The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांची आज ७४ वी पुण्यतिथी. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेने गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला आज ७४ वर्षे पूर्ण झाली.

@thempscupdate
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यता आंदोलन : गांधी युग

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/historymm
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#personalities : विद्या बाळ..👇

स्त्रीवादाच्या भाष्यकार, 'मिळून साऱ्या जणी'च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पुण्यातील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्त्री-पुरूष समानतेसाठी स्त्रीवादाची वेगळी मांडणी करत महिलांच्या प्रगतीसाठी विद्या बाळ यांनी आयुष्य वेचलं. लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांनी महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळ आणि संस्थात्मक कार्यातून समाजातील मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले. स्त्रियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरूषभान यायला हवं असं म्हणत त्यांनी लिखाणाला कृतीची जोड दिली. विद्याताईंनी स्त्री या मासिकात २२ वर्षे पत्रकार कार्यकर्ता म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी 'नारी समता मंच'ची स्थापना केली. पुढच्या टप्प्यात स्त्री आणि पुरूष यांच्यातील संबंधांची नवी मांडणी करणारे 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर 'सखी मंडळा'ची स्थापनाही केली.

व्यापक कार्य

महिलांची उन्नती हेच ध्येय ठेवून काम करणाऱ्या विद्याताईंनी प्रश्नांशी संबंधित इतर सामाजिक विषयांचीही मांडणी केली. बोलते व्हा, पुरूष संवाद केंद्र, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरूष उवाच अभ्यासवर्ग या संस्था त्यांनी सुरू केल्या. लेख, अनुवाद, कांदबरी, संपादक आदी शैलीत त्यांनी लिखाण केलं. त्यांच्या एकूण कार्याची दखल घेत महाराष्ट्र फाऊंडेशननं त्यांचा 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानही केला आहे. त्याचबरोबर अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.

t.me/thempscupdate
#personalities : विद्या बाळ

🔰विद्याताई नी सुरू केलेल्या संस्था🔰

📌 नाटी समता मंच
📌 मिळून साऱ्याजणी
📌 अक्षरस्पर्श ग्रंथालय
📌 साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ
📌 पुरुष उवाच अभ्यासवर्ग
📌 पुरुष संवाद केंद्र

🔰प्रकाशित साहित्य🔰

कादंबरी :

📌 तेजस्विनी= वाळवंटातील वाट
📌 अनुवादित कादंबरी = जीवन हे असं आहे
चरित्र:
📌 कमला की (डॉ. कमलाबाई देशपांडे
यांचे चरित्र)

स्फूट लेखांचे संकलन:

📌 अपराजिता नि:श्वास (संपादित)
📌 कथा गौटीची= डॉटर्स ऑफ महाराष्ट्र
📌 तुमच्या माझ्यासाठी
मिळवती पोतडी (संपादित)
📌ोध स्वतःचा= संवाद = साकव

🔰 पुरस्कार 🔰

📌 आगरकर पत्रकारिता पुरस्कार
कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार
📌 शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार
सामाजिक कृतज्ञता निधी तर्फे
"सामाजिक कृतज्ञता जीवन गौरव
पुरस्कार
📌 स्त्री समस्यांविषयक कार्य आणि
पत्रकारितेतील योगदानाबद्दल फाय
फाउंडेशनचा पुरस्कार
#schemes
● शिवभोजन योजना

- राज्यातल्या दरिद्री आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी राज्यात 26 जानेवारी 2020 पासून करण्यास सुरुवात झाली आहे.
- योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रायेागिक तत्वावर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे.
- त्यासाठी राज्य सरकारने चालू वित्तीय वर्षात उर्वरित तिमाहीसाठी 6.48 कोटी रुपयांची रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिली आहे.

● योजनेचे स्वरूप

- योजनेमध्ये थाळीची किंमत शहरी भागात प्रती थाळी 50 तर ग्रामीण भागामध्ये 35 रुपये राहणार आहे. ज्यामध्ये केवळ 10 रुपये ग्राहकांकडून घेतले जाणार आणि उर्वरित रक्कम सरकार अनुदान स्वरुपात प्रदान करणार.
- ही योजना राबविण्यासाठी खानावळ, स्वंयसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट अथवा मेस यांची समितीमार्फत निवड करण्यात येत आहे.
- समितीने पात्र ठरवलेल्या खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, मेस यांमध्ये प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयांव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून अन्न नागरी पुरवठा विभागाकडून थेट जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार.
- मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासंबंधी हे अनुदान नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्यात येणार. ते शिवभोजन ॲपमध्ये भरलेल्या माहितीची परिगणना करून संबंधिताना हे अनुदान दर पंधरा दिवसांनी ऑनलाईन पद्धतीने वितरित करतील.
- ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या वेळेत कार्यरत राहणार असून भोजनालयात एकाच वेळी किमान 25 व्यक्तींच्या जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे. एका भोजनालयात किमान 75 तर कमाल 150 थाळी भोजन उपलब्ध होणार.
#personalities : ​हर्षवर्धन श्रृंगला

