MPSC Science
67.1K subscribers
8.6K photos
54 videos
354 files
716 links
Download Telegram
🔹न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी):

#eMPSCkatta_Current_Affairs
#NSG

- गेली अनेक वर्षे भारत न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी)मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

- अमेरिका, मेक्सिकोपाठोपाठ ब्रिटननेही भारताला या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.


*पार्श्वभूमी व स्थापना:*

- १९७४मध्ये भारताने अणू चाचणी (बुद्ध हसला) केली आणि त्यानंतर अमेरिका, रशिया, कॅनडा, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या सात देशांनी ‘न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप’ स्थापन केला.

- त्यामुळे एकाअर्थाने भारतच हा ग्रुप बनण्यासाठी कारणीभूत ठरला.

- अणूतंत्रज्ञान आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला आळा घालणे, हा या समूहाचा प्रमुख उद्देश होता.

- मुख्यत: भारताला अणूतंत्रज्ञान मिळू नये हा उद्देश एनएसजीच्या स्थापनेमागे होता.

- १९७५ ते १९७८ या कालावधीत लंडनमध्ये अनेक बैठका पार पडल्या आणि कशाची निर्यात कुठल्या देशाला करता येईल, कुणाला करता येणार नाही आदी बाबींवर निर्णय घेण्यात आले.

- त्यानंतर १९९१पर्यंत एनएसजीची बैठक झाली नाही.

- १९९१च्या पहिल्या आखाती युद्धानंतर हा ग्रुप पुन्हा सक्रिय झाला.

*सदस्यदेश:*

- आजच्या घडीला या ग्रुपमध्ये ४८ सदस्य देश असूनबहुतांश देश युरोपीय खंडातले असून चीन, ऑस्ट्रेलिया व कोरिया सारखे देश आशिया खंडातले आहेत तर ब्राझिलसारखे मोजके देश लॅटिन अमेरिकेतले आहेत.

- एनएसजीच्या ४८ सदस्य देशांपैकी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन आणि रशिया हे पाच अण्वस्त्रधारी देश अशी ज्यांची ओळख आहे असे आहेत.

- तर उर्वरीत ४३ देशांनी एनपीटी म्हणजे न्युक्लिअर नॉनप्रोलिफरेशन ट्रिटीवर किंवा अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

- हा करार अन्यायकारक असल्याचे सांगत आजपर्यंत भारताने या करारावर सही करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळेच भारताचा एनएसजी मध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होता.

- पाकिस्तान व भारत आता मुख्यत: या महत्त्वाच्या ग्रुपमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. चीनचा भारताला विरोध तर पाकिस्तानला पाठिंबा आहे.

- भारताच्या प्रवेशाचा मार्ग खुला
जरी एनपीटीवर सही केली नसली तरी २००८ मध्ये भारताने अमेरिकेशी नागरी अणू करार केला.

- या करारानुसार आण्विक शक्तिचा वापर शांततेसाठी करण्याची, नागरी अणू कार्यक्रम आणि लष्करी अणू कार्यक्रम वेगळे ठेवण्याची ग्वाही भारताने दिली.

- याबरोबरचभारताचा १९७४पासूनचा सन्माननीय इतिहास बघता (ज्यामध्ये भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान अन्य देशांना दिलेले नाही याचा समावेश होतो) भारताबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायात विश्वास उत्पन्न झाला.

- त्यामुळे या गटामध्ये सहभागी होण्याचा भारताचा मार्ग खुला झाला आहे.

*एनएसजी सदस्यत्वाचे ४ महत्त्वाचे फायदे:*

1) वैद्यकीय क्षेत्रापासून ते अणूउर्जेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये आण्विक तंत्रज्ञान भारताला मिळू शकेल. एनएसजी चे सदस्य असलेल्या देशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे जे भारतीय तंत्रज्ञानापेक्षा विकसित आहे.

2) खनिज तेलांसारखी प्रदूषण वाढवणारी इंधने भारत उर्जा निर्मितीसाठी वापरतो. पर्यावरण रक्षणासाठी पर्यायी उर्जेचे प्रमाण ४० टक्के असण्याची गरज आहे. जर एनएसजी मध्ये प्रवेश मिळाला तर भारतासाठी अणूउर्जा प्रकल्प आयात करण्याचा मार्ग अत्यंत सुलभ होणार आहे.

3) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अणू उर्जेची निर्मिती केली तर स्वस्त वीज मिळेल आणि तिचा फायदा उत्पादन क्षेत्राला तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला होईल.

