#eMPSCkatta_Telegram_Updates
🔹पंतप्रधान पीक विम्यात महाराष्ट्र देशात अव्वल
६७ लाख शेतकऱ्यांना सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण
राज्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये देशभरामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आला. राज्यातील सुमारे ६७ लाख शेतकऱ्यांनी सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण काढले आहे.
ही माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार अहमद पटेल यांच्यासह अनेकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषिराज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. त्यानुसार, २०१६च्या खरीप हंगामासाठी देशातील ३ कोटी २६ लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये एकटय़ा महाराष्ट्रातील ६६ लाख ७९ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. म्हणजे हे प्रमाण वीस टक्क्यांहून अधिक आहे. तसेच या ६६ लाख ७९ हजारांमध्ये कर्जाने वाकलेल्या २१ लाख शेतकऱ्यांचाही समावेश आहे. या सर्वाचा एकूण १६,९६४ कोटी रुपयांचा पीक विमा उतरविला आहे.
राज्यातील कृषी खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत प्रामुख्याने मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. आत्महत्याग्रस्त असलेल्या उस्मानाबाद, यवतमाळ, लातूर, बीडसारख्या जिल्ह्य़ांमध्ये सरासरी ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना विमा संरक्षणाखाली आवर्जून आणले आहे. जलयुक्त शिवार मोहिमेपाठोपाठ या विमा योजनेसाठी राज्याने खास प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
देशाचा विचार करता ३ कोटी २६ लाख शेतकऱ्यांचा ३८० लाख हेक्टर क्षेत्रासाठी १ लाख ३७ हजार ५३५ कोटींचा विमा उतरविला आहे. २०१५च्या खरिपामध्ये हेच प्रमाण ३ कोटी ९ लाख शेतकरी, ३३९ लाख हेक्टर क्षेत्र आणि विमा रक्कम ६९,३०७ कोटी रुपये होती. म्हणजे विम्याचे कवच मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या एका वर्षांमध्ये साडेपाच टक्क्यांनी, शेतीचे क्षेत्र बारा टक्क्यांनी आणि विम्याची रक्कम थेट शंभर टक्क्यांनी म्हणजे दुपटीने वाढली. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान (५३ लाख शेतकरी व १२ हजार कोटींचे कवच), मध्य प्रदेश (३२ लाख शेतकरी आणि वीस हजार कोटींचे कवच), आंध्र प्रदेश (१५ लाख शेतकरी व साडेचौदा हजार कोटींचे कवच) आणि उत्तर प्रदेश (३० लाख शेतकरी व १४ हजार कोटींचे कवच) यांचा समावेश आहे.
पाच वर्षांत २२ हजार हेक्टर शेतीवर गंडांतर
२००८ ते २०१४ या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील २२ हजार हेक्टर शेतीवर औद्योगिकीकरणाने गंडांतर आणल्याची माहिती राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात मिळाली. २००८-०९मध्ये राज्यातील २ कोटी ११ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्र शेतीखाली होते. हे क्षेत्र २०१३-१४मध्ये २२ हजार हेक्टरने घटून २ कोटी ११ लाख २७ हजार हेक्टरवर आले. त्यामुळे एकूण भूभागाशी असलेले शेतीचे प्रमाण ६८.७३ टक्क्यांवरून ६८.६६ टक्क्यांवर घसरले. थोडक्यात ०.०७ टक्के शेतीचे रूपांतर बिगरकृषी जमिनीमध्ये झाले. याच कालावधीत संपूर्ण देशामध्ये मात्र ६ लाख ९ हजार हेक्टर शेतजमीन (१८ कोटी २४ लाख ५९ हजारांवरून १८ कोटी अठरा लाख ५० हजार हेक्टरवर) बिगरकृषी कारणांकडे वळविली गेली.
औद्योगिकीकरणामध्ये महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या गुजरातमध्ये मात्र या पाच वर्षांमध्ये शेतजमिनीवर गदा न आल्याचे आकडेवारीतून दिसते आहे. २००८ आणि २०१४ या दोन्ही वर्षांमध्ये एकूण भूभागाशी शेतीचे असलेले प्रमाण ५३.३० टक्के एवढे कायम राहिले. दुसरीकडे आसाम, पंजाब आणि झारखंड आदी राज्यांमध्ये शेतीचे क्षेत्र आश्चर्यकारकरीत्या वाढले.
