मी मराठी कविता समुह.....
3.95K subscribers
2.25K photos
30 videos
4 files
90 links
🙏मी मराठी कविता संग्रह🙏

"मराठी आणि हिंदी ,कविता, लेख"

@khpatil
Download Telegram
गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या ....
मनातील कडवापणा बाहेर पडू द्य ....
या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण नक्की राहू द्या ....

उत्कर्षाचे अत्तर सुगंधी
चोहिकडे शिंपावे,...!
सुखाचे मंगल क्षण
आपणांस लाभावे ..........!!
श्री लक्ष्मी - नारायण घरी तुमच्या यावे .........!
शुभेच्छांनी अवघे अंगण तुमचे भरावे .......!!
*"मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"*🙏🙏

भागवत पाटिल जळगाव....
*गोम*

उत्तर शोधायला नेमके प्रश्न हवे असतात ..!
शोध संपतो तिथेच जिथे प्रश्न नवे असतात ..!!

एक अधिक एक उत्तर जरी दोन होते ...!
एक से भले दोन हेच खरे क्षण होते ...!!

गुणाकार भागाकार जगण्याची रित झाली...!
बेरीज वजाबाकी मात्र जीवनाची प्रित झाली..!!

हातचा घेता घेता हातचे सोडून गेले ..!
रिकामी कटोरी पाहून पाहणारे हात जोडून गेले...!!

देता घेता सारे आयुष्य कष्ट उपसण्यात गेले ..!
फेकलेल्या पत्रावळीत काय उष्टे राहून गेले..!!

अजब खेळ हा सारा कठपुतली बाहुल्याचा झाला ..!
नाचवतो बोटावर तो खेळ बोलक्या बाहुल्याचा झाला ..!!

खुप झाले लिहिणे वाचतो इथे कोण आहे ..!
शब्दांच्या पलीकडले लिहितो इथे कोण आहे.. !!

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
📌
*अलक*

डोहाळे जेवणाचा घरगुती कार्यक्रमाचे त्या दांपत्याने मोठ्या आनंदाने साजरा केला . वेटाळातील कुमारीके पासुन ते वयोवृद्ध महिलांची गर्दी घरात दाटुन भरली होती .
*नववधू समोर वेगवेगळ्या मिष्टान्नाने झाकलेले ठेवले अन् तीला एक झाकण उघडायला सांगितले तिने एक झाकण उचलताच बर्फी पाहुन जमलेल्या महिलांन मधुन एकच आवाज आला अरेरेsssss बर्फी निघाली का ?*

✒️
*सुभाष उमरकर,सामनगांव नाशिक.*
पाहून प्रिये तुला
माझा मी न राहिलो
कळेना माझे मला
जगाचे भान विसरलो ...!!

विसरून मी स्वत:ला
तुझ्यात गुंतला गेलो
माझ्या ही नकळत मी
तुझा शब्द झेलत गेलो ...||

तुझ्या मोहिनी शब्दांच्या
प्रेमात मी न्हालो
तुझ्या प्रेमळ स्पर्शाने
प्रिये तृप्त मी झालो ...||

दिवस असो की रात्र
स्वप्न मी पाहिले
नाही विचार कशाचा
जीवन तुला वाहिले ..||

बघ जमत का तुला
माझ्या सारख वागायला
असतो छंद जगण्याचा
आता लागले समजायला ..!!

✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*मी*

गरज भासते तेव्हा जमतो मी।
एरव्ही मात्र डोळ्यांत सलतो मी॥
विश्वास आपल्यांवर टाकतो मी।
धोका देण्यासाठी मग मिळतो मी॥

खरं बोललो की टोचतो मी।
जगाला एवढा का बोचतो मी॥
दुःख देणारास विसरतो मी।
सावरायला नकळत असतो मी॥

जीवलगांना मात्र कळतो मी।
त्यांच्यासाठीच तर नडतो मी॥
अपयशाचा धनी असतो मी।
शेवटी निमूट सहन करतो मी॥

✒️✒️*प्रा. योगेश त्रिंबकराव भोसले*
बीड
कविता आवडल्यास नक्की प्रतिक्रीया द्या🙏🏻
📌
*अलक*

तशी त्याची ही रोजची सवय होती . तासन् तास काठावर बसुन नदीपात्रात एक एक खडा फेकायचा आणि निर्माण होणाऱ्या वलयाकडे एक सारखे तो संपेपर्यंत पाहत बसायचे .
*एक वलय कधी काळी त्याच्या भोवती ही होत पण तेही असंच नदीपात्रात निर्माण होणाऱ्या वलया सारखं हळूहळू संपलं होतं .*

✒️
*सुभाष उमरकर,सामनगांव नाशिक.*
सलाम करा या तिरंग्याला 🇮🇳
जी तुमची शान आहे...!

