Forwarded from चालू घडामोडी 2025
भारतात आणखी 2 नवीन रामसर स्थळे
1) सिलीसर तलाव -अलवर राजस्थान - 315.97 हेक्टर
2) कोपरा जलाशय -बिलासपूर छत्तीसगड - 210 हेक्टर
रामसर स्थळांच्या बद्दल माहिती
👼 भारतात एकूण 96 रामसर स्थळे झाली
👼 भरतात एकूण 13,61,331 हेक्टर क्षेत्र व्यापतात
👼 तमिळनाडू सर्वात जास्त 20 रामसार
👼 जागतिक पाणथळ दिन - 2 फेब्रुवारी
👼 रामसर कराराची तारीख - 2 फेब्रुवारी 1971
👼 रामसर मुख्यालय - ग्लैंड, स्वित्झर्लंड
👼 भारतातील पहिले रामसर स्थळ - चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राज्यस्थान)
➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖ ➖
✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
1) सिलीसर तलाव -अलवर राजस्थान - 315.97 हेक्टर
2) कोपरा जलाशय -बिलासपूर छत्तीसगड - 210 हेक्टर
रामसर स्थळांच्या बद्दल माहिती
✍️ संकलन :- ©चालूघडामोडी2025
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤66🥰4🔥2
अपना टाईम आयेगा!
आयुष्य ही काही 'टी-२०' मॅच नाही; जिथे पहिल्या चेंडूपासूनच चौकार-षटकार मारणे अपेक्षित असते. आयुष्य ही एक 'कसोटी' मॅच आहे. इथे खेळपट्टीवर टिकून राहणे जास्त महत्त्वाचे असते. कधीकधी चेंडू अंगावर झेलून घ्यावे लागतात, कधीकधी सलग Maiden Overs जातात; पण जो खेळाडू खेळपट्टी सोडत नाही; त्यालाच खराब चेंडू मिळतो आणि तोच शतक ठोकू शकतो. आजच्या इन्स्टंट युगात आपल्याला यश सुद्धा 'इन्स्टंट' हवे असते. पण निसर्गाचा नियम तसा नाही. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला बहरण्याची एक वेळ असते आणि ती वेळ येईपर्यंत फक्त एकाच गोष्टीची गरज असते— ती म्हणजे 'अतूट धैर्य'.
संस्कृतमध्ये एक अत्यंत समर्पक सुभाषित आहे:
“शनैः पन्थाः शनैः कन्था शनैः पर्वतलङ्घनम् ।
शनैर्विद्या शनैर्वित्तं पञ्चैतानि शनैः शनैः ॥”
याचा अर्थ असा की; रस्ता हळूहळू चालून पार होतो, गोधडी हळूहळू शिवून पूर्ण होते, पर्वत हळूहळू ओलांडावा लागतो. त्याचप्रमाणे विद्या आणि धन (संपत्ती/यश) हे सुद्धा हळूहळूच प्राप्त होतात. घाई करून या गोष्टी मिळत नाहीत.
आपल्या आजूबाजूला आपण अनेक अशी उदाहरणे पाहतो जिथे सुरुवातीला प्रचंड अपयश आले; पण त्या व्यक्ती थांबल्या नाहीत. चित्रपटसृष्टी हे याचे उत्तम उदाहरण आहे. तिथे 'उगवत्या सूर्याला नमस्कार' करण्याची पद्धत आहे, पण मावळतानाही पुन्हा उगवण्याचे स्वप्न पाहणारेच तिथे टिकतात.
धुरंधर निमित्ताने अक्षय खन्नाचं कौतुक सुरू आहे. 'बॉर्डर' आणि 'दिल चाहता है' सारख्या चित्रपटांतून त्याने आपली छाप पाडली होती. पण तो नेहमीच अंडररेटेड राहिला. मध्ये काही वर्षे तो पूर्णपणे गायब झाला होता. त्याला मुख्य नायकाच्या भूमिका मिळणे बंद झाले होते. पण अक्षय खन्नाने कधीही मिळेल ते काम स्वीकारून स्वतःचा दर्जा घालवला नाही. त्याने वाट पाहिली. जेव्हा तो परतला, तेव्हा 'इत्तेफाक', 'Section 375' आणि 'दृश्यम २' सारख्या चित्रपटांतून त्याने दाखवून दिले की वाघ म्हातारा झाला तरी त्याची शिकार करण्याची पद्धत बदलत नाही. या एकाच वर्षात त्याचा औरंगजेब आणि रहमान डकैत प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत.
मजा म्हणजे त्याच्या ज्या डान्स स्टेपचं कौतुक होतंय ती त्याने २००४ मध्येच हलचल मधल्या गाण्यात करून झाली आहे. तीच स्टेप तब्बल वीस वर्षांनी लोकांनी इतकी डोक्यावर घेतली की धडाधड reels बनत आहेत! श्रद्धा और सबुरी हाच मंत्र इथे लागू पडतो. बॉबी देओल हेही असंच आणखी एक उदाहरण.
यश हवं तर 'प्रतीक्षा करण्याची तयारी' हवी महाराज. जेव्हा अंधार दाटतो; तेव्हा समजायचे की पहाट जवळ आली आहे. अनेकदा आपण यशाच्या अगदी जवळ पोहोचलो असताना प्रयत्न सोडून देतो. झाडाला आज पाणी घातले की उद्या फळ मिळत नाही, त्यासाठी ऋतू बदलावा लागतो!
त्यामुळे; जर आज तुमची वेळ चालत नसेल, लोक तुमची दखल घेत नसतील, तर निराश होऊ नका. स्वतःला हेच सांगा की मी संपलेलो नाही, मी फक्त विश्रांती घेत आहे, तयारी करत आहे. वाघ जेव्हा दोन पावले मागे घेतो, तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर तो मोठ्या झेपेची तयारी करत असतो.
तुमची वेळ नक्की येईल; फक्त तोपर्यंत मैदानात पाय रोवून उभे राहा!
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
आयुष्य ही काही 'टी-२०' मॅच नाही; जिथे पहिल्या चेंडूपासूनच चौकार-षटकार मारणे अपेक्षित असते. आयुष्य ही एक 'कसोटी' मॅच आहे. इथे खेळपट्टीवर टिकून राहणे जास्त महत्त्वाचे असते. कधीकधी चेंडू अंगावर झेलून घ्यावे लागतात, कधीकधी सलग Maiden Overs जातात; पण जो खेळाडू खेळपट्टी सोडत नाही; त्यालाच खराब चेंडू मिळतो आणि तोच शतक ठोकू शकतो. आजच्या इन्स्टंट युगात आपल्याला यश सुद्धा 'इन्स्टंट' हवे असते. पण निसर्गाचा नियम तसा नाही. प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक व्यक्तीला बहरण्याची एक वेळ असते आणि ती वेळ येईपर्यंत फक्त एकाच गोष्टीची गरज असते— ती म्हणजे 'अतूट धैर्य'.
संस्कृतमध्ये एक अत्यंत समर्पक सुभाषित आहे:
“शनैः पन्थाः शनैः कन्था शनैः पर्वतलङ्घनम् ।
शनैर्विद्या शनैर्वित्तं पञ्चैतानि शनैः शनैः ॥”
याचा अर्थ असा की; रस्ता हळूहळू चालून पार होतो, गोधडी हळूहळू शिवून पूर्ण होते, पर्वत हळूहळू ओलांडावा लागतो. त्याचप्रमाणे विद्या आणि धन (संपत्ती/यश) हे सुद्धा हळूहळूच प्राप्त होतात. घाई करून या गोष्टी मिळत नाहीत.
आपल्या आजूबाजूला आपण अनेक अशी उदाहरणे पाहतो जिथे सुरुवातीला प्रचंड अपयश आले; पण त्या व्यक्ती थांबल्या नाहीत. चित्रपटसृष्टी हे याचे उत्तम उदाहरण आहे. तिथे 'उगवत्या सूर्याला नमस्कार' करण्याची पद्धत आहे, पण मावळतानाही पुन्हा उगवण्याचे स्वप्न पाहणारेच तिथे टिकतात.
धुरंधर निमित्ताने अक्षय खन्नाचं कौतुक सुरू आहे. 'बॉर्डर' आणि 'दिल चाहता है' सारख्या चित्रपटांतून त्याने आपली छाप पाडली होती. पण तो नेहमीच अंडररेटेड राहिला. मध्ये काही वर्षे तो पूर्णपणे गायब झाला होता. त्याला मुख्य नायकाच्या भूमिका मिळणे बंद झाले होते. पण अक्षय खन्नाने कधीही मिळेल ते काम स्वीकारून स्वतःचा दर्जा घालवला नाही. त्याने वाट पाहिली. जेव्हा तो परतला, तेव्हा 'इत्तेफाक', 'Section 375' आणि 'दृश्यम २' सारख्या चित्रपटांतून त्याने दाखवून दिले की वाघ म्हातारा झाला तरी त्याची शिकार करण्याची पद्धत बदलत नाही. या एकाच वर्षात त्याचा औरंगजेब आणि रहमान डकैत प्रेक्षकांची वाहवा मिळवत आहेत.
मजा म्हणजे त्याच्या ज्या डान्स स्टेपचं कौतुक होतंय ती त्याने २००४ मध्येच हलचल मधल्या गाण्यात करून झाली आहे. तीच स्टेप तब्बल वीस वर्षांनी लोकांनी इतकी डोक्यावर घेतली की धडाधड reels बनत आहेत! श्रद्धा और सबुरी हाच मंत्र इथे लागू पडतो. बॉबी देओल हेही असंच आणखी एक उदाहरण.
यश हवं तर 'प्रतीक्षा करण्याची तयारी' हवी महाराज. जेव्हा अंधार दाटतो; तेव्हा समजायचे की पहाट जवळ आली आहे. अनेकदा आपण यशाच्या अगदी जवळ पोहोचलो असताना प्रयत्न सोडून देतो. झाडाला आज पाणी घातले की उद्या फळ मिळत नाही, त्यासाठी ऋतू बदलावा लागतो!
त्यामुळे; जर आज तुमची वेळ चालत नसेल, लोक तुमची दखल घेत नसतील, तर निराश होऊ नका. स्वतःला हेच सांगा की मी संपलेलो नाही, मी फक्त विश्रांती घेत आहे, तयारी करत आहे. वाघ जेव्हा दोन पावले मागे घेतो, तेव्हा तो घाबरलेला नसतो, तर तो मोठ्या झेपेची तयारी करत असतो.
तुमची वेळ नक्की येईल; फक्त तोपर्यंत मैदानात पाय रोवून उभे राहा!
- वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
❤211💯45🎉5