MPSC Geography
139K subscribers
7.8K photos
82 videos
564 files
1.07K links
Download Telegram
🔹गांडूळाच्या विष्ठेमध्ये काय असते. ?

देशी गांडुळाच्या विष्ठेमध्ये सगळया खनिजांचे अनंत भंडार असते. त्या विष्ठेमध्ये भोवतालच्या मातीपेक्षा 7 पट जास्त नाट्रोजन असतो, 9 पट जास्त स्फुरद(फॉस्फेट), 11 पट जास्त, पलाश(पोटॅश), 8 पट चुना(कॅल्शीअम), 10 पट मग्न(मॅग्नेशिअम), 10 पट गंधक (सल्फर), ह्या सोबतच बाकीचे खनिजं जास्त प्रमाणात असतात. ही गांडुळांची विष्ठा मुळाजवळ येऊन पडते, त्यातील सर्व अन्नद्रव्य मुळयांना मिळतात व सोबतच विष्ठेमध्ये असणारे उपयुक्त जंतू नवीन  ताकद आणि  स्फूर्ती  घेऊन ह्युमसच्या निर्मीतीच्या कामाला लागतात. 
जगातील विविध स्थळांची टोपननावे किंवा ठळक वैशिष्टये


👉🏾 *इंग्लंडचे उद्यान*
– केंट

👉🏾 *यूरोपाचे काश्मीर*
– स्वित्झर्लंड

👉🏾 *वादळी शहर*
– शिकागो

👉🏾 *पीत नदी*
– हो हँग हो

👉🏾 *भारताचे स्वित्झर्लंड*
– काश्मीर

👉🏾 *लवगांचे बेट*
– झांजीबार

👉🏾 *गुलाबी शहर*
– जयपूर

👉🏾 *खड़काळ शहर*
– अँबरडीन

👉🏾 *पायाखालील प्रदेश*
– ऑस्ट्रेलिया