4)भारत एनपीटीवर सह्या करूनही हे सर्व मिळवू शकतो, परंतु तसे केल्यास भारताचा अण्वस्त्रांचा मार्ग बंद होतो. त्यामुळे एनएसजी सदस्यत्व मिळाले तर एनपीटीवर सही करण्याची राहणार नाही आणि लष्करासाठीचा अणू कार्यक्रमही अबाधित राहील.
.
सौजन्य : लोकमत वर्तमानपत्र
🔹न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी):

#eMPSCkatta_Current_Affairs
#NSG

- गेली अनेक वर्षे भारत न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप (एनएसजी)मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

- अमेरिका, मेक्सिकोपाठोपाठ ब्रिटननेही भारताला या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यासाठी पाठिंबा दर्शवला आहे.


*पार्श्वभूमी व स्थापना:*

- १९७४मध्ये भारताने अणू चाचणी (बुद्ध हसला) केली आणि त्यानंतर अमेरिका, रशिया, कॅनडा, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, जपान आणि इंग्लंड या सात देशांनी ‘न्युक्लिअर सप्लायर्स ग्रुप’ स्थापन केला.

- त्यामुळे एकाअर्थाने भारतच हा ग्रुप बनण्यासाठी कारणीभूत ठरला.

- अणूतंत्रज्ञान आणि आण्विक शस्त्रास्त्रांच्या प्रसाराला आळा घालणे, हा या समूहाचा प्रमुख उद्देश होता.

- मुख्यत: भारताला अणूतंत्रज्ञान मिळू नये हा उद्देश एनएसजीच्या स्थापनेमागे होता.

- १९७५ ते १९७८ या कालावधीत लंडनमध्ये अनेक बैठका पार पडल्या आणि कशाची निर्यात कुठल्या देशाला करता येईल, कुणाला करता येणार नाही आदी बाबींवर निर्णय घेण्यात आले.

- त्यानंतर १९९१पर्यंत एनएसजीची बैठक झाली नाही.

- १९९१च्या पहिल्या आखाती युद्धानंतर हा ग्रुप पुन्हा सक्रिय झाला.

*सदस्यदेश:*

- आजच्या घडीला या ग्रुपमध्ये ४८ सदस्य देश असूनबहुतांश देश युरोपीय खंडातले असून चीन, ऑस्ट्रेलिया व कोरिया सारखे देश आशिया खंडातले आहेत तर ब्राझिलसारखे मोजके देश लॅटिन अमेरिकेतले आहेत.

- एनएसजीच्या ४८ सदस्य देशांपैकी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, चीन आणि रशिया हे पाच अण्वस्त्रधारी देश अशी ज्यांची ओळख आहे असे आहेत.

- तर उर्वरीत ४३ देशांनी एनपीटी म्हणजे न्युक्लिअर नॉनप्रोलिफरेशन ट्रिटीवर किंवा अण्वस्त्रप्रसार बंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

- हा करार अन्यायकारक असल्याचे सांगत आजपर्यंत भारताने या करारावर सही करण्यास नकार दिलेला आहे. त्यामुळेच भारताचा एनएसजी मध्ये प्रवेशाचा मार्ग बंद होता.

- पाकिस्तान व भारत आता मुख्यत: या महत्त्वाच्या ग्रुपमध्ये सामील होण्यास उत्सुक आहेत. चीनचा भारताला विरोध तर पाकिस्तानला पाठिंबा आहे.

- भारताच्या प्रवेशाचा मार्ग खुला
जरी एनपीटीवर सही केली नसली तरी २००८ मध्ये भारताने अमेरिकेशी नागरी अणू करार केला.

- या करारानुसार आण्विक शक्तिचा वापर शांततेसाठी करण्याची, नागरी अणू कार्यक्रम आणि लष्करी अणू कार्यक्रम वेगळे ठेवण्याची ग्वाही भारताने दिली.

- याबरोबरचभारताचा १९७४पासूनचा सन्माननीय इतिहास बघता (ज्यामध्ये भारताने विकसित केलेले तंत्रज्ञान अन्य देशांना दिलेले नाही याचा समावेश होतो) भारताबद्दल आंतरराष्ट्रीय समुदायात विश्वास उत्पन्न झाला.

- त्यामुळे या गटामध्ये सहभागी होण्याचा भारताचा मार्ग खुला झाला आहे.

*एनएसजी सदस्यत्वाचे ४ महत्त्वाचे फायदे:*

1) वैद्यकीय क्षेत्रापासून ते अणूउर्जेपर्यंत विविध क्षेत्रांमध्ये आण्विक तंत्रज्ञान भारताला मिळू शकेल. एनएसजी चे सदस्य असलेल्या देशांकडे अद्ययावत तंत्रज्ञान आहे जे भारतीय तंत्रज्ञानापेक्षा विकसित आहे.

2) खनिज तेलांसारखी प्रदूषण वाढवणारी इंधने भारत उर्जा निर्मितीसाठी वापरतो. पर्यावरण रक्षणासाठी पर्यायी उर्जेचे प्रमाण ४० टक्के असण्याची गरज आहे. जर एनएसजी मध्ये प्रवेश मिळाला तर भारतासाठी अणूउर्जा प्रकल्प आयात करण्याचा मार्ग अत्यंत सुलभ होणार आहे.

