The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#EnB
#Ramsar_Convention_on_Wetlands

•2 फेब्रुवारी 1971 रोजी रामसर करार स्वीकृत करण्यात आला.

•1 फेब्रुवारी 1982 रोजी भारताने या करारावर स्वाक्षरी केली .

•2019 अखेर भारतात एकूण 27 रामसर स्थळे होती.

2020 मध्ये 10 ठिकाणांचा यामध्ये समावेश करण्यात आला असून आता भारतातील रामसर स्थळांची संख्या 37 इतकी झाली आहे.

नाशिक_जिल्ह्यातील_नांदूर_मधमेश्वर चा समावेश रामसर स्थळांमध्ये झाल्याने हे महाराष्ट्रातील_पहिले_रामसर_स्थळ ठरले आहे.

•2020 मध्ये घोषित इतर रामसार स्थळे -
# पंजाब -
1)केशोपूर मीआनी
2)बियास संवर्धन राखीव क्षेत्र
3)नानगल

# उत्तर_प्रदेश -
4)नवाबगंज
5)पार्वती आग्रा
6)समन
7)समसपुर
8)संडी
9)सरसाई नावर

​​नांदूर मधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्रातील पहिले रामसार स्थळ .

नांदूरमधमेश्वर अभयारण्य महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यात स्थित आहे. हा नांदूर मधमेश्वर जलाशयाचा परिसर आहे. येथे स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षी हजारोंच्या संख्येने आढळत असल्यामुळे ते महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाते. 

गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर

१९८६ मध्ये हा परिसर नांदूर मधमेश्वर अभयारण्य म्हणून अधिसूचित करण्यात आला .

इराणमधील कॅस्पियन या समुद्राच्या किना-यावरील ‘ रामसर ‘ या शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी जगभरातील पाणथळ जागांच्या संरक्षणासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी एक परिषद भरवण्यात आली. या परिषदेतील ठरावाला रामसर ठराव म्हणून ओळखले जाते. हा ठराव १९७५ सालापासून अंमलात आला.

पाणथळ प्रदेशांना मानवी जीवनात असलेले स्थान सर्वांना समजावे या हेतूने दर वर्षी २ फेब्रुवारीचा दिवस ‘ वेटलँड्स डे ’ साजरा केला जावा असा निर्णय या परिषदेत घेतला गेला. असा पहिला दिवस १९९७ साली साजरा झाला.


•राज्यसेवा पूर्व परीक्षेत यापूर्वी प्रश्न विचारण्यात आला आहे.

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
#EnB : RAMSAR Wetland sites in India..👆👇
27 स्थळे : (जुन्या यादी प्रमाणे)


MPSC स्पर्धा परीक्षेत दरवर्षी यावर एक प्रश्न विचारला जातो..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.


t.me/thempscupdate



🚨टीप- 👉 MPSC Update & Pune 👈 या नावाशी साधर्म्य असणारी 5-6 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏
महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांची आज ७४ वी पुण्यतिथी. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेने गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला आज ७४ वर्षे पूर्ण झाली.

@thempscupdate
Forwarded from History by M.M.
स्वातंत्र्यता आंदोलन : गांधी युग

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

t.me/historymm
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from History by M.M.
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#personalities : विद्या बाळ..👇

स्त्रीवादाच्या भाष्यकार, 'मिळून साऱ्या जणी'च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव पुण्यातील नचिकेत या त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या जाण्यानं महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

स्त्री-पुरूष समानतेसाठी स्त्रीवादाची वेगळी मांडणी करत महिलांच्या प्रगतीसाठी विद्या बाळ यांनी आयुष्य वेचलं. लेखिका, पत्रकार आणि महिला कार्यकर्त्या असलेल्या विद्या बाळ यांनी महाराष्ट्रातील स्त्रीवादी चळवळ आणि संस्थात्मक कार्यातून समाजातील मानसिकता बदलण्याचे प्रयत्न केले. स्त्रियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरूषभान यायला हवं असं म्हणत त्यांनी लिखाणाला कृतीची जोड दिली. विद्याताईंनी स्त्री या मासिकात २२ वर्षे पत्रकार कार्यकर्ता म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी 'नारी समता मंच'ची स्थापना केली. पुढच्या टप्प्यात स्त्री आणि पुरूष यांच्यातील संबंधांची नवी मांडणी करणारे 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर 'सखी मंडळा'ची स्थापनाही केली.

व्यापक कार्य

महिलांची उन्नती हेच ध्येय ठेवून काम करणाऱ्या विद्याताईंनी प्रश्नांशी संबंधित इतर सामाजिक विषयांचीही मांडणी केली. बोलते व्हा, पुरूष संवाद केंद्र, अक्षरस्पर्श ग्रंथालय, साथ साथ विवाह अभ्यास मंडळ, पुरूष उवाच अभ्यासवर्ग या संस्था त्यांनी सुरू केल्या. लेख, अनुवाद, कांदबरी, संपादक आदी शैलीत त्यांनी लिखाण केलं. त्यांच्या एकूण कार्याची दखल घेत महाराष्ट्र फाऊंडेशननं त्यांचा 'जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानही केला आहे. त्याचबरोबर अनेक मानसन्मान त्यांना मिळाले आहेत.

