मराठी व्याकरण
222K subscribers
8.5K photos
36 videos
336 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
🔹शब्दसमूहाबद्दल एक शब्द :-

१) जे विसरता येणार नाही असे - अविस्मरणीय
२) परमेश्वराचे अस्तित्व मानणारा - आस्तिक
३) जाणून घेण्याची इच्छा असलेला - जिज्ञासू
४) सतत उद्योग करणारा - दीर्घोद्योगी
५) दुसऱ्याच्या जिवावर जगणारे - परोपजीवी
६) गावाचा कारभार - गावगाडा
७) वाजवीपेक्षा जास्त खर्च करणारा - उधळ्या
८) तीन रस्ते मिळतात ती जागा - तिठा
९) मोफत पाणी मिळण्याची व्यवस्था - पाणपोई
१०) घोड्यांना बांधण्याची जागा - पागा
1
🔹समान अर्थाचे शब्द

२) समान अर्थाचे शब्द :- समानार्थी शब्द म्हणजे एका शब्दाशी समसमान अर्थव्याप्ती आणि वापराची व्याप्ती असलेला, त्याच भाषेतला दुसरा शब्द किंवा शब्दसमूह.

१) आनंद = हर्ष, मोद, संतोष
२) दिवस = वार, वासर, अहन
३) वारा = अनिल, पवन, वायू, समीरण
४) सोने = कनक, सुवर्ण, हेम, कांचन
५) मुलगा = पुत्र, सुत, नंदन, तनुज
६) पान = पर्ण, पत्र, पल्लव
७) नदी = सरीता, तटिनी, तरंगिणी
८) अनल = विस्तव, पावक, अग्नी, वन्ही
९) तोंड = आनन , मुख, वदन
१०) दैत्य = दानव, राक्षस, असुर
🔹विरुद्धार्थी शब्द

३) विरुद्धार्थी शब्द :-

१) इहलोक x परलोक
२) तेजी x मंदी
३) पुरोगामी x प्रतिगामी
४) श्रेष्ठ x कनिष्ठ
५) स्वच्छ x घाणेरडा
६) सुटका x अटक
७) सुभाषित x कुभाषित
८) हिरमुसलेला x उत्साही
९) स्वार्थ x परमार्थ
१०) विलंब x त्वरा
🔹शब्द एक - अर्थ अनेक

४) शब्द एक - अर्थ अनेक :-

१) पक्ष - पंख, बाजू, भाग, श्राद्ध
२) पूर - नगर, शहर, पाण्याचा पूर
३) वर - पती, आशीर्वाद
४) नाद - आवाज, छंद, आवड
५) वजन - माप, वचक, प्रतिष्ठा
६) खूण - चिन्ह, सूचना, इशारा, संकेत
७) काळ - वेळ, मृत्यू
८) मान - आदर, स्वाभिमान, शरीराचा एक अवयव
९) तीर - नदीचा काठ, बाण
१०) दल - सैन्याची तुकडी, फुलाची पाकळी
🔹समूहवाचक शब्द

५) समूहवाचक शब्द :-

१) खेळाडूंचा - संघ
२) भाकऱ्यांची - चवड
३) तारकांचा - पुंज
४) फळांचा - घोस
५) पक्ष्यांचा - थवा
६) प्राण्यांचा - जथा
७) मुलांचा, मुलींचा - घोकळा
८) हत्तींचा - कळप
९) दुर्वांची - जुडी
१०) किल्ल्यांचा - जुडगा
🔹आलंकारिक शब्दयोजना

६) आलंकारिक शब्दयोजना :-

१) अतिशय बुद्धिमान व्यक्ती - ब्रह्मदेव
२) अप्राप्य गोष्ट - मृगजळ
३) अत्यंत रागीट माणूस - जमदग्नी
४) अत्यंत कुरूप स्त्री - कुब्जा
५) वेडेवाकडे बोलणे - मुक्ताफळे
६) तात्पुरती विरक्ती - स्मशानवैराग्य
७) कलहप्रिय स्त्री - कैकेयी
८) एकत्र येऊन कारस्थान करणारे लोक - चांडाळचौकडी
९) नेहमी सत्य बोलणारा धर्मनिष्ठ माणूस - धर्मराज
१०) गुणकारी उपाय - रामबाण
🔥1
राज्यसेवा / PSI / STI / ASO / कर सहायक / मंत्रालयीन क्लर्क आणि तत्सम स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त.