3) अत्याधुनिक तंत्रज्ञानाने अणू उर्जेची निर्मिती केली तर स्वस्त वीज मिळेल आणि तिचा फायदा उत्पादन क्षेत्राला तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला होईल.

4)भारत एनपीटीवर सह्या करूनही हे सर्व मिळवू शकतो, परंतु तसे केल्यास भारताचा अण्वस्त्रांचा मार्ग बंद होतो. त्यामुळे एनएसजी सदस्यत्व मिळाले तर एनपीटीवर सही करण्याची राहणार नाही आणि लष्करासाठीचा अणू कार्यक्रमही अबाधित राहील.
.
सौजन्य : लोकमत वर्तमानपत्र
💡 विज्ञान मैत्री प्रश्नमंजूषा💡
🍀 उत्तरासाहित 🍀

🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥🍥
१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते
३) कमी होते
४) समान राहते

२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी

३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
१) नसते
२) असते
३) दोन्हीपैकी नाही
४) समान असते

४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन

५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती
४) मानवी प्राणी

६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे

७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा

८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त
३) वलयांकित
४) वरील सर्व

९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव
२) किटक
३) विषाणू
४) कृमी

१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा
४) नाक

११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार

१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव
३) साथीचे रोगविषयक
४) यापैकी नाही


Join our channel here @MPSCScience
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
प्राणी व त्यांचे आयुष्यमानप्राणी व त्यांची आयुर्मर्यादा-

१. मलेशियन कासव - १५० ते १६० वर्षे

२. कासव - ८० वर्षे

३. हत्ती - ६० वर्षे

४. चिँपाझी - ५० ते ६० वर्षे

५. गरूड - ५५ वर्षे

६. घोडा - ५० वर्षे

७. गेँडा - ४१ वर्षे

८. पाणघोडा - ४० वर्षे

९. अस्वल - ३४ वर्षे

१०. झेब्रा - २२ वर्षे

११. माकड - २० वर्षे

१२. वाघ - २० वर्षे

१३. मांजर - २२ वर्षे

१४. कुञा - २० वर्षे

१५. चिमणी - ७ वर्षे

१६. गोल्डफिश - १० वर्षे
🔭📡🔬🔭🔭🔬📡🔭
🌐भारतीय शास्त्रज्ञाचे शोध/पुरस्कार/कार्य🌐


🌐चंद्रशेखर व्यंकट रमन 🔹

रामन इफेक्ट, विज्ञानातील नोबेल मिळविणारे पहिले भारतीय (1930)
 
🌐डॉ. होमी जहांगीर भाभा 🔹

यांच्या अध्यक्षतेखाली भाभा, अणुसंशोधन केंद्राची स्थापना (BARC)-1957
 
जगदिशचंद्र बोस 🔹

वन्स्पतींना संवेदना असतात, असे प्रतिपादन केले. क्रेस्क्रोग्राफचा शोध बोस रिसर्च इन्स्टिट्यूट, कोलकाताची स्थापना
 
🌐श्रीनिवास रामानुज 🔹

आधुनिक काळातील एक असामान्य गणिती व्यक्तिमत्व
 
विक्रम साराभाई 🔹

शृंखला पद्धतीने अनुविच्छेदन करण्याचे तंत्र भारतात निर्माण केले. थुंबा (केरळ) येथे अग्निबाण प्रक्षेपण केंद्राची स्थापना (1963)
 
🌐हरगोविंद खुराणा 🔹

कृत्रिमरित्या जनुक (DNA) तयार केले. 1968 चा नोबेल
 
🌐डॉ. एस. चंद्रशेखर 🔹

तार्‍यांची रचना, सापेक्षता व कृष्ण विवर इ. विषयांवर सैद्धांतिक ग्रंथ निर्मिती, 1983 चा नोबेल
 
🌐बिरबल सहानी 🔹

जिन्मोस्पर्म या वृक्ष आणि रोपांचा शोध लावला. द पॉलिओबोटॅनिक सोसायटीची स्थापना (1946)
 
🌐सत्येन्द्रनाथ बोस 🔹

इलेक्ट्रॉन व फोटॉन कणांच्या समुहांचे संख्या शास्त्रीय नियम शोधले(1924). बोस आइनस्टाइन स्टॅटिस्टिक्सच्या नियमांना पाळणार्‍या अनुमधील मुलकणांना सत्येन्द्रनाथ बोस यांच्या सन्मानार्थ बोसॉन असे नाव देण्यात आले. जुलै 2012 मध्ये 'सर्न' या संस्थेने मिनी बिग बँग प्रयोगातून शोधलेला मूलभूत कण 'गॉड पार्टिकल' ला हिग्ज-बोसॉन कण असे नाव देण्यात आले.
 