🔹पंतप्रधान पीक विम्यात महाराष्ट्र देशात अव्वल
६७ लाख शेतकऱ्यांना सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण
राज्यातील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिल्याने पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये देशभरामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल आला. राज्यातील सुमारे ६७ लाख शेतकऱ्यांनी सुमारे सतरा हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण काढले आहे.
ही माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार अहमद पटेल यांच्यासह अनेकांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कृषिराज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी शुक्रवारी राज्यसभेत दिली. त्यानुसार, २०१६च्या खरीप हंगामासाठी देशातील ३ कोटी २६ लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेतला. त्यामध्ये एकटय़ा महाराष्ट्रातील ६६ लाख ७९ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. म्हणजे हे प्रमाण वीस टक्क्यांहून अधिक आहे. तसेच या ६६ लाख ७९ हजारांमध्ये कर्जाने वाकलेल्या २१ लाख शेतकऱ्यांचाही समावेश आहे. या सर्वाचा एकूण १६,९६४ कोटी रुपयांचा पीक विमा उतरविला आहे.
राज्यातील कृषी खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत प्रामुख्याने मराठवाडा, खानदेश व विदर्भातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. आत्महत्याग्रस्त असलेल्या उस्मानाबाद, यवतमाळ, लातूर, बीडसारख्या जिल्ह्य़ांमध्ये सरासरी ९० टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना विमा संरक्षणाखाली आवर्जून आणले आहे. जलयुक्त शिवार मोहिमेपाठोपाठ या विमा योजनेसाठी राज्याने खास प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे.
देशाचा विचार करता ३ कोटी २६ लाख शेतकऱ्यांचा ३८० लाख हेक्टर क्षेत्रासाठी १ लाख ३७ हजार ५३५ कोटींचा विमा उतरविला आहे. २०१५च्या खरिपामध्ये हेच प्रमाण ३ कोटी ९ लाख शेतकरी, ३३९ लाख हेक्टर क्षेत्र आणि विमा रक्कम ६९,३०७ कोटी रुपये होती. म्हणजे विम्याचे कवच मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या एका वर्षांमध्ये साडेपाच टक्क्यांनी, शेतीचे क्षेत्र बारा टक्क्यांनी आणि विम्याची रक्कम थेट शंभर टक्क्यांनी म्हणजे दुपटीने वाढली. महाराष्ट्रापाठोपाठ राजस्थान (५३ लाख शेतकरी व १२ हजार कोटींचे कवच), मध्य प्रदेश (३२ लाख शेतकरी आणि वीस हजार कोटींचे कवच), आंध्र प्रदेश (१५ लाख शेतकरी व साडेचौदा हजार कोटींचे कवच) आणि उत्तर प्रदेश (३० लाख शेतकरी व १४ हजार कोटींचे कवच) यांचा समावेश आहे.
पाच वर्षांत २२ हजार हेक्टर शेतीवर गंडांतर
२००८ ते २०१४ या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्रातील २२ हजार हेक्टर शेतीवर औद्योगिकीकरणाने गंडांतर आणल्याची माहिती राज्यसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात मिळाली. २००८-०९मध्ये राज्यातील २ कोटी ११ लाख ४९ हजार हेक्टर क्षेत्र शेतीखाली होते. हे क्षेत्र २०१३-१४मध्ये २२ हजार हेक्टरने घटून २ कोटी ११ लाख २७ हजार हेक्टरवर आले. त्यामुळे एकूण भूभागाशी असलेले शेतीचे प्रमाण ६८.७३ टक्क्यांवरून ६८.६६ टक्क्यांवर घसरले. थोडक्यात ०.०७ टक्के शेतीचे रूपांतर बिगरकृषी जमिनीमध्ये झाले. याच कालावधीत संपूर्ण देशामध्ये मात्र ६ लाख ९ हजार हेक्टर शेतजमीन (१८ कोटी २४ लाख ५९ हजारांवरून १८ कोटी अठरा लाख ५० हजार हेक्टरवर) बिगरकृषी कारणांकडे वळविली गेली.
औद्योगिकीकरणामध्ये महाराष्ट्राशी स्पर्धा करणाऱ्या गुजरातमध्ये मात्र या पाच वर्षांमध्ये शेतजमिनीवर गदा न आल्याचे आकडेवारीतून दिसते आहे. २००८ आणि २०१४ या दोन्ही वर्षांमध्ये एकूण भूभागाशी शेतीचे असलेले प्रमाण ५३.३० टक्के एवढे कायम राहिले. दुसरीकडे आसाम, पंजाब आणि झारखंड आदी राज्यांमध्ये शेतीचे क्षेत्र आश्चर्यकारकरीत्या वाढले.