जॉईन करा आमचे चॅनेल @Marathi
★|| मराठी व्याकरण ||★

🍀📝 शब्दशोध 📝🍀


खालील शब्दांचे किंवा शब्दसमूहाचे अर्थ सांगा.उत्तर केवळ चार अक्षरी शब्द हवा व प्रत्येक शब्दात शेवटचे दोन अक्षरे
🔹दा र 🔹 असली पाहिजेत.
😊😊 चला प्रयत्न करू या


१) घोडा सांभाळणारा -मोतदार
२) वेत्रधारी- चोपदार
३) ऑफिसर- कामदार
४) रूचकर - चवदार
५) सुंदर - छबीदार
६) चांगल्या घाटाचा -डौलदार
७) उतरती - ढाळदार
८) मोतद्दार -खासदार
९) सोयरा - नातेदार
१०) शोभिवंत - टुमदार
११) तेजस्वी - पाणीदार
१२) छत्रधर -माहीदार
१३) गच्च भरलेले - भरदार
१४) प्रांतावरचा मुख्य अधिकारी - सुभेदार
१५) अधिन -ताबेदार
___________________________
आमचे मराठी व्याकरण चॅनेल जॉईन होण्यासाठी येथे क्लीक करा telegram.me/Marathi
1👍1
🔹संधी व त्याचे प्रकार

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात.

उदा.

विधालय : धा : द + य + आ

पश्चिम : श्चि : श + च + इ

आम्ही : म्ही : म + ह + ई

शत्रू : त्रू : त + र + ऊ

संधी:

स्वरसंधी -

जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्‍या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात.



उदा.

ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा

सूर्यास्त = सूर्य + अस्त

सज्जन = सत् + जन

चिदानंद = चित् + आनंद

संधीचे प्रकार:

संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.



स्वर संधी -

एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात.



दिर्घत्व संधी -

अ + अ = आ

आ + आ = आ

आ + अ = आ

इ + ई = ई

ई + ई = ई

इ + इ = ई

उ + ऊ = ऊ

उ + उ = ऊ

नियम -

(1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो.

उदा.

ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा

गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश

उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश

चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय

महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी

देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी

(2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो.

उदा.

एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य

सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव

मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य

प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य

जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ

गंगा+औघ (आ+औ=औ) गंगा+औ+घ= गंगौघ

(3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते.

उदा.

प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ

इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी

अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम

प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक

मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर

पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा

(4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो.

उदा.

ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन

गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन

गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर

नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक

व्यंजन संधी :

एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात.

उदा.

सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी)

चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी)

नियम -

(1) पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात.
उदा.
विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल

वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती

क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा

(2) पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला *'तृतीय व्यंजन संधी'* असे म्हणतात.
1👍1
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
पुण्यामधील सेमिनार, क्लास, टेस्ट सिरीज, मुलाखत, पुस्तक प्रदर्शन , अभ्यासिका, इत्यादी MPSC संबंधीत माहिती पोस्ट केली जाईल.

जॉईन करा @MPSCPune

फक्त पुणे मधील मुलांनी जॉईन करावे.
समानार्थी शब्द

जॉईन करा @Marathi
समानार्थी शब्द

जॉईन करा @Marathi
समानार्थी शब्द

जॉईन करा @Marathi
समानार्थी शब्द

जॉईन करा @Marathi
समानार्थी शब्द

जॉईन करा @Marathi
🌹संग्रही ठेवावे असे🌹
टोपणनावाने लिहिणारे मराठी साहित्यिक, गद्यलेखक, कवी


