मी मराठी कविता समुह.....
3.95K subscribers
2.25K photos
30 videos
4 files
90 links
🙏मी मराठी कविता संग्रह🙏

"मराठी आणि हिंदी ,कविता, लेख"

@khpatil
Download Telegram
भाऊबीज

खंत आई राहिली
मनी बहीण नाही या भावा !
भाऊबीज झाली साजरी
पोटाच्या गोळ्यांनी जपला ग ठेवा !!

कळते आज मातृत्व आई
बनून बहीण ओवाळते मज बाई !
धन्य तुझी माया ज्यात जन्मली
बापाची लाडकी ताई !!

खेळ नशिबाचा
ना जाणे अभागी !
स्त्री सत्वच आहे महान
त्यात सामावली महामायेची शक्ती जगी !!

नका हो करू हत्या
स्त्रीभ्रूणाची तरसेल भाऊ बहिणीला !
जाणा सत्व वेळीच स्त्रीचे
जननी आहे ती जगताला !!

कवी धनंजय इंगळे
पुणे
*दिप*

आता नको ते दीलासे
आणि नको ते बंधन नात्याचे ...
जोडणारे धागे मनाचे
कच्चेच दुवे असतात भावनांचे ..!
साखरेचा गोडवाही संपला
वाहत्या पाण्याचा पाट झाला...
चाचणीचा तारही तुटुन गेला ..!
कशाला हवी ती रुढी परंपरा. ?
खोटीच औपचारिकता,
अन् खोटाच तो दिखावा..
नातं असावं विश्वासाचं
घट्ट असणा-या मनाचं
क्षणिक नसणारं ...
पानगळीच्या पानाला हवा असतोच ना
ओलावा देणारा गारवा ...!
पुन्हा नको तो
फसवा आभास , वरकरणी प्रेम ...
आता मी एकटाच करतोय प्रकाशमान
दिपावली च्या ज्योतीने अंगन माझे ..!
आरतीच्या ताटातला दिप बघ
अजुनही तेवतो आहे .....!!

*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक*
*आनंद*

अंधार रात्रीचा होता तसाच आहे
आशा मज उद्याची स्वप्न डोळ्यात आहे ....!!

चाहुल जरा लागता भीती सावलीची वाटते
स्वतः च सावलीचा आधार शोधत आहे ....!!

चंद्र माथ्यावर येता मन शांत होते
माथ्यावरचा चंद्र तिच्या काळजात आहे ....!!

हे तारकांनो उभारा शामियाना आनंदाचा
शहनाई आनंदाची मांडवात वाजत आहे ....!!

हळूवार रात्र सरते डोळे निद्रीस्त होतात
बांग कोमड्यांची कानात गुंजत आहे ....!!

प्रभातीचे रंग लेऊनी धरा उजळून निघाली
तृप्ती चे समाधान आज मनात आहे .....!!

*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक*
9022622856
9284639442
*आनंद*

अंधार रात्रीचा होता तसाच आहे
आशा मज उद्याची स्वप्न डोळ्यात आहे ....!!

चाहुल जरा लागता भीती सावलीची वाटते
स्वतः च सावलीचा आधार शोधत आहे ....!!

चंद्र माथ्यावर येता मन शांत होते
माथ्यावरचा चंद्र तिच्या काळजात आहे ....!!

हे तारकांनो उभारा शामियाना आनंदाचा
शहनाई आनंदाची मांडवात वाजत आहे ....!!

हळूवार रात्र सरते डोळे निद्रीस्त होतात
बांग कोमड्यांची कानात गुंजत आहे ....!!

प्रभातीचे रंग लेऊनी धरा उजळून निघाली
तृप्ती चे समाधान आज मनात आहे .....!!

*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक*
9022622856
9284639442
व्यथा पोलीस पत्नीची....
#गडचिरोली
*कधी संपती हे दिसे*

कधी संपती हे दिसे
मन ही झाले वेडेपिसे
क्षणही तो युगासम भासे
तुजविण जगण्या आस नसे

चार मासाचा वनवास घडता
घरे हृदयी सोबत सोडता
विरघळले अश्रूसवे वचन तोडता
दुःखी पिंजऱ्यात काळीज कोंडता

तुजविण असे मी निराधार
तव आठवणींचा मज आधार
स्वप्नाच्या घोड्यावर मी स्वार
कीती वेदना तरी न हार

मज स्वप्न ते स्वप्नच वाटे
घायाळ करिती विरहाचे काटे
मज स्वप्नांची ती पहाट कोठे
स्वप्नांहून भासे हे बंध मोठे
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
PSI अजय दत्तात्रय चव्हाण
खाकी वर्दीतील दर्दी कवी
*जागर*

रात्र काजव्यांची
चांदण्यांना लाजवते
अंधारलेल्या दिशांना
सारी रात्र जागवते ....!!

