कर्मयोग/Yltp
Contact:
Sandesh : 9892798799
Mayuresh : 9820557071
Sudarshan: 8652778011
@Sudarshanjaybhay
Contact:
Sandesh : 9892798799
Mayuresh : 9820557071
Sudarshan: 8652778011
@Sudarshanjaybhay
👍7
202212071736126019.pdf
158.5 KB
#GR
🔸तलाठी भरती 2022..
👉 3110 तलाठी + 518 मंडळ अधिकारी पदे मान्यता...
👉 जाहिरात डिसेंबर end किंवा जानेवारी महिन्यात अपेक्षित..
🔸तलाठी भरती 2022..
👉 3110 तलाठी + 518 मंडळ अधिकारी पदे मान्यता...
👉 जाहिरात डिसेंबर end किंवा जानेवारी महिन्यात अपेक्षित..
❤9👍2
मंडळ अधिकारी हे महसूल विभागातील पद आहे. प्रथम तहसिल कार्यालयाची पद रचना समजून घेवूया.
तहसिलदार, नायब तहसिलदार (हे विभाग निहाय असतात उदा. महसूल, पुरवठा), पेशकार, लिपीक, मंडळ अधिकारी, (एका मंडळ अधिकारीच्या क्षेत्रात ४ ते ५ तलाठी असु शकतात. मंडळाच्या भौगोलिक परिस्थिती नुसार तलाठी संख्या बदलु शकते) व शेवटी तलाठी.
आपण जेंव्हा एखादी शेत जमीन विकत घेता तेंव्हा मालकी हक्काच्या रकान्यात स्वतः ची नोंद घेण्यास अर्ज केल्या नंतर तलाठी खरेदीदाराची नोंद फेरफार वहीस घेतो. सदर नोंद मंजुर करायचे अधिकार मंडळ अधिकारी यांना असतात. तसेच आप-आपल्या क्षेत्रातील महसुल वसुली (शेतसारा, N.A. Tax), जात प्रमाणपत्र प्रकरणात पंचनामा, रेशनकार्ड प्रकरणात पंचनामा अशी विविध प्रकारचे महसुली काम करत असतात.
टिप : 👉तलाठी यांनी घेतलेला (म्हणजे मंडळ अधिकारींनी मंजूर केलेला) फेरफार रद्द करण्याचे अधिकार तहसीलदार यांना नसतात. सदर फेरफार फक्त उप विभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी (SDM) हे रद्द करू शकतात.
तहसिलदार, नायब तहसिलदार (हे विभाग निहाय असतात उदा. महसूल, पुरवठा), पेशकार, लिपीक, मंडळ अधिकारी, (एका मंडळ अधिकारीच्या क्षेत्रात ४ ते ५ तलाठी असु शकतात. मंडळाच्या भौगोलिक परिस्थिती नुसार तलाठी संख्या बदलु शकते) व शेवटी तलाठी.
आपण जेंव्हा एखादी शेत जमीन विकत घेता तेंव्हा मालकी हक्काच्या रकान्यात स्वतः ची नोंद घेण्यास अर्ज केल्या नंतर तलाठी खरेदीदाराची नोंद फेरफार वहीस घेतो. सदर नोंद मंजुर करायचे अधिकार मंडळ अधिकारी यांना असतात. तसेच आप-आपल्या क्षेत्रातील महसुल वसुली (शेतसारा, N.A. Tax), जात प्रमाणपत्र प्रकरणात पंचनामा, रेशनकार्ड प्रकरणात पंचनामा अशी विविध प्रकारचे महसुली काम करत असतात.
टिप : 👉तलाठी यांनी घेतलेला (म्हणजे मंडळ अधिकारींनी मंजूर केलेला) फेरफार रद्द करण्याचे अधिकार तहसीलदार यांना नसतात. सदर फेरफार फक्त उप विभागीय अधिकारी तथा उप विभागीय दंडाधिकारी (SDM) हे रद्द करू शकतात.
👍21
कर्मयोग/Yltp
Contact:
Sandesh : 9892798799
Mayuresh : 9820557071
Sudarshan: 8652778011
@Sudarshanjaybhay
Contact:
Sandesh : 9892798799
Mayuresh : 9820557071
Sudarshan: 8652778011
@Sudarshanjaybhay
👍5
१. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली होती तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली होती.
२. पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना आंबेडकर यांनी केली आणि या संस्थेमार्फत मुंबईमध्ये सिद्धार्थ कॉलेज सुरू केले आणि औरंगाबाद मध्ये मिलिंद कॉलेज सुरू केले.
३. महाड येथे मनुस्मृतीचे ग्रंथाचे दहन केले त्यावेळी अनंतराव चित्रे, गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे आणि नाना टिपणीस इत्यादी लोकांचा सहभाग होता.
४. राजकीय हक्क देण्यासाठी ब्रिटिश सरकारने लॉर्ड साऊथबरो च्या अध्यक्षतेखाली मतदान कमिटी भारतात १९१९ मध्ये पाठवली,अस्पृश्यांच्या राजकीय हक्काची मागणी करण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे व डॉक्टर आंबेडकर यांची सरकारने यावेळी निवड केली होती.