मान नेहमी वर उंच ठेवा ..,
जो पर्यंत प्राण आहे ..!

असंख्यांनी केले ..
तुझ्यासाठी बलिदान ..!

गाऊ त्या भारतमातेचे गुणगान...!!

सर्व भारतीयांना ...
माझ्या व माझ्या परिवाराकडून
२६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक~हार्दिक शुभेच्छा....!! 🇮🇳🙏🙏
On the eve of Republic Day, Padma Nagri Awards, which are the highest awards in the country, were announced and there was an opportunity to make the nation proud. Hearty congratulations to all the Padma award winners who have become 'India's ideal' by doing remarkable work in various fields!💐💐💐
बाणाक्षरी
-------

🇳🇪🇳🇪🇳🇪

हा
माझ्या
देशाचा
गणतंत्र
दिस मानाचा
करिती साजरा
सण लोकशाहीचा
सन्मान
जगात
ध्वज तो
नभात
फडके
जोरात
‌. डौलाने

🇳🇪🇳🇪🇳🇪

विजयकुमार गोखले
कर्जत




.
बाणाक्षरी
-------

🇳🇪🇳🇪🇳🇪

हा
माझ्या
देशाचा
गणतंत्र
दिस मानाचा
करिती साजरा
सण लोकशाहीचा
सन्मान
जगात
ध्वज तो
नभात
फडके
जोरात
‌. डौलाने

🇳🇪🇳🇪🇳🇪

विजयकुमार गोखले
कर्जत
*विश्वास*

मनातलं माझ्या सर्व तुला
केव्हा पासुन सांगायचं होतं ...!
तू अचानक बोलली मला
हे तर मला आधीच माहीत होतं ...!!

किती सांगु किती नाही
मला असं प्रत्येक वेळी व्हायचं ...!
तू मात्र जेव्हा तेव्हा
माझ्या आधीच व्यक्त व्हायचं ...!!

असं नव्हतं कधी मला
तुझ्या मनाची भाषा कळली नाही ..!
उगाच तुझं मन दुखवू नये
म्हणुन माझी जीभ वळली नाही ...!!

जाऊ दे ना आता तुला
माझं प्रत्येक गुपित कळलं आहे ..!
प्रेम आपलं आता बघ ना
नव्या वळणावर वळलं आहे ...!!

प्रेमाची सोबत आपण आता
प्रत्येक क्षणोक्षणी करीत राहु ..!
सात जन्म कुणी पाहिले
निदान एकमेकांच्या मनात राहु ....!!

*सुभाष उमरकर,सामनगांव नाशिक.*
*सत्य*

*आयुष्याचं ओझं ज्याचं*
*त्यालाच वाहायचं असतं*
*सुख: दुःखाचं भार*
*ज्याचा त्यालाच पेलवायचा असतो ..!!*

*इजा पोहचवणारी माणसं*
*नेहमी आपलीच असतात*
*पायाच्या वहाणाची फक्त*
*मापे बदललेली असतात..!!*

*कोण म्हणतं सुख*
*शोधुन सापडत नाही*
*दुःखाला दुर सारा*
*वाट आडवी येत नाही...!!*

*माझं तुझं करण्यात*
*वेळ वाया गेला*
*मरणाच्या दारात फक्त*
*एकटाच तो गेला...!!*

*काय कमावले काय गमावले*
*हिशोब कशाला करायचा*
*ताळेबंद जीवनाचा करताना*
*घोळ कायमच असायचा...!!*

*सोबत काही क्षणाची*
*इथेच विसरावी लागते*
*जगी अंती जाताना*
*एकट्यालाच जावे लागते..!!*

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
*नातं*

पान आयुष्याचं वाचायला
घेतले जेव्हा मी हाती
तेव्हाच कळले मला
किती महत्वाची असतात नाती...!!