मराठी भाषेत जेव्हा काव्यरचनेला सुरुवात झाली तेव्हापासून कवी बहुधा आपले पहिले नाव कविनाम म्हणून वापरत असत. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, मोरोपंत, सगनभाऊ ही या कवींची प्रथम नावे होती. प्रथम नाव, मधले नाव आणि नंतर आडनाव लिहायची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली. आधुनिक काळातदेखील इंदिरा, कवी गोविंद, दत्त, नीरजा, पद्मा, मनमोहन, माधव, मीरा, यशोधरा, विनायक, संजीवनी या कवि-कवयित्रींनी स्वतःच्याच पहिल्या नावाने काव्यलेखन केले. अनेक कवींनी आपल्या सग्यासंबंधींच्या नावाला अग्रज, अनुज, कुमार, जूलियन, तनय, सुत, इत्यादी प्रत्यय लावून आपापली टोपणनावे सिद्ध केली. इतरांनी या पद्धतींशी फारकत घेऊन अत्यंत स्वतंत्र टोपणनावे घेतली आणि आपले काव्यलेखन केले.

१९६० पासून टोपणनावाखाली कविता करण्याची पद्धत मराठीतून बहुधा हद्दपार झाली आहे.

काही मराठी आणि अन्य भारतीय कवींच्या टोपणनावांची ही यादी :


अकिंचन
🌹वासू. ग. मेहेंदळे

अनंततनय
🌹दत्तात्रेय अनंत आपटे

अनंतफंदी
🌹अनंत भवानीबावा घोलप

अनंतसुत विठ्ठल, कावडीबाबा
🌹विठ्ठल अनंत पिंपळगावकर

अनिल
🌹आत्माराम रावजी देशपांडे

अनिल भारती
🌹शान्ताराम पाटील
(या कातरवेळी, तो सलीम राजपुत्र)

अशोक (कवी)
🌹नारायण रामचंद्र मोरे

अज्ञातवासी
🌹दिनकर गंगाधर केळकर

आधुनिक नीळकंठ
🌹बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर

आनंद
🌹विनायक लक्ष्मण बरवे

आनंदतनय
🌹गोपाळ आनंदराव देशपांडे

इंदिरा
🌹इंदिरा संत

इंदुकांत
🌹दिनकर नानाजी शिंदे

उदासी/हरिहरमहाराज
🌹नीलकंठ रामकृष्ण पाळंदे

उद्धवचिद्धन/उद्धवचैतन्य/उधोबाबा/
🌹उद्धव xxxx कोकिळ

एकनाथ, एकाजनार्दन
🌹एकनाथ सूर्यनारायण पैठणकर

एक मित्र, विनायक
🌹विनायक जनार्दन करंदीकर

कलापी, बालकवी
🌹त्र्यंबक बापूजी ठोंबरे

कवीश्वरबास
🌹भानूभट/भास्करभट्ट xxxx बोरीकर

कावडीबाबा/अनंतसुत विठ्ठल
🌹विठ्ठल अनंत पिंपळगावकर

कांत
🌹वा.रा. कांत

काव्यशेखर
🌹भास्कर काशीनाथ चांदूरकर

किरात/भ्रमर
🌹कृष्णाजी लक्ष्मण सोमण

कुंजविहारी
🌹🌹हरिहर गुरुनाथ सलगरकर

कुमुदबांधव
🌹स.अ. शुक्ल

कुसुमाग्रज
🌹विष्णू वामन शिरवाडकर

केशवकुमार
🌹प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे

केशवसुत
🌹कृष्णाजी केशव दामले

केशवसुत
🌹नारायण केशव बेहेरे

के.स.रि.
🌹केशव सदाशिव रिसबूड

कोणीतरी
🌹नरहर शंकर रहाळकर

गिरीश
🌹शंकर केशव कानेटकर

गोपिकातनया
🌹कु.द्वारका हिवरगावकर(सौ.मनोरमा श्रीधर रानडे)

