The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from POLITY By M.M. (MADHUSUDAN N R P)
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE #imp #GS #Revision

@thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇

1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇
👉 @politymm वर क्लीक करा.

2. "इतिहास" या विषयासाठी 👇
👉 @historymm वर क्लीक करा.

3. "भूगोल" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 divya असे Search 🔍 करा.

4. "सामान्य विज्ञान" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 more असे Search 🔍 करा

5. "अर्थशास्त्र" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 #eco आणि economics असे Search 🔍 करा.

6. "CSAT" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 Aptitude आणि CSAT असे Search 🔍 करा.

साभार,

@madhusudanrp

सर्व सदस्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा..! 👍

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (ajit sir)
*जोतीराव गोविंदराव फुले* (एप्रिल ११, इ.स. १८२७ -नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. येथील जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती; जनता त्यांना *महात्मा फुले* म्हणे.

*बालपण आणि शिक्षण*

जोतिबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोर्‍हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांचेशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स. १८४२ ला माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

*शैक्षणिक कार्य*

महात्मा फुल्यांच्या कवितेच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या खालील ओळी प्रसिद्ध आहेत.

“विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले ।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।”

बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्‌र्‍य आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी त्यांनी पुण्याच्या वेताळपेठेत इ.स.१८५२ मध्ये शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती दिली. जोतीरावांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.

*सामाजिक कार्य*

मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्‍चित मत आणि अनुमान होते. *‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’* असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या *‘शेतकर्‍याचा असूड’* या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्‌र्‍याची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. *‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’* हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

*सत्यशोधक समाज*

२४ सप्टेंबर इ.स.१८७३ रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरवात केली. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. त्याचवेळी त्या कन्याशाळेच्या शिक्षिका म्हणूनही कार्य करीत होत्या. दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन प्रकाशनचे कार्य के
Forwarded from The MPSC Update © (ajit sir)
ले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. *छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.* तथाकथित उच्चवर्णीयांकडून होणार्‍या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. 'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.

*साहित्य आणि लेखन*

'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला *'गुलामगिरी'* ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. *'अस्पृश्यांची कैफियत'* हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

*सन्माननीय उपाधी*

जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना *‘महात्मा’* ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.

*लेखन*

इ.स.१८५५
नाटक
तृतीय रत्न

जून, इ.स. १८६९
पवाडा
छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पवाडा

जून इ.स. १८६९
पवाडा
विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी

इ.स.१८६९
पुस्तक
ब्राह्मणांचे कसब

इ.स.१८७३
पुस्तक
गुलामगिरी

सप्टेंबर २४ ,इ.स. १८७६
अहवाल
सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत

मार्च २० इ.स. १८७७
अहवाल
पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट

एप्रिल १२ , इ.स. १८८९
निबंध
पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ

२४ मे इ.स. १८७७
पत्रक
दुष्काळविषयक पत्रक

१९ ऑक्टोबर इ.स. १८८२
निवेदन
हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन

१८ जुलै इ.स. १८८३
पुस्तक
शेतकऱ्याचा असूड

४ डिसेंबर इ.स. १८८४
निबंध
महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणंाविषयीचे मत

११ जून इ.स. १८८५
पत्र
मराठी ग्रंथागार सभेस पत्र

१३ जून इ.स. १८८५
पुस्तक
सत्सार अंक १

ऑक्टोंबर इ.स. १८८५
पुस्तक
सत्सार अंक २

१ ऑक्टोंबर इ.स. १८८५
पुस्तक
इशारा

२९ मार्च इ.स.१८८६
जाहीर प्रकटन
ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर

२ जून इ.स. १८८६
पत्र
मामा परमानंद यांस पत्र

जून इ.स. १८८७
पुस्तक
सत्यशोधक सामाजोक्त मंगलअष्टकासह सर्व पूजा-विधी

इ.स. १८८७
काव्यरचना
अखंडादी काव्य रचना

१० जुलै इ.स. १८८७
मृत्यू पत्र
महात्मा फुले यांचे उईलपत्र

इ.स. १८९१ (प्रकाशन)
पुस्तक
सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक

*राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंती निमित्त पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन
#eco भारताचा आर्थिक विकास दर करोनामुळे घटणार
जागतिक बँकेचा इशारा

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीमुळे भारताची आर्थिक विकास कामगिरी खूप वाईट होणार आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. भारताची अर्थव्यवस्था आता २०२०-२१ मध्ये १.५ टक्के ते २.८ टक्के विकास दर राखू शकेल.

जागतिक बँकेच्या दक्षिण आशियाविषयक  आर्थिक अहवालात म्हटले आहे की, २०१९-२० मध्ये भारताचा आर्थिक विकास दर हा ३१ मार्चअखेर ४.८ ते ५ टक्के राहील पण नंतर करोना प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे तो कमी होणार आहे. आर्थिक क्षेत्रातील कमकुवत कामगिरीने आधीच आर्थिक विकास दर खालावलेला असताना आता भारताला करोनाचा फटका बसला आहे.
आर्थिक वर्ष २१ मध्ये देशांतर्गत पुरवठा व मागणी या दोन्हीवर परिणाम झाला असून त्यामुळे आर्थिक विकासाला फटका बसणार आहे. जागतिक पातळीवर करोनाचा प्रसार असल्याने देशांतर्गत गुंतवणूकही कमी होणार आहे. २०२१-२२ मध्ये विकास दर पुन्हा पाच टक्के होऊ शकतो पण त्यातही आर्थिक शिस्त व पत धोरणात बदल करावे लागणार आहेत.

t.me/thempscupdate
#corona अमेरिकेसह या १३ देशांसाठी भारत बनला ‘संजिवनी’; लाखो गोळ्या पाठवणार
सरकारने दिली मंजुरी

ज्या औषधांसाठी अमेरिकेने भारताला धमकी वजा इशारा दिला होता, ती हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधे 👉१३ देशांसाठी पाठवण्याची परवानगी भारत सरकारने दिली आहे. विशेष म्हणजे त्यात अमेरिकेचाही समावेश आहे.

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन पाठवण्यात येणाऱ्या देशांमध्ये 👉 अमेरिका, स्पेन, जर्मनी, बहरिन, ब्राझिल, नेपाळ, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान, मालदिव आणि बांगला देश👈 या १३ देशांचा समावेश आहे. अमेरिकेने भारताकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या ४८ लाख गोळ्या मागितल्या होत्या. भारताने ३५.८२ लाख गोळ्या पाठवण्यास मंजुरी दिली आहे.

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
जवळपास 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर,1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले....एकूण 299 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी केली...
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
निश्चितच या मसुद्यामागे एका अतिशय हुशार, संयमी, आणि सर्व पैलू आणि बारकांव्यांचा काटेकोरपणे अभ्यास करणारे एक थोर व्यक्तिमत्व होते...ते म्हणजे - संविधानांचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर...🙏
Forwarded from The MPSC Update ©
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त @thempscupdate चॅनेल तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!! 💐💐💐
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE #imp #GS #Revision

@thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇

1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇
👉 @politymm वर क्लीक करा.

2. "इतिहास" या विषयासाठी 👇
👉 @historymm वर क्लीक करा.

3. "भूगोल" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 divya असे Search 🔍 करा.

4. "सामान्य विज्ञान" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 more असे Search 🔍 करा

5. "अर्थशास्त्र" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 #eco आणि economics असे Search 🔍 करा.

6. "CSAT" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 Aptitude आणि CSAT असे Search 🔍 करा.

साभार,

@madhusudanrp

सर्व सदस्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा..! 👍

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇

1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..

2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..

उदा.

# भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + खतीब (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे

# राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-

# सामान्य विज्ञान (Gen. Science ) - Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes

# चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)

# प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - Lucent's General Knowledge ( सामान्य "ज्ञान" ) या पुस्तकातील संपूर्ण Charts / Boxes

# अर्थशास्त्र - देसले , कोळंबे आणि प्रतियोगीता दर्पण Special Issue (फक्त Colour Pages ) या तिन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes



3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा..



4. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय , बुद्धिमत्ता साठी किमान 1 तास आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..


5. मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️

साभार,

t.me/thempscupdate
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
शुभ प्रभात..अभ्यासासाठी शुभेच्छा..👍

http://t.me/thempscupdate
🚆 आज भारतीय रेल्वेचा वाढदिवस
----------------
आज १६ एप्रिल १८५३ रोजी या दिवशी बोरीबंदर ते ठाणे देशातली पहिली रेल्वे धावली. भारतात जगन्नाथ सेठ आणि जमशेदजी जीजीभाई यांनी पहिल्यांदा रेल्वे रुळ आणले. त्यांनीच जीआयपी अर्थात ग्रेट इंडीयन पेनिन्सुला रेल्वेच्या संचालकपदावर राहून भारतात पहिली रेल्वे आणली. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भारतात मुंबई ते ठाणे या मार्गावर देशात पहिली रेल्वे धावली. त्या दिवशी बोरीबंदर ते ठाणे असा ३५ किमीचा प्रवास ४५ मिनीटांत पहिल्या रेल्वेने पार पाडला होता. या रेल्वेला १४ डब्बे होते. या रेल्वेत जवळपास ४०० लोकांनी प्रवासाचा अनुभव घेतला होता.

लोकल हा शब्द ट्रेनच्या इतिहासात पहिल्यांदा १ फेब्रुवारी १८६५ रोजी निघालेल्या वेळापत्रकात वापरण्यात आला. कल्याण ते उत्तर आणि माहिम ते पश्चिम या विभागांसाठी हा शब्द वापरण्यात आला होता. काळानुरुप या लोकलमध्ये खूप बदल होत गेले. ६ डब्यांपासून १५ डब्यांपर्यंत लांबलचक झाली ही गाडी. पादचारी पूल तयार झाले. पश्चिम रेल्वेवरच जगातली पहिली लेडीज स्पेशल ट्रेन धावली, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ रवींदर भाकर यांनी दिली.

त्यानंतर भारतात दरवर्षी या रेल्वेच्या डागडुजीसाठी अर्थसंकल्प तयार करण्यात येवू लागला. दरम्यान, १९२४ मध्ये ईस्ट इंडीया कमिटीचे चेअरमन विल्यम एक्वर्थ यांनी रेल्वे अर्थसंकल्पाला युनियन बजेटपासून वेगळे केले होते. तेव्हापासून ते आजपर्यंत रेल्वेचे अर्थसंकल्प हे वेगळेच सादर करण्यात येत होते. भारतीय रेल्वेच्या निर्मितीनंतर जवळपास ५० वर्षानंतर अर्थात १९०९ मध्ये रेल्वेत शौचालये तयार करण्यात आली. रेल्वे प्रवासादरम्यान ओखिल चंद्र सेन या प्रवाशाने आपल्या वाईट अनुभवाविषयी साहिबगंज विभागीय कार्यालयास पत्राव्दारे माहिती दिली होती. त्यानंतर या पत्राची दखल घैत ब्रिटीश सरकारने रेल्वेत शौचालयांची सुविधा सुरू केली. सेन यांनी लिहीलेले पत्र आजही भारतीय रेल्वे संग्रहालयात ठेवण्यात आले आहे.

आशियात सर्वात मोठे भारतीय रेल्वेचे जाळे आहे. तसेच जगात एकाच मॅनेजमेंटच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारी भारतीय रेल्वे ही जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. दररोज जवळपास २०००० रेल्वे धावतात. तसेच २.३ कोटी प्रवासी रोज रेल्वेचा प्रवास करतात. देशात एकूण ७३४९ स्टेशन्स आहेत. भारतीय रेल्वे रूळाची एकूण लांबी ही ६७,३६८ हजार किमी एवढी आहे. तसेच यार्ड, साइडिंग्स यासर्वांना जोडून रेल्वेरुळाची लांबी ही १२१४०७ किमीपेक्षा जास्त आहे. दरम्यान, आजही जगातील सर्वात जुन्या वाफेवरची रेल्वे ही आजही भारतात धावते. या रेल्वेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे. फेअरी क्विेन नावाची ही रेल्वे सध्या नवी दिल्ली ते राजस्थान दरम्यान धावते तसेच या रेल्वेला आंतरराष्ट्रीय स्तरावर हेरिटेज ऍवार्डने सन्मानित करण्यात आले आहे. जुलै १९८६ मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदा रेल्वेला आधुनिकतेचा टच दिला. आणि रेल्वेची सर्व माहिती ही सीआरआयएस आणि आयसीआरएसव्दारे करण्यात आली. या संगणकीय जोडीमुळे भारतीय रेल्वेचे पुर्णपणे रुपडेच बदलून गेले. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या प्रगतिचा आलेख चढतच गेला.

भारतीय रेल्वेचा शुभंकर म्हणून भोलू हत्तीला ओळखले जाते. हे एक कार्टून असून ज्याच्या हातात हिरवा कंदील देण्यात आला आहे. या हत्तीच्या प्रतिकास भारतीय रेल्वेच्या १५० वर्षाची पुर्तता झाल्याच्या पार्श्वआभूमीवर १६ एप्रिल २००२ मध्ये बंगळूरूमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. त्याच्या बरोबर एका वर्षानंतर अर्थात २००३ मध्ये सरकारकडून या भोलू हत्तीला अधिकृतपणे प्रतिक असल्याचे घोषित करण्यात आले.

२०१४ मध्ये प्रति तास १६० किमी वेगाने चालणाऱ्या रेल्वेचे यशस्वी चाचणी घेण्यात आले होती. याच्या काही महिन्यानंतर लगेच सेमी हाय स्पीड ट्रेन गतिमान एक्सनप्रेसची चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये दिल्ली ते आग्रा हा प्रवास ९० मिनीटात पार करण्यात या रेल्वेला यश आले होते. या ट्रेनमुळे जवळपास प्रवाशांचे ३० मिनीटे वाचली. नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही सध्या सर्वात वेगाने धावणारी रेल्वे आहे. या रेल्वेचा वेग हा १५० किमी प्रति तास असून ही रेल्वे फैजाबादवरून आग्र्याला पोहचते. तर दुसरीकडे मेतुपलयम ऊटी नीलगिरी पॅसेंजर ही देशातील सर्वात कमी वेगाने धावणारी भारतीय रेल्वे आहे. या रेल्वेचा वेग हा १० किमी प्रति तास आहे. भारतीय रेल्वेमध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशनमध्ये जगातील सर्वात मोठे रूट रिले इंटरलॉकिंग सिस्टीम आहे. याच सिस्टीमची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे.

- संजीव वेलणकर

t.me/thempscupdate
Indian Railway 2020.pdf
2.8 MB
भारतीय रेल्वेविषयी रंजक माहिती..👆
#imp #SSE 2020 MPSC परीक्षाबाबत-

मित्रांनो, सध्या अनेक विद्यार्थी-मित्र यावर्षीच्या MPSC परीक्षा रद्द होण्याबाबत आणि वयोमर्यादा वाढ याविषयी प्रश्न विचारत आहेत, त्याविषयी..👇

1. मित्रांनो, MPSC / UPSC परीक्षेचा अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून अंतिम ध्येय प्राप्त होईपर्यंत अखंड मेहनत करणे अपेक्षित असते.

2. GS चा अभ्यास कधीही वाया जाणारा नाही, त्यामुळे सध्याच्या संभ्रमाच्या वातावरणात पूर्णतः सकारात्मक राहून सचोटीने सतत Updated राहणे कधीही फायद्याचे ठरते.

3. अंतिमत: सध्या व्हायरल होणाऱ्या बातमीकडे दुर्लक्ष करावे व MPSC आयोगातर्फे आतापर्यंत पुढील परीक्षा व वयोमर्यादा विषयी काहीही Notifications आलेले नसल्याने न डगमगता अभ्यास चालू ठेवावा, ही विनंती..🙏

साभार,

@thempscupdate