मोठी बातमी ! एमपीएससीची 21 ऑक्टोबरपूर्वी परीक्षा - https://www.esakal.com/maharashtra/examination-mpsc-21st-october-305261
eSakal.com
मोठी बातमी ! एमपीएससीची 21 ऑक्टोबरपूर्वी परीक्षा
Marathi news about Examination of MPSC before 21st October : सोलापूर : कोरोनामुळे एमपीएससीची राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करावी लागली. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांतील कोषागार कार्यालयातील प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सुरक्षा कक्षात ठेवण्यास एमपीएससीच्या…
वनामती मधील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण कसे होते..?
याबद्दल चा भाग -२
https://youtu.be/GO0nD7TRq_U
यामध्ये मी गाव आणि आदिवासी संलग्नतेबाबतची माहिती दिली आहे.. 😊
बघा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा...
Join us @mpscdecoded
याबद्दल चा भाग -२
https://youtu.be/GO0nD7TRq_U
यामध्ये मी गाव आणि आदिवासी संलग्नतेबाबतची माहिती दिली आहे.. 😊
बघा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा...
Join us @mpscdecoded
YouTube
Beautiful memories of Training of MPSC officers from Vanamati Nagpur Part 2..By Pravin D (Tahsildar)
या Video मध्ये ज्याप्रमाणे MPSC मधील वर्ग 1 अधिकाऱ्यांची training यशदा पुणे येथे होते...त्याप्रमाणे नागपूर येथील वनामती याठिकाणी वर्ग 2 अधिकाऱ्यांची training होते...भाग 1 आपण पहिलाच तसे त्या training बद्दल चे अनुभव पुढील भाग आपले सहकारी अधिकारी Share करत…
*श्री. गुरु गोबिंद सिंगजी इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनियरिंग अँन्ड टेक्नोलॉजी, विष्णूपुरी (नांदेड*) यांनी आपल्या महाविद्यालयातील कतृत्ववान *माजी विद्यार्थीची यशोगाथा* येणाऱ्या विद्यार्थ्याना मार्गदर्शन व प्रेरणादायी ठरावी यासाठी *एसजीजीएस आयकाँन* असा एक उपक्रम राबवत आहेत. त्यामध्ये *अश्विनी शेंडगे, डीवायएसपी,पवनी* यांची यशोगाथा.
Join us @mpscdecoded
एसजीजीएस आयकॉन....
रोल मॉडेल पोलीस उपअधीक्षक: अश्विनी शेंडगे
-- प्रा. डॉ. रवींद्र जोशी
"दररोज नवीन नवीन आव्हाने येत असतात, आपल्याला तत्पर राहणे गरजेचे असते. दिवस-रात्र, शनिवार-रविवार, सणवार, कुठल्याही क्षणी कॉल येतो. इथे घटना घडली, तातडीने या. आहे त्या मनुष्यबळासोबत घटनास्थळी त्वरित पोहोचावे लागते. तत्परतेने परिणामकारक निर्णय जागेवर घ्यावा लागतो आणि स्थिती नियंत्रणात ठेवावी लागते. लेडीज ऑफिसर जेव्हा चौकात उभी असते तेव्हा समाज विशेषतः मुली एक आत्मनिर्भर, रोल मॉडेल म्हणून आपल्याकडे पाहात असतात आणि तशी कामगिरी करावी लागते.' पोलीस उप अधीक्षक अश्विनी शेंडगे या शंकरराव चव्हाण सभागृहाच्या मंचावरून तरुणाईला संबोधीत करत होत्या. टाळ्यांचा कडकडाट झाला, तरुणांची दंड फुलली, मुली स्वयंनिर्भरतेने भुवया उंचावत होत्या. ज्या मंचासमोर त्यांनी २०-२५ प्रशासकीय सेवेतील यशस्वी अधिकाऱ्यांची भाषणे ऐकली होती, आज त्याच मंचावर त्या वक्ता होत्या. अशा आत्मनिर्भर, रोल मॉडेल, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे एसजीजीएस नांदेडच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या २०१४ सालच्या विद्यार्थिनी आहेत.
अश्विनी मूळची सांगली जिल्ह्यातील झरे या गावची. ज्या गावात वर्षातले सात महिने टॅंकरने पाणीपुरवठा होतो, मुलं-मुली, बायका पाण्यासाठी रांगेत थांबायची, त्या गावची ती. वडील रामचंद्र शेंडगे व्यवसायाने शिक्षक, तीन मुली, एक मुलगा एकूण चार अपत्य, त्यापैकी अश्विनी एक. ती लहानपणापासून सर्वगुणसंपन्न अशी गुणी मुलगी होती. शाळेत सरांनी दिलेली आव्हाने, ती पुढाकार घेऊन स्वीकारायची. पाचवीत असताना ९५% गुण घेऊन शाळेत पहिली आली. तेव्हा प्राचार्यांनी अभिनंदन करून सांगितलं, एकदा टॉप राहणं सोपं असतं पण सातत्य ठेवणं हे कठीण. हे शब्द कोमल मनावर कोरले गेले आणि ती सतत दहावीपर्यंत शाळेत टॉप असायची. वडील गणिताचे शिक्षक, 'पोरगी काय दहावीला गणितात दिवे लावणार? त्यात ती आजारी आहे,' असा शिक्षकांनी टोमणा मारला. वडिलांना मान खाली घालण्याची वेळ येऊ द्यायची नाही. तिने आव्हान स्विकारले, जिद्दीने पेटली आणि गणितात १५०/१५० गुण मिळविले.
