Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
*प्रिय अंदमान,*
स. न. वि. वि.
तुझ्या पोर्टब्लेअरच्या विमानतळाला आपल्या *स्वातंत्र्यवीर सावरकरांचं* नाव दिलं आणि माझी तबियत खूश झाली. तूही सुखावला असशील ना? त्यांच्यासारख्या क्रांतिकारकांमुळे तू जगाला ज्ञात झालास. ते तुझ्या इथे आलेल्या क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते.
सांग ना, नाही तर आधी तुझं अस्तित्व काय होतं? एक भूगोल असलेला भूभाग! पण इतिहास नाही. चिनी प्रवासी इत्सिंग आणि मार्को पोलीच्या प्रवासवर्णनात तुझा उल्लेख आढळतो. पण बस तेवढ्यापुरताच! आधुनिक संस्कृतीचा स्पर्शच तुला झाला नव्हता.
साहसी गोरे आले आणि तुझ्या इथे वसाहत टाकली. कॅप्टन ब्लेअर तुझ्याकडे आरमार घेऊन आला. तुझ्या इथली रानटी माणसं, श्वापदं आणि घनदाट जंगलं पाहून गोऱ्यांनाही रानटी कल्पना सुचल्या. त्यांनी तिथे अट्टल गुन्हेगारांसाठी जेल बनवली. त्या रानटी वातावरणाला शोभा आणतील असे जेलर ठेवले. मी असं ऐकलंय की तुझ्या इथे असे काही खेकडे आहेत, जे माडाच्या झाडावर चढतात आणि त्यांची नांगी स्ट्रॉसारखी वापरून नारळातलं पाणी पितात? खरंच त्या गोऱ्यांच्या जेलमध्ये जेलर्ससुद्धा खेकडेच होते. तो सावरकरांना छळणारा बारी काय होता? ते कैद्यांचं रक्त प्यायचे. माणसांचं रूप घेतलेले ते खेकडे होते. गोऱ्यांनी तुझं नाव 'काळं पाणी' करून टाकलं. ज्याला हालहाल करून मारायचं असेल त्याला ते काळ्या पाण्याला पाठवत. आपल्या १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातले स्वातंत्र्यसैनिकही तुझ्याच जेलमध्ये पाठवले गेले होते. पण ४ जुलै १९११ रोजी 'महाराजा' बोट तुझ्या बेटाला लागली आणि इतिहासच तुझ्या धक्क्याला लागला. हातापायात लोखंडी बेड्या ठोकलेला एक तरतरीत बॅरिस्टर त्या बोटीतून उतरला.
साखळदंडात गुरफटलेल्या दरोडेखोरांची तुला सवय होती, पण हा साधासुधा दरोडेखोर नव्हता. त्याने पैशासाठी कुणाला मारलं नव्हतं. तो ब्रिटिश साम्राज्यावर दरोडा टाकायला निघाला होता. त्यासाठी त्याने स्वतःच्या घराची राखरांगोळी केली होती. तो जवळपास दहा वर्षे तिथे राहिला. हालअपेष्टा भोगल्या. नरक नरक म्हणतात तो कसा असावा याचा त्याने जिवंतपणी अनुभव घेतला. कुणी मानो ना मानो, ती दहा वर्षे मला आमच्या इतिहासाची सोनेरी पानं वाटतात. बॅ. विनायक दामोदर सावरकर तुझ्या कुशीत स्वातंत्र्यवीर झाले.
१९४२ साली असाच एक स्वातंत्र्याचं वारं प्यायलेला आयसीएस तुझ्यापाशी आला. त्याने तुला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केलं. तिथल्या बंदिवानांना सोडलं. तू त्या दिवशी नक्कीच नि: श्वास सोडला असशील. नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पदस्पर्श हा तुझ्या भूमीला झालेला इतिहासाचा दुसरा पदस्पर्श होता. त्यानंतर तुझा भूगोल विसरला गेला. तुझं नाव घेतलं की चटकन आठवतो तो इतिहास!!