कितीही दुर असलो तरी
आठवण येते क्षणोक्षणी
एकांत धुसमुसतो मनात
डोळ्यातून वाहते पाणी...!!

मनातील विचारांची पाने
असतात नेहमीच भरलेली
चांगले वाईट शब्द
मनावर जातात कोरली....!!

मित्राच पान नेहमीच
ठेवतो मी कोरं
शब्द नाही सुचत तेव्हा
कारण नातं असतं खरं ...!!

बोल आठवतात आईचे
जरी बोबडे माझे बोल
आईची बाबांची शिकवण
आहे माझ्यासाठी अनमोल ...!!

घेऊन वसा सत्याचा
माझा मी बदलायला निघालो
आहे विश्वास सोबतीला
स्वप्न घडवायला निघालो ...!!

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
*माझं बाळ*

गोंडस, इवलेसे, निर्मळ,
निरागस, माझं बाळ..
पाहे मज टकमक,
करत त्याचे खेळ..

स्पर्श त्याचा कोमल,
मिळे आनंद निखळ..
गोड गुलाबी त्याचे स्मित,
वाटे खुपच दुर्मिळ..

सोबत बाळा तुझी असता,
वेगात निघुन जाते सकाळ..
तुझी आठवण सतत,
जरी नसतो मला वेळ..

भेट तुझी होण्या लवकर,
परत व्हावी संध्याकाळ..
गोंडस, इवलेसे, निर्मळ,
निरागस माझं बाळ..

*@- प्रा. योगेश त्रिंबकराव भोसले*
*प्रपोज डे*
❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

भलेही नकार नव्हता ,शब्दात तुझ्या
होकाराचा इशारा मला कळलाच नाही .....!!

लाख बहाणे केले तू ,मला टाळण्याचे
योग भेटीचा येणे ,जुळलाच नाही ....!!

आतूर होता जीव ,फुलपाखरचं जीणं
मोह मिलनाचा मी ,सोडलाच नाही ...!!

कधी भेटली कधी , हसुन बोलली
जीव तुझा माझ्यावर भाळलाच नाही ...!!

मी माझ्या आनंदी ,जगण्यावर भर दिला
ध्यास तुझ्या ध्येयाचा तू सोडलाच नाही ....!!

चल गडे एकदा , नव्याने जगुन पाहु
आयुष्य चार दिवसांचे ,बाकी काहीच नाही ...!!

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
अप्रतिम लेख आहे नक्की आवडेल.

*OUT LET*

लाखो जीव घेणार्‍या क्रूर *हिटलरने* शेवटी आत्महत्या केली !........
सुंदर विचार देणारे *साने गुरुजी* आत्मघात करुन घेतात.
मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे *स्वामी विज्ञानानंद* मंत्रालयावरुन उडी मारुन जीव देतात.
आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे *भैय्युजी महाराज* आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात.
पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करुनही *सुशांत सिंग राजपुतनं* नैराश्यातून आत्महत्या केली.
-आणि आता सहा आठ महिन्यांपूर्वी नैराश्याशी लढा कसा द्यायचा हे शिकवणाऱ्या *शीतल (आमटे) करजगी* आपलं जीवन संपवतात.
-आजची नागपूरची बातमी *उच्च विद्याविभूषित, दिवंगत कुलगुरूच्या पत्नी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. ज्योत्स्ना मेश्राम* यांनी नवव्या माळ्यावरून उडी घेऊन नैराश्यातून आत्महत्या केली.

या काही सेलिब्रिटींच्या उदाहरणातुन काय शिकायचं आपण? ........