अभ्यासापेक्षा खेळात जास्त आवड. ती मुलांसोबत जास्तीत जास्त खेळ खेळायची. क्रिकेट हा सर्वात आवडीचा खेळ. तसेच वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला, बक्षीसेसुद्धा पटकावली. नृत्यकलेत तर ती निपुण होती. आठवीत असताना राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. सर्वांगिण व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असताना, प्रशासकीय सेवेत जायचं, याचं बीज शालेय जीवनातच तिच्या मनात रोवल्या गेलं. सांगलीच्या कलेक्टर मनीषा मेह्स्कर मॅडमला ऐकलं होतं, वर्तमानपत्रात वाचलं होतं. त्यांच्या प्रभावशाली कर्तृत्वान प्रशासनाने ती प्रभावित झाली. पूर्व सांगली जिल्हात जेव्हा पाण्याचे दुर्भिक्ष होते तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंधारणाचे परिणामकारक उपयुक्त प्रकल्प घडवून आणले. स्त्रियांसमोरचा पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न सोडवला. तेव्हा गावातील स्त्रिया त्यांच्याबद्दल चर्चा करायच्या, त्या म्हणायच्या, 'ती कलेक्टर बाई लई गुणी पोरगी आहे.' यामुळेच अश्विनीची मनीषा मॅडम रोल मॉडेल झाली. आपण असंच अधिकारी व्हावं जेणेकरून आपल्याला समाजासाठी अधिकारपूर्वक कार्य करता येईल, अशी तिने शालेय जीवनात ध्येयनिश्चिती केली.
अश्विनी तर प्रतिबिंब होतं तिच्या आजीच. तिची आजी ९२ वर्षांची आहे, तरिही आज त्या दोन किलोमीटर स्वतः शेतात पायी जातात, कामे स्वतः पाहतात, सुईत दोरा सुद्धा स्वतः टाकतात, अशा खंबीर आजीचा तिला पाठिंबा. तिसरी मुलगी म्हणून कुटुंबाचा, समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. त्याकाळात सांगली जिल्ह्यात भ्रूणहत्येचे प्रमाण जास्त होतं, सर्वांना मुले पाहिजे होती. पण अश्विनीची आई तर आजीला एकुलती एक मुल.. आजी अशिक्षित असली तरीही ती मुलीचे महत्त्व ओळखून होती. अश्विनीला नवोदयला पाठवणार होते परंतु आजी खंबीर, 'लेकरू गुणी आहे, इथेच शिकणार,' आणि अश्विनी आजीच्या विश्वासास पात्र ठरून दहावीत पहिली आली आणि तिने बारावी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथून केले.
२०१० साली एसजीजीएसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. घरापासून ५०० किलोमीटर अंतरावर दूर मुलगी कशी राहणार, घरच्यांची काळजी. पण खंबीर अश्विनीने सर्वांना धीर दिला. तशी ती होमसिक नव्हती. द्वितीय वर्षात असताना नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली. त्यांनी स्तुत्य उपक्रम घडवून
Join us @mpscdecoded
एसजीजीएस आयकॉन....
रोल मॉडेल पोलीस उपअधीक्षक: अश्विनी शेंडगे
-- प्रा. डॉ. रवींद्र जोशी
"दररोज नवीन नवीन आव्हाने येत असतात, आपल्याला तत्पर राहणे गरजेचे असते. दिवस-रात्र, शनिवार-रविवार, सणवार, कुठल्याही क्षणी कॉल येतो. इथे घटना घडली, तातडीने या. आहे त्या मनुष्यबळासोबत घटनास्थळी त्वरित पोहोचावे लागते. तत्परतेने परिणामकारक निर्णय जागेवर घ्यावा लागतो आणि स्थिती नियंत्रणात ठेवावी लागते. लेडीज ऑफिसर जेव्हा चौकात उभी असते तेव्हा समाज विशेषतः मुली एक आत्मनिर्भर, रोल मॉडेल म्हणून आपल्याकडे पाहात असतात आणि तशी कामगिरी करावी लागते.' पोलीस उप अधीक्षक अश्विनी शेंडगे या शंकरराव चव्हाण सभागृहाच्या मंचावरून तरुणाईला संबोधीत करत होत्या. टाळ्यांचा कडकडाट झाला, तरुणांची दंड फुलली, मुली स्वयंनिर्भरतेने भुवया उंचावत होत्या. ज्या मंचासमोर त्यांनी २०-२५ प्रशासकीय सेवेतील यशस्वी अधिकाऱ्यांची भाषणे ऐकली होती, आज त्याच मंचावर त्या वक्ता होत्या. अशा आत्मनिर्भर, रोल मॉडेल, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे एसजीजीएस नांदेडच्या इलेक्ट्रॉनिक्स विभागाच्या २०१४ सालच्या विद्यार्थिनी आहेत.
अश्विनी मूळची सांगली जिल्ह्यातील झरे या गावची. ज्या गावात वर्षातले सात महिने टॅंकरने पाणीपुरवठा होतो, मुलं-मुली, बायका पाण्यासाठी रांगेत थांबायची, त्या गावची ती. वडील रामचंद्र शेंडगे व्यवसायाने शिक्षक, तीन मुली, एक मुलगा एकूण चार अपत्य, त्यापैकी अश्विनी एक. ती लहानपणापासून सर्वगुणसंपन्न अशी गुणी मुलगी होती. शाळेत सरांनी दिलेली आव्हाने, ती पुढाकार घेऊन स्वीकारायची. पाचवीत असताना ९५% गुण घेऊन शाळेत पहिली आली. तेव्हा प्राचार्यांनी अभिनंदन करून सांगितलं, एकदा टॉप राहणं सोपं असतं पण सातत्य ठेवणं हे कठीण. हे शब्द कोमल मनावर कोरले गेले आणि ती सतत दहावीपर्यंत शाळेत टॉप असायची. वडील गणिताचे शिक्षक, 'पोरगी काय दहावीला गणितात दिवे लावणार? त्यात ती आजारी आहे,' असा शिक्षकांनी टोमणा मारला. वडिलांना मान खाली घालण्याची वेळ येऊ द्यायची नाही. तिने आव्हान स्विकारले, जिद्दीने पेटली आणि गणितात १५०/१५० गुण मिळविले.
