The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
BudgetHighlights_2020_Marathi_Part_1.pdf
95.5 KB
महाराष्ट्र अर्थसंकल्प-2020 महत्वाचे मुद्दे..👆

t.me/thempscupdate
#International : जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 👧👩‍🦰🧕👩‍🏭👩‍⚕🤵‍♀

१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या हक्कांमध्ये स्त्री-पुरुष समानतेबाबतच्या अनेक हक्क आणि अधिकारांचा समावेश होता. यात कामाचे तास, वेतन या बाबी तर होत्याच पण प्रामुख्याने मतदानाच्या हक्काबाबतची जागरुकताही होती. महिलांना जगभरात अनेक देशांमध्ये मतदानाचा हक्क नव्हता. भारत मात्र याबाबत पहिल्या दिवसापासून अपवाद होता. भारतात सुरुवातीपासूनच महिलांना पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा हक्क देण्यात आला आहे.

का साजरा होतो महिला दिन?

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन ही कम्युनिस्ट कार्यकर्ती अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा 'जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

भारतात कधी साजरा झाला महिला दिन?


भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने 'जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या.

मतदानाचा अधिकार..कुठे, केव्हा

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रातही महिलांना सुरुवातीपासून मतदानाचा अधिकार नव्हता. तेथे महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी १४४ वर्षे लागली. ब्रिटनमध्ये १०० वर्षांनी महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. भारतात महिलांनी मतदान करू देण्यात सुरुवातीला काही ब्रिटीश अधिकाऱ्यांचा विरोध होता. स्वित्झर्लंडमध्ये महिला मतदानासाठी १९७४ साल उजाडले. स्वतंत्र भारतात मात्र सुरुवातीपासून महिलांना मतदान करता येते. अनेक इस्लाम राष्ट्रांमध्ये अगदी अलीकडे २१ व्या शतकापर्यंत हा अधिकार वंचित ठेवण्यात आला होता.

संघर्ष सुरूच

महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला असला तरी सरकरमध्ये प्रतिनिधित्व मात्र कमी आहे. अजूनही भारतात लोकसभेत, विधानसभांमध्ये महिला उमेदवारांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे मतदानाच्या पातळीवर महिलांच्या लढ्याला यश आलं असलं तरी मतदारांच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी अधिकाधिक संख्येने पुढे येण्याची गरज आहे.

t.me/thempscupdate
शुभ प्रभात..अभ्यासासाठी शुभेच्छा..💐

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#SSE #eco #videos

👉परीक्षेला 1 महिना शिल्लक असताना #Revision साठी Smart Study आवश्यक आहे. त्यासाठी जास्तीत जास्त Flow-charts / Infographics / Maps / Videos पाहणे फायद्याचे ठरते.

🚨#Videos : सध्या मार्केट मध्ये अनेक Videos चा महापूर आला असल्याने फक्त मान्यताप्राप्त मार्गदर्शक/ Lecturers / 👉विशेषतः अनुभवी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी ( ज्यांनी स्वतः MPSC राज्यसेवा/ UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा दिल्या असतील) 👈यांचेच Videos पाहा.

@thempscupdate
Samvakya.wmv
146.9 MB
👆👆👆#CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....

आजचा व्हिडिओ "Syllogism" 👆

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या शब्दात होळी

दैन्य दुःख आम्हा न येती जवळी|
दहन हे होळी होती दोष || 1||

सर्वमुख येती माने लोटांगणी |
कोणाच्याही आणे दृष्टीपुढे || धृ ||

आमची आवडे संत समासमागम |
आणीक तया ठायी ठायी विठ्ठोबाच ||2||

आमचे मागणे मागो तयाची सेवा |
मोक्षाची निर्देवा कुणा चाड||3||

तुका म्हणे पोटी साठविला देव |
नुनय तो भाव कोण आम्हा ||4 ||

होळीच्या पवित्र अग्निमध्ये कायमस्वरूपी वैरभाव, निराशा, दारिद्र्य, आळस, क्रूरता, यांचेे दहन होवो, आणि सर्वाच्या आयूष्यात आनंद नांदो. होळीच्या मनापासुन कायमस्वरूपी ॠणात राहून कृतज्ञतापुर्वक शुभेच्छा, ,,,

पाण्याचा अपव्यय टाळा आणि वन्यजीवाना उन्हाळ्यात पाणी पाजा एवढीच आपणाकडून अपेक्षा, धन्यवाद !!!!

