The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update ©
https://m.economictimes.com/industry/energy/oil-gas/iraq-continues-to-be-indias-top-oil-supplier-imports-from-us-rises-4-folds/articleshow/69129071.cms
#Imp #Current
भारताला तेल (Crude Oil ) पुरवठा करणारे देश...( एकूण आयातीनुसार ) 2018-19..👇👇

1. इराक
2. सौदी-अरेबिया
3. इराण
4. UAE ( संयुक्त अरब अमिराती)
5. व्हेनेझुएला
6. नायजेरिया
7. कुवैत
8. मेक्सिको
9. अमेरिका


MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" साठी खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.👇

t.me/thempscupdate
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन... पत्रकार दिनाच्या सर्व पत्रकार बांधवाना शुभेच्छा...
-------------------------------
आज दि. ६ जानेवारी. वृत्तपत्रसृष्टीत ६ जानेवारी या तारखेला विशेष महत्व आहे. कारण आजपासून साधारणपणे १८८वर्षांपूर्वी ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबई मध्ये 'दर्पण' या नावाने पाक्षिकास सुरूवात केली आणि तो मराठी वृत्तपत्रसृष्टीचा सुवर्ण दिन ठरला. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ हे वृत्तपत्र सुरू करून मराठीतील आद्यसंपादक होण्याचा बहुमान मिळविला. त्यांची आठवण म्हणून आपण ६ जानेवारी रोजी दर्पण दिन साजरा करतो.

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा फार मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा १८३२ ते १८४६ या काळात उमटवला.

बाळशास्त्री जांभेकरांना आपण ‘दर्पण’कार जांभेकर म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकी सत्तेला उलथून टाकायचे असेल, तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला आणि मराठी वृत्तपत्रविश्र्वात नवी पहाट उगवली. दर्पणाचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्या वेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.

दर्पणाचा पहिला अंक ६ जानेवारी, १८३२ रोजी प्रकाशित झाला. वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती. जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजीत ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते.

t.me/thempscupdate
#Infographics 👉 Australia : Hot & Dry

t.me/thempsupdate
निवडणूक आयोगाची नवी यंत्रणा: “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)”

अर्जदारांना अर्जांची स्थिती जाणून घेता यावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) “पॉलिटिकल पार्टीज रजिस्ट्रेशन ट्रॅकिंग मॅनेजमेंट सिस्टम (PPRTMS)” नावाची नवी यंत्रणा कार्यरत केली आहे.

1 जानेवारी 2020 पासून याबाबतचे नवीन नियम लागू झाले. त्याच्या अंतर्गत, 1 जानेवारीपासून राजकीय निवडणूक पक्षाच्या नोंदणीसाठी अर्ज करणारे अर्जदार विनंतीची प्रगती मागू शकतात आणि SMS व ई-मेलद्वारे स्थिती प्राप्त करू शकण्यास सक्षम झाले आहेत.

नव्या नियमांनुसार,

🔸नोंदणी करणार्‍या संघटनेच्या स्थापनेच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत आयोगाकडे अर्ज सादर करावा लागणार.

🔸https://pprtms.eci.gov.in या संकेतस्थळावर अर्जाची स्थिती जाणून घेता येणार आहे.

🔸राज्यघटनेतले कलम 324 आणि ‘लोकप्रतिनिधी कायदा-1951’ याच्या कलम 29 (अ) अन्वये राजकीय पक्षांची नोंदणी प्रकिया नियंत्रित केली जाते.

ECI विषयी

भारतीय निवडणूक आयोग (ECI) ही एक स्वायत्त व अर्ध-न्यायिक संस्था आहे. आयोगाला घटनात्मक दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आयोगाची स्थापना दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी झाली.

घटनेच्या कलम 324 अन्वये आयोगावर राष्ट्रपती व उपराष्ट्रपती तसेच संसदेची लोकसभा आणि राज्यसभा तसेच राज्याच्या विधानसभा निवडणुका घेण्याची जबाबदारी असते.

आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि दोन निवडणूक आयुक्त असतात. निवडणूक आयुक्त हे भारतीय निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत, ज्यांना राष्ट्रीय व राज्य पातळीवर निवडणूक घेण्याचे अधिकार आहेत.
Forwarded from History by M.M.
Buddhist Councils...👆

प्राचीन इतिहास वरील अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..

t.me/historymm
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from POLITY By M.M.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
#Current
#EnB

🌹🌳🌴इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट, 2019🌴🌳🌹

👉30 डिसेंबर, 2019 रोजी केंद्रीय पर्यावरण आणि हवामानमंत्री प्रकाश जावडेकर यांनी "इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट, 2019" जाहीर केला. हा अहवाल दर दोन वर्षांनी जाहीर केला जातो. 

👉या अहवालात वनक्षेत्र, जंगलातील वनस्पती घनता, वृक्षारोपण दर इत्यादींबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

अहवालाची ठळक वैशिष्ट्ये

👉या अहवालानुसार देशाचे एकूण वनक्षेत्र (वन कवच) हे 7,12,249चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 21.67%आहे. 

👉देशाच्या झाडाचे क्षेत्रफळ सुमारे 95,027 चौरस किलोमीटर आहे जे देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 2.89% आहे.

👉भारतीय वन राज्य अहवाल, 2017 च्या तुलनेत यावर्षी देशाच्या वनक्षेत्रात 3,976 चौरस किलोमीटर (0.56%) वाढ झाली आहे.

सर्वात जास्त वृद्धी दर्शविणारे राज्य

1.कर्नाटक (1025 चौरस किमी),
2.आंध्र प्रदेश (990 चौरस किमी),
3.केरळ (823 चौरस किमी), 4.जम्मू-काश्मीर (371 चौरस किमी),
5.हिमाचल प्रदेश (334 चौ किमी) .

👉देशातील डोंगराळ जिल्ह्यांमधील वनक्षेत्र 2,84,006 चौरस किलोमीटर आहे, जे या जिल्ह्यांच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 40.
🌸🌸ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’🌸🌸

💧राज्याला कलेचा समृद्ध वारसा लाभला आहे. दृश्यकलेचे शिक्षण देणारी देशातील पहिली संस्था सर ज.जी. कला महाविद्यालयाच्या रूपात मुंबईत स्थापन झाली. राज्यातील कलाकारांनी कला क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लौकिक प्राप्त केला आहे. त्यानुसार, दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाºया ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

💧राज्यात दृश्यकला क्षेत्रात सातत्यपूर्ण आणि निष्ठेने कार्य करणाºया ज्येष्ठ कलाकारांना ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ दरवर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप पाच लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असणार आहे.

💧तर हा पुरस्कार दृश्यकलेच्या एका ज्येष्ठ व नामवंत कलाकार यांना दरवर्षी, क्रमनिहाय प्रदान करण्यात येईल. त्यात अनुक्रमे रेखा व रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला आणि कला व शिल्प (अंतर्गत गृहसजावट, वस्त्रकाम, मातकाम, धातूकाम) या विभागांचा समावेश आहे.

💧तसेच या क्रमनिहाय येणाºया संबंधित कला विभागात पुरस्कारासाठी कलाकार यांची निवड न झाल्यास त्यानंतरच्या क्रमावरील विभागातील कलाकारांचा पुरस्कारासाठी विचार करण्यात येईल, असे निर्देश शासन निर्णयात नमूद आहेत.
#Current
#S&T

🔷कर्नाटकच्या NIT येथे ISROचे चौथे शैक्षणिक केंद्र

- अंतराळ क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी एक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक  राज्यातल्या सुरथकल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (NIT) याच्या परिसरात एक प्रादेशिक शैक्षणिक केंद्र उघडणार आहे.

- त्यासंदर्भात 3 जानेवारीला दोन्ही संस्थांमध्ये एक सामंजस्य करार झाला.