अभ्यासापेक्षा खेळात जास्त आवड. ती मुलांसोबत जास्तीत जास्त खेळ खेळायची. क्रिकेट हा सर्वात आवडीचा खेळ. तसेच वक्तृत्व स्पर्धेत जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतला, बक्षीसेसुद्धा पटकावली. नृत्यकलेत तर ती निपुण होती. आठवीत असताना राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक आला. सर्वांगिण व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असताना, प्रशासकीय सेवेत जायचं, याचं बीज शालेय जीवनातच तिच्या मनात रोवल्या गेलं. सांगलीच्या कलेक्टर मनीषा मेह्स्कर मॅडमला ऐकलं होतं, वर्तमानपत्रात वाचलं होतं. त्यांच्या प्रभावशाली कर्तृत्वान प्रशासनाने ती प्रभावित झाली. पूर्व सांगली जिल्हात जेव्हा पाण्याचे दुर्भिक्ष होते तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंधारणाचे परिणामकारक उपयुक्त प्रकल्प घडवून आणले. स्त्रियांसमोरचा पाणी टंचाईचा गंभीर प्रश्न सोडवला. तेव्हा गावातील स्त्रिया त्यांच्याबद्दल चर्चा करायच्या, त्या म्हणायच्या, 'ती कलेक्टर बाई लई गुणी पोरगी आहे.' यामुळेच अश्विनीची मनीषा मॅडम रोल मॉडेल झाली. आपण असंच अधिकारी व्हावं जेणेकरून आपल्याला समाजासाठी अधिकारपूर्वक कार्य करता येईल, अशी तिने शालेय जीवनात ध्येयनिश्चिती केली.
अश्विनी तर प्रतिबिंब होतं तिच्या आजीच. तिची आजी ९२ वर्षांची आहे, तरिही आज त्या दोन किलोमीटर स्वतः शेतात पायी जातात, कामे स्वतः पाहतात, सुईत दोरा सुद्धा स्वतः टाकतात, अशा खंबीर आजीचा तिला पाठिंबा. तिसरी मुलगी म्हणून कुटुंबाचा, समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा. त्याकाळात सांगली जिल्ह्यात भ्रूणहत्येचे प्रमाण जास्त होतं, सर्वांना मुले पाहिजे होती. पण अश्विनीची आई तर आजीला एकुलती एक मुल.. आजी अशिक्षित असली तरीही ती मुलीचे महत्त्व ओळखून होती. अश्विनीला नवोदयला पाठवणार होते परंतु आजी खंबीर, 'लेकरू गुणी आहे, इथेच शिकणार,' आणि अश्विनी आजीच्या विश्वासास पात्र ठरून दहावीत पहिली आली आणि तिने बारावी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथून केले.
२०१० साली एसजीजीएसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. घरापासून ५०० किलोमीटर अंतरावर दूर मुलगी कशी राहणार, घरच्यांची काळजी. पण खंबीर अश्विनीने सर्वांना धीर दिला. तशी ती होमसिक नव्हती. द्वितीय वर्षात असताना नांदेडचे जिल्हाधिकारी श्रीकर परदेशी यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख झाली. त्यांनी स्तुत्य उपक्रम घडवून
❤1
आणला. विद्यार्थ्यांना यूपीएससीसाठी स्वतःच्या चेंबरमध्ये मार्गदर्शन करायचे. नंतर जागा कमी पडत होती, त्या उपक्रमाने वटवृक्षाचा आकार घेतला. मार्गदर्शनासाठी शेकडोच्या संख्येने मुलं-मुली यायची. शंकरराव चव्हाण सभागृह नांदेड येथे प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व्हायची आणि अश्विनी पहिल्या रांगेत बसून सर्वांची भाषणे ऐकायची. एमपीएससी, यूपीएससी द्यायची, आता इरादा पक्का झाला होता. एसजीजीएसमध्ये सुद्धा यूपीएससी चॅप्टर होता. आठ-दहा जणांचा ग्रुप केला, इंजिनिअरिंगचा अभ्यास झाल्यानंतर ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचे. अश्विनीने इंजिनिअरिंगच्या अभ्यासाला प्राधान्य दिले. तिला माहित होते, इथे आपण अव्वल राहिलो तरच आपण पुढे आयुष्यात यशस्वी होणार.
कॉलेजमध्ये असताना सुद्धा सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा हिरीरीने भाग असायचा. ती राष्ट्रीय सेवा योजनेची कॉर्डिनेटर व महिला प्रतिनिधी होती. कॉलेजच्या वार्षिक अंक 'दृष्टीत' सुद्धा सक्रिय सहभाग असायचा. तिला वाटायचे यामुळे आपला दृष्टिकोन सकारात्मक होणार. जलदिंडी कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग. गोदा नदीच्या तीरावरील गावांना भेटी, रात्री मुक्काम, ग्रामीण जीवनदर्शन, गावात भजन-कीर्तन, भारूडाच्या रूपाने जनजागृतीसाठी अनेक उपक्रम केले. तिला या सर्व गोष्टींचा एमपीएससीच्या मुलाखतीत खूप फायदा झाला कारण प्रात्यक्षिक अनुभवाने तिचा पाया मजबूत झाला होता. इंजिनीअरिंगच्या कंपन्याची मुलाखत दिलीच नाही कारण तिचं ठरलेलं होतं, प्रशासकीय सेवा. या ध्येयाने प्रेरित होऊन २०१४ साली चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन इंजिनिअरिंग मधून बाहेर पडली.
सोशल मीडियाचा भरपूर उपयोग केला, माहिती घेतली. पुण्यातील स्वरूपवर्धिनी सेवाभावी संस्थेचा शोध घेतला. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली. ही संस्था एक वर्ष लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ग्रंथालय व गेस्ट लेक्चर मोफत देत असते. अश्विनीने वडिलांना आपला निर्णय कळविला. एक वर्ष वेळ द्या, अभ्यासाचा प्रवाह जो आहे तो कायम राहील, यात यश नाही मिळाल्यास परत इंजिनिअरिंगच्या क्षेत्राकडे वळेल. वडिलांनी आधार दिला, खंबीर आजीचा आशीर्वाद घेतला. तिने पुण्यातल्या स्वरूपवर्धिनीच्या ग्रंथालयात बसून १२-१४ तास दररोज स्वतः अभ्यास केला कारण इंजिनीअरिंगमध्ये उत्तम गुण मिळवल्यामुळे स्वतःवर विश्वास होता, आपण करू शकतो. मोबाईल, सोशल मीडिया, नातेवाईक, मौजमजा, खेळ, मित्र सगळ्यांपासून दूर, एकच ध्येय एमपीएससी. ती जिद्दीने पेटली, २०१५ साली फॉर्म भरला. तांत्रिक अडचणी आल्या, परीक्षा देऊ शकली नाही. ती खचली नाही, अजून जोमाने अभ्यास केला. २०१६ साली ती पहिल्याच प्रयत्नात प्री, मेन्स, इंटरव्यू यशस्वी होऊन २०१७ साली पोलीस उपधीक्षाक (Dy.SP/ACP) या पदावर निवड झाली. आजीला फोन केला, आजी आनंदाने गहिवरली, 'गुणी पोरगी, मला माहित होतं तू जिंकणार.' ज्या समाजाला, कुटुंबाला मुली जड वाटतात, नको असतात, गुरुजींच्या मुली डॉक्टर, शिक्षिका व अश्विनी प्रशासकीय सेवेतील उच्च अधिकारी झाली. गावात सत्कार, मानसन्मान, 'पोरीने बापाचं नाव मोठं केलं', तीच लोक म्हणायला लागली.