पाण्यात शांतपणे पोहोणारं बदक वरुन शांत दिसत असलं तरी पाण्याखाली त्याचे पाय वेगानं हलत असतात. शांत पोहोतोय हे दाखवण्यासाठी करावे लागणारे त्याचे कष्ट फक्त त्यालाच माहित असतात.
*माणुस वर वर दिसतो तितका आतून खंबीर असेलच असं नाही.* त्याच्या मनात वेगळी खळबळ असु शकते, जी आपल्यापर्यंत पोहोचत नसते किंवा तो त्या आनंदी आणि सुखी चेहर्‍याच्या आड लपवत असतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो. शेवटी काय...?? वर सुंदर ताजमहाल असला तरी खाली कबरच आहे हे विसरुन चालणार नाही.
भय्यूजी महाराजांनीआत्महत्या केल्या नंतर ABP माझा चॅनलने एक परिचर्चा घडवून आणली होती.
त्यात बोलताना भय्यूजी महाराजांचे मित्र - श्री. अशोक वानखेडे यांनी मानवी स्वभावाचा फार चांगला पैलू सांगितला. भैय्यूजी महाराज स्वतः एक *अध्यात्मीक* गूरू होते परंतू ते एक व्यक्ती पण होते. आपल्या मनातील *स्ट्रेस* बाहेर काढायला त्याच्या जवळ *outlet* नव्हता. डॉ. शितल आमटे (बाबा आमटे यांची नात - त्याचं ही अगदी भैयु महाराजासारखं झाले.)
*इतकं महत्वाचं असतं का हे outlet ?*
होय !!!
कोट्यावधी रूपये खर्च करून पाण्यासाठी विशाल *धरण* बांधलं आणि समजा त्याला outlet च दिले नाही तर काय होईल? निश्चितच धरण फुटेल. इतकं महत्वाचं असते हे *waste weir* ...मानवी शरीर म्हणजे विविध पंचतत्वापासून सांधलेलं एक *धरणच* आहे. या शरीरात समस्यांची आवक अति प्रमाणात झाली तर हे शरीररूपी धरण फुटेल की राहील ?
*मुंबई का तुंबते? पुरेसे outlets राहिले नाहीत.*
म्हणून आपलं outlet सदैव सताड उघडं ठेवा. आपल्या तोंडाचे *outlet* वापरून आपल्या समस्या आपल्या माणसांना सांगा. आपल्या अंर्तमनाचं outlet open करण्यासाठी meditation चा अवलंब करा आणि शक्य झाल्यास जगातील सगळ्यात मोठं *outlet* म्हणजे आपले डोळे, ते उघडा. फुटून जाऊ द्या अश्रूंचा बांध...वाहून जाऊ द्या.. स्ट्रेस, दुःख, उपेक्षा.. पिस्तुलच्या गोळीने डोक्याला छिद्र पाडण्यापेक्षा, पंख्याला लटकण्यापेक्षा.. हे केव्हाही सोपं नाही का.?
*म्हणूनच मित्र नावाच्या खांद्याचा आधार घ्या. मन मोकळं करा. बेस्ट आउटलेट परीवार आणि मित्र!*
हसा ! बोला ! रडा ! भांडा !
व्यक्त व्हा !! मुक्त व्हा.. !!

*काळजी घ्या....*

🙏😊🙏सोडून गेल्यावर *"ᴍɪss ʏᴏᴜ"* म्हणण्यापेक्षा

🙏😊🙏सोबत आहे तोपर्यंत *"ᴡɪᴛʜ ʏᴏᴜ"* म्हणा. आपुलकीची माणसं मिळायला खुप मोठं भाग्य लागतं.

*समस्त मित्राना समर्पित...*
💐🙏🙏💐
*प्रेम विरह*

प्रेम माझं तिला दिसलं नाही,
जीव तिचा माझ्यात गुंतला नाही,
वेड माझं तिला कळलं नाही,
स्वप्न पाहायचं मात्र मी सोडलं नाही..

गुलाबाचं फुल तिने घेतलं नाही,
मागे वळून सुद्धा पाहीलं नाही,
प्रीत माझी बहरली नाही,
प्रयत्न करायचं मात्र मी सोडलं नाही..

होकार तिचा मिळवणे जमलं नाही,
वास्तव मला कबूल झालं नाही,
असणं माझं तिला आवडलं नाही,
तिच्यासाठी झुरणं मात्र मी सोडलं नाही..
@प्रा.योगेश त्रिंबकराव भोसले
तुझ्या मौनाचा अर्थ
न समजण्या इतका
अरसिक नव्हतो मी .....

अन् तू माझ्याशी
कुठलं नातं जोडतेस
हे ही जाणुन होतो ....

पण तू मात्र
तसे भासवु देत नव्हती
कारण .....

तुझ्या हास्यावर
टिप्पणी करण्यास माझ्या
शब्दकोषात कदाचित
शब्द अपुरे होते ....

तुझ्या प्रत्येक भेटीत
तुला भेटण्याची उत्कृटता
मी लपवु शकलो नाही .....

पण माझी ही
धडपड पाहून तू फक्त
हास्य करीत राहीली .....

✒️✒️
*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*