गोपीनाथ
🌹गोपीनाथ तळवलकर

गोमा गणेश
🌹गणेश कृष्ण फाटक

गोविंद
🌹गोविंद दत्तात्रय दरेकर

गोविंदपौत्र
🌹श्रीधर व्यंकटेश केतकर

गोविंदप्रभु
🌹गुंडम अनंतनायक राऊळ

गोविंदाग्रज
🌹राम गणेश गडकरी

ग्रेस
🌹माणिक सीताराम गोडघाटे

चक्रधर
🌹श्रीचांगदेव राऊळ

चंद्रशेखर
🌹चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे

चेतोहर
🌹परशुराम नारायण पाटणकर

जगन्नाथ
🌹जगन्नाथ धोंडू भांगले

जगन्मित्र
🌹रेव्हरंड नारायण वामन टिळक

जननीजनकज
🌹पु.पां गोखले

टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती
🌹वासुदेव गणेश टेंबे

ढोलीबुवा/महीपतिनाथ
🌹सखाराम केरसुणे

तुकाराम/तुका
🌹तुकाराम बोल्होबा/बाळकोबा मोरे/अंबिले/आंबले

दत्त
🌹दत्तात्रय कोंडो घाटे

दया पवार
🌹दगडू पवार

दामोदर
🌹वीरेश्वर सदाशिव ऊर्फ तात्या छत्रे

दा.ग.पा.
🌹दामोदर गणेश पाध्ये

दासोपंत/ दिगंबरानुचर
🌹दासो दिगंबर देशपांडे

दित्जू/माधव जूलियन
🌹माधव त्र्यंबक पटवर्धन

नामदेव
🌹नामदेव दामाशेटी शिंपी

नारायणसुत
🌹श्रीपाद नारायण मुजुमदार

निरंजन
🌹वसंत सदाशिव बल्लाळ

निशिगंध
🌹रा.श्री. जोग

निळोबा
🌹निळा मुकुंद पिंपळनेरकर

नीरजा
🌹नीरजा साठे

नृसिंहसरस्वती
🌹नरहरी माधव काळे

पठ्ठे बापूराव
🌹श्रीधर कृष्ण कुलकर्णी (रेठरेकर)

पद्मविहारी
🌹रघुनाथ गणेश जोशी

पद्मा
🌹पद्मा गोळे

पी.सावळाराम
🌹निवृत्तिनाथ रावजी पाटील

पुरु.शिव. रेगे
🌹पु.शि. रेगे

पूर्णदास
🌹बाबा उपसकर-राजाध्यक्ष

प्रभाकर शाहीर
🌹प्रभाकर जनार्दम दातार

फुलारी/बी रघुनाथ
🌹भगवान रघुनाथ कुलकर्णी

बहिणाबाई
🌹बहिणाबाई नथूजी चौधरी

(संत) बहिणाबाई
🌹कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक)

बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुत
🌹ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी

बाबा आमटे
🌹मुरलीधर देवीदास आमटे

बाबुलनाथ
🌹विनायक श्यामराव काळे

बालकवी/कलापि
🌹त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बाळा
🌹बाळा कारंजकर

बी; B
🌹बाळकृष्ण अनंत भिडे

बी; BEE
🌹नारायण मुरलीधर गुप्ते

बी रघुनाथ/फुलारी
🌹भगवान रघुनाथ कुलकर्णी

बोधलेबुवा
🌹माणकोजी भानजी जगताप

भगवानकवि
🌹भगवान रत्नाकर कर्‍हाडकर

भानजी
🌹भास्कर त्रिंबक देशपांडे

भानुदास/मामळूभट
🌹भानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा)

भावगुप्तपद्म
🌹पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी

भावशर्मा
🌹के.(केशव) नारायण काळे

भालेंदु
🌹भालचंद्र/गुलाबराव सीताराम स
👍2
ुकथनकर

भ्रमर/किरात
🌹कृष्णाजी लक्ष्मण सोमण

मंदार
🌹एकनाथ पांडुरंग रेंदाळकर

मध्वमुनीश्वर
🌹त्रिंबक नारायणाचार्य ( आडनाव अनुपलब्ध)