ध्येयवादी लोकांच कार्य सुद्धा सिद्धीस जाते. अश्विनीला प्रशिक्षणानंतर परीविक्षाधिन कालावधीत नांदेडला पोस्टींग मिळाली. ज्या महाविद्यालयात ती शिकली, घडली, मौजमजा केली, जिथे प्रेरणादायी व्यक्तींचं कर्तृत्व पाहिलं, ऐकलं; त्याच ऑडिटोरियमच्या मंचावरती विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी ती वक्ता म्हणून आली होती. अभिमानाने ती गहिवरली. आनंदाश्रू तिच्या गालावर नकळत आले, तिने लपविण्याचा प्रयत्न केला. पण खंबीर, आत्मनिर्भर अश्विनी विद्यार्थ्यांना खड्या आवाजात मार्गदर्शन करत होती. विद्यार्थी, प्राध्यापक आपल्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांनीचे यश पाहून टाळ्यांनी प्रतिसाद देत होती. डॉ. यशवंत जोशी, डॉ. एल. एम. वाघमारे आणि डॉ. अरुण पाटील यांचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले, अशी तिने कृतज्ञता व्यक्त केली.
तरूणाईला पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे संबोधित करत होत्या, 'आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा, स्वतः निर्णय घ्या. आपल्या व्यक्तिमत्त्वाला काय जमतंय ते पहा. प्रेरणास्थान, रोल मॉडेल ठरवा. त्यांच्यावर विश्वास ठेवा, अनुकरण करा, स्वप्न पहा. ध्येय निश्चिती करा, मग मात्र थांबू नका. अडचणी, संकटं येणारचं थांबू नका, ढळू नका, मार्ग आपोआपच निघतो. जिद्दीने पेटा कारण तो तुमचा स्वप्नांचा पाठलाग करतानाचा उच्च काल असतो. यश तुमच्या पाठीशीच असते, फक्त तुम्ही किती खंबीर आहात हे तपासत असते. सोनेरी पहाट प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असते. पण तुमच्या स्वप्नांची पहाट उजाडल्यानंतर स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा आणि त्या यशाच्या सोनेरी किरणांच्या पहाटेचा आनंद घ्या.' टाळ्यांच्या कडकडाट चालूच होता. असा वातावरणात भाव पसरला होता....
"जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
शिखरे यशाची सर तुम्ह
कॉलेजमध्ये असताना सुद्धा सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात तिचा हिरीरीने भाग असायचा. ती राष्ट्रीय सेवा योजनेची कॉर्डिनेटर व महिला प्रतिनिधी होती. कॉलेजच्या वार्षिक अंक 'दृष्टीत' सुद्धा सक्रिय सहभाग असायचा. तिला वाटायचे यामुळे आपला दृष्टिकोन सकारात्मक होणार. जलदिंडी कार्यक्रमात उस्फूर्तपणे सहभाग. गोदा नदीच्या तीरावरील गावांना भेटी, रात्री मुक्काम, ग्रामीण जीवनदर्शन, गावात भजन-कीर्तन, भारूडाच्या रूपाने जनजागृतीसाठी अनेक उपक्रम केले. तिला या सर्व गोष्टींचा एमपीएससीच्या मुलाखतीत खूप फायदा झाला कारण प्रात्यक्षिक अनुभवाने तिचा पाया मजबूत झाला होता. इंजिनीअरिंगच्या कंपन्याची मुलाखत दिलीच नाही कारण तिचं ठरलेलं होतं, प्रशासकीय सेवा. या ध्येयाने प्रेरित होऊन २०१४ साली चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन इंजिनिअरिंग मधून बाहेर पडली.
सोशल मीडियाचा भरपूर उपयोग केला, माहिती घेतली. पुण्यातील स्वरूपवर्धिनी सेवाभावी संस्थेचा शोध घेतला. प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाली. ही संस्था एक वर्ष लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ग्रंथालय व गेस्ट लेक्चर मोफत देत असते. अश्विनीने वडिलांना आपला निर्णय कळविला. एक वर्ष वेळ द्या, अभ्यासाचा प्रवाह जो आहे तो कायम राहील, यात यश नाही मिळाल्यास परत इंजिनिअरिंगच्या क्षेत्राकडे वळेल. वडिलांनी आधार दिला, खंबीर आजीचा आशीर्वाद घेतला. तिने पुण्यातल्या स्वरूपवर्धिनीच्या ग्रंथालयात बसून १२-१४ तास दररोज स्वतः अभ्यास केला कारण इंजिनीअरिंगमध्ये उत्तम गुण मिळवल्यामुळे स्वतःवर विश्वास होता, आपण करू शकतो. मोबाईल, सोशल मीडिया, नातेवाईक, मौजमजा, खेळ, मित्र सगळ्यांपासून दूर, एकच ध्येय एमपीएससी. ती जिद्दीने पेटली, २०१५ साली फॉर्म भरला. तांत्रिक अडचणी आल्या, परीक्षा देऊ शकली नाही. ती खचली नाही, अजून जोमाने अभ्यास केला. २०१६ साली ती पहिल्याच प्रयत्नात प्री, मेन्स, इंटरव्यू यशस्वी होऊन २०१७ साली पोलीस उपधीक्षाक (Dy.SP/ACP) या पदावर निवड झाली. आजीला फोन केला, आजी आनंदाने गहिवरली, 'गुणी पोरगी, मला माहित होतं तू जिंकणार.' ज्या समाजाला, कुटुंबाला मुली जड वाटतात, नको असतात, गुरुजींच्या मुली डॉक्टर, शिक्षिका व अश्विनी प्रशासकीय सेवेतील उच्च अधिकारी झाली. गावात सत्कार, मानसन्मान, 'पोरीने बापाचं नाव मोठं केलं', तीच लोक म्हणायला लागली.