घेऊन प्रकाशाचे दान
चंद्र झाला प्रकाशित
शाप आला नशिबी
असे पुथ्वीच्या समिप .....!!

मन आतुरलेले
भेट सख्याची घेण्यास
निशाचर झाला भुंगा
बंदिस्त फुलांच्या मिठीत ...!!

गंध गंधाळल्या दिशा
वारा फिरे चौहुकडे
नव निर्मितीचा ध्यास
पराग कणांच्या मनात .....!!

आस मनी उद्याची
हर्ष काळजात दाटे
सखीच्या मिलनाची
आहे हुरहुर मनात .....!!

स्वप्न पाहतो पाहतो
रात्र उघड्या डोळ्यांची
जागर करतो स्वप्नपुर्तीचा
रोज साखरझोपेत......!!

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*
*श्रध्दा आणि सबुरी*

जेव्हा पेटवशील अंधार चिरण्या
समई देव्हा-यातील होईल मी ....!

वात होऊनी निरंतर जळेल
जीवन प्रकाशमय तुझे करीन मी ....!

भाव भक्तीचा खेळ हा सारा
नाद होऊनी गुंजेल मी ...!

दरवळेल सुंघद जीवनात तुझ्या
धुप होऊनी पेटेल मी ...!

वाहशील जेव्हा सुंदर फुले
सुगंध होऊन पसरेल मी ....!

आसनस्त होऊन जपमाळ जपते
नाम तुझेच मग होईल मी ....!

तु धागा हो घट्ट सुखाचा
गाठ आयुष्याची बांधिल मी ...!

चालेल पुजा ही नित्य निरंतर
तु भक्ती भाव होईल मी ....!

दगडात वसु दे देवपण आता
नतमस्तक तिथेच होईल मी ...!

असाच चालतो खेळ श्रध्देचा
सबूरी मनात ठेवेल मी ....!

देव नाही देवळात सखे
प्रेमातून हे सिध्द करीन मी ....!

*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक*
होशियारी

राक्षसी सैतानी संदिग्ध भारी
दाखवतात नेहमी हुशारी
मराठी द्वेषाची त्यांना खुमारी
शब्दरूपी बाण सोडती विषारी

संवैधानिक पदावर जरी स्वारी
पाठबळावर करतात हरामखोरी
आग लावून वर चालू मुजोरी
व्यवस्थेत आहेत असे बुरखाधारी

द्वेषापोटी होतात आंधळे
साथीला काही मराठी वेंधळे
ईतीहासाला फासतात काळे
विषमतावादी धुर्त भोळे

संधिसाधू भ्रष्ट राजकारणी
तडीपारांची करतात मनधरणी
शिवशाहीशी करतात बेईमानी
आपल्याच विचारांची पेरणी

वसंत गवळी गोंदिया
" गज़ल - चंद सिक्के "

चंद सिक्कों की लालच,
कहाँ ले गयी ।
अच्छा खासा था जीवन,
सजा हो गयी ॥
अकेला मैं बैठा अब,
सोचा करूँ ।
क्यों ये मुझसे न जाने,
यह बात हो गई ॥
चंद सिक्कों की लालच,
कहाँ ले गयी....॥१॥

तोड़े रिश्ते ये नाते,
पैसों के लिए ।
हर दिन हर पल,
है धोखे दिये ॥
भरोसा मैंने तोड़ा,
बुराई हुयी ।
इंसानियत न जाने,
कहाँ सो गयी ॥
चंद सिक्कों की लालच,
कहाँ ले गयी....॥२॥

बीवी बच्चों को छोड़ा,
शैतानी हैं की ।
ख़ाली पैसों को मैंने,
अहमियत हैं दी ॥
शराब और जुए की भी,
लत लग गयी ।
मेरी ही बुराई मुझको,
डुबो ले गयी ॥
चंद सिक्कों की लालच,
कहाँ ले गयी....॥३॥

ऐसी नहीं क़ोई बात,
जो मैंने ना की ।
दोस्त भाई किसी की भी,
पर्वा ना की ॥
बाजारेहुस्न जानें लगा,
रंगीनियों में खोने लगा ।
दुनियादारी की मुझको,
ना चिंता हुयी ॥
चंद सिक्कों की लालच,
कहाँ ले गयी....॥४॥

अंत मे क्या है मिला,
क्या हुआ सिलसिला ।
सारे अपनो को मैंने,
गंवा है दिया ॥
ठोकर खाने लगा,
आँख रोने लगी ।
बुरे कर्मों की सजा,
मुझे मिल गयी ॥
चंद सिक्कों की लालच,
कहाँ ले गयी....॥५॥

✍️ अजय गणेशवार, नागपुर.
वेड तर मलाही होतं
फक्त तुझ्यातच रमायचं
नाही ठेवलं भान मी
सांग मागचं आयुष्य कसं विसरायचं ....?