मनमोहन
🌹गोपाळ नरहर उर्फ मनमोहन नातू

मनोहरबंधू
🌹भास्कर कृष्ण उजगरे

महिपती
🌹महिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर

महीपतिनाथ/ढोलीबुवा
🌹सखाराम केरसुणे

माणिक/माणिकप्रभू/माणिकबाबा
🌹माणिक मनोहर नाईक, हरकुडे

माधव
🌹माधव केशव काटदरे

माधव जूलियन, दित्जू/मा.जू./एम्.जूलियन
🌹माधव त्र्यंबक पटवर्धन

माधव मिलिंद
🌹कॅ. मा.कृ. शिंदे

माधवसुत
🌹दामोदर माधव कुळकर्णी

माधवानुज
🌹काशीनाथ हरी मोडक

मीरा
🌹मीरा तारळेकर

मुकुंदराय
🌹🌹मुकुंद गणेश मिरजकर

मुक्ताबाई/मुक्ताई
🌹मुक्ता विठ्ठलपंत कुलकर्णी

मुक्तिबोध
🌹शरच्चंद्र माधब मुक्तिबोध

मुक्तेश्वर
🌹मुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल

मोरोपंत
🌹मोरेश्वर रामचंद्र पराडकर

यशवंत
🌹यशवंत दिनकर पेंढरकर

यशोधरा
🌹यशोधरा साठे

योगेश
🌹भालजी पेंढारकर

रंगनाथ स्वामी (निगडीकर)
🌹रंगनाथ बोपाजी घोडके

रघुनाथ पंडित
🌹रघुनाथ पंडित चंदावरकर, रघुनाथ
गणेश नवहस्त/नवाथे

रमेश बाळ
🌹बाळ सीताराम मर्ढेकर

राजहंस
🌹यादव शंकर वावीकर

राधारमण
🌹कृष्णाजी पांडुरंग लिमये

रामजोशी/कविराय
🌹राम जनार्दन जोशी

रामदास
🌹नारायण सूर्याजी ठोसर

वसंत
🌹वासुदेव बळवंत पटवर्धन

डॉ. वसंत अवसरे
🌹शांता शेळके (श्री अवसरे मुळात शान्ताबाईंचे स्नेही होते.)

वसंतविहार
🌹शंकर दत्तात्रय जोशी

वा.दा.ओ.
🌹वामन दाजी ओक

वामन पंडित
🌹वामन तानाजी शेषे / वा शेष

विठाबाई
🌹विठा रामप्पा नायक

विठा रेणुकानंदन
🌹विठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी

विठ्ठल केरीकर
🌹विठ्ठल नरसिंह साखळकर

विठ्ठलदास
🌹विठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर

विंदा करंदीकर
🌹गोविंद विनायक करंदीकर

विनायक/एक मित्र
🌹विनायक जनार्दन करंदीकर

विष्णुदास
🌹कृष्णराव रावजी धांदरफळे

विसोबा खेचर
🌹विसोबा चाटे

विहंगम
🌹बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर

वैशाख
🌹त्र्यं.वि. देशमुख

शारदाश्रमवासी
🌹पुरुषोत्तम गोपाळ काणेकर

श्रीकृष्ण
🌹श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर

श्रीधर
🌹श्रीधर ब्रह्मानंद नाझरेकर/खडके/देशपांडे

श्रीराम
🌹श्रीनिवास रामचंद्र बोबडे

संजीव
🌹कृष्ण गंगाधर दीक्षित

संजीवनी
🌹संजीवनी मराठे

सदानंदस्वामी
🌹सदानंद चिंतामणी उपासनी

सरस्वतीकंठाभरण
🌹दिनकर नानाजी शिंदे

साधुदास
🌹गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर

साने गुरुजी
🌹पांडुरंग सदाशिव साने

सामराज
🌹शामभट लक्ष्मण आर्वीकर (राजोपध्ये)

सांवतामाळी
🌹सांवता परसूबा माळी

सुधांशु
🌹हणमंत नरहर जोशी

सुमंत
🌹अप्पाराव धुंडिराज मुरतुले

सुहृद्चंपा
🌹पुरुषोत्तम शिवराम रेगे

सौमित्र
🌹किशोर कदम

स्वरूपानंद
🌹रामचंद्र विष्णू गोडबोले

हरिबुवा
🌹हरिबुवा शिंपी (हरीबोवा केरेश्वर भोंडवे)

हरिहरमहाराज/उदासी
🌹नीलकंठ रामकृष्ण पाळंदे

होनाजी
🌹होनाजी सयाजी शेलारखाने

ज्ञानेश्वर/ज्ञानदेव/ज्ञानाबाई/बापरखमादेवीवर/बापविठ्ठलसुत
🌹ज्ञानदेव विठ्ठलपंत कुलकर्णी
___________________________________________
आणखी मराठी व्याकरण विषयक माहिती मिळवण्यासाठी @marathi वर क्लिक करा , नंतर जॉईन वर क्लिक करा , आणि मराठी व्याकरणाचा अभ्यास करा.
__________________________________________
Telegram.me/marathi
🔹मराठी भाषेच्या इतिहासा -

मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने

मराठी भाषेच्या इतिहासाची उपलब्ध साधने ग्रांथिक साधने,कोरीव लेख-शिलालेख,ताम्रपट;लोकसाहित्य, अप्रत्यक्ष साधने
प्रमाण साधने कागदपत्रांचा आधार शासकीय आदेश, राजाने काढलेली फर्माने आज्ञापत्रे, करारनामे, तहनामे आपापसातील पत्रव्यवहार दुय्यम साधने तवारिखा,बखरी,पोवाडे,स्रोत्रे

ऐतिहासिक उत्पत्ती

वेदपूर्वकालीन भाषा, वैदिक भाषा, संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इ. भाषेच्या स्वरुपावरुन प्रत्येक भाषेतील काही वैशिष्टे मराठी भाषेत दिसतात. त्यामुळे मराठी ही वेदपूर्वकालीन भाषेपासून, संस्कृतपासून, पालीपासून, प्राकृत भाषेपासून, महाराष्ट्री किंवा अपभ्रंश भाषेपासून तयार झाली असावी असा विचार अनेक अभ्यासक मांडतात मात्र त्यांच्यात एकमत अजूनही दिसून येत नाही.

मराठी भाषेच्या बाबतीत काही मते अशी-
वेदकालीन
वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. आणि इतर प्राकृत भाषेच्या रुपाशी जुळणारे विशेष सापडतात. पण एवढ्यावरुन अभ्यासक तिला प्राकृत पासुन निर्माण झाली असे मानण्यास तयार नाहीत. वेदकाळापासून इ.स.५०० - ७०० पर्यंत वेदकालीन प्राकृत भाषा समाजात वापरात नव्हत्या त्यामुळे हे मत योग्य वाटत नाही.

वेदकालीन ज्या बोलीभाषा होत्या त्यावरुन मराठीचा जन्म झाला. या मताचे कारण असे की, वेदात संस्कृत भाषेच्या स्वभावाशी विसंगत भावाविशेष सापडतात. म्हणजे वेदपुर्वकालीन भाषेत साधे स्वर, संयुक्त स्वर, आणि अर्धस्वर दिसतात. तिन्हीपैकी उच्चारदृष्ट्या अर्धस्वर हे प्रथमचे असावेत. अर्धस्वरापासून साधे स्वर निर्माण झाले आणि शेवटी संयुक्त स्वर असा क्रम आहे. तो संस्कृत मधे नाही, असे म्हणतात. आणि अभिजात संस्कृत हे व्याकरण, छंद,मात्रा, गण, यामुळे ते परिपूर्ण होते. वेदात वेदपुर्वीचे शब्द आहेत पण ते अभिजात संस्कृत मधे नाहीत त्या पुर्वीच्या भाषेचा प्राकृत आणि मराठी भाषेशी संबध दाखवण्याचा प्रयत्न या विषयाचे अभ्यासक करतात.

तमिळ-मराठी भाषा संबंध

मराठी भाषेचा ज्ञात इतिहास साधारणपणे हजार ते तेराशे वर्षांचा आहे. कन्नड आणि तेलुगू भाषा आणखी पाचशे वर्ष वरिष्ठ आहेत असे मानले जाते. मराठीच्या अगोदर प्राकृत-अपभ्रंश आणि महाराष्ट्री प्राकृत ह्यांचा वावर सुमारे १५०० वर्षे होता असे मानले तरी त्यापूर्वी महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जायची हा प्रश्न उरतोच. मराठी भाषेत त्या काळात असणारे जे स्थानिक द्रविड कुलोत्पन्न शब्द होते, ते आजही वापरात आहेत, "देशी" अशा अर्थाने भाषातज्ज्ञ त्यांचा उल्लेख करतात. डॉ.पां.दा. गुणे व भाषाशास्त्रज्ञ विल्सन ह्याने मराठीतील देशी शब्दांचे ॠण मान्य केले आहे. अनुलोम-प्रतिलोम पद्धतीने प्रत्येक मराठी शब्दाचा संबंध संस्कृतशी जोडणे तार्किक वाटत नाही, त्यामुळे भाषेचे जाणकार श्री.केतकर ह्यांचे मत संस्कृत देखील स्थानिक भाषांपासून तयार झाली असावी असे आहे, जे आत्यंतिक स्वरूपाचे वाटते.