५. 25 सप्टेंबर 1932 रोजी पुणे येथे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये करार झाला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो. हा करार येरवडा कारागृहात झाला होता आणि पुणे करारानुसार अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ ऐवजी संयुक्त मतदारसंघ व 18 टक्के राखीव जागा ठेवण्याचा निर्णय झाला.#Factshots
👍1
१. प्राचीन भारतातील व्यापार या विषयात प्रबंध लिहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी MA ही पदवी प्राप्त केली.
२. भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा : एक ऐतिहासिक पृथक्करनात्मक परिशीलन या प्रबंधाबद्दल कोलंबिया विद्यापीठाने त्यांना पीएचडी पदवी बहाल केली.
३. रुपयाचा प्रश्न या विषयावर लंडन विद्यापीठाने Dsc ही अर्थशास्त्रातील पदवी त्यांना प्रदान केली.
४. १९२० रोजी कागल जहागिरीतील माणगाव येथे आप्पासाहेब पाटील यांच्या मदतीने परिषद भरवली होती त्यांचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर होते.
५. १९२४ रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन झाली त्या सभेच्या कार्यकारी मंडळाचे डॉक्टर आंबेडकर अध्यक्ष व सेक्रेटरी सिताराम शिवतरकर होते आणि सभेचे ब्रीदवाक्य शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे होते.#Factshots
👍4
१. महात्मा गांधी आफ्रिकेमध्ये दादा अब्दुल्ला या व्यक्तीचा खटला लढण्यासाठी गेले होते.
२. राजकुमार शुक्ला या व्यक्तीने महात्मा गांधी यांना चंपारण मध्ये यावे यासाठी बोलावले होते.
३. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या बेळगाव या एकमेव अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते (साल १९२४)
४. गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु होते.
५. यंग इंडिया आणि हरिजन ही वृत्तपत्रे महात्मा गांधी यांनी सुरू केली होती.#Factshots
👍3
1.आत्मनिष्ठ युवती समाजाची स्थापना नाशिक मध्ये सौभाग्यवती येसू बाबाराव सावरकर यांनी केली होती.
2.वासुदेव बळवंत फडके यांच्या मृत्यूनंतर अमृत बाजार पत्रिकेने त्यांच्या बलिदानाचे वर्णन देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारख्या उत्तुंग महापुरुष अशा शब्दात केले होते.
3. सविनय कायदेभंगाच्या वेळी महाराष्ट्रात सोलापूरात लष्करी कायदा लागू झाला होता.
4.डॉक्टर सिद्धनाथ काणे हे यवतमाळ या भागातून क्रांतीकारकांच्या कारवाया करत होते
5. अकोला महाराष्ट्र येथे दहीहंडा सत्याग्रह झाला होता, दहीहंडा गावांमध्ये खाऱ्या पाण्याच्या विहिरी होत्या म्हणून तेथे मीठ तयार करून कायदे भंग करण्यात आला सविनय कायदेभंगाच्या दरम्यानची ही एक महत्त्वपूर्ण घटना महाराष्ट्रात घडली होती.
#Factshots History
👍2
1. 12मे 1875 सुपे पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता.
2. या उठावाची चौकशी करण्यासाठी ब्रिटिशांनी डेक्कन रॉयल हे कमिशन नेमले होते.
3. या कमिशनने शेतकऱ्यांचा अदूरदर्शीपणा हा शेतकऱ्यांच्या असंतोषाचे कारण होते असे नमूद केले .
4. शेतकऱ्यांनी शोषित वर्गासाठी बंड केले असे रणजित गुहा यांचे या उठावा विषयीचे मत आहे.
5. प्रत्यक्षात या उठावाचा प्रसार पुण्याच्या शिरूर तालुक्यातील कर्धे गावापासून झाला होता येथील लोकांनी सारा भरण्यास नकार दिला पण खरा उठाव हा प्रथम सुपे (पुणे जिल्हा) येथेच झाला होता.#Factshots History
👍5
1. एलिफिस्टनने साताऱ्याचा पोलिटिकल एजंट म्हणून ग्रँड डफ या व्यक्तीची नेमणूक केली होती.
2. ब्रिटिश व्यापारी केंद्राची सुरुवात सुरत या भागातून झाली होती.
3. 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर लॉर्ड मेओ यांचा खून केला होता तो एक ब्रिटिश व्हाइसरॉय होता.
4. आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार लॉर्ड रिपन ने सुरू केले.
5. भारतामध्ये दत्तक वारस नामंजूर हे धोरण लॉर्ड डलहौसीने स्वीकारले.
6. लॉर्ड विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरल ने इनाम कमिशन 1818 नेमले.
7. ब्रिटिश सत्तेदरम्यान जिल्हाअधिकाऱ्या कडील न्यायिक शक्ती लॉर्ड कॉर्नवालीस यांनी काढून घेतली होती.
8. भारतीय शस्त्र कायदा लॉर्ड लिटन यांच्या काळात आला होता
9. प्रथम फॅक्टरी कायदा लॉर्ड रिपन यांच्या काळात आला होता
10. भारतीय विद्यापीठ कायदा लॉर्ड कर्झन यांच्या काळात आला होता.
#Factshots History👍4