ध्येयवादी लोकांच कार्य सुद्धा सिद्धीस जाते. अश्विनीला प्रशिक्षणानंतर परीविक्षाधिन कालावधीत नांदेडला पोस्टींग मिळाली. ज्या महाविद्यालयात ती शिकली, घडली, मौजमजा केली, जिथे प्रेरणादायी व्यक्तींचं कर्तृत्व पाहिलं, ऐकलं; त्याच ऑडिटोरियमच्या मंचावरती विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी ती वक्ता म्हणून आली होती. अभिमानाने ती गहिवरली. आनंदाश्रू तिच्या गालावर नकळत आले, तिने लपविण्याचा प्रयत्न केला. पण खंबीर, आत्मनिर्भर अश्विनी विद्यार्थ्यांना खड्या आवाजात मार्गदर्शन करत होती. विद्यार्थी, प्राध्यापक आपल्या यशस्वी माजी विद्यार्थ्यांनीचे यश पाहून टाळ्यांनी प्रतिसाद देत होती. डॉ. यशवंत जोशी, डॉ. एल. एम. वाघमारे आणि डॉ. अरुण पाटील यांचे मार्गदर्शन, सहकार्य लाभले, अशी तिने कृतज्ञता व्यक्त केली.
तरूणाईला पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे संबोधित करत होत्या, 'आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा, स्वतः निर्णय घ्या. आपल्या व्यक्तिमत्त्वाला काय जमतंय ते पहा. प्रेरणास्थान, रोल मॉडेल ठरवा. त्यांच्यावर विश्वास ठेवा, अनुकरण करा, स्वप्न पहा. ध्येय निश्चिती करा, मग मात्र थांबू नका. अडचणी, संकटं येणारचं थांबू नका, ढळू नका, मार्ग आपोआपच निघतो. जिद्दीने पेटा कारण तो तुमचा स्वप्नांचा पाठलाग करतानाचा उच्च काल असतो. यश तुमच्या पाठीशीच असते, फक्त तुम्ही किती खंबीर आहात हे तपासत असते. सोनेरी पहाट प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असते. पण तुमच्या स्वप्नांची पहाट उजाडल्यानंतर स्वतःच्या निर्णयावर ठाम राहा आणि त्या यशाच्या सोनेरी किरणांच्या पहाटेचा आनंद घ्या.' टाळ्यांच्या कडकडाट चालूच होता. असा वातावरणात भाव पसरला होता....
"जे जे हवे तुम्हाला ते ते मिळू दे,
शिखरे यशाची सर तुम्ह
ी करावी,
पाहता वळूनि मागे यश तुमच्या पाठीशी असू दे,
तुमच्या यशाचा झेंडा यशोशिखरावरती फडफडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे,
भाग्यवान या शब्दांची प्रेरणा तरुणाईला आपणापासून मिळू दे"...
परिविक्षाधीन कालावधीनंतर त्यांना पहिली पोस्टिंग नक्षल प्रभावित क्षेत्रात भंडारा जिल्ह्यात मिळाली. स्त्री-पुरुष असा काही भेदभाव नसतो. रात्री-बेरात्री घटना घडली की तातडीने घटनास्थळी पोहोचावे लागते आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी लागते. समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिस प्रशासनावर असते. याच समाजातील १६-१८ वर्ष या वयोगटातील मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. समाज म्हणतो, फूस लावली. परंतु या वयात मुली शारीरिक आकर्षण, मॉडेलिंग, मॉडर्न जमाना, ग्लॅमर याकडे आकर्षित होतात आणि करिअर घडायच्या वेळेस चुकीच्या मार्गावर जातात. त्यात स्वतःचे, कुटुंबाचे न भरून येणारे नुकसान होत असते. यासाठी अश्विनीने सामाजिक चळवळीतून युवा संवाद साधला. भरकटलेल्या तरुणाईला समुपदेशन करत असतात. पालकांनाही मुला-मुलीला समजून घ्यायला सांगतात. 'गाडीचा अपघात झाला तर आपण फेकून देत नाही, त्याचे इन्शुरन्स काढतो, सर्व्हिसिंग करतो. मग या जीवित गाड्यांचा अपघात झाला तर त्यांना दुरुस्ती करा,' असे आवाहन करत असतात.
स्वतः अभियंता असल्यामुळे पोलिस प्रशासनात त्यांना खूप उपयोग होत आहे. आजकाल चोरी, दरोडा, हाणामारी याचे प्रमाण तर आहेच. पण सायबर क्राईमचे प्रमाण ही दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडियाचे कोणी अकाउंट हॅक केल्यास इंजिनीयर या नात्याने त्या आयपी ऍड्रेस लवकरच शोधतात. इतर गोष्टींना सुद्धा तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. कर्मचाऱ्यांना सुद्धा संगणक, ॲप विषयी त्या प्रशिक्षण देत असतात. वेळोवेळी येणाऱ्या प्रसंगामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव येतो. त्यासाठी त्या वेळात वेळ काढून व्यायाम आणि ध्यान करत असतात. त्यांना सांभाळून घेणाऱ्या जोडीदाराचा आई-वडिल शोध घेत आहेत. अश्विनीला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
यासाठी हार्दिक शुभेच्छा…
Join us @mpscdecoded
पाहता वळूनि मागे यश तुमच्या पाठीशी असू दे,
तुमच्या यशाचा झेंडा यशोशिखरावरती फडफडू दे,
आयुष्यात तुमच्या सर्व काही मनासारखे घडू दे,
भाग्यवान या शब्दांची प्रेरणा तरुणाईला आपणापासून मिळू दे"...