माझा मी तुझ्यात असा
बेभान होऊन रमलो
नव्हती उसंत क्षणाची
काही क्षणात कोलमडलो ....!

असणं नसणं जणू हा
नियतिचा खेळ झाला
दोरी वरचा खेळ डोंबाऱ्याचा
कुठे आयुष्याला पुरला ....!

नभी पसरला होता जेव्हा
असंख्य तारकांचा पसारा
काळोख दाटला अमावस्येला
चंद्र काळोखात बुडाला ....!

सखे प्रेमाची उपमा तुला
आता देऊ कसा मी
विरहाच्या कवितेले शब्द
दुःखी मनाने मांडु कसा मी ...!

लिहिण्यासारखे खुप असते
उगाच आलाप ओढणार नाही
आनंदी जगण्याचा तुझा मंत्र
आता मी विसरणार नाही ...!

*सुभाष उमरकर , सामनगांव नाशिक*
*स्मृती*

सामोरी येता टाळुन गेला तू
असा कसा जाळून गेला तू ..!!

अशीच का लागली ठेस मनाला
काळजात जखमा करून गेला तू.....!!

वाट मोकळीच होती त्या क्षणाला
एकटाच वाटेवर सोडून गेला तू ..!!

अबोल भावना ओथंबुन आल्या
नजरेची भाषा न समजुन गेला तू ...!!

पायवाटेवर चे ठसे पुसले जात नाही
वाळूत रेघोट्या ओढून गेला तू ...!!

येतो तो काळ निघून जातो
काळजातले घर पाडून गेला तू ..!!

ये पुन्हा मी म्हणणार नाही
आठवणींचे गाठोडे सोडून गेलातू ....!!

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक.*
Forwarded from _₹विkant Wakude
Forwarded from _₹विkant Wakude
देखण्या रूपाची तुझ्या
काय किमया सांगु..
जगातील आश्चर्याचा
आठव्या निकरा जणू..
            _₹वि़kant
Forwarded from Anil Rathod
जेव्हा परिस्थिती परीक्षा घेत असते

🌷🌷 तिथे🌷🌷

माणसांचा राग करण्यात अर्थ नसतो.

☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️
©अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677
*गारगोटी*

कोरलेल्या काळजातून
दिसतील का तुला ...
तुझेच ओरखडलेले निशान !
मी तर जखमांची
मलमपट्टी करणं ही सोडलयं ....
.भीती वाटते आता
ओली जखम पुन्हा चिघळली तर ..??

जखमेचं काय गं
ती पाठीची असो
की असो छातीची ...!
वेदनेची झळ तर
हृदयालाच होते ना ...?

कठोर मनाची तुझी
दुधारी तलवार तर
सरळ वार हृदयालाच
करुन गेली ...!

पाषाणाचेही घर्षन होतं म्हणतात
पाण्याच्या प्रवाहाने....
पण तुझ्या अश्रुंची तर आता
गारगोटी झाली चकचकणारी ...!

किंबहुना मी तर म्हणेल
वाहत्या प्रवाहात गरगरीत
झाली ..
आकार असुनही हुंकार
नसलेली,
निर्जीव दगडा सारखी ....!

*सुभाष उमरकर,सामनगांव नाशिक*
*जीवन गाणे*

खेळ होता की , होता तो बहाना
सांग ना सखे का ,तु साधला निशाणा ...?

भुललो जरी मी ,याद ती पुराणी
तरी पुन्हा पुन्हा का, येते साद कानी ...?

चालणे थांबणे हे ,नित्यक्रमाचे जगणे
मन बावरे सखे ,नको गाऊस तेच गाणे ...!

ध्यास अंतरीचा आस ,नको सोडु तु
अंथरूण पुन्हा गालिचा, स्वप्न उद्याचे रंगव तू ....!

असतो रोज मी संगतीत ,गंध मनी मातीचा
जरी आहेत बेरंग ,ताटवा रान फुलांचा ....!

सखे गंध अत्तराचा ,कोरडाच आहे फाया
चलबिचल वाढता मनी, का थरथरते काया....?

चल बदलुन टाकु ती रीत जगण्याची
अन् पुन्हा संगतीने गाऊ तीच गाणी संगतीची ...!

✒️
*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक.*
------  माझा कृषिप्रधान भारत  ------


स्वत:ला कृषिप्रधान
म्हणवणाऱ्या भारताची पहा
अवस्था ही झाली कशी.......
कर्जाच्या त्या दोरीनं ,
इथला शेतकरी राजाच घेतोय फाशी......