पण ज्यांनी तुला इतिहास दिला त्या वीर सावरकरांचं नाव तुझ्या पोर्टब्लेअरच्या विमानतळाला दिल्यावर काही मार्क्सवादी मंडळींच्या पोटात दुखलं. तुझ्या बंदराला पोर्टब्लेअर म्हटलेलं आम्हाला खटकत नाही, विमानतळाला आपल्याच एका सुपुत्राचं नाव मात्र खटकतं. का? तर म्हणे सावरकर ब्रिटिशांची माफी मागून तुझ्या तुरुंगातून बाहेर पडले. होय, सावरकरांनी ब्रिटिशांना राजकारणात न पडण्याची हमी दिली. ज्याला पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती त्याला ब्रिटिश हार-तुरे,श्रीफळ देऊन 'जा मुक्त संचार कर' असं सांगणार नव्हतेच. थोडंसं पडतं घेऊनच त्यांना तुरुंगातून बाहेर पडणं शक्य होतं. पण शेवटी तुरुंगात राहण्यापेक्षा बाहेर पडूनच ते देशसेवा जास्त चांगल्या रीतीने करू शकणार होते आणि लादलेल्या अटीतून ब्रिटिशांचा डोळा चुकवून कसं राष्ट्रकार्य करायचं हे सावरकरांपेक्षा जास्त चांगलं कुणाला ठाऊक होतं? रत्नागिरीच्या नजरकैदेत असताना त्यांनी प्रचंड सामाजिक कार्य तर केलंच, पण त्यांना राजकारणात पडायची परवानगी नसतानाही देशभरातल्या क्रांतिकारकांशी त्यांचे छुपे संबंध होते. ब्रिटिश पोलीस त्यांच्यावर धाडी घालत. पण सावरकरांनी स्वतःला त्यातून फार चतुराईने वाचवलं होतं.
तरीही स्वातंत्र्यवीरांनी तुझ्या तुरुंगातल्या हालअपेष्टांना कंटाळून जीवाच्या भीतीने ब्रिटिशांची माफी मागितली असं जर कुणाला म्हणायचं असेल तर त्याने आपलं डोकं चांगल्या मानसोपचारतज्ञाला दाखवावं. होईल तो खर्च मी करायला तयार आहे. त्यांनी जेव्हा पिस्तुल आणि बॉम्बशी खेळायचं ठरवलं तेव्हाच त्यांना त्यांचा शेवट ठाऊक होता. स्वातंत्र्य किंवा मृत्यू!
ज्या काळात मोठमोठे गुन्हेगार काळ्या पाण्याच्या नावाने चळाचळा कापायचे तेव्हा पन्नास वर्षांची शिक्षा ऐकल्यावर स्वातंत्र्यवीर म्हणाले, "ब्रिटिश साम्राज्य तरी पन्नास वर्षे टिकेल का? ''
स. न. वि. वि.
तुझ्या पोर्टब्लेअरच्या विमानतळाला आपल्या *स्वातंत्र्यवीर सावरकरांचं* नाव दिलं आणि माझी तबियत खूश झाली. तूही सुखावला असशील ना? त्यांच्यासारख्या क्रांतिकारकांमुळे तू जगाला ज्ञात झालास. ते तुझ्या इथे आलेल्या क्रांतिकारकांचे मुकुटमणी होते.
सांग ना, नाही तर आधी तुझं अस्तित्व काय होतं? एक भूगोल असलेला भूभाग! पण इतिहास नाही. चिनी प्रवासी इत्सिंग आणि मार्को पोलीच्या प्रवासवर्णनात तुझा उल्लेख आढळतो. पण बस तेवढ्यापुरताच! आधुनिक संस्कृतीचा स्पर्शच तुला झाला नव्हता.