- मधुसूदन नि.र.प. (महाजन) 🙏🏻
Read: ‘नारीशक्ती’ने कुपोषण निर्मूलन, जलसंवर्धनासाठी काम करावे
https://www.loksatta.com/desh-videsh-news/femininity-power-pm-modi-internet-closed-in-kashmir-akp-94-2102811/

१०३ वर्षांच्या अ‍ॅथलीट मान कौर, भारतीय हवाई दलातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिक मोहना सिंह, भावना कांत, अवनी चतुर्वेदी, शेतकरी पडाला भुदेवी व बिना देवी, कारागीर  अरिफा जान, पर्यावरणतज्ज्ञ चामी मुरमू, उद्योजक निलझा वांगमो, वाहन उद्योग संशोधन व्यावसायिक रश्मी उध्र्वरेषे, गवंडी कलावती देवी, गिर्यारोहक जुळ्या बहिणी तान्शी व नुंगशी मलिक, शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रबर्ती व साक्षरता परीक्षेत पहिल्या आलेल्या ९८ वर्षांच्या कात्यायिनी अम्मा यांना २०१८ चे नारीशक्ती पुरस्कार देण्यात आले.

@thempscupdate
The MPSC Update © pinned «श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या शब्दात होळी दैन्य दुःख आम्हा न येती जवळी| दहन हे होळी होती दोष || 1|| सर्वमुख येती माने लोटांगणी | कोणाच्याही आणे दृष्टीपुढे || धृ || आमची आवडे संत समासमागम | आणीक तया ठायी ठायी विठ्ठोबाच ||2|| आमचे मागणे मागो तयाची सेवा…»
#imp

मित्रांनो, पूर्व परीक्षेला जेमतेम आजपासून 15 दिवस राहिलेत...

# आपला महत्वाचा वेळ न्युजपेपर वाचण्यात वाया घालवू नका...

# Revision सोबतच आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा अथवा प्रिंट घ्या...आणि सगळे प्रश्न आणि त्यांचा पॅटर्न नीट समजून घ्या...

# टेलिग्राम वर पण जास्त वेळ न राहता फक्त फावल्या वेळात आपण सगळ्या विषयांच्या महत्वाच्या पोस्ट्स already अपलोड केल्या आहेत..त्या
सगळ्या जुन्या पोस्ट्स एकदा पाहून घ्या...पण दिवसातील फक्त 1 तास या गोष्टीसाठी दयावा...

# जोरदार अभ्यास करा आणि मुख्य परीक्षेला पात्र व्हा...🙏🙏🙏

@thempscupdate
#GS #Prelims

मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇

1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..

2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..


उदा.

🚨 भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + दीपस्तंभ (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे

🚨राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व M. #Laxmikanth पुस्तकातील Charts आणि Boxes-

🚨सामान्य विज्ञान (Gen. Science ) - 5 वी ते 10 क्रमिक व Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes

🚨चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)

🚨अर्थशास्त्र - देसले (Limited) , कोळंबे या दोन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes

🚨 इतिहास - 11 वी इतिहास, Lucent GK - प्राचीन व मध्ययुगीन साठी आणि आधुनिक भारत नोट्स (महत्वाचे Points) @thempscupdate@historymm वर अगोदरच Share केले आहे.

3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..

4.
#GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करणे आवश्यक आहे.

5. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय, बुद्धिमत्ता चाचणी आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..


साभार, 🙏

@madhusudanrp

t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#GS #Prelims मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇 1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे…»
#Recruitment : 20 एप्रिलपासून मेगाभरती.👆

Online Exam की offline याविषयी पुन्हा संभ्रम कायम..!