फाशी घेतलेल्या त्या बापाची
ऐका सांगतो कहाणी........
झाडाला लटकलेला तो बाप आठवला
की डोळ्यांत येत पाणी......

लटकलेल्या त्या बापाला आठवून
घरदार माझा रडतो......
इथ शेतकरी जगला काय अन् मेला काय सांगा कुणाला फरक पडतो ......

भरलेल्या त्या डोळ्यांतल्या पाण्याला
आता असच रोखून धरतो.......
मेलेल्या बापाचा हा पोरका मुलगा
कृषीप्रधान भारताला
ही कविता अर्पण करतो........

मी पुन्हा येईन,
मी पुन्हा येईन म्हणणारा मात्र
पुन्हा नाही आला ........
पण जगाला पोसणारा तो बाप माझा
त्या बांधावरच्या झाडाला लटकून मेला.....

घरातल्या हार घातलेल्या
त्या बापाच्या फोटोकडे पाहिलं की,
येतो अश्रूंचा पूर......
आणि डोळे पुसत आईपण म्हणायची
फारच झालाय चुलीत धूर.......

सत्तेच्या त्या खुर्चीसाठी
लोकशाहीचा तुम्ही बाजार केला.....
पण कर्जात बुडालेला तो बाप माझा
त्या बांधावरच्या
झाडाला लटकून मेला ...........

जिवंत असणाऱ्या माझ्या बापाच्या पिकाला या सरकारने हमीभाव
नाही दिला......
म्हणून आमचा बाप आम्हाला पोरक
करून गेला..........

जिवंतपणी माझ्या बापाच्या कष्टाचं
उष्ट तुम्ही खाता.......
आणि बाप मेल्यावर मदत म्हणून
फक्त काही लाखांत पैसे देता......

अरे! शेतात काबाडकष्ट करून-करून
बाप माझा मेला.......
आणि मेल्यावरही देहाचा त्याच्या
फक्त काहीं लाखांत सौदा केला......

आता तुमच्या त्या लाखो रुपयांच्या मदतीचा काय आम्हाला फायदा........???
बाप मरेपर्यंत.....माझा
झोपला होता का रे! तुमचा कायदा.....???

आता कायदा ही जाऊद्या......!!!!
आणि, फायदा हि जाऊद्या......!!!!
शेतकऱ्यावर झालेल्या
अन्यायाचा प्रश्न आज ना उद्या सुटेल.........
पण मेलेला तो बाप माझा
मला कसा परत भेटेल
सांगा ना!! मला कसा परत भेटेल...????
      

    ----------------------  स्वरचित कथन :
                               अमर रमेश राजमाने
                               मु.पो. बेलगाव
                               ता: आष्टी, जि: बीड
                               मो:9373716863
*शोध*

नेहमी वाटे शिरावरती,टांगती तलवार आहे ..
किती जाहले तुकडे ,मन बेजार आहे .....!!

किती झेलतो वार, जखमांची गिनती कशाला ....
मन झाले पाषाण ,धारधार अवजार आहे ...!!

हिमालय साठवला कोणी ,मनाच्या गाभाऱ्यात.‌.
गोठले काळीज प्रश्नांनी , मोठा आजार आहे ....!!

तू आहेस सोबतीला, बळ हत्तींचे मिळते ....
सामना संकटाशी पराभव मानण्यात नकार आहे ..!!

स्वप्न उद्याचे पाहीले,बीज आशेचे पेरले ,
जरी लहरी निसर्ग ,रोपटे फुलणार आहे ....!!

कोण चालतो न पडता,वाट खडतर असता
सोबत चाललो हात घेऊन, ध्येय न दुर आहे .....!!

थांबायाचे आहे कुठे तरी विसावा निश्चित असतो ..
सोबत मिळो न मिळो ,सुख अपार आहे ...!!

✒️✒️
*सुभाष उमरकर ,सामनगांव नाशिक.*
*मी लढायला तयार झालो*

सांगु कुणा मी
माझेच दुःख जगाला
भेटले मला अनेक
त्यांचे दुःख सांगायला ...!!

हसण्यावारी नेले मी
क्षणोक्षणी मनाला
मला पाहून हसले
दुःख सांगु कसे कुणाला ...!!

सल मनातली मी
मनात दडवुन ठेवली
मन त्यांचे जाणताना
सुखाची भर घातली ....!!

जगी आला तो गेला
काय तमा इथे कुणाची
प्रत्येक जण सांगतो
व्यथा फक्त स्वतःची ....!!

माझा मी फक्त आता
जिंकण्यावर भर देतो
पराभवाच्या भाकड कथा
बासणात गुंडाळून ठेवतो ....!!

पुन्हा जगायला मी
नव्याने तयार झालो
मागे सारून दुःख सारे
मी लढायला तयार झालो .....!!

*सुभाष उमरकर सामनगांव नाशिक*