साहसी गोरे आले आणि तुझ्या इथे वसाहत टाकली. कॅप्टन ब्लेअर तुझ्याकडे आरमार घेऊन आला. तुझ्या इथली रानटी माणसं, श्वापदं आणि घनदाट जंगलं पाहून गोऱ्यांनाही रानटी कल्पना सुचल्या. त्यांनी तिथे अट्टल गुन्हेगारांसाठी जेल बनवली. त्या रानटी वातावरणाला शोभा आणतील असे जेलर ठेवले. मी असं ऐकलंय की तुझ्या इथे असे काही खेकडे आहेत, जे माडाच्या झाडावर चढतात आणि त्यांची नांगी स्ट्रॉसारखी वापरून नारळातलं पाणी पितात? खरंच त्या गोऱ्यांच्या जेलमध्ये जेलर्ससुद्धा खेकडेच होते. तो सावरकरांना छळणारा बारी काय होता? ते कैद्यांचं रक्त प्यायचे. माणसांचं रूप घेतलेले ते खेकडे होते. गोऱ्यांनी तुझं नाव 'काळं पाणी' करून टाकलं. ज्याला हालहाल करून मारायचं असेल त्याला ते काळ्या पाण्याला पाठवत. आपल्या १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धातले स्वातंत्र्यसैनिकही तुझ्याच जेलमध्ये पाठवले गेले होते. पण ४ जुलै १९११ रोजी 'महाराजा' बोट तुझ्या बेटाला लागली आणि इतिहासच तुझ्या धक्क्याला लागला. हातापायात लोखंडी बेड्या ठोकलेला एक तरतरीत बॅरिस्टर त्या बोटीतून उतरला.
साखळदंडात गुरफटलेल्या दरोडेखोरांची तुला सवय होती, पण हा साधासुधा दरोडेखोर नव्हता. त्याने पैशासाठी कुणाला मारलं नव्हतं. तो ब्रिटिश साम्राज्यावर दरोडा टाकायला निघाला होता. त्यासाठी त्याने स्वतःच्या घराची राखरांगोळी केली होती. तो जवळपास दहा वर्षे तिथे राहिला. हालअपेष्टा भोगल्या. नरक नरक म्हणतात तो कसा असावा याचा त्याने जिवंतपणी अनुभव घेतला. कुणी मानो ना मानो, ती दहा वर्षे मला आमच्या इतिहासाची सोनेरी पानं वाटतात. बॅ. विनायक दामोदर सावरकर तुझ्या कुशीत स्वातंत्र्यवीर झाले.
१९४२ साली असाच एक स्वातंत्र्याचं वारं प्यायलेला आयसीएस तुझ्यापाशी आला. त्याने तुला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केलं. तिथल्या बंदिवानांना सोडलं. तू त्या दिवशी नक्कीच नि: श्वास सोडला असशील. नेताजी सुभाषचंद्र बोसांचा पदस्पर्श हा तुझ्या भूमीला झालेला इतिहासाचा दुसरा पदस्पर्श होता. त्यानंतर तुझा भूगोल विसरला गेला. तुझं नाव घेतलं की चटकन आठवतो तो इतिहास!!
पण ज्यांनी तुला इतिहास दिला त्या वीर सावरकरांचं नाव तुझ्या पोर्टब्लेअरच्या विमानतळाला दिल्यावर काही मार्क्सवादी मंडळींच्या पोटात दुखलं. तुझ्या बंदराला पोर्टब्लेअर म्हटलेलं आम्हाला खटकत नाही, विमानतळाला आपल्याच एका सुपुत्राचं नाव मात्र खटकतं. का? तर म्हणे सावरकर ब्रिटिशांची माफी मागून तुझ्या तुरुंगातून बाहेर पडले. होय, सावरकरांनी ब्रिटिशांना राजकारणात न पडण्याची हमी दिली. ज्याला पन्नास वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती त्याला ब्रिटिश हार-तुरे,श्रीफळ देऊन 'जा मुक्त संचार कर' असं सांगणार नव्हतेच. थोडंसं पडतं घेऊनच त्यांना तुरुंगातून बाहेर पडणं शक्य होतं. पण शेवटी तुरुंगात राहण्यापेक्षा बाहेर पडूनच ते देशसेवा जास्त चांगल्या रीतीने करू शकणार होते आणि लादलेल्या अटीतून ब्रिटिशांचा डोळा चुकवून कसं राष्ट्रकार्य करायचं हे सावरकरांपेक्षा जास्त चांगलं कुणाला ठाऊक होतं? रत्नागिरीच्या नजरकैदेत असताना त्यांनी प्रचंड सामाजिक कार्य तर केलंच, पण त्यांना राजकारणात पडायची परवानगी नसतानाही देशभरातल्या क्रांतिकारकांशी त्यांचे छुपे संबंध होते. ब्रिटिश पोलीस त्यांच्यावर धाडी घालत. पण सावरकरांनी स्वतःला त्यातून फार चतुराईने वाचवलं होतं.