#eMPSCkatta_Telegram_Updates
🔹मध्यप्रदेशातील खडककला जगातील प्राचीन
मध्यप्रदेशातील मंडसौर जिह्यामधील भानपूर क्षेत्रातील एका टेकडीमधील खडकावर कोरलेली चित्रे जगातील सर्वात जुनी असून तज्ञांच्या मते ती 2 ते 5 लाख वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे. चालू नोव्हेंबरच्या 2 ते 23 पर्यंत झालेल्या यशस्वी मोहिमेने हे नवीन रहस्य जगापुढे आणले आहे. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सरसचिव प्रा. गिरिराज कुमार आणि ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक रॉबर्ट बेडनरिक यांच्या संयुक्त सहकार्यातून सदर मोहीम यशस्वी करण्यात आली. बेनरिक हे खडककलेतील जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक असून ते ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रॉक आर्ट ऑर्गनायझेशन’ चे (आयएफआरएओ) समन्वयक आहेत. आग्य्रातील दयाळबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटमधील रॉक आर्ट सायन्सचे कुमार प्राध्यापक आहेत. त्यांनीच सदर खडकचित्रकलेचे वय 2 ते 5 लाख वर्षांचे असल्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला.
दर की चट्टान गुहेतील खडकावर कलात्मक चित्र असल्याचा शोध 2002 च्या प्रारंभी लागल्याने त्यासंदर्भात संशोधन सुरू झाले. त्याजागी प्रहार केल्याने निर्माण झालेले दगडही 5 लाख वर्षांपूर्वीचे असावेत, असे कुमार यांनी सांगितले. खडक प्रकल्पाचा तपशील सांगताना ते म्हणाले की सदर प्रकल्पाच्या कामाने ही मोहीम रूंपली दर की चट्टान गुहेतील खडकांचे नमुने व तपशील जाणण्याचा यामागील हेतू होता. यासाठी भारतासह ऑस्टेलिया व युरोपमधील वैज्ञानिकांनी भाग घेतला आहे.
🔹मध्यप्रदेशातील खडककला जगातील प्राचीन
मध्यप्रदेशातील मंडसौर जिह्यामधील भानपूर क्षेत्रातील एका टेकडीमधील खडकावर कोरलेली चित्रे जगातील सर्वात जुनी असून तज्ञांच्या मते ती 2 ते 5 लाख वर्षांपूर्वीची असावीत, असा अंदाज आहे. चालू नोव्हेंबरच्या 2 ते 23 पर्यंत झालेल्या यशस्वी मोहिमेने हे नवीन रहस्य जगापुढे आणले आहे. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे सरसचिव प्रा. गिरिराज कुमार आणि ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक रॉबर्ट बेडनरिक यांच्या संयुक्त सहकार्यातून सदर मोहीम यशस्वी करण्यात आली. बेनरिक हे खडककलेतील जागतिक कीर्तीचे वैज्ञानिक असून ते ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रॉक आर्ट ऑर्गनायझेशन’ चे (आयएफआरएओ) समन्वयक आहेत. आग्य्रातील दयाळबाग एज्युकेशनल इन्स्टिटय़ूटमधील रॉक आर्ट सायन्सचे कुमार प्राध्यापक आहेत. त्यांनीच सदर खडकचित्रकलेचे वय 2 ते 5 लाख वर्षांचे असल्याबद्दलचा अंदाज व्यक्त केला.
दर की चट्टान गुहेतील खडकावर कलात्मक चित्र असल्याचा शोध 2002 च्या प्रारंभी लागल्याने त्यासंदर्भात संशोधन सुरू झाले. त्याजागी प्रहार केल्याने निर्माण झालेले दगडही 5 लाख वर्षांपूर्वीचे असावेत, असे कुमार यांनी सांगितले. खडक प्रकल्पाचा तपशील सांगताना ते म्हणाले की सदर प्रकल्पाच्या कामाने ही मोहीम रूंपली दर की चट्टान गुहेतील खडकांचे नमुने व तपशील जाणण्याचा यामागील हेतू होता. यासाठी भारतासह ऑस्टेलिया व युरोपमधील वैज्ञानिकांनी भाग घेतला आहे.