The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#EnB
🔹भारतातली जागतिक वारसा स्थळे

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.18 एप्रिल जागतिक वारसा दिन म्हणून साजरा केला जातो.

आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

▪️सांस्कृतिक

1) आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश (👉1983

2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र

3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार

4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)

5) चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात

6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट

8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र

9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र

10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश

11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू

12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक

13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू

14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले

16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर

17) हमायूनची कबर, दिल्ली

18) खजुराहो, मध्यप्रदेश

19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)

21) कुतुब मिनार, दिल्ली

22) राणी की वाव, पटना, गुजरात

24) लाल किल्ला, दिल्ली

25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश

26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा

27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश

28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड

29) जतर मंतर, जयपूर

30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत

▪️नैसर्गिक

1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश

2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)

▪️मिश्र

1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम

▪️UNESCO बाबत

संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो. या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.

t.me/thempscupdate
Whatsapp इतिहास..👆
शुभ प्रभात...अभ्यासासाठी शुभेच्छा..👆

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
Forwarded from The MPSC Update © (Siddheshwar More)
प्रसिद्ध लेखिका, नाटककार आणि दिग्दर्शिका 👉सई परांजपे यांना २०१९ या वर्षासाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे.

👉 'आणि मग एक दिवस' या पुस्तकाला हा पुरस्कार मिळाला आहे. प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या 'अँड देन वन डे' या इंग्रजी पुस्तकाचा हा अनुवाद आहे.

मराठीसह २३ भाषांमधील अनुवादकांना २०१९ या वर्षासाठीचा साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे. दिल्लीतील रविंद्र भवनातील साहित्य अकादमीच्या मुख्यालयात अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली आज कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध २३ पुस्तकांची २०१९ साठीच्या अनुवाद पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. त्यावर कार्यकारी मंडळाने शिक्कामोर्तब केले.

पुस्तकांची निवड त्या त्या भाषांतील त्रिसदस्यीय समितीने केली. मराठी भाषेसाठीच्या निवड समितीत ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे, जयंत पवार, निशिकांत ठकार यांचा समावेश होता. या समितीने 'आणि मग एक दिवस' हे पुस्तक मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट अनुवादित पुस्तक म्हणून आपला कौल दिला.

t.me/thempscupdate
करोना व्हायरसमुळे योकोहामा बंदरावर थांबवण्यात आलेल्या 👉डायमंड प्रिन्सेस क्रूझवरील भारतीयांच्या सुटकेसाठी चार्टर्ड विमान पाठवण्यात येणार आहे. वैद्यकीय चाचणीत ज्या भारतीयांना करोनाचा संसर्ग झाला नाही, अशा भारतीयांना या विमानाद्वारे मायदेशी आणण्यात येणार असल्याची माहिती दूतावासाने दिली आहे.

डायमंड प्रिन्सेस ही क्रूझ ३ फेब्रुवारीपासून जपानच्या योकोहामा बंदरावर उभी आहे. हाँगकाँगमधून या क्रूझवर आलेल्या प्रवाशामुळे करोनाचा संसर्ग झाला. या क्रूझवर एकूण ३७११ प्रवासी व कर्मचारी आहेत. त्यामध्ये १३८ कर्मचारी व ६ प्रवासी हे भारतीय आहेत. आतापर्यंत १४ भारतीयांना करोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती दूतावासाने दिली आहे. उपचारांना हे करोनाबाधित भारतीय सकारात्मक प्रतिसाद देत असल्याची माहिती दूतावासाने दिली.
#CSAT- "Aptitude & Reasoning" या विषयाची अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओस आपण अपलोड करणार आहोत...दररोज एक या प्रमाणे...पुण्यातील एका नामवंत classes चे व्हिडिओ असतील....

आजचा व्हिडिओ "वयोमान"👇

t.me/thempscupdate
#EnB : 🚨जगातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरापैकी २१ भारतात

जगभरातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरापैकी २१ शहरं ही भारतातील असल्याचा धक्कादायक खुलासा 👉वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०१९👈 मध्ये झाला आहे. राजधानी दिल्ली, गाझियाबाद हे सर्वाधिक प्रदूषित शहर असून 👉गाझियाबाद पहिल्या स्थानी आहे.👈 तर, शेजारील देश चीनची राजधानी बीजिंगने सुधारणा केली असून प्रदूषित शहरातील पहिल्या २०० शहराच्या यादीतून बाहेर पडण्यात यश मिळवले आहे.