तरीही स्वातंत्र्यवीरांनी तुझ्या तुरुंगातल्या हालअपेष्टांना कंटाळून जीवाच्या भीतीने ब्रिटिशांची माफी मागितली असं जर कुणाला म्हणायचं असेल तर त्याने आपलं डोकं चांगल्या मानसोपचारतज्ञाला दाखवावं. होईल तो खर्च मी करायला तयार आहे. त्यांनी जेव्हा पिस्तुल आणि बॉम्बशी खेळायचं ठरवलं तेव्हाच त्यांना त्यांचा शेवट ठाऊक होता. स्वातंत्र्य किंवा मृत्यू!
ज्या काळात मोठमोठे गुन्हेगार काळ्या पाण्याच्या नावाने चळाचळा कापायचे तेव्हा पन्नास वर्षांची शिक्षा ऐकल्यावर स्वातंत्र्यवीर म्हणाले, "ब्रिटिश साम्राज्य तरी पन्नास वर्षे टिकेल का? ''
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
पळणारा माणूस हा उद्धटपणा दाखवू शकत नाही.
त्यांची बायको जेव्हा त्यांचा निरोप घ्यायला आली तेव्हा स्वातंत्र्यवीर म्हणाले, "मुला-मुलीची वीण वाढवणे आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणायचा असेल तर असले संसार कावळे- चिमण्याही करतात. पण संसाराचा याहून भव्य अर्थ घ्यायचा असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपण कृतकृत्य झालो आहोत. आपली चार चूल बोळकी आपण फोडून टाकली, तर त्यायोगे पुढे-मागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल. ''
पाहिलेत विचार? ज्या पिढीला पाहिलेलंही नाही त्यांचा विचार करणारी ही माणसं होती. आजच्या राजकारण्यांच्या घरातून जो सोन्याचा धूर निघतो ना ती चिमणी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या अनेक ज्ञात- अज्ञात मंडळींच्या त्यागावर उभी आहे. त्यांनी कोलू फिरवला, काथ्या कुटला, चाबकाचे फटके खाल्ले, सापांचे तुकडेमिश्रित भाजी पचवली. पाण्यात कालवून भात खाल्ला म्हणून स्वातंत्र्याचा पुलाव आपल्या ताटात पडला. म्हणून लोकशाहीच्या सर्वोच्च सदनात खासदारांना निर्भयपणे बोलता येतं. पण या लोकशाहीचा एकच दुर्गुण आहे. ती कुणालाही जीभ उचलून टाळ्याला लावायची परवानगी देते. त्यामुळे बोबडे बोलही ऐकून घ्यावे लागतात.
एक गोष्ट खरी की, सावरकरांनी शारीरिक यातना प्रचंड सोसल्या. ते काही आडदांड शरीराचे नव्हते आणि शरीर आडदांड असलं तरी कोलू आणि हंटरपुढे फार काळ तग धरू शकत नाही. बैलाची कामं माणसं नाही करू शकत. त्यामुळे आयुष्य संपवून टाकावं असं सावरकरांनाही काही वेळा वाटलं. इंदुभूषण रॉय किंवा आशुतोष लाहिरींसारख्या क्रांतिकारकांनी स्वतःला फास लावून घेतला होता. जो माणूस मृत्यूला आपल्याबरोबर सावलीसारखा घेऊन फिरला आणि शेवटी मृत्यूला कॉलर पकडून धरलं, तो घाबरून माफी मागेल? (टेल धिस जोक टू समबडी एल्स!) त्यांनी तुरुंगाबाहेर पडण्यासाठी मान्य केलेल्या शर्तीना माफी म्हणणं हा त्यांच्या त्यागाचा अपमान आहे.