भाषातज्ज्ञ विश्वनाथ श्री. खैरे ह्यांनी "संमत" सिद्धान्ताद्वारे मराठीचे मूळ तमिळ भाषेमध्ये शोधले असल्याचे त्यांनी द्रविड महाराष्ट्र, अडगुलं मडगुलं (पुस्तक) या पुस्तकांत सांगितले आहे. डॉ. श्री.ल. कर्वे ह्यांचेही मत तसेच आहे. तमिळ आणि जुनी मराठी (साधारणपणे सातशे ते आठशे वर्षापूर्वीची- संत ज्ञानेश्वरांच्या काळातील) ह्यांचे पदक्रम, व्याकरण, वाक्यरचना ह्यांत खूपच साम्य आहे. वापरात असलेले मराठी शब्द थोड्याफार फरकाने आजही तमिळमध्ये दिसून येतात. त्यामुळे फक्त संस्कृत आणि प्राकृत ह्याच भाषांच्या आरोपणांतून मराठीचा जन्म झाला हा तर्क योग्य वाटत नाही. तर त्या उलट खैरे ह्यांचा
संमत सिद्धान्त अधिक स्वीकारार्ह वाटतो. (संमत=संस्कृत-मराठी-तमिळ).

संस्कृतपासून मराठी

संस्कृतपासून मराठी भाषा निर्माण झाली असे एक मत आहे. संस्कृतपासून मराठी निर्माण झाली नाही कारण वर्णांने बदल, प्रयोगातील वेगळेपणा, उच्चारणातील फरक, वाक्प्रचार, इत्यादी बाबतीत दोन्हीही भाषेत खूप वेगळेपणा आहे. जे थोडेफार साम्य आहे ते पुरेसे नाही.

भाषाशुद्धी चळवळ

स्वातंत्र्यवीर सावरकर १९२३पासून १९३७पर्यंत रत्नागिरीला स्थानबद्ध होते. प्रत्यक्ष राजकारणात भाग घ्यायला त्यांना बंदी होती. तेव्हा त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, कालबाह्य रूढी यांवर टीका करणारे पुष्कळ लेख 'किर्लोस्कर' मासिकातून लिहिले. १९२४मध्ये 'केसरीत' 'मराठी भाषेचे शुद्धीकरण' ही लेखमाला लिहिली. याच शीर्षकाची पुस्तिका नंतर प्रकाशित झाली.

ही लेखमाला सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असताना लिहिली असल्यामुळे आणि सावरकरांबद्दल सुशिक्षित समाजास आदर आणि कुतूहल वाटत असल्यामुळे त्यांच्या सांगण्याचा अनेकांवर प्रभाव पडला. भाषाशुद्धी करणे हे राष्ट्रकार्यच आहे. त्यामुळे आपण जरी राजकारणात भाग घेऊन इंग्रजी राजवटीचा प्रतिकार करू शकलो नाही तरी सावरकर सुचवितात त्याप्रमाणे
👌1
आपल्या भाषेचे शुद्धीकरण करून त्या रूपाने इंग्रजीची ह्कालपट्टी करू शकतो अशी सावरकरांच्या अनुयायांची श्रद्धा होती.

अरबी-फारसी आणि इंग्रजी शब्दांच्या ऐवजी मराठी आणि संस्कृत शब्दप्रयोग करावेत असे विनायक दामोदर सावरकर व त्यांच्या अनुयायांचे मत होते. ही सावरकरांची भूमिका माधवराव पटवर्धनांनी थोड्या फरकाने म्हणजे शक्य तिथे संस्कृतसुद्धा टाळावे व मराठी शब्द वापरावे अशा स्वरूपात मांडली(जळगाव साहित्य संमेलन अध्यक्षीय भाषण १९३६).