पण महा-आयटी कडून खाजगी एजन्सी ची 15 एप्रिल पर्यंत नियुक्ती करण्यात येत असल्याने पुन्हा Online Exam होण्याची शक्यता..!

t.me/thempscupdate
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती
-------------------
‘आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार’ हे शब्द यशवंतरावांचे यथार्थ वर्णन करतात. एक सुसंस्कृत राजकारणी, थोर विचारवंत, आदर्श लोकप्रतिनिधी, मनस्वी लेखक, सचोटी, नेकी आणि निष्ठेचा वसा देणारे यशवंतराव चव्हाण म्हणजे महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्नंच होते. सुमारे ४० वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला सुयोग्य दिशा देण्याचे आणि समतोल व जातिभेदरहीत राजकारणाचा वारसा देण्याचे कार्य त्यांनी केले.

मार्च १२, इ.स.१९१३ मध्ये सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी यशवंतरावांचा जन्म झाला. त्यांना त्यांच्या आईने-विठाबाईंनी निग्रहाने सांभाळले, घडवले. स्वातंत्र्यपूर्व काळात कराड येथे शालेय शिक्षण घेतले. १९३०च्या गांधींजींच्या चळवळीने स्वातंत्र्य चळवळ शहरातून खेडेगावात गेली. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील हा एक महत्त्वपूर्ण सामाजिक बदल होता. या काळात मोठय़ा प्रमाणावर स्वातंत्र्य लढय़ातील कार्यकर्ते तुरुंगात गेले. १९३१मध्ये शालेय शिक्षण घेत असतानाच तिरंगा फडकवल्याबद्दल १८ महिने तुरुंगवासाची यशवंतरावांनाही शिक्षा झाली. तुरुंगातच त्यांना गांधीवादी विचारांचा, मार्क्सवादी विचारांचा परिचय झाला.

१९३३मध्ये जेलमधून बाहेर पडताना त्यांच्या काँग्रेसनिष्ठेला समाजवादाची जोड मिळाली. तुरुंगामधून बाहेर पडल्यानंतर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी उच्च शिक्षणाकरिता कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजला प्रवेश मिळविला. कोल्हापूरला शिक्षण घेतानाच स्वातंत्र्यचळवळीला वाहून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यशवंतराव चव्हाणांच्या जीवनातील हा कालखंड वैचारिक आंदोलनाचा होता. प्रचंड वाचन, प्रत्यक्षात येणारे अनुभव, राजकारणात उदय पावलेले नवीन तत्त्वज्ञान यातून हा संघर्ष त्यांच्या मनात उभा राहिला होता. वकिलीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते (नुकतेच लग्न झालेले असूनही) १९४२ च्या लढ्यात सातारा जिल्ह्यात आघाडीवर होते. या आंदोलनातही त्यांनी दोन वर्षांचा तुरुंगवास भोगला.

यशवंतरावांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञानोपासक व अभिरुचीसंपन्न व्यक्ति, सुसंस्कृत व वैचारिक अधिष्ठान असलेले नेतृत्व, आणि मुत्सद्दी व विरोधकांचाही मान राखणारे संयमी राजकारणी, म्हणूनच १९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. पण मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा प्रश्न पुढे होता, शिवाय अनेक विचारसरणीच्या लोकांना एकत्र बसून राज्य करणे अवघड होते. तेव्हा मानसिक तेढीतील तीव्रता कमी करून, काही विरोधी नेत्यांना विश्वासात घेऊन, कॉग्रेसश्रेष्ठींशी तडजोड करून महाराष्ट्र राज्य स्वतंत्र करण्यात आले. १ मे, १९६० रोजी मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाले आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (१मे १९६० – १९ नोव्हेंबर १९६२) म्हणूनही त्यांचीच निवड झाली.

● यशवंतरावांची ग्रंथसंपदा
आपले नवे मुंबई राज्य, ॠणानुबंध, कृष्णाकाठ, भूमिका, विदेश दर्शन, सह्याद्रीचे वारे, युगांतर.

यशवंतरावांचे आयुष्य रेखाटणारी पुस्तके: आधुनिक महाराष्ट्र के शिल्पकार, आमचे नेते यशवंतराव, कृष्णाकाठचा माणूस, घडविले त्यांना माऊलीने, नवमहाराष्ट्राचे शिल्पकार, मुलांचे यशवंतराव चव्हाण, यशवंतराव : इतिहासाचे एक पान, यशवंतराव : एक इतिहास.