मार्क्सवादी खासदारांनी म्हणे सावरकरांची नेताजींबरोबर तुलना केली म्हणूनही आगपाखड केली. अंदमाना, तूच सांग या दोन तेजस्वी सुपुत्रांत तू उजवं- डावं करू शकतोस? मला मान्य आहे नेताजी स्वयंभू होते. सावरकरांनी सांगितलं म्हणून त्यांनी देशाबाहेर पलायन केलं आणि आझाद हिंद सेना काढली असं मी म्हणणार नाही. पण त्यांचे काँग्रेसचे मोठमोठे नेते सोडून नेताजींना सावरकरांशी याबाबतीत विचारविनिमय करावासा वाटला यात दोघांचे सूर कुठे तरी जुळत होते असं वाटत नाही?
पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्क्सवाद्यांनी सावरकरांना राष्ट्रप्रेम शिकवणं हे पार्थिव पटेलने किरमाणीला यष्टिरक्षण शिकवण्यासारखं आहे. मला कार्ल माकर्सबद्दल प्रचंड आदर आहे. मार्क्सवादाच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल आदर आहे. पण काही अपवाद वगळले तर भारतीय मार्क्सवाद्यांबद्दल आदर बाळगण्यासारखं काही नाही. या मंडळींनी बऱ्याचदा सावरकरांच्या हिंदू महासभेचा पाठिंबा घेतला होता. बरं, सावरकरांनाही साम्यवादाबद्दल राग वगैरे नव्हता. एकदा त्यांना जी. पु. गोखलेनी साम्यवादाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, मला हिंदुस्थानात साम्यवाद्यांचं राज्य आलं तरी चालेल पण नेभळटांचं नको. ते आल्याने धर्माचं प्राबल्य कमी होईल. मला त्यांचे सर्वच मार्ग आवडतील असं नाही. चर्च, परकीय मिशनरी, मुल्ला-मौलवी, मशिदी यांचं प्राबल्य कमी होईल. त्याचबरोबर आमच्या मंदिरांचाही नाश करतील हे साम्यवादी, पण चर्च-मशिदी पडल्यावर मंदिरं पडली तर बिघडलं कुठे? जुन्या रूढी, भोळसट कल्पना नष्ट झाल्या तर आधुनिक शास्त्रावर आधारलेला, बहुसंख्याकांना पोषक म्हणजे हिंदूंना पोषक असा धर्म राहील ना? मग हिंदुत्वाचे आम्ही आग्रही तरी काय मागतो आहोत? आम्हाला प्रगत आणि उन्नत असं हिंदुत्व हवंय. '
कळलं ना, हा माणूस काय होता तो! तो मार्क्सवाद्यांपेक्षाही आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होता.
असो. अंदमाना, तू तरी गैरसमज करून घेऊ नकोस. त्या पुण्यात्म्याने तुझ्याकडे वास्तव्य केल्यामुळे तू फक्त थेट राहिला नाहीस. तू फक्त टुरिस्ट स्पॉट राहिलेला नाहीस. तुझं तीर्थक्षेत्र झालंय. तुझं सोनं झालंय सोनं. तू कृतार्थ झालायस.
तू तरी त्यांचा कृतज्ञ राहा!
तुझा,
द्वारकानाथ संझगिरी
(स.न.वि.वि. या पुस्तकातून)
Andaman PortBlair Savarkar Article India Independence Freedom Fight Sanzgiri
त्यांची बायको जेव्हा त्यांचा निरोप घ्यायला आली तेव्हा स्वातंत्र्यवीर म्हणाले, "मुला-मुलीची वीण वाढवणे आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच जर संसार म्हणायचा असेल तर असले संसार कावळे- चिमण्याही करतात. पण संसाराचा याहून भव्य अर्थ घ्यायचा असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपण कृतकृत्य झालो आहोत. आपली चार चूल बोळकी आपण फोडून टाकली, तर त्यायोगे पुढे-मागे हजारो जणांच्या घरी क्वचित सोन्याचा धूर निघेल. ''
पाहिलेत विचार? ज्या पिढीला पाहिलेलंही नाही त्यांचा विचार करणारी ही माणसं होती. आजच्या राजकारण्यांच्या घरातून जो सोन्याचा धूर निघतो ना ती चिमणी स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या अनेक ज्ञात- अज्ञात मंडळींच्या त्यागावर उभी आहे. त्यांनी कोलू फिरवला, काथ्या कुटला, चाबकाचे फटके खाल्ले, सापांचे तुकडेमिश्रित भाजी पचवली. पाण्यात कालवून भात खाल्ला म्हणून स्वातंत्र्याचा पुलाव आपल्या ताटात पडला. म्हणून लोकशाहीच्या सर्वोच्च सदनात खासदारांना निर्भयपणे बोलता येतं. पण या लोकशाहीचा एकच दुर्गुण आहे. ती कुणालाही जीभ उचलून टाळ्याला लावायची परवानगी देते. त्यामुळे बोबडे बोलही ऐकून घ्यावे लागतात.