🌐मेघनाथ साहा🔹

किरर्णोत्सर्ग दबावाचा सिद्धांत, थर्मल आयोनायझेशान सिद्धांत, इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स या संस्थेची भारतात स्थापना.
 
🌐जयंत नारळीकर 🔹

स्टडी स्टेट थिअरी या सिद्धांतास फ्रेड हॉइल यांना मदतीला घेऊन नारळीकरांनी नवे रूप देण्याचा प्रयत्न केला.
 
🌐सर व्यंकटरमन रामकृष्णन 🔹

2009 चे रसायन शास्त्राचे नोबेल, 2010 चे पद्मविभूषण, 2012 चा नाईटहुड पुरस्कार

🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰🔰
🔹भौतिक राशी व त्यांची परिमाणे/एकके :

क्र.भौतिक राशीपरिमाणे/एकक

1.विद्युतरोध-ओहम
2.विद्युतधारा-कुलोम
3.विद्युतभार-होल्ट
4.विद्युत ऊर्जा-ज्युल
5.वेग-m/s
6.त्वरण-m/s2
7.संवेग-kg/ms
8.कार्य-ज्यूल
9.शक्ती -ज्यूल/सेकंद
10.बल-Newton
11.घनता-kg/m3
12.दाब-पास्कल
____________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCScience येथे क्लिक करा.


 
Forwarded from MPSC Science
🔹भौतिक राशी व त्यांची परिमाणे/एकके :

क्र.भौतिक राशीपरिमाणे/एकक

1.विद्युतरोध-ओहम
2.विद्युतधारा-कुलोम
3.विद्युतभार-होल्ट
4.विद्युत ऊर्जा-ज्युल
5.वेग-m/s
6.त्वरण-m/s2
7.संवेग-kg/ms
8.कार्य-ज्यूल
9.शक्ती -ज्यूल/सेकंद
10.बल-Newton
11.घनता-kg/m3
12.दाब-पास्कल
____________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCScience येथे क्लिक करा.


 
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
उपकरण - उपयोग

• स्टेथोस्कोप–––हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.

• सेस्मोग्राफ–––भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.

• फोटोमीटर–––परकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.

• हायग्रोमीटर–––हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.

• हायड्रोमीटर–––द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

• हायड्रोफोन–––पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.

• अ‍ॅमीटर–––विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण

• अल्टीमीटर–––समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

• अ‍ॅनिमोमीटर–––वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.

• ऑडिओमीटर–––ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.

• बॅरोमीटर–––हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.

• बॅरोग्राफ–––हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.

• मायक्रोस्कोप–––सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

• लॅक्टोमीटर–––दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.

• स्फिग्मोमॅनोमीटर–––रक्तदाब मोजण्याचे साधन.
---------------------------------------------------------
जॉईन करा @MPSCScience
सामान्य विज्ञान (इयत्ता 5 वी) :

शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात.

 मेंदू, फुफ्फुसे, हृदय, इ. आंतरिंद्रियांची उदाहरणे आहेत.

 अन्नाचे पचन अन्न नलिकेमध्ये होते.

 अन्न पचनास मदत करणार्‍या रसास पाचकरस असे म्हणतात.

 तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते.

 डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक असतात.

 भुईमुंग, करडई यांसारख्या तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते.

 पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात.

 मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.

 आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते.

 ओ.आर.एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.

 पोटॅशिअम परमॅगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.

 खडकापासून मातीचा 2.5 सेमी पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्ष लागतात.

 डोंगर उतारावर घातलेल्या बांध्ंणा ताली किंवा ओटे म्हणतात.

 पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत कणाद महर्षींनी मांडले.

 कणाद महर्षींचा जन्म इसवी सनापूर्वी 6 व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजेच गुजराथ राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टम येथे झाला.

 पदार्थाच्या सूक्ष्मतिसूक्ष्म कणाला महर्षीनी 'पीलव' म्हटले आहे.

 उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात.
 उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणार्‍या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात.

 लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट व निकेल हे धातूही चुंबकाकडे आकर्षिले जातात.

 पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणार्‍या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात.

 बाष्पीभवन, सांद्रीभवन, विरघळणे, उत्कलन आणि विलयन हे भौतिक बदलाचे प्रकार आहेत.

 लोखंडी पत्रे, नळ इ. वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात.

 तांब्या-पितळेच्या भांड्यांना काथिलाचा लेप देऊन कल्हई करतात.
____________________________________
आमचे विज्ञान चे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCScience येथे क्लिक करा , आमचे चॅनेल ओपन होईल , चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या Join ऑप्शन वर क्लिक करा.