📌 अमेरिकेतील सध्याचे भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला हे पुढील विदेश सचिव होणार आहेत. विद्यमान विदेश सचिव विजय गोखले यांच्या निवृत्तीमुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

📌 1 मे 1962 रोजी मुंबईत जन्मलेले श्रृंगला हे भारताचे 33 वे विदेश सचिव होणार आहेत. श्रृंगला हे 1984 च्या आयएफएस तुकडीचे अधिकारी आहेत.

📌 1988 च्या आयएफएस तुकडीचे अधिकारी तरणजीत सिंग संधू यांची अमेरिकेतील भारताच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संधू हे यापूर्वी श्रीलंकेत राजदूत म्हणून कार्यरत हेते.

📌 जुलै 2013 ते जानेवारी 2017 या कालावधीत संधू यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारताच्या डेप्युटी चीफ ऑफ मिशनपदाची जबाबदारी सांभाळली आहे. श्रृंगला यांनी विदेश मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम करताना बांगलादेश, म्यानमार, मालदीव आणि श्रीलंका विभागाचे प्रभारीपद सांभाळले आहे.

📌 संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. फ्रान्स, व्हिएतनाम, इस्रायल आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांनी राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Economic Survey 2019-20 (आर्थिक सर्वेक्षण) Live...👇👇👇

@thempscupdate

https://youtu.be/FiJU10V4sL8
echapter.pdf
24.4 MB
#eco survey 2019-20 Volume-I

t.me/thempscupdate
echapter_vol2(1).pdf
26.6 MB
#eco survey 2019-20 Volume-II

http://t.me/thempscupdate
#budget2020
#eco Survey 2020 -

👉आर्थिक सर्वेक्षण 2019-20 Theme – एनेबल मार्केट्स, प्रोमोट 'प्रो-बिझिनेस' पॉलिसीज अँड स्ट्रेन्दन 'ट्रस्ट' इन द इकॉनमी.

आर्थिक सर्वेक्षण अहवालातील ठळक मुद्दे

कच्च्या तेलाचे दर कमी राहिल्याचा देशाला फायदा झाला. त्यामुळे चालू खात्यातील तूट घटली.

महागाईचा दर एप्रिल २०१९ मध्ये ३.२ टक्के होता. डिसेंबरमध्ये तो २.६ टक्क्यांवर आला आहे.

२०१९-२० या वित्तवर्षातील दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकासाची गती वाढली. त्यासाठी १० क्षेत्रांचे योगदान मोठे आहे.

देशाच्या आर्थिकासावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी, २०२० ते २०२५ या काळात पायाभूत विकास क्षेत्रावर १०० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची गरज आहे, असेही आर्थिक सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे की, २०१४ पासून महागाईच्या दरात सातत्याने घट होत आहे. २०१४ ते २०१९ या काळात महागाईच्या दरात फारशी दरवाढ किंवा घटही झालेली नाही.

देशाला आर्थिक विकासात मोठी प्रगती करायची असेल तर कुशल बँकिंग क्षेत्राची आवश्यकता आहे.

५ ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे ध्येय गाठायचे असल्यास देशातील व्यापार धोरणाला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.

‘एसेम्बल इन इंडिया फॉर द वर्ल्ड’ या योजनेला ‘मेक इन इंडिया’ या योजनेशी जोडावे लागेल, अशी सूचनाही या अहवालात करण्यात आली आहे. असे केल्यास जगातील निर्यात क्षेत्रातील भागीदारी २०२५ पर्यंत ३.५ टक्क्यांवर तर २०३० पर्यंत ६ टक्क्यांवर जाईल, अशी आशा आहे.


आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत माडण्यात आला असून, त्यात देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधी अनेक
आकडेवारी मांडण्यात आली आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकासाचा दर (जीडीपी) ६ ते ६.५ टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

t.me/thempscupdate