परिविक्षाधीन कालावधीनंतर त्यांना पहिली पोस्टिंग नक्षल प्रभावित क्षेत्रात भंडारा जिल्ह्यात मिळाली. स्त्री-पुरुष असा काही भेदभाव नसतो. रात्री-बेरात्री घटना घडली की तातडीने घटनास्थळी पोहोचावे लागते आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी लागते. समाजाच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिस प्रशासनावर असते. याच समाजातील १६-१८ वर्ष या वयोगटातील मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण जास्त आहे. समाज म्हणतो, फूस लावली. परंतु या वयात मुली शारीरिक आकर्षण, मॉडेलिंग, मॉडर्न जमाना, ग्लॅमर याकडे आकर्षित होतात आणि करिअर घडायच्या वेळेस चुकीच्या मार्गावर जातात. त्यात स्वतःचे, कुटुंबाचे न भरून येणारे नुकसान होत असते. यासाठी अश्विनीने सामाजिक चळवळीतून युवा संवाद साधला. भरकटलेल्या तरुणाईला समुपदेशन करत असतात. पालकांनाही मुला-मुलीला समजून घ्यायला सांगतात. 'गाडीचा अपघात झाला तर आपण फेकून देत नाही, त्याचे इन्शुरन्स काढतो, सर्व्हिसिंग करतो. मग या जीवित गाड्यांचा अपघात झाला तर त्यांना दुरुस्ती करा,' असे आवाहन करत असतात.
स्वतः अभियंता असल्यामुळे पोलिस प्रशासनात त्यांना खूप उपयोग होत आहे. आजकाल चोरी, दरोडा, हाणामारी याचे प्रमाण तर आहेच. पण सायबर क्राईमचे प्रमाण ही दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे व्हाट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल मीडियाचे कोणी अकाउंट हॅक केल्यास इंजिनीयर या नात्याने त्या आयपी ऍड्रेस लवकरच शोधतात. इतर गोष्टींना सुद्धा तंत्रज्ञानाचा उपयोग होतो. कर्मचाऱ्यांना सुद्धा संगणक, ॲप विषयी त्या प्रशिक्षण देत असतात. वेळोवेळी येणाऱ्या प्रसंगामुळे शारीरिक आणि मानसिक तणाव येतो. त्यासाठी त्या वेळात वेळ काढून व्यायाम आणि ध्यान करत असतात. त्यांना सांभाळून घेणाऱ्या जोडीदाराचा आई-वडिल शोध घेत आहेत. अश्विनीला शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
यासाठी हार्दिक शुभेच्छा…
Join us @mpscdecoded
*सुशांतसिंग च्या निमित्ताने..*
✍🏻 आदित्यराजे पवार..
गेल्या काही दिवसांत काही प्रसिद्ध सिनेअभिनेत्यांचं निधन झालं. जनसामान्यांची हळहळ व्यक्त केली आणि social media च्या माध्यमातून दुःख व्यक्त केल. अशावेळी काही विरुद्ध प्रतिक्रिया या अर्थाच्या होत्या की एखादा अभिनेता गेला म्हणून इतकं दुःख का? कि त्याचा जीव हा जास्त मौल्यवान आहे? तुलनेसाठी नुकत्याच शहिद झालेल्या जवानांचे तसेच आपली सेवा बजावताना प्राण गामावलेल्यांची उदाहरणे दिली गेली.
प्रत्येकाचे जीवन बहुमोल आहे आणि प्रत्येकाला एक quality life जागण्याचा अधिकार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा ती/तो आपल्याला परत कधी म्हणजे कधीच परत भेटणार नाही हि जाणीव दुःखाचे प्रमुख कारण ठरते . आता जर एखादी व्यक्ती आपल्या नात्यातील असेल, मैत्री वा प्रेमाचे संबंध असतील किंवा फक्त परिचित असेल तर त्यानुसार हि काहीतरी गमावल्याची भावना कमी अधिक तीव्र असेल.
सिनेमा हि अशी गोष्ट आहे की जिथं कलाकार एक असामान्य असं जग आपल्यासमोर उभं करत असतात. या सिनेमाच्या निमित्ताने जगातील कितीतरी वेगवेगळे प्रदेश आणि लोक आपल्याला बघायला मिळतात. मी जेव्हा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट बघतो तेव्हा त्या निवांत जीवन जगण्याच्या स्वप्नात हरवून जातो. जेव्हा 'थ्री एडिअट्स' हा चित्रपट बघितला तेव्हा बरेच विद्यार्थी स्वतःला रँचो आणि अभ्यासू मुलांना चतुर समजू लागले. जेव्हा चित्रपटात एखादी यशस्वी प्रेमकहाणी रंगवली जाते तेव्हा प्रेक्षकांतील कित्येक प्रेमवीराना समाधान मिळते. बऱ्याचदा चित्रपटाचा नायक हा अपप्रवृत्ती अथवा असमान अशा व्यवस्थे विरुद्ध लढणारा असतो आणि त्याचा लढा बरेच काही शिकवून जातो. त्या नायकाचे डायलॉग्स बऱ्याचदा काहीतरी सकारात्मक संदेश देऊन जातात, जगण्यास नवीन ऊर्जा देतात आणि विशेषतः तरुणांना व्यक्त होण्यासाठी आयतेच शब्द देऊन जातात.
चित्रपट बघतानाच्या त्या 2-3 तासात माणूस एक वेगळं जीवन जगत असतो. बऱ्याचदा तिथं नवीन स्वप्न जन्म घेतात तर कधी अपूर्ण स्वप्न त्या चित्रपटात का होईना पण कुणाच्यातरी माध्यमातून पूर्ण होताना दिसतात. चित्रपट हा कलेचा असा आविष्कार आहे की जो समजण्यासाठी फार काही बौद्धिक परिश्रम लागत नाहीत आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला हि त्याचा आनंद घेता येतो. आणि चित्रपटाची प्रेरणा सुद्धा समाजजीवनचं आहे. त्यामुळे अभिनयाची प्रतिभा लाभलेले कलाकार सामान्य माणसाला परिचित व जवळचे वाटू लागतात.
जेव्हा असा कलाकार आपल्यातून निघून जातो तेव्हा कुणीतरी जवळची व्यक्ती गेल्यासारखी वेदना होणे साहजिक आहे. या ठिकाणी कुणाला तो कलाकार सैनिकांच्या, पोलिसांच्या, खेळाडूच्या मित्राच्या वा प्रेमीच्या भूमिकेत आठवतो. त्या कलाकाराने आपल्या अभिनयातून ज्या वेगवेगळ्या प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण केल्या त्या दुरावल्याची भावना यावेळी तयार होते.