t.me/thempscupdate
#personalities : विद्या बाळ

🔰विद्याताई नी सुरू केलेल्या संस्था🔰

📌 नाटी समता मंच
📌 मिळून साऱ्याजणी
📌 अक्षरस्पर्श ग्रंथालय
📌 साथ-साथ विवाह अभ्यास मंडळ
📌 पुरुष उवाच अभ्यासवर्ग
📌 पुरुष संवाद केंद्र

🔰प्रकाशित साहित्य🔰

कादंबरी :

📌 तेजस्विनी= वाळवंटातील वाट
📌 अनुवादित कादंबरी = जीवन हे असं आहे
चरित्र:
📌 कमला की (डॉ. कमलाबाई देशपांडे
यांचे चरित्र)

स्फूट लेखांचे संकलन:

📌 अपराजिता नि:श्वास (संपादित)
📌 कथा गौटीची= डॉटर्स ऑफ महाराष्ट्र
📌 तुमच्या माझ्यासाठी
मिळवती पोतडी (संपादित)
📌ोध स्वतःचा= संवाद = साकव

🔰 पुरस्कार 🔰

📌 आगरकर पत्रकारिता पुरस्कार
कमल प्रभाकर पाध्ये ट्रस्टचा पुरस्कार
📌 शंकरराव किर्लोस्कर पुरस्कार
सामाजिक कृतज्ञता निधी तर्फे
"सामाजिक कृतज्ञता जीवन गौरव
पुरस्कार
📌 स्त्री समस्यांविषयक कार्य आणि
पत्रकारितेतील योगदानाबद्दल फाय
फाउंडेशनचा पुरस्कार
#schemes
● शिवभोजन योजना

- राज्यातल्या दरिद्री आणि गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात जेवण उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून “शिवभोजन” योजनेची अंमलबजावणी राज्यात 26 जानेवारी 2020 पासून करण्यास सुरुवात झाली आहे.
- योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात प्रायेागिक तत्वावर राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात किमान एक भोजनालय सुरु करण्यात येणार आहे.
- त्यासाठी राज्य सरकारने चालू वित्तीय वर्षात उर्वरित तिमाहीसाठी 6.48 कोटी रुपयांची रक्कम अनुदान म्हणून उपलब्ध करून दिली आहे.

● योजनेचे स्वरूप

- योजनेमध्ये थाळीची किंमत शहरी भागात प्रती थाळी 50 तर ग्रामीण भागामध्ये 35 रुपये राहणार आहे. ज्यामध्ये केवळ 10 रुपये ग्राहकांकडून घेतले जाणार आणि उर्वरित रक्कम सरकार अनुदान स्वरुपात प्रदान करणार.
- ही योजना राबविण्यासाठी खानावळ, स्वंयसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालये, रेस्टॉरंट अथवा मेस यांची समितीमार्फत निवड करण्यात येत आहे.
- समितीने पात्र ठरवलेल्या खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचतगट, भोजनालय, रेस्टॉरंट, मेस यांमध्ये प्रत्येक ग्राहकाकडून प्राप्त झालेल्या 10 रुपयांव्यतिरिक्त उर्वरित रक्कम अनुदान म्हणून अन्न नागरी पुरवठा विभागाकडून थेट जिल्हाधिकारी यांना देण्यात येणार.
- मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रासंबंधी हे अनुदान नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांना देण्यात येणार. ते शिवभोजन ॲपमध्ये भरलेल्या माहितीची परिगणना करून संबंधिताना हे अनुदान दर पंधरा दिवसांनी ऑनलाईन पद्धतीने वितरित करतील.
- ही भोजनालये दुपारी 12 ते 2 या वेळेत कार्यरत राहणार असून भोजनालयात एकाच वेळी किमान 25 व्यक्तींच्या जेवणासाठी बसण्याची व्यवस्था असणार आहे. एका भोजनालयात किमान 75 तर कमाल 150 थाळी भोजन उपलब्ध होणार.
#personalities : ​हर्षवर्धन श्रृंगला

📌 अमेरिकेतील सध्याचे भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला हे पुढील विदेश सचिव होणार आहेत. विद्यमान विदेश सचिव विजय गोखले यांच्या निवृत्तीमुळे त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

📌 1 मे 1962 रोजी मुंबईत जन्मलेले श्रृंगला हे भारताचे 33 वे विदेश सचिव होणार आहेत. श्रृंगला हे 1984 च्या आयएफएस तुकडीचे अधिकारी आहेत.

📌 1988 च्या आयएफएस तुकडीचे अधिकारी तरणजीत सिंग संधू यांची अमेरिकेतील भारताच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संधू हे यापूर्वी श्रीलंकेत राजदूत म्हणून कार्यरत हेते.

📌 जुलै 2013 ते जानेवारी 2017 या कालावधीत संधू यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारताच्या डेप्युटी चीफ ऑफ मिशनपदाची जबाबदारी सांभाळली आहे. श्रृंगला यांनी विदेश मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम करताना बांगलादेश, म्यानमार, मालदीव आणि श्रीलंका विभागाचे प्रभारीपद सांभाळले आहे.

📌 संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. फ्रान्स, व्हिएतनाम, इस्रायल आणि दक्षिण आफ्रिकेत त्यांनी राजदूत म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Economic Survey 2019-20 (आर्थिक सर्वेक्षण) Live...👇👇👇

@thempscupdate

https://youtu.be/FiJU10V4sL8