गाझियाबादमध्ये दरवर्षी पीएम २.५ची घनता ११०.२ राहिली आहे. सर्वाधिक प्रदूषित शहराच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, 👉पीएम २.५ दरवर्षी १० मायक्रोग्राम प्रतिघनमीटर असले पाहिजे.👈 भारतातील ९८ टक्के शहरांमधील प्रदूषण २० टक्क्यांनी कमी झाले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या दिलासादायक बाबीनंतरही सर्वाधिक प्रदूषित शहरातील 👉पहिल्या १० शहरात भारतातील सहा शहरांचा समावेश 👈आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये दिल्लीतील काही भागात एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ८०० हून अधिक झाल्यानंतर आपात्कालीन परिस्थिती असल्याचे जाहीर करावे लागले होते.

दक्षिण आशियात सुधारणा

वायू गुणवत्तेबाबत दक्षिण आशियात वर्ष २०१८ च्या तुलनेत काही प्रमाणात स्थिती सुधारली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत भारतासह पाकिस्तान, बांगलादेशचाही समावेश आहे. पाकिस्तानच्या गुजरांवाला, फैसलाबाद आणि रावळपिंडी हे शहर सर्वाधिक प्रदूषित आहेत. आर्थिक मंदी, अनुकूल हवामान आणि स्वच्छ हवेसाठी सरकारी पातळीवर केलेल्या प्रयत्नांमुळे दक्षिण आशियात काही प्रमाणात सुधारणा झाली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
दिल्लीतील विविध विभागातील प्रदूषण & AQI..👆👇
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, कवी, लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पावनस्मृतिस विनम्र अभिवादन!

t.me/thempscupdate
#VeerSawarkar
उत्कट देशभक्त, जहाल क्रांतीकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, क्रियाशील समाजसुधारक असा एक माणूस या पृथ्वीतलावर होता. हे कुणाला खरे वाटणार नाही इतका स्वा. वीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्यासारखा शोभिवंत चमत्कार होता. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथे त्यांचा २८ मे १८८३ रोजी जन्म झाला. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी १८९८ मध्ये त्यांनी मातृभूमीला पारतंत्र्यापासून मुक्त करण्यासाठी देवीपुढे सशस्त्रक्रांतीची शपथ घेतली. ‘जयोस्तुते’ हे स्वातंत्र्य देवीचे स्तोत्र वयाच्या २० व्या वर्षी लिहिले.

पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विदेशी कापडांची होळी करून जनजागृती केली. ९ जून १९०६ मधे लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते लंडनला गेले. तेथे त्यांनी भारतीयांना एकत्र करून तेथून देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले. १८५७ च्या स्वातंत्र्य समराचा इतिहास गुप्तपणे छापून भारतात पाठवला. त्याची अनेक भाषात भाषांतरे होऊन देशभक्त क्रांतीकारकांनी प्रेरणा घेतली. १९०९ मधे बॅरिस्टर परीक्षा पास होऊनही पदवीस नकार दिला. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलानेच हु. अनंत कान्हेरे या क्रांतीकारकाने जॅक्सनचा वध केला. याबाबत सावरकरांना अटक झाली. पॅरीसहून लंडनला येताना मार्सेलीस बंदरात समुद्रात उडी टाकून निसटण्याचा ऐतिहासिक, धाडसी प्रयत्न त्यांनी केला. अखेर दोन जन्मठेप व काळ्यापाण्याची शिक्षा त्यांना झाली. त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनाही काळ्यापाण्याची शिक्षा झाली होती.

अंदमानला त्यांचे अमानुष हाल झाले पण तरीही तेथे लिहिण्याचे कोणतेही साधन नसताना काळ कोठडीच्या भितीवर कोळशानी त्यांनी महाकाव्य लिहिले. काळ्यापाण्यातून सुटका होऊन रत्नागिरीला आल्यावर त्यांनी समाजसुधारणेसाठी पतितपावन मंदिर, अस्पृश्यता निवारक परिषद, महार परिषद असे कार्यक्रम करून विरोधाची पर्वा न करता जागृती केली. १९३७ ला विनाअट संपूर्ण मुक्तता झाल्यावर हिंदू महासभेचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. १९४० मध्ये सुभाषचंद्र बोस व सावरकर यांची ऐतिहासिक भेट झाली. क्रांतीकार्यासाठी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराची सांगता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १० मे १९५२ ला केली. २२ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तर अ. भा. नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला होता. आयुष्याचा क्षणन् क्षण आणि शरीराचा कणन् कण त्यांनी केवळ देशासाठी अर्पण केला. महर्षी व्यास-वाल्मिकींच्या कुळातला अमर साहित्यकार व हाडाची काडे करणारा आधुनिक दधिची असलेल्या या महापुरुषाने प्रायोपवेशन करून (अन्नत्याग करून) २६ फेब्रुवारी १९६६ मध्ये देहत्याग केला..!

http://t.me/thempscupdate