नोक-यांचे हे असले गारूड नाही. तिथं बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी मुलं संशोधन, व्यवस्थापन, तंत्रज्ञान, पत्रकारिता, कला, शिक्षण, आरोग्य, लॉ, फायनान्स, बॅंकिंग, राजकारण, स्वतंत्र उद्योग अशा अनेकविध क्षेत्रांकडं वळतात. आपल्याकडं सगळ्यांना सरकारी नोकरी किंवा मग आयआयटी- आयटी एवढंच कसं करायचं असतं? त्यातही शहरातल्या मुला-मुलींचा कल आयटी-आयआयटीकडं आणि खेड्यातल्या मुलांची भिस्त स्पर्धा परीक्षांवर. त्याशिवाय जगात कोणाला काही करायचं नसतं!
ब्रिटिशांनी ज्या देशांवर राज्य केलं, तिथं हे साहेबी नोक-यांचं आकर्षण भयंकर आहे. शिवाय, त्यांना मिळणारा मानमरातब, त्यांचे नोकर-चाकर, त्यांच्याकडं असणारी निरंकुश सत्ता, पैसे मिळण्याच्या वेगवेगळ्या वाटा आणि कमाल सुरक्षितता यामुळं या नोक-यांचं भयंकर आकर्षण. अशा अधिका-यांना 'आयकॉन' वगैरे मानण्याची मानसिकता. माध्यमांनी ती आणखी वाढवली. व्यवस्थेविषयी नाराजी असते. राजकीय नेत्यांविषयी घृणा असते. पण, तीच व्यवस्था चालवणारे भ्रष्ट प्रशासकीय अधिकारीही सगळ्यांचे आयकॉन असतात.
दुसरा मुख्य मुद्दा आहे तो वेगळाच.
आपल्याकडे, 'आयुष्यात पुढे काय होणार', याचं फार कौतुक असतं. अगदी लहान मुलालाही 'मोठा झाल्यावर तू काय होणार?' असले प्रश्न विचारायला आपल्याला भलतं आवडतं. मुलांना खरंतर बरंच काही व्हायचं असतं.
मला आठवतं.
माझ्या मुंबईस्थित सहका-याचा मुलगा परवा वडिलांसोबत आला होता. त्याला कोणीतरी विचारलं - "मोठा झाल्यावर तू कोण होणार?"
बारा-तेरा वर्षांचा तो गोड चिमुरडा भारी हसला. म्हणाला, "मला राष्ट्रपती व्हायचं होतं. कारण त्यांचं घर मोठं असतं. पण, आता प्लान मी चेंज केला. आता मला 'आर्किऑलॉजी' शिकायचंय. किंवा वैमानिक व्हायचंय. पण, आई म्हणते की सायंटिस्ट हो. बघू, काय ठरतंय!"
'यूपीएससी'मध्ये चमकलेल्या पोरा-पोरींच्या कौतुकाच्या बातम्या सध्या गावभर सुरू आहेत. जोडीला 'कोचिंग क्लासेस'च्या मोठमोठ्या जाहिराती झळकत आहेत. बापाने जमीन विकली आणि पोरगी अधिकारी झाली; टेम्पोचालकाचा पोरगा कलेक्टर झाला, वगैरे बातम्यांचा पाऊस पडतोय.
अशावेळी 'कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही", अशी स्थिती असलेल्या पोरा-पोरींकडे कोणाचे लक्ष नाही. स्पर्धा परीक्षांचा बाजार सध्या एवढ्या तेजीत आहे की अशा मुलांकडे लक्ष जाण्याचेही कारण नाही. बाजाराला दरवर्षी नवे नायक मिळतात. हे नायक 'मोटिव्हेशनल स्पीकर' होऊन जातात. त्यांच्या भाषणांनी बाजाराला आणखी नवे बकरे मिळतात. असा हा प्रवास सुरू असतो.