भाषाशुद्धी भूमिकेच्या मर्यादासुद्धा विविध व्यक्तींनी व्यक्त केल्या तर काहींनी टीकाही केली. १९२७च्या पुणे साहित्य संमेलनात श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी भूमिका अशी घेतली की कोणतीही भाषा अन्य भाषासंपर्कापासून अलिप्त राहू शकत नाही. दीर्घकाळ एकमेकींच्या सहवासात आदान-प्रदान होणे ही स्वाभाविक क्रिया आहे. जे शब्द मराठीशी एकरूप झाले आहेत ते केवळ अन्य भाषांतून आले या कारणासाठी त्यांना बहिष्कृत करणे अव्यवहार्य आहे. मराठीत हवा, जमीन, वकील गरीब, सराफ, महाल, इलाखा, जिल्हा, मुलूख, मसाला, हलवा, गुलकंद, बर्फी, मुद्दा ,अत्तर, तवा ,तपशील, सरबत असे शेकडो अरबी-फारसी शब्द आले आहेत व ते मराठीचा एक भाग झाले आहेत. त्यांना मराठीतून काढून टाकणे अशक्य आहे.

प्राध्यापक श्री.के. क्षीरसागर यांचा विरोध अधिक तीव्र होता."खरी भाषाशुद्धी आणि तिचे खरे वैरी सावरकर आणि पटवर्धन" हा क्षीरसागरांचा आक्रमक शैलीतील लेख त्या वेळच्या सह्याद्री मासिकात प्रकाशित झाला, त्यामुळे बरीच खळबळ निर्माण झाली. 'सह्याद्री' आणि 'लोकशिक्षण' या त्यावेळच्या मासिकांमधून भाषाशुद्धीबद्दलची मतमतांतरे मांडणारे अनेक लेख प्रकाशित झाले.

प्रा. क्षीरसागरांच्या मते भाषाशुद्धिवाद्यांना क्लिष्ट आणि विकृत शब्द निर्मितीचा रोग जडला आहे. भाषाशुद्धीचे कारण पुढे करून हल्ली जो उठतो तो नवे शब्द बनवत सुटला आहे. यामुळे मराठीचे स्वाभाविक सौंदर्य बिघडत असून फारसी आणि इंग्रजी शब्दांचे उच्चाटन व्हायच्या ऐवजी त्यांची आठवण पक्की होत आहे.

गोल्डन मीन साठी 'सुवर्णमध्य' 'क्रोकोडाइल टियर्स' साठी 'नक्राश्रू'; 'रेकॉर्ड ब्रेक' ला 'उच्चांक मोडणे' हे किंवा असले शब्द म्हणजे शब्दाला शब्द ठेवून केलेली भाषांतरे होत. या भाषांतरित शब्दांमुळे मूळ इंग्रजी शब्दच कृत्रिम रूपाने मराठीत येत आहेत. सर्वसामान्य मराठी माणसालाही कोणता शब्द कोठे वापरावयाचा ते स्वभावतःच कळते. 'कमाल' शब्द त्याज्य आणि 'पराकाष्ठा' तेवढा स्वीकार्ह असे तो मानणार नाही.तर 'प्रयत्नांची पराकाष्ठा' आणि 'मूर्खपणाची कमाल' असा योग्य वापर तो करील.
परभाषांमुळे अधिक पर्याय उपलब्ध होतात. त्यामुळे सूक्ष्म अर्थच्छटा व्यक्त करायला त्यांचा उपयोग होतो हे मत गो.कृ. मोडक यांनीही मांडले आहे. अर्भक, संतान, संतती, मूल, बालक हे सगळे स्वकीय शब्द आहेत. पण कोणता शब्द कोठे वापरावयाचा याचे संकेत वेगळे आहेत. यात औलाद या परकीय शब्दामुळे आणखी भर पडली आहे. सह्याद्री मासिकासाठी एका विस्तृत लेखाद्वारा न.चिं. केळकरांनी भाषाशुद्धीचे स्वागत करूनही तिच्या मर्यादा स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या पद्धतीने युक्तिवाद करताना त्यांनी म्हटले आहे, 'तत्त्वात जिंकाल पण तपशिलात हराल'.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'भाषाशुद्धी' या प्रश्नाची 'चळवळ' होण्यासारखी स्थिती उरली नसली तरी अनेक भाषिक प्रश्नांची गुंतागुंत वाढली आहे असे दिसून येते.

जॉईन करा @Marathi
👍1
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM