मराठी व्याकरण
223K subscribers
8.5K photos
36 videos
337 files
581 links
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा.

लगेच जॉईन करा @Marathi
Download Telegram
1112)शाळेची घंटा होताच आम्ही फटकातून आत शिरलो वाक्यचा प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
35%
1)केवळवाक्य
38%
2)संयुक्त वाक्य
25%
3)मिश्र वाक्य
1%
4)यापैकी नाही
👍408👏5🔥2
1113)पुष्कळ वर्षांपूर्वी मोठ्या आवडीने रातरणीचे रोप आणून मी ते बागेत एक कोपऱ्यात लावले वाक्यचा प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
39%
1)केवळ वाक्य
36%
2)संयुक्त वाक्य
22%
3)मिश्र वाक्य
2%
4)यापैकी नाही
👍459👌5🙏2🤔1
1114)उद्या सुट्टी मिळाली तर मी गावात येईन वाक्यचा प्रकार ओळखा?
Anonymous Quiz
17%
1)केवळ वाक्य
33%
2)संयुक्त वाक्य
47%
3)मिश्र वाक्य
2%
4)यापैकी नाही
👍545👌2
1115)आरती सुरू झाल्यावर घंटानाद सुरू झाला .
Anonymous Quiz
46%
1)केवळ वाक्य
30%
2)संयुक्त वाक्य
23%
3)मिश्र वाक्य
2%
4)यापैकी नाही
👍51🤔1110👌3🔥2
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏

जॉईन - @eMPSCKatta
🙏8240👍24
🌿शुद्धलेखन म्हणजे काय?🌿

आपण आपले विचार बोलून किंवा लिहून दाखवितो. आपल्या या बोलण्याला म्हणतात 'भाषा', व तेच लिहून दाखविण्याला 'लेखन' म्हणतात.           

आपण बोलताना शब्दांचे उच्चार करतो. त्यांतील काही अक्षरे -हस्व असतात, काही दीर्घ असतात, तर काहींचा उच्चार नाकातून होतो. शब्दांतील या -हस्व - दीर्घ व सानुस्वार अक्षरांच्या उच्चाराप्रमाणे बोलणे म्हणजे शुद्ध बोलणे; व बोलण्यातील शुद्ध उच्चाराप्रमाणे ते अक्षरांत लिहून दाखविणे याला स्थूलमानाने 'शुद्धलेखन' म्हणायला हरकत नाही.   
👍227👏3
🌷आपण जे लिहितो ते शुद्ध म्हणजे निर्दोष असावे असे सर्वांना वाटते. हे लेखन शुद्ध व बिनचूक असावे याबद्दल काही नियम घालून देण्यात आलेले असतात. यांनाच 'शुद्धलेखनविषयक नियम' असे आपण म्हणतो.         

🌷शुद्धलेखनाबाबतचे आजचे नियम पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे झालेले आहेत. ते नीट समजावून घेतले की आपले लेखन निश्चित सुधारते.

🌷आपले विचार जसे इतरांना समजले पाहिजेत, तसे इतरांचे विचार आपल्याला समजायला हवेत. यासाठी आपली भाषा एका विशिष्ट ठरलेल्या पद्धतीनेच बोलली किंवा लिहिली गेली तरच ती 'शुद्ध' समजली जाते. त्यात काही चूक झाली तर ती अशुद्ध ठरते.   
👍187🔥1
🌷जसे 'तो पुस्तक वाचतो', 'त्याने पुस्तक वाचले', 'त्याने पुस्तके वाचली' अशा ठरावीक पद्धतीनेच आपण बोलायला हवे. याऐवजी 'तो पुस्तक वाचला', 'त्याने पुस्तक वाचली', 'त्याने पुस्तके वाचतो' अशा पद्धतीने जर आपण बोललो तर ते चुकीचे ठरते.    

🌷आपण लिहितो त्या शब्दाचे किंवा वाक्याचे शुद्ध स्वरूप कोणते व अशुध्द स्वरूप कोणते यांबाबत काही नियम ठरविण्यात आले आहेत. हे नियम हाच व्याकरणाचा विषय, व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजेच शुद्धलेखन. 'शुध्दलेखन' हा वेगळा असा विषय नाहीच. व्याकरणाचाच एक भाग आहे.  
👍206👌1
🌷शुद्धलेखनात शब्दांतील -हस्व - दीर्घ अक्षरे व अनुस्वार यांचाच आपण प्रामुख्याने विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवद्याचाच विचार करतो; पण शुद्धलेखन याचा एवढाच मर्यादित अर्थ नाही.
🌷 शब्दांतील अक्षरांचे लेखन एवद्याचाच विचार यांच्याही शुद्धलेखनात कारवायचा नसून वाक्यात येणाऱ्या शब्दांचा क्रम व त्यांची अचूक योजना, जोडाअक्षरातील वर्णांची अचूक रचना, विरामचिन्हाचा योग्य वापर यांच्याही शुद्धलेखनात समावेश होतो.
🌷तसेच जोडशब्द तयार करताना शेजारचे वर्ण एकमेकांत मिसळतात; अनेक शब्दांचा एक शब्द करताना त्यातले काही शब्द कसे गळतात; व नवीनच शब्द कसे तयार केले जातात ( म्हणजेच संधी, समास व शब्दसिद्धी)   यांच्याही विचार शुद्धलेखनात अवश्य करावा लागतो.   
9👍4
🌷आधी भाषा, मग व्यकरण :          

'🌷शुद्धलेखन' हा शब्दच थोडा फसवा आहे. आपले लेखन कशा प्रकारे करावे याबद्दल प्रारंभीच्या व्याकरणकारणी काही नियम ठरविले. त्याप्रमाणे जे लिहिले जाई ते त्या वेळी शुद्ध समजले जात असे.        

🌷पूर्वी मराठीत अनुस्वार बऱ्याच ठिकाणी दिले जात. उदा. 'नाही' वर अनुस्वार द्यावा लागे. 'काही' मधल्या दोन्ही अक्षरांवर अनुस्वार देत. 'मी कामे केली' हे वाक्य 'मी कामें केली' असे सानुस्वार लिहावे लागे.
🌷याचे कारण त्या वेळच्या लोकांच्या बोलण्यात नासोच्चार खूप होते. त्यास अनुसरून, त्यात व्याकारणीक अनुस्वरांची भर घालून, तसेच अर्थभेद, व्युत्पत्तीने व परंपरा यांचाही विचार करून अनुस्वार कोठे द्यावेत व -हस्व - दीर्घ केव्हा लिहावे हे ठरविण्यात आले होते
🌷. आता आपण तसा उच्चार करत नाही. आपल्या उच्चारात आता खूप बदल झाला आहे. म्हणून हे अनुस्वार आजच्या लेखनातून नाहीसे झाले आहेत.      
👍141
🌷पूर्वीच्या लेखनावर संस्कृतचा पगडा विशेष होता. त्यामुळे शब्दामध्ये येणारे इ-कार व उ-कार संस्कुतपामने -हस्व लिहिले जात. आता आपण मराठीचे लेखन मराठीच्या उच्चारानुसार लिहू लागलो आहे.
🌷प्रारंभी केलेल्या नियमांत आतापर्यंत वेळोवेळी बदल होत राहणार. भाषा बदलत चालली म्हणजे तिच्या लेखनपध्दतीतही बदल होणे साहजिक आहे. आधी भाषा बनते; मग तिचे व्याकरण ठरते.  

🌷भाषेत बदल होत गेला की व्यकरणकारकाला शरणागती पत्करावी लागते व पूर्वीच्या नियमांना मुरड घालावीच लागते. परिणामतः लेखनविषयक ठरलेल्या नियमांतही बदल करावाच लागतो.
🌷लिहिण्याची शास्त्रशुद्ध पद्धत म्हणजे आपण बोलताना वर्णाचा जसा उच्चार करतो तसे लिहिणे. पण बोलण्यातील उच्चाराप्रमाणे लेखन करावयाचे तर आपली वर्णमाला अपुरी पडते. मराठीतील सगळे उच्चार लिहून दाखविण्याची सोय आपल्या वर्णमालेत नाही. तसेच, प्रत्येकजण आपल्या स्वतःच्या उच्चारपद्धतीप्रमाणे लिहू लागला तर मोठा कठीण प्रसंग निर्माण होईल.
🌷एकमेकांचा विचार एकमेकांना समजायला हवा असेल तर एक विशिष्ट लेखनपध्दतीचा अनुसरणे भाग आहे. म्हणजेच लेखनाबाबत काही नियम ठरवून ते सर्वांनी आचरणात आणणे योग्य ठरते. अशा नियमांचा आपण 'शुद्धलेखनाचे नियम' म्हणत आलो.  
👍127
मराठी शुद्ध लेखनाचे नियम        

अ)अनुस्वार       

१) नाकापासून स्पष्टपणे उच्चार होणा-या अक्षरावर नेहमी अनुस्वार द्यावा.      

उदा.

डोंगर, सतरंजी, धंदा, कुंभार, अंधार, पंचमी. इ.          
👍172
🌷2) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.        

उदा.

लोकांना, मुलांकडून, मित्रांचे, घोड्यांसाठी, त्यांना इ.          

🌷३) आदरार्थी अनेकवचनी (बहुवचनी) नामांच्या सामान्य रूपांवर अनुस्वार द्यावा.      

उदा.

शिक्षकांनी, वडिलांनी, आजोबांनी, विवेकानंदांनी, रानडेंनी इ.       
👍128
   

🌷४) पुढील शब्दांवर अनुस्वार देऊ नये.          

जसे - का, की, केळे, करू, करताना, रवेळू, घरात, घरी, जाऊ, तेथे, तेव्हा, जेथे, जेव्हा, झोप, नाव, नवे, पाच, बसू, माती, लाकूड, शाळेत. (कारण - या शब्दात अनुनासिकाचा स्पष्ट उच्चार होत नाही)    
8👍5
आ) हस्व - दीर्घ अक्षरे

१) इ - कारान्त आणि 'उ’ - कारान्त शब्दातील शेवटचे अक्षर नेहमी दीर्घ लिहावे.          

उदा -

मी, कवी, गुरू, बाहू जू, ऋषी, गती, वही, गहू पेरू, वाळू, शत्रू.       

परंतु असे शब्द जोडशब्दात आल्यास हा शेवटचा ई कार व ऊ कार हस्व होतात.          

उदा -

विद्यार्थिभांडार ऋषिकुमार, कविचरित्र, लघुकथा, शत्रुपक्ष इ.          

अपवाद - अति, आणि, नि, परंतु, तथापि, अद्यापि, यद्यपि, प्रभृति, यथामति, यथाशक्ति, इति, ही अवये हस्वातच लिहावी.      

२) सामासिक शब्दातील पहिले पद हस्व 'इ' कारान्त 
👍2912🤔3👌2
२) सामासिक शब्दातील पहिले पद हस्व 'इ' कारान्त किंवा 'उ' कारान्त असल्यास ते हस्वातच राहते. आणि ते पद दीर्घ 'ई' कारान्त किंवा ऊ' कारान्त तत्सम शब्द असल्यास ते दीर्घातच राहते.    

उदा -

कविचरित्र, गतिमान, गुरुवर्य, पशुपक्षी, युक्तिवाद, लघुकथा, वायुपुत्र, शक्तिमान, हरिनाम, गौरीहर, वधूवर इ. 
👍84
Forwarded from MPSC Maharashtra
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🟣 सुरू होत आहे प्रश्नोत्तरांचा सामना

🟣 राज्यसेवा व गट ब मुख्य परीक्षेसाठी

🟣 विश्लेषणात्मक स्पष्टीकरण बॅच 2.0

🟣 TOPICWISE PYQ

🟣 QUESTION PAPERWISE  PYQ

🟣 विषय : मराठी

🟣 आयोगाचा प्रत्येक प्रश्न आणि चारही पर्यायांचे सखोल स्पष्टीकरण

🟣 उत्तरे अचूक व जलद काढण्याचे तंत्र

🟣 2024  ते 2011 पर्यंतच्या 100 प्रश्नपत्रिका

🟣 19 विविध परीक्षा

🟣 PYQ + REVISION असा दुहेरी फायदा

🟣 मार्गदर्शक  : अमोल पाटील

🟣 या बॅचसोबत आयोगाच्या 100 प्रश्नपत्रिकांचा समावेश असलेली दोन पुस्तके मोफत

🟣 सुरुवात : सोमवार, 21 एप्रिल 2025 पासून

🟣 वेळ : सकाळी 8 : 00 ते 10 :00

🟣 कालावधी : 30 दिवस

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन ( LIVE ) स्वरूपात

🟣 डेमो पाहण्यासाठी खाली दिलेल्या
YOU TUBE चॅनेलला भेट द्या.

🟣 ऑनलाईन बॅच क्रमांक 27

🟣 ऑनलाईन बॅच पाहण्यासाठी आमचे app download करा.

या बॅच बद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्हांला call करा.

संपर्क : 7517345810 / 8180029385
👍229
३) अकारान्त शब्दातील उपान्त्य 'इ' कार किंवा 'उ' कार दीर्घ असतो. 

उदा -

ऊस, गूळ, चूल, नीळ, दूध, धीट, धूप, नीट, नवीन, पाऊस, पूल, फूल, बहीण, बक्षीस, माणूस, मीठ, मूल, म्हणून, विहीर, तीर, घूस, परीट, बुरूज, कापूस इ.        

अपवाद - संस्कृतमधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.

उदा -

अरुण, कुसुम, गुण, तरुण, दक्षिण, पश्चिम, प्रिय, मधुर, मंदिर, युग, विष, शिव इ.  
👍156
४) एकाक्षरी शब्द दीर्घ असावेत - 

उदा -

मी, तू, ती, ही, जी, ऊ, थू, धू, पी, पू, शी इ.             

५) शब्दातील अन्त्य अक्षर दीर्घ असल्यास उपान्त्य अक्षर हे बहुधा हस्व असते.        

उदा -

दिवा, जुनी, किती, मुळा, महिना, वकिली, गरिबी, गुरुजी, माहिती, सुरू, हुतुतू इ.         

अपवाद - संस्कृत मधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.          

उदा -

परीक्षा, प्रतीक्षा, गीता, पूजा इ.     
👍238🙏5
) शब्दाच्या शेवटी ‘इक' प्रत्यय आल्यास ‘क’ पूर्वीचा 'इ' कार ‘उ’ कार हस्व लिहावा.        

उदा. -

ऐतिहासिक, कौटुंबिक, धनिक, यांत्रिक, लौकिक, वार्षिक, शारीरिक, सार्वजनिक, साप्ताहिक, नैतिक, पौराणिक, बौधिक, भाविक, भौगोलिक, मानसिक इ.    

७) हळूहळू , लुटूलुटू , मुळूमुळू , दुडुदुडू अशा प्रकारच्या शब्दातील दुसरे व चौथे अक्षर दीर्घ असते.        

८) गावाच्या नावात शेवटी 'पूर' ही अक्षरे असल्यास त्यातील 'पू' नेहमी दीर्घ लिहावे.  

उदा.

नागपूर, विजापूर इ.  
👍205
इ) सामान्यरूप  

१) हस्व 'इ' कारान्त व 'उ' कारान्त तत्सम शब्दाचे सामान्यरूप करताना त्या शब्दातील अंत्यस्वर दीर्घ होतो.

उदा. -

रवि - रवीचे, प्रभु - प्रभूला इ.       

२) मराठी शब्दाचे उपान्त्य अक्षर (दीर्घ) ई किंवा ऊ याने युक्त असल्यास शब्दाचे सामान्यरूप होताना ते उपान्त्य अक्षर हस्व होते.    

उदा. -

वीट - विटेने, मूठ - मुठीत, बहीण - बहिणीला, रायपूर - रायपुरात इ.      

अपवाद - संस्कृतमधून मराठीत आलेल्या अशाप्रकारच्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.  

उदा. -

सीता - सीतेला, पूर्व - पूर्वेकडे, परीक्षा - परीक्षेसाठी, पूजा - पूजेकरिता इ.   
👍174🤔2