निर्गुण वा अमूर्त स्वरूपातील देव कल्पिने माणसाला शक्य होत नाही म्हणून मूर्तिपूजा. जेव्हा चित्रपटातून का होईना पण डोळ्यासमोर फिरतोय असा कलाकार मृत पावतो आणि त्याचवेळी समाजात महत्वपूर्ण योगदान असणारा पण अपरिचित कधीही न पाहिलेला व्यक्ती जातो तेव्हा इथं कुणाचा जीव जास्त महत्वाचा हा प्रश्नच अयोग्य. आणि सामान्य माणसाकडून प्रत्येक गोष्टीला फार वैचारिक बौद्धिक प्रतिसाद अपेक्षित करणे देखील चुकीचे. इथं वाटलं वाईट म्हणून ठेवलं असेल व्हाट्सप् ला स्टेटस. इतकंच. आणि प्रत्येकजण प्रत्येक जीवासाठी संवेदनशील असेल इतक्या जाणीवा जागृत होणं अशक्यच.
आता राहिला विषय आत्महत्येचा तर जीवनात फक्त काळोखच दिसतोय आणि प्रकाशाचा एकही किरण येण्याची अपेक्षाच नाही तेव्हा उचललेल हे एक टोकाचं पाऊल. मग या समाजात त्या व्यक्तीला सावरू शकेल अस कुणीही न भेटणं म्हणजे समाजाचाच पराभव. मग जर कुणी म्हणतय तसं हे पाप असेल तर ते सुद्धा समाजाचच. आता एक अभिनेता आत्महत्या करतोय आणि इतकी हळहळ मग शेतकरी आत्महत्येला काही किंमतच नाही का?
शेतकरी हा व्यवस्थेचा बळी आहे. शेतकरी आत्महत्या मानसिक कमी सामाजिक जास्त आहे. सुखवस्तू जीवनासाठी प्रयत्नशील असणाऱ्याला ते मिळवण्यात येणार अपयश हे सुद्धा बऱ्याचदा आत्महत्येचं कारण ठरत. सामान्य नजरेतून जे जीवनात हवं ते सर्वकाही असणारी व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा प्रश्न विचारला जातो की 'बाबा तुला काय कमी होत?'. जे मिळवण्यासाठी तुम्ही सर्व धडपडत आहात ते मिळाल्यावर सुद्धा मानसिक स्वास्थ्य नसेल तर ते सगळं कसं निरर्थक ठरत याच उदाहरण म्हणून या घटनेकडे बघितल गेलं. एका सर्वपरिचित व्यक्तीने आत्महत्या केली या कारणाने मानसिक आरोग्याकडे लक्ष वेधन्यासाठी यावर जास्त चर्चा झाली. या चर्चेतून सकारात्मक बदल घडावेत इतकीच अपेक्षा😊🙏🏻
- आदित्य पवार
Join us @mpscdecoded
✍🏻 आदित्यराजे पवार..
गेल्या काही दिवसांत काही प्रसिद्ध सिनेअभिनेत्यांचं निधन झालं. जनसामान्यांची हळहळ व्यक्त केली आणि social media च्या माध्यमातून दुःख व्यक्त केल. अशावेळी काही विरुद्ध प्रतिक्रिया या अर्थाच्या होत्या की एखादा अभिनेता गेला म्हणून इतकं दुःख का? कि त्याचा जीव हा जास्त मौल्यवान आहे? तुलनेसाठी नुकत्याच शहिद झालेल्या जवानांचे तसेच आपली सेवा बजावताना प्राण गामावलेल्यांची उदाहरणे दिली गेली.
प्रत्येकाचे जीवन बहुमोल आहे आणि प्रत्येकाला एक quality life जागण्याचा अधिकार आहे. जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा ती/तो आपल्याला परत कधी म्हणजे कधीच परत भेटणार नाही हि जाणीव दुःखाचे प्रमुख कारण ठरते . आता जर एखादी व्यक्ती आपल्या नात्यातील असेल, मैत्री वा प्रेमाचे संबंध असतील किंवा फक्त परिचित असेल तर त्यानुसार हि काहीतरी गमावल्याची भावना कमी अधिक तीव्र असेल.
सिनेमा हि अशी गोष्ट आहे की जिथं कलाकार एक असामान्य असं जग आपल्यासमोर उभं करत असतात. या सिनेमाच्या निमित्ताने जगातील कितीतरी वेगवेगळे प्रदेश आणि लोक आपल्याला बघायला मिळतात. मी जेव्हा 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट बघतो तेव्हा त्या निवांत जीवन जगण्याच्या स्वप्नात हरवून जातो. जेव्हा 'थ्री एडिअट्स' हा चित्रपट बघितला तेव्हा बरेच विद्यार्थी स्वतःला रँचो आणि अभ्यासू मुलांना चतुर समजू लागले. जेव्हा चित्रपटात एखादी यशस्वी प्रेमकहाणी रंगवली जाते तेव्हा प्रेक्षकांतील कित्येक प्रेमवीराना समाधान मिळते. बऱ्याचदा चित्रपटाचा नायक हा अपप्रवृत्ती अथवा असमान अशा व्यवस्थे विरुद्ध लढणारा असतो आणि त्याचा लढा बरेच काही शिकवून जातो. त्या नायकाचे डायलॉग्स बऱ्याचदा काहीतरी सकारात्मक संदेश देऊन जातात, जगण्यास नवीन ऊर्जा देतात आणि विशेषतः तरुणांना व्यक्त होण्यासाठी आयतेच शब्द देऊन जातात.
चित्रपट बघतानाच्या त्या 2-3 तासात माणूस एक वेगळं जीवन जगत असतो. बऱ्याचदा तिथं नवीन स्वप्न जन्म घेतात तर कधी अपूर्ण स्वप्न त्या चित्रपटात का होईना पण कुणाच्यातरी माध्यमातून पूर्ण होताना दिसतात. चित्रपट हा कलेचा असा आविष्कार आहे की जो समजण्यासाठी फार काही बौद्धिक परिश्रम लागत नाहीत आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला हि त्याचा आनंद घेता येतो. आणि चित्रपटाची प्रेरणा सुद्धा समाजजीवनचं आहे. त्यामुळे अभिनयाची प्रतिभा लाभलेले कलाकार सामान्य माणसाला परिचित व जवळचे वाटू लागतात.