एक गोष्ट खरी की, सावरकरांनी शारीरिक यातना प्रचंड सोसल्या. ते काही आडदांड शरीराचे नव्हते आणि शरीर आडदांड असलं तरी कोलू आणि हंटरपुढे फार काळ तग धरू शकत नाही. बैलाची कामं माणसं नाही करू शकत. त्यामुळे आयुष्य संपवून टाकावं असं सावरकरांनाही काही वेळा वाटलं. इंदुभूषण रॉय किंवा आशुतोष लाहिरींसारख्या क्रांतिकारकांनी स्वतःला फास लावून घेतला होता. जो माणूस मृत्यूला आपल्याबरोबर सावलीसारखा घेऊन फिरला आणि शेवटी मृत्यूला कॉलर पकडून धरलं, तो घाबरून माफी मागेल? (टेल धिस जोक टू समबडी एल्स!) त्यांनी तुरुंगाबाहेर पडण्यासाठी मान्य केलेल्या शर्तीना माफी म्हणणं हा त्यांच्या त्यागाचा अपमान आहे.
मार्क्सवादी खासदारांनी म्हणे सावरकरांची नेताजींबरोबर तुलना केली म्हणूनही आगपाखड केली. अंदमाना, तूच सांग या दोन तेजस्वी सुपुत्रांत तू उजवं- डावं करू शकतोस? मला मान्य आहे नेताजी स्वयंभू होते. सावरकरांनी सांगितलं म्हणून त्यांनी देशाबाहेर पलायन केलं आणि आझाद हिंद सेना काढली असं मी म्हणणार नाही. पण त्यांचे काँग्रेसचे मोठमोठे नेते सोडून नेताजींना सावरकरांशी याबाबतीत विचारविनिमय करावासा वाटला यात दोघांचे सूर कुठे तरी जुळत होते असं वाटत नाही?
पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मार्क्सवाद्यांनी सावरकरांना राष्ट्रप्रेम शिकवणं हे पार्थिव पटेलने किरमाणीला यष्टिरक्षण शिकवण्यासारखं आहे. मला कार्ल माकर्सबद्दल प्रचंड आदर आहे. मार्क्सवादाच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल आदर आहे. पण काही अपवाद वगळले तर भारतीय मार्क्सवाद्यांबद्दल आदर बाळगण्यासारखं काही नाही. या मंडळींनी बऱ्याचदा सावरकरांच्या हिंदू महासभेचा पाठिंबा घेतला होता. बरं, सावरकरांनाही साम्यवादाबद्दल राग वगैरे नव्हता. एकदा त्यांना जी. पु. गोखलेनी साम्यवादाबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, मला हिंदुस्थानात साम्यवाद्यांचं राज्य आलं तरी चालेल पण नेभळटांचं नको. ते आल्याने धर्माचं प्राबल्य कमी होईल. मला त्यांचे सर्वच मार्ग आवडतील असं नाही. चर्च, परकीय मिशनरी, मुल्ला-मौलवी, मशिदी यांचं प्राबल्य कमी होईल. त्याचबरोबर आमच्या मंदिरांचाही नाश करतील हे साम्यवादी, पण चर्च-मशिदी पडल्यावर मंदिरं पडली तर बिघडलं कुठे? जुन्या रूढी, भोळसट कल्पना नष्ट झाल्या तर आधुनिक शास्त्रावर आधारलेला, बहुसंख्याकांना पोषक म्हणजे हिंदूंना पोषक असा धर्म राहील ना? मग हिंदुत्वाचे आम्ही आग्रही तरी काय मागतो आहोत? आम्हाला प्रगत आणि उन्नत असं हिंदुत्व हवंय. '
कळलं ना, हा माणूस काय होता तो! तो मार्क्सवाद्यांपेक्षाही आधुनिक आणि विज्ञाननिष्ठ होता.
असो. अंदमाना, तू तरी गैरसमज करून घेऊ नकोस. त्या पुण्यात्म्याने तुझ्याकडे वास्तव्य केल्यामुळे तू फक्त थेट राहिला नाहीस. तू फक्त टुरिस्ट स्पॉट राहिलेला नाहीस. तुझं तीर्थक्षेत्र झालंय. तुझं सोनं झालंय सोनं. तू कृतार्थ झालायस.
तू तरी त्यांचा कृतज्ञ राहा!
तुझा,
द्वारकानाथ संझगिरी
(स.न.वि.वि. या पुस्तकातून)
Andaman PortBlair Savarkar Article India Independence Freedom Fight Sanzgiri
Important Points (Checklist) for Combine Pre 2022 (Economics)
https://youtube.com/watch?v=2lFPTDIguQA&feature=share#
https://youtube.com/watch?v=2lFPTDIguQA&feature=share#
YouTube
Important Points (Checklist) for Combine Pre 2022 (Economics)
🚨#current #PIN कौतुकास्पद! पुण्यातील पुष्पा हेगडे यांची आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड
https://www.loksatta.com/pune/pushpa-hegde-from-pune-elected-as-vice-president-of-international-council-for-women-pune-print-news-rmm-97-2949056/
https://www.loksatta.com/pune/pushpa-hegde-from-pune-elected-as-vice-president-of-international-council-for-women-pune-print-news-rmm-97-2949056/
Loksatta
कौतुकास्पद! पुण्यातील पुष्पा हेगडे यांची आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड
आंतरराष्ट्रीय महिला परिषदेच्या (इंटरनॅशनल कौन्सिल फॉर वूमन-आयसीडब्ल्यू) उपाध्यक्षपदी पुण्यातील पुष्पा हेगडे यांची निवड झाली आहे.
🚨 आपल्या #ThempscUpdate चॅनेलवरील अनेक सदस्यांची आज विविध पदावर निवड झाली आहे. सर्वांना मेसेज करणे शक्य नसल्याने ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी @madhusudanrp या Username वर आपले नाव आणि निवड झालेले पद याचा मेसेज करावा..🙏
#SSE #2020 परीक्षेत विविध पदांवर निवड झालेले आपले काही सदस्य..👇
#Sagar Nanaware - ACPO - SC Topper
#Darshan Mehta - DEO
#Shekhar Bhilare - SO
#Aakash Shinde - APO
#Shobha Lagad - NT
#Manoj Jamdade - NT
#Kiran Phule - NT
#Bhushan Borse - NT
#Sagar Gavand - AR
#Vivek Chaudhari - ABDO
#Vaibhav Padwal - ABDO
🚨 साध्या लोकांचे साधे चॅनल आहे आपले मिळालेल्या यशामध्ये फक्त उमेदवारांचाच शंभर टक्के वाटा आहे, आपण फक्त संपर्काचे एक माध्यम आहोत..🙏
@madhusudanrp
#Sagar Nanaware - ACPO - SC Topper
#Darshan Mehta - DEO
#Shekhar Bhilare - SO
#Aakash Shinde - APO
#Shobha Lagad - NT
#Manoj Jamdade - NT
#Kiran Phule - NT
#Bhushan Borse - NT
#Sagar Gavand - AR
#Vivek Chaudhari - ABDO
#Vaibhav Padwal - ABDO
🚨 साध्या लोकांचे साधे चॅनल आहे आपले मिळालेल्या यशामध्ये फक्त उमेदवारांचाच शंभर टक्के वाटा आहे, आपण फक्त संपर्काचे एक माध्यम आहोत..🙏
@madhusudanrp
The MPSC Update © pinned «🚨 आपल्या #ThempscUpdate चॅनेलवरील अनेक सदस्यांची आज विविध पदावर निवड झाली आहे. सर्वांना मेसेज करणे शक्य नसल्याने ज्यांची निवड झालेली आहे, त्यांनी @madhusudanrp या Username वर आपले नाव आणि निवड झालेले पद याचा मेसेज करावा..🙏»