यशवंतरावांचे आर्थिक विचार
यशवंतराव चव्हाण यांचे आर्थिक विचार प्रामुख्याने शेती, उद्योग, सहकार, समाजवाद, आर्थिक विषमता, विकासातील समस्या आणि नियोजनाचे महत्व इत्यादीशी निगडीत आहेत.

यशवंतरावांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी

- यशवंतरावांना भाषण, संगीत आणि भजन-कीर्तनाची आवड होती. त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेत पारितोषिके पटकावली.
- त्यांनी सालसेत येथे सत्याग्रहात भाग घेतला होता.
- येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली. तेथेच त्यांना राजकीय, सामाजिक प्रश्नांची जाणीव झाली.
- 1930 साली महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ सुरू केल्यानंतर त्यांनी त्यामध्ये भाग घेतला.
- 1932 साली त्यांना पहिला तुरुंगवास घडला. या कारावासात मार्क्सवादाशी विचारांशी त्यांचा परिचय होऊन काँग्रेसमधील रॉयपंथीय गटाशी त्यांचे संबंध वाढले.
- दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी यशवंतराव चव्हाणांना रॉय यांनी घेतलेली युद्धविषयक भूमिका अमान्य झाली.
- 1942 साली छोडो भारत आंदोलनात ते सहभागी झाले.
- 1946 साली मुंबई प्रांताच्या विधिमंडळाच्या निवडणुकीत ते सातारा मतदार संघातून निवडून संसदीय चिटणीस झाले.
- 1948 स

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#SSE
मित्रांनो, पूर्व परीक्षेसाठी आजपासून मोजके दिवस राहिले आहेत..अनेक विद्यार्थी मित्रांनी या दिवसात अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याविषयी प्रश्न विचारलेत..त्याविषयी थोडेसे...👇👇👇

1. प्रथमतः या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. वर्षभर आपण जे References वाचले आहेत त्यांचीच आपल्याला उजळणी (Revision ) करायची आहे..

2. राज्यव्यवस्था, भूगोल व पर्यावरण, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी या 4 विषयावर मागच्या काही वर्षांपासून GS मध्ये 70 ते 80 टक्के प्रश्न येत असल्याने सध्याच्या काळात या विषयांच्या रिविजन बरोबरच विविध पुस्तकातील
Charts / Tables / Boxes हे नीट पाहून घ्यावेत..

उदा.

# भूगोल (Geography) - सवदी ( भूगोल व पर्यावरण ) + खतीब (महाराष्ट्राचा भूगोल) या दोन्ही पुस्तकातील सर्व Charts व Boxes आणि सवदी Atlas या पुस्तकातील नकाशे

# राज्यव्यवस्था (Indian Polity ) - संविधान चार्ट व एम. लक्ष्मीकांत पुस्तकातील Charts आणि Boxes-

# सामान्य विज्ञान (Gen. Science ) - Lucent's General Science या पुस्तकातील सर्व Charts, Formulae आणि Boxes

# चालू घडामोडी - कोणत्याही एखाद्या प्रसिद्ध प्रकाशनाचे पुस्तक व्यवस्थित करा..( किमान मागच्या 6 ते 8 महिन्यांची मासिके)

# प्राचीन व मध्ययुगीन इतिहास - Lucent's General Knowledge ( सामान्य "ज्ञान" ) या पुस्तकातील संपूर्ण Charts / Boxes

# अर्थशास्त्र - देसले , कोळंबे आणि प्रतियोगीता दर्पण Special Issue (फक्त Colour Pages ) या तिन्ही पुस्तकातील Charts आणि Boxes



3. Revision बरोबर अतिशय महत्वाचे काम म्हणजे "आयोगाचे जुने प्रश्न" (कोणतेही एक पुस्तक ) पाहून घेणे..
GS च्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करा..



4. या शेवटच्या दिवसात साधारणतः दररोज GS चा एक विषय , बुद्धिमत्ता साठी किमान 1 तास आणि
*चालू घडामोडी* ( मार्केटमधील प्रसिध्द प्रकाशनाचे कोणतेही एक पुस्तक) साठी किमान 1 तास असे वेळापत्रक ठेवावे..


5. मित्रांनो, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️

साभार,

t.me/thempscupdate