'यूपीएससी'साठी बारा लाख अर्ज आले तर त्यातल्या आठशे लोकांना पोस्ट मिळते. 'एमपीएससी'मध्येही हे असेच प्रमाण आहे. हे आठशे लोक सगळीकडे झळकतात. बाकीच्या लोकांची स्थिती काय आहे, हे कोणी विचारायला जात नाही पुणे, मुंबई, नागपूर आणि दिल्ली ही आपल्याकडे 'यूपीएससी'ची मुख्य सेंटर आहेत. इथं भरपूर विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायला येत असतात. त्यांच्यासाठी राहायला खोल्या, पेइंग गेस्ट्स, अभ्यासिका, पुस्तकं, क्लासेस, खाणावळी असा एक वेगळा बाजारच उभा राहिला आहे. कोणी हरो वा जिंको, बाजार तेजीत असतो. दरवर्षी नव्या हीरोंवर गुलाल उधळला जातो आणि त्याचवेळी कोणीतरी गळफास घेऊन आत्महत्या करत असतो. या आत्महत्यांच्या बातम्या लक्षणीय प्रमाणात असूनही त्यांची दखल घेतली जात नाही. बाजार या परीक्षेचा असो अथवा आयपीएलचा, बाजाराला स्टार लागतातच. त्यामुळे चमचमते स्टार महत्त्वाचे. या अशा आत्महत्या होतच राहणार.
वयोमर्यादा संपेपर्यंत पोरं अभ्यास करत असतात. शेवटी ती पोरंही राहात नाहीत, अशा वयाची होतात. वंचित समूहांची वयोमर्यादा अथवा 'ॲटेम्प्टस'ची संख्या यात शिथिलता असल्यामुळे त्यांची स्थिती आणखी भयंकर होते. तिशीच काय चाळीशी उलटलेली अशी अपयशी माणसं या बाजारात रुतलेली असतात. अखेर त्यांचा बाजार उठतो आणि आयुष्यात काय करायचं हा प्रश्न अनुत्तरित राहातो. शनिपारावर बेघर- गरीब लोकांसाठी जे अन्नदान केले जाते, त्या रांगेत ही माणसं दिसतात. सगळेच दोर कापले गेले की अखेरीस ते गळ्याला लागतात. पण, या संदर्भात कोणीच कधी बोलत नाही.
जी मुलं 'क्वालिफाय' होतात, ती फार बुद्धिमान असतात, असं नाही. जी होत नाहीत, ती अपात्र असतात असंही नाही. परीक्षा नावाचं प्रकरण फार विश्वासार्ह असतं, असंच मुळी नाही. काहींचा मटका लागतो. काहींचा लागत नाही. लागला तर एकदम मालामाल. नाही लागला तर आयुष्याची दाणादाण. कोणाचं काही होवो, क्लासेसच्या नव्या इमारती उभ्या राहातात. प्रकाशनं आणि पुस्तक विक्रेते गब्बर होतात. यांच्यासाठी खाणावळी चालवून मेसमालकांची पोटं सुटतात. अभ्यासिका सुरू करणारे विनासायास श्रीमंत होतात.
मुळात, हे घडते कशामुळे?
अमेरिका वा युरोपातल्या देशात सरकारी नोक-यांचे हे असले गारूड नाही. तिथं बुद्धिमान आणि महत्त्वाकांक्षी मुलं संशोधन, व्यवस्थापन, तंत्रज्ञान, पत्रकारिता, कला, शिक्षण, आरोग्य, लॉ, फायनान्स, बॅंकिंग, राजकारण, स्वतंत्र उद्योग अशा अनेकविध क्षेत्रांकडं वळतात. आपल्याकडं सगळ्यांना सरकारी नोकरी किंवा मग आयआयटी- आयटी एवढंच कसं करायचं असतं? त्यातही शहरातल्या मुला-मुलींचा कल आयटी-आयआयटीकडं आणि खेड्यातल्या मुलांची भिस्त स्पर्धा परीक्षांवर. त्याशिवाय जगात कोणाला काही करायचं नसतं!
ब्रिटिशांनी ज्या देशांवर राज्य केलं, तिथं हे साहेबी नोक-यांचं आकर्षण भयंकर आहे. शिवाय, त्यांना मिळणारा मानमरातब, त्यांचे नोकर-चाकर, त्यांच्याकडं असणारी निरंकुश सत्ता, पैसे मिळण्याच्या वेगवेगळ्या वाटा आणि कमाल सुरक्षितता यामुळं या नोक-यांचं भयंकर आकर्षण. अशा अधिका-यांना 'आयकॉन' वगैरे मानण्याची मानसिकता. माध्यमांनी ती आणखी वाढवली. व्यवस्थेविषयी नाराजी असते. राजकीय नेत्यांविषयी घृणा असते. पण, तीच व्यवस्था चालवणारे भ्रष्ट प्रशासकीय अधिकारीही सगळ्यांचे आयकॉन असतात.
दुसरा मुख्य मुद्दा आहे तो वेगळाच.
आपल्याकडे, 'आयुष्यात पुढे काय होणार', याचं फार कौतुक असतं. अगदी लहान मुलालाही 'मोठा झाल्यावर तू काय होणार?' असले प्रश्न विचारायला आपल्याला भलतं आवडतं. मुलांना खरंतर बरंच काही व्हायचं असतं.
मला आठवतं.
माझ्या मुंबईस्थित सहका-याचा मुलगा परवा वडिलांसोबत आला होता. त्याला कोणीतरी विचारलं - "मोठा झाल्यावर तू कोण होणार?"
बारा-तेरा वर्षांचा तो गोड चिमुरडा भारी हसला. म्हणाला, "मला राष्ट्रपती व्हायचं होतं. कारण त्यांचं घर मोठं असतं. पण, आता प्लान मी चेंज केला. आता मला 'आर्किऑलॉजी' शिकायचंय. किंवा वैमानिक व्हायचंय. पण, आई म्हणते की सायंटिस्ट हो. बघू, काय ठरतंय!"
अशा अनेक वाटा पोरांना खुणावत असतात.
पण, त्यांच्या नकळत्या वयात आपण त्या वाटा बंद करतो. एकच वाट त्याला दाखवतो किंवा तीच दिसेल, अशी व्यवस्था करतो. आणि मग 'फोकस्ड' काम करायचं. एकदम 'एकच तारा समोर आणि पायतळी अंगार'! अरे, कशाला एकच तारा समोर. अवघं आकाश आहे समोर. मस्त सगळं बघ. सगळ्यातली मजा घे. धमाल कर. ठरव आयुष्यात काय करायचंय!
जगायला असे किती पैसे लागतात? आणि, हव्या त्या वाटेने छान पैसे मिळतातच. अगदी ओला-उबेर चालवणारा महिन्याला लाखभर रूपये मिळवतो. पुस्तकं विकणारे लोक आनंदात जगू शकतात. स्पर्धा परीक्षा करणा-या पोरांना वेगवेगळ्या रंगात सोडा विकणारा गडीही मस्त नोटा छापतो. पैसे मिळतात कुठेही आणि जगायला फार काही पैसे लागत नसतात. आपल्याला आपल्या टर्म्सवर जगता येणं महत्त्वाचं.
'फोकस्ड' याला मी तर एकारलेले असे म्हणतो. आता एखादा चिमुरडा आठवीत असतानाच कोट्याला आयआयटी तयारीला जाईल, तर त्याचं बिचा-याचं आयुष्य काय असणार आहे पुढं? तो झाला अथवा नाही झाला तरी! मुलांना हवं ते करता आलं पाहिजे. करू दिलं पाहिजे. आणि, काही केलंस वा काही नाही झालास, तरी काही बिघडत नाही, हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. एका साच्यातनं काढून सगळ्यांनी एकसाची व्हावं, असा मूर्खाग्रह त्या पोरांचं अख्खं आयुष्य बरबाद करत असतो. शिवाय, त्यातून त्या त्या क्षेत्रांना हवं असणारं टॅलेंट मिळत नाही, ही आणखी वेगळीच सामाजिक समस्या.
आनंदानं जगता येणं आणि आपल्याला हवं ते करता येणं हेच महत्त्वाचं असेल, तर जगण्यापुरते पैसे मिळवणे ही फार मोठी अडचण नसते. पण, नस्त्या प्रतिष्ठेच्या- सामाजिक धारणांच्या ओझ्यामुळे आपण ही संधी घेतच नाही. लोकांनी आपल्याला सॅल्यूट ठोकावा, वरचे पैसे मिळावेत आणि नोकरी कायमस्वरूपी असावी या असल्या फालतू आकर्षणापोटी स्पर्धा परीक्षांचं खूळ आपण तयार करून ठेवलं आहे.
दरवर्षी दोनेक हजार मुलं सरकारी अधिकारी होत असतील. गेल्या दहा वर्षांत अशी वीस-पंचवीस हजार मुलं अधिकारी झाली असतील. कुठं गेली ती मुलं? आज तुमच्या समाजाचे खरेखुरे आयकॉन कोण आहेत? ते वेगळेच आहेत. वेगवेगळ्या वाटा चोखाळणारे आहेत. निवृत्त झालेल्या आयएएस अधिका-यांना विचारा. मग ते तुम्हाला त्यांच्या एकाकीपणाच्या कथा सांगतील. याउलट सृजनशील माणसं निवृत्तीनंतरच्या वयात अधिकच बहरलेली दिसतील. मग ते, बाबा आढाव असोत की आमच्या ज्योती सुभाष. जयंत नारळीकर असोत की रतन टाटा किंवा सुनील गावसकर. भालचंद्र नेमाडे असोत की तारा भवाळकर वा यशवंत मनोहर.
'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार' असलं एकारलेपण तुमच्या मुलांना देऊ नका. त्यांच्या पायतळी अंगार पसरवू नका. आणि, समोर अवघं आकाश खुणावत असताना, त्यांना एकाच ता-यावर 'फोकस' करायला सांगू नका.
विजय तेंडुलकर म्हणाले होते ते खरं.
माणसानं मांजरासारखं असायला पाहिजे. किचनच्या ओट्यावर दिसेल त्या भगुन्यात (पातेल्यात) तोंड घालायला हवं. एका भगुन्यात तोंड घातलं की जिभेला काही चव लागते. लगेच दुस-या भगुन्यावरचं झाकण पायानं दूर सारायचं आणि त्यात तोंड घालायचं.
सगळ्या चवी बघा लेको.
आयुष्य छान आहे.
तुमच्या मुला-मुलींना मोठेपणी काही करू नका. मुळात त्यांना असलं मोठंच करू नका की जे त्यांचं बालसुलभ कुतुहल संपवून टाकेल!
कोणत्याही साच्यात टाकू नका मुलांना.
त्यांना जगायला शिकू द्या. त्यांना जगू द्या.
मग बघा, घरोघरी आनंदाचे झरे सापडतील.
🚨 हा लेख जास्तीत जास्त Share करा..🙏
पण, त्यांच्या नकळत्या वयात आपण त्या वाटा बंद करतो. एकच वाट त्याला दाखवतो किंवा तीच दिसेल, अशी व्यवस्था करतो. आणि मग 'फोकस्ड' काम करायचं. एकदम 'एकच तारा समोर आणि पायतळी अंगार'! अरे, कशाला एकच तारा समोर. अवघं आकाश आहे समोर. मस्त सगळं बघ. सगळ्यातली मजा घे. धमाल कर. ठरव आयुष्यात काय करायचंय!
जगायला असे किती पैसे लागतात? आणि, हव्या त्या वाटेने छान पैसे मिळतातच. अगदी ओला-उबेर चालवणारा महिन्याला लाखभर रूपये मिळवतो. पुस्तकं विकणारे लोक आनंदात जगू शकतात. स्पर्धा परीक्षा करणा-या पोरांना वेगवेगळ्या रंगात सोडा विकणारा गडीही मस्त नोटा छापतो. पैसे मिळतात कुठेही आणि जगायला फार काही पैसे लागत नसतात. आपल्याला आपल्या टर्म्सवर जगता येणं महत्त्वाचं.
'फोकस्ड' याला मी तर एकारलेले असे म्हणतो. आता एखादा चिमुरडा आठवीत असतानाच कोट्याला आयआयटी तयारीला जाईल, तर त्याचं बिचा-याचं आयुष्य काय असणार आहे पुढं? तो झाला अथवा नाही झाला तरी! मुलांना हवं ते करता आलं पाहिजे. करू दिलं पाहिजे. आणि, काही केलंस वा काही नाही झालास, तरी काही बिघडत नाही, हे त्यांना सांगितलं गेलं पाहिजे. एका साच्यातनं काढून सगळ्यांनी एकसाची व्हावं, असा मूर्खाग्रह त्या पोरांचं अख्खं आयुष्य बरबाद करत असतो. शिवाय, त्यातून त्या त्या क्षेत्रांना हवं असणारं टॅलेंट मिळत नाही, ही आणखी वेगळीच सामाजिक समस्या.
आनंदानं जगता येणं आणि आपल्याला हवं ते करता येणं हेच महत्त्वाचं असेल, तर जगण्यापुरते पैसे मिळवणे ही फार मोठी अडचण नसते. पण, नस्त्या प्रतिष्ठेच्या- सामाजिक धारणांच्या ओझ्यामुळे आपण ही संधी घेतच नाही. लोकांनी आपल्याला सॅल्यूट ठोकावा, वरचे पैसे मिळावेत आणि नोकरी कायमस्वरूपी असावी या असल्या फालतू आकर्षणापोटी स्पर्धा परीक्षांचं खूळ आपण तयार करून ठेवलं आहे.
दरवर्षी दोनेक हजार मुलं सरकारी अधिकारी होत असतील. गेल्या दहा वर्षांत अशी वीस-पंचवीस हजार मुलं अधिकारी झाली असतील. कुठं गेली ती मुलं? आज तुमच्या समाजाचे खरेखुरे आयकॉन कोण आहेत? ते वेगळेच आहेत. वेगवेगळ्या वाटा चोखाळणारे आहेत. निवृत्त झालेल्या आयएएस अधिका-यांना विचारा. मग ते तुम्हाला त्यांच्या एकाकीपणाच्या कथा सांगतील. याउलट सृजनशील माणसं निवृत्तीनंतरच्या वयात अधिकच बहरलेली दिसतील. मग ते, बाबा आढाव असोत की आमच्या ज्योती सुभाष. जयंत नारळीकर असोत की रतन टाटा किंवा सुनील गावसकर. भालचंद्र नेमाडे असोत की तारा भवाळकर वा यशवंत मनोहर.
'एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार' असलं एकारलेपण तुमच्या मुलांना देऊ नका. त्यांच्या पायतळी अंगार पसरवू नका. आणि, समोर अवघं आकाश खुणावत असताना, त्यांना एकाच ता-यावर 'फोकस' करायला सांगू नका.
विजय तेंडुलकर म्हणाले होते ते खरं.
माणसानं मांजरासारखं असायला पाहिजे. किचनच्या ओट्यावर दिसेल त्या भगुन्यात (पातेल्यात) तोंड घालायला हवं. एका भगुन्यात तोंड घातलं की जिभेला काही चव लागते. लगेच दुस-या भगुन्यावरचं झाकण पायानं दूर सारायचं आणि त्यात तोंड घालायचं.
सगळ्या चवी बघा लेको.
आयुष्य छान आहे.
तुमच्या मुला-मुलींना मोठेपणी काही करू नका. मुळात त्यांना असलं मोठंच करू नका की जे त्यांचं बालसुलभ कुतुहल संपवून टाकेल!
कोणत्याही साच्यात टाकू नका मुलांना.
त्यांना जगायला शिकू द्या. त्यांना जगू द्या.
मग बघा, घरोघरी आनंदाचे झरे सापडतील.
🚨 हा लेख जास्तीत जास्त Share करा..🙏
The MPSC Update © pinned «🚨स्पर्धा परीक्षेचे वास्तव..👇 'यूपीएससी'मध्ये चमकलेल्या पोरा-पोरींच्या कौतुकाच्या बातम्या सध्या गावभर सुरू आहेत. जोडीला 'कोचिंग क्लासेस'च्या मोठमोठ्या जाहिराती झळकत आहेत. बापाने जमीन विकली आणि पोरगी अधिकारी झाली; टेम्पोचालकाचा पोरगा कलेक्टर झाला, वगैरे बातम्यांचा…»
Read: महाराष्ट्राला मिळणार पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ; मुंबई-पुणे प्रवास आता फक्त अडीच तासांत होणार!
🚨देशातील दोन महत्त्वपूर्ण शहारातील प्रवास अधिक जलद व्हावा यासाठी वंदे भारत या रेल्वे चालवण्यात येतात. येत्या दोन वर्षांत तब्बल ४०० वंदे भारत रेल्वे संपूर्ण देशभरात चालवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. देशात वाराणसी ते नवी दिल्ली, नवी दिल्ली ते कटरा आणि हावडा ते रांची या रेल्वेमार्गांवर वंदे भारत रेल्वे धावत आहेत.
https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-to-get-first-vande-bharat-express-the-mumbai-pune-journey-will-now-take-just-two-and-a-half-hours-msr-87-2958682/
🚨देशातील दोन महत्त्वपूर्ण शहारातील प्रवास अधिक जलद व्हावा यासाठी वंदे भारत या रेल्वे चालवण्यात येतात. येत्या दोन वर्षांत तब्बल ४०० वंदे भारत रेल्वे संपूर्ण देशभरात चालवण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय. देशात वाराणसी ते नवी दिल्ली, नवी दिल्ली ते कटरा आणि हावडा ते रांची या रेल्वेमार्गांवर वंदे भारत रेल्वे धावत आहेत.
https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-to-get-first-vande-bharat-express-the-mumbai-pune-journey-will-now-take-just-two-and-a-half-hours-msr-87-2958682/
Loksatta
महाराष्ट्राला मिळणार पहिली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस ; मुंबई-पुणे प्रवास आता फक्त अडीच तासांत होणार!
देशभरात आगामी दोन वर्षात ४०० वंदे भारत रेल्वे चालवण्याची केंद्र सरकारची योजना आहे.
#EnB 🚨आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन
👉जागतिक पर्यावरण दिन 👉1972 पासून साजरा केला जातो.
👉दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो
🚨2019 ची संकल्पना(Theme) - Beat air pollution
🚨2020 ची संकल्पना (Theme)- "Biodiversity" and "Time for Nature"
🚨2021 ची संकल्पना (Theme)- "Ecosystem Restoration"
🚨2022 ची संकल्पना (Theme)- ‘Only One Earth’, which focuses on living sustainably in harmony with nature.
👉जागतिक पर्यावरण दिन 👉1972 पासून साजरा केला जातो.
👉दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो
🚨2019 ची संकल्पना(Theme) - Beat air pollution
🚨2020 ची संकल्पना (Theme)- "Biodiversity" and "Time for Nature"
🚨2021 ची संकल्पना (Theme)- "Ecosystem Restoration"
🚨2022 ची संकल्पना (Theme)- ‘Only One Earth’, which focuses on living sustainably in harmony with nature.
विश्लेषण : अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत अकस्मात वाढ कशी झाली?
✅ देशाची खनिज इंधनावरील वीजनिर्मिती क्षमता ही २ लाख ३५ हजार ९२९ मेगावॉट असून त्यापैकी कोळशावर चालणाऱ्या औष्णिक वीजप्रकल्पांची क्षमता २ लाख २६८७ मेगावॉट आहे. देशात एकूण १७३ कोळशावर आधारित वीजप्रकल्प असून तेच प्रामुख्याने वीजमागणी पूर्ण करतात. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ३ हजार ९१० मेगावॉट वीजपुरवठा करण्यात आला. त्यापैकी ६९ टक्के वीज ही कोळशावर आधारित औष्णिक वीजप्रकल्पांतून पुरवण्यात आली.
https://www.loksatta.com/explained/explained-sudden-increase-in-unconventional-energy-production-print-exp-0622-abn-97-2959338/
✅ देशाची खनिज इंधनावरील वीजनिर्मिती क्षमता ही २ लाख ३५ हजार ९२९ मेगावॉट असून त्यापैकी कोळशावर चालणाऱ्या औष्णिक वीजप्रकल्पांची क्षमता २ लाख २६८७ मेगावॉट आहे. देशात एकूण १७३ कोळशावर आधारित वीजप्रकल्प असून तेच प्रामुख्याने वीजमागणी पूर्ण करतात. गेल्या २४ तासांत देशात २ लाख ३ हजार ९१० मेगावॉट वीजपुरवठा करण्यात आला. त्यापैकी ६९ टक्के वीज ही कोळशावर आधारित औष्णिक वीजप्रकल्पांतून पुरवण्यात आली.
https://www.loksatta.com/explained/explained-sudden-increase-in-unconventional-energy-production-print-exp-0622-abn-97-2959338/
Loksatta
विश्लेषण : अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत अकस्मात वाढ कशी झाली?
देशातील वीजमागणीत मागील वर्षीच्या तुलनेत १२ टक्के तर महाराष्ट्रातील वीजमागणीत २० टक्क्यांहून अधिक वाढ झाली
#EnB धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित होणारे महाराष्ट्र भारतातील पहिले राज्य
✅ अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम २००६ नुसार, वनवासी अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी यांच्या हक्कांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील क्षेत्रात वन्यजीव संवर्धनासाठी वनहक्क कायद्याच्या कलम दोन(ब)नुसार धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणे अपेक्षित होते. या निर्णयामुळे वन्यजीवांसाठी संरक्षित अधिवास उपलब्ध होणार आहे. राज्यात ४९ अभयारण्ये आणि सहा राष्ट्रीय उद्याने असे एकूण ५५ संरक्षित क्षेत्र आहेत. या सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते.
https://www.loksatta.com/nagpur/maharashtra-becomes-first-state-to-declare-endangered-wildlife-habitats-scsg-91-2961465/
✅ अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी अधिनियम २००६ नुसार, वनवासी अनुसूचित जनजाती व इतर पारंपरिक वनवासी यांच्या हक्कांना मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानातील क्षेत्रात वन्यजीव संवर्धनासाठी वनहक्क कायद्याच्या कलम दोन(ब)नुसार धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणे अपेक्षित होते. या निर्णयामुळे वन्यजीवांसाठी संरक्षित अधिवास उपलब्ध होणार आहे. राज्यात ४९ अभयारण्ये आणि सहा राष्ट्रीय उद्याने असे एकूण ५५ संरक्षित क्षेत्र आहेत. या सर्व संरक्षित क्षेत्राकरिता धोकाग्रस्त वन्यजीव अधिवासाचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते.
https://www.loksatta.com/nagpur/maharashtra-becomes-first-state-to-declare-endangered-wildlife-habitats-scsg-91-2961465/
#SnT #Noro विश्लेषण : केरळमध्ये दोन मुलांमध्ये आढळलेला नोरोव्हायरस काय आहे?
https://www.loksatta.com/explained/explained-what-is-the-norovirus-two-cases-found-in-kerala-know-the-symptoms-and-prevention-abn-97-2961773/
नोरोव्हायरस काय आहे?
नोरोव्हायरस सर्व वयोगटातील लोकांना संक्रमित करतो. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) नुसार, नोरोव्हायरस हा एक संसर्गजन्य विषाणू आहे जो संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधून, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने पसरतो. रोगाचा प्रादुर्भाव सहसा क्रूझ जहाजांवर, नर्सिंग होममध्ये आणि इतर बंद जागांवर होतो.
या विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन असल्यामुळे एखाद्याला या विषाणूचा अनेकदा संसर्ग होऊ शकतो. नोरोव्हायरस अनेक जंतुनाशकांना प्रतिरोधक आहे आणि ६० डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात हा विषाणू टिकून राहू शकतो. म्हणूनच फक्त वाफवलेले अन्न किंवा क्लोरीनच्या पाण्यामुळे हा विषाणू मरत नाही. हा विषाणू सामान्य हँड सॅनिटायझर्सच्या वापरानंतरही टिकून राहू शकतो.
https://www.loksatta.com/explained/explained-what-is-the-norovirus-two-cases-found-in-kerala-know-the-symptoms-and-prevention-abn-97-2961773/
नोरोव्हायरस काय आहे?
नोरोव्हायरस सर्व वयोगटातील लोकांना संक्रमित करतो. सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी) नुसार, नोरोव्हायरस हा एक संसर्गजन्य विषाणू आहे जो संक्रमित व्यक्तीशी थेट संपर्क साधून, दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने पसरतो. रोगाचा प्रादुर्भाव सहसा क्रूझ जहाजांवर, नर्सिंग होममध्ये आणि इतर बंद जागांवर होतो.
या विषाणूचे वेगवेगळे स्ट्रेन असल्यामुळे एखाद्याला या विषाणूचा अनेकदा संसर्ग होऊ शकतो. नोरोव्हायरस अनेक जंतुनाशकांना प्रतिरोधक आहे आणि ६० डिग्री सेल्सिअसपर्यंतच्या तापमानात हा विषाणू टिकून राहू शकतो. म्हणूनच फक्त वाफवलेले अन्न किंवा क्लोरीनच्या पाण्यामुळे हा विषाणू मरत नाही. हा विषाणू सामान्य हँड सॅनिटायझर्सच्या वापरानंतरही टिकून राहू शकतो.
Loksatta
विश्लेषण : केरळमध्ये दोन मुलांमध्ये आढळलेला नोरोव्हायरस काय आहे?
नोरोव्हायर किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घ्या
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
mindmapcharts@PolityMM.pdf
17 MB