- NIT-सुरथकल इथले केंद्र हे ISROचे चौथे प्रादेशिक शैक्षणिक केंद्र असणार. इतर केंद्रे मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (जयपूर), गुवाहाटी विद्यापीठ आणि कुरुक्षेत्र विद्यापीठ येथे आहेत.

▪️केंद्राविषयी

- या ठिकाणी अंतराळ तंत्रज्ञान क्षेत्रातल्या अनुप्रयोगांमधील संशोधन आणि विकास कार्ये NIT सह संयुक्तपणे केले जाणार आहे.

- ISRO या केंद्राच्या कामकाजासाठी व प्रशासकीय खर्चासाठी वर्षाकाठी 2 कोटी रुपयांचे वार्षिक अनुदान देणार आहे.

- कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुडुचेरी, केरळ आणि लक्षद्वीप या राज्यांचा समावेश असलेल्या दक्षिणेकडील प्रदेशात अंतराळ तंत्रज्ञानाच्या कामांना प्रोत्साहन देण्यासाठी हे केंद्र मदतनीस म्हणून काम करणार.

- भारतीय अंतराळ कार्यक्रमाच्या भविष्यातल्या गरजांसंबंधित क्षेत्रांमध्ये प्रगत संशोधन हे केंद्र करणार आहे.

- क्षमता बांधणी, जनजागृती आणि ISROच्या संशोधन व विकास कामांसाठी हे केंद्र एक दूत म्हणून काम करणार आहे.

- या केंद्रामध्ये NITचे प्राध्यापक आणि संशोधक तसेच भेट देणारे वैज्ञानिक आणि ISROचे तज्ज्ञ असणार. एक संयुक्त धोरण व व्यवस्थापन समिती या केंद्राच्या अंतर्गत चालणार्‍या उपक्रमांचे मार्गदर्शन करणार.

- या केंद्राच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना संशोधन प्रकल्पाच्या कालावधी दरम्यान संशोधन पाठ्यवृत्ती (फेलोशिप) देखील दिली जाणार.
#Current
#Polity

दिल्ली निवडणूक : तारखा जाहीर.
==============================
06 Jan 2020

● देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे.
● दिल्लीत ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.
● मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व सहकारी आयुक्त अशोक लवासा यांनी पत्रकार परिषदेत दिल्ली विधानसभेच्या ७० जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.
● निवडणूक अधिसूचना मंगळवार, १४ जानेवारी रोजी काढली जाणार असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २१ जानेवारी आहे.
● २२ जानेवारी उमेदवारी अर्ज छाननीची अंतिम तारीख असेल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २४ जानेवारी आहे.
● मतदान शनिवार, ८ फेब्रुवारी रोजी होणार असून, निकाल मंगळवारी ११ फेब्रुवारी रोजी घोषित होतील.
● दिल्ली विधानसभेची मुदत २२ फेब्रुवारी रोजी संपणार असून, १३ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे अरोरा यांनी सांगितले.
● दिल्लीत २६८९ जागांवरील १३ हजार ७५० मतदान केंद्रांमध्ये मतदान होणार आहे.
● फेब्रुवारी, २०१५मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ७०पैकी ६७ जागा जिंकून इतिहास घडविला होता.
● नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सर्व सात जागा भाजप ने जिंकल्या आहेत.

● मतदान : ८ फेब्रुवारी
● निकाल : ११ फेब्रुवारी
● मतदार : १ कोटी ४६ लाख ९२ हजार १३६
● सैन्य दल कर्मचारी : ११ हजार ५५६
● एकूण मतदार : १ कोटी ४७ लाख ३ हजार ६९२
​​🤼‍♂ नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी 2020 🤼‍♂🏆

◾️६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेला 3-2 अशा गुणफरकाने पराभूत केले.

◾️ याचबारोबर महाराष्ट्राला यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे.

◾️६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागात हर्षवर्धन सदगीर याने तर माती विभागातून शैलेश शेळके याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

◾️महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात हे मल्‍ल एकाच तालमीतील म्हणजे काका पवारांचे पठ्ठे मैदानात होते.