जेव्हा असा कलाकार आपल्यातून निघून जातो तेव्हा कुणीतरी जवळची व्यक्ती गेल्यासारखी वेदना होणे साहजिक आहे. या ठिकाणी कुणाला तो कलाकार सैनिकांच्या, पोलिसांच्या, खेळाडूच्या मित्राच्या वा प्रेमीच्या भूमिकेत आठवतो. त्या कलाकाराने आपल्या अभिनयातून ज्या वेगवेगळ्या प्रतिमा लोकांच्या मनात निर्माण केल्या त्या दुरावल्याची भावना यावेळी तयार होते.
निर्गुण वा अमूर्त स्वरूपातील देव कल्पिने माणसाला शक्य होत नाही म्हणून मूर्तिपूजा. जेव्हा चित्रपटातून का होईना पण डोळ्यासमोर फिरतोय असा कलाकार मृत पावतो आणि त्याचवेळी समाजात महत्वपूर्ण योगदान असणारा पण अपरिचित कधीही न पाहिलेला व्यक्ती जातो तेव्हा इथं कुणाचा जीव जास्त महत्वाचा हा प्रश्नच अयोग्य. आणि सामान्य माणसाकडून प्रत्येक गोष्टीला फार वैचारिक बौद्धिक प्रतिसाद अपेक्षित करणे देखील चुकीचे. इथं वाटलं वाईट म्हणून ठेवलं असेल व्हाट्सप् ला स्टेटस. इतकंच. आणि प्रत्येकजण प्रत्येक जीवासाठी संवेदनशील असेल इतक्या जाणीवा जागृत होणं अशक्यच.
आता राहिला विषय आत्महत्येचा तर जीवनात फक्त काळोखच दिसतोय आणि प्रकाशाचा एकही किरण येण्याची अपेक्षाच नाही तेव्हा उचललेल हे एक टोकाचं पाऊल. मग या समाजात त्या व्यक्तीला सावरू शकेल अस कुणीही न भेटणं म्हणजे समाजाचाच पराभव. मग जर कुणी म्हणतय तसं हे पाप असेल तर ते सुद्धा समाजाचच. आता एक अभिनेता आत्महत्या करतोय आणि इतकी हळहळ मग शेतकरी आत्महत्येला काही किंमतच नाही का?
शेतकरी हा व्यवस्थेचा बळी आहे. शेतकरी आत्महत्या मानसिक कमी सामाजिक जास्त आहे. सुखवस्तू जीवनासाठी प्रयत्नशील असणाऱ्याला ते मिळवण्यात येणार अपयश हे सुद्धा बऱ्याचदा आत्महत्येचं कारण ठरत. सामान्य नजरेतून जे जीवनात हवं ते सर्वकाही असणारी व्यक्ती जेव्हा आत्महत्या करते तेव्हा प्रश्न विचारला जातो की 'बाबा तुला काय कमी होत?'. जे मिळवण्यासाठी तुम्ही सर्व धडपडत आहात ते मिळाल्यावर सुद्धा मानसिक स्वास्थ्य नसेल तर ते सगळं कसं निरर्थक ठरत याच उदाहरण म्हणून या घटनेकडे बघितल गेलं. एका सर्वपरिचित व्यक्तीने आत्महत्या केली या कारणाने मानसिक आरोग्याकडे लक्ष वेधन्यासाठी यावर जास्त चर्चा झाली. या चर्चेतून सकारात्मक बदल घडावेत इतकीच अपेक्षा😊🙏🏻
- आदित्य पवार
Join us @mpscdecoded
वरील pdf मध्ये राष्ट्रपती बद्दल सर्व नोट्स व त्या घटकावर आज पर्यंत विचारले गेलेले प्रश्न आहेत..Mpsc व combine prelim साठी उपयोगी ठरेल
कोणत्या महाराष्ट्रीय संतांची पदे शिखांच्या साहिबा या पवित्र ग्रंथात आहेत?
Anonymous Quiz
11%
संत रामदास
25%
संत एकनाथ
19%
संत तुकाराम
45%
संत नामदेव
👍11❤2
सीमेवर भारत आणि चीनमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया या वर्षाच्या अखेरीस पहिल्या टप्प्यातील S-400 अॅडव्हान्स्ड एअर डिफेन्स मिसाईल सिस्टम भारताला पुरवणार आहे.
Anonymous Quiz
88%
बरोबर
12%
चूक
'कायद्यासमोर समानता'(equality before law) हे तत्त्व खालीलपैकी कुणाला लागू होत नाही?
Anonymous Quiz
4%
उपराष्ट्रपती
6%
पंतप्रधान
14%
सरन्यायाधीश
76%
राष्ट्रपती
❤17
तुम्हाला GS मध्ये कोणता विषय सर्वात जास्त कठीण वाटतो?
Anonymous Poll
7%
Polity
22%
History
6%
Geography
43%
Science
21%
Economics
❤2
Forwarded from R. Jadhav
पृथ्वीच्या अंतरंगा बाबत काय खरे आहे ?
अ. खोलीनुसार दाब वाढत जातो ब. खोलीनुसार तापमान कमी होते .
क. खोलीनुसार खडकांची घनता वाढत जाते .
अ. खोलीनुसार दाब वाढत जातो ब. खोलीनुसार तापमान कमी होते .
क. खोलीनुसार खडकांची घनता वाढत जाते .
Anonymous Quiz
12%
फक्त अ बरोबर
11%
फक्त क बरोबर
16%
अ आणि ब बरोबर
61%
अ आणि क बरोबर
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
3, 24, 81,192, ________.
3, 24, 81,192, ________.
Anonymous Quiz
16%
348
33%
375
40%
384
12%
378
भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोण ओळखला जातो?
Anonymous Quiz
13%
Canning
7%
Lytton
54%
Mayo
26%
Ripon
Forwarded from R. Jadhav
भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 अंतर्गत 'राज्य 'या संकल्पनेत खालील पैकी कशाचा सामावेश होतो ?
(अ). भारताची संसद आणि शासन (ब) . घटक राज्याची विधिमंडळ व शासन (क). स्थानिक स्वराज्य संस्था
(अ). भारताची संसद आणि शासन (ब) . घटक राज्याची विधिमंडळ व शासन (क). स्थानिक स्वराज्य संस्था
Anonymous Quiz
84%
वरील सर्व
4%
फक्त अ
4%
अ आणि क
7%
अ आणि ब
❤1