The MPSC Update ©
#SSE #2020 परीक्षेत विविध पदांवर निवड झालेले आपले काही सदस्य..👇 #Sagar Nanaware - ACPO - SC Topper #Darshan Mehta - DEO #Shekhar Bhilare - SO #Aakash Shinde - APO #Shobha Lagad - NT #Manoj Jamdade - NT #Kiran Phule - NT #Bhushan Borse - NT #Sagar Gavand …
आपल्याविषयी काही यशस्वी सदस्यांच्या मोजक्या प्रतिक्रिया..😊🙏👇
Forwarded from MADHUSUDAN N R P
खूप चांगलं पद मिळाला आहे लोकांची उत्तम सेवा कराल हीच अपेक्षा
Forwarded from Sagar Nannaware
Ho nakkich...maza first preference hota ha
Forwarded from Bhushan B
नमस्कार सर,
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राज्यसेवा परीक्षा 2020 च्या निकालात यात माझी नायब तहसीलदार या पदी निवड झाली आहे.
परीक्षेच्या मुलाखत या टप्प्यावर तुमची मला मोलाची मदत झाली. त्याबद्दल धन्यवाद!
पुढील तयारीसाठी असेच मार्गदर्शन व्हावे ही इच्छा!
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राज्यसेवा परीक्षा 2020 च्या निकालात यात माझी नायब तहसीलदार या पदी निवड झाली आहे.
परीक्षेच्या मुलाखत या टप्प्यावर तुमची मला मोलाची मदत झाली. त्याबद्दल धन्यवाद!
पुढील तयारीसाठी असेच मार्गदर्शन व्हावे ही इच्छा!
#polity विश्लेषण : भारत-पाकिस्तान दरम्यानचा ‘सिंधू पाणी वाटप करार’ ( Indus Water Treaty) नेमका काय आहे ?
https://www.loksatta.com/explained/explained-what-is-indus-water-treaty-signed-between-india-pakistan-asj-82-2952738/
https://www.loksatta.com/explained/explained-what-is-indus-water-treaty-signed-between-india-pakistan-asj-82-2952738/
Loksatta
विश्लेषण : भारत-पाकिस्तान दरम्यानचा ‘सिंधू पाणी वाटप करार’ ( Indus Water Treaty) नेमका काय आहे ?
'सिंधु पाणी वाटप करार'च्या ११८ व्या नियमित बैठकीच्या निमित्ताने दोन्ही देशांमधील खंडीत झालेला संवाद पुर्ववत सुरु होण्याची संधी निर्माण झाली आहे.
The MPSC Update ©
#SSE #Prelims2022 #Advt.pdf
👆👆🚨#SSE #Prelims2022 फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.
✅ Payment Staus, Exam Centre परत एकदा पाहून घ्या.
✅ Payment Staus, Exam Centre परत एकदा पाहून घ्या.
Forwarded from Deleted Account
Hello sir.....😊🙏
तुमचे मनापासून खूप खूप खूप खूप आभार....
प्रत्येकवेळी तुम्ही अतिशय निस्वार्थ भावनेने मदत केली
Mission70+असो की
Preference भरायचा असो
तुम्ही नेहमी call वर बोलून counseling केली ....
तुमची साथ यापुढेही लाभावी....
Thank u so much once again😊🙏
तुमचे मनापासून खूप खूप खूप खूप आभार....
प्रत्येकवेळी तुम्ही अतिशय निस्वार्थ भावनेने मदत केली
Mission70+असो की
Preference भरायचा असो
तुम्ही नेहमी call वर बोलून counseling केली ....
तुमची साथ यापुढेही लाभावी....
Thank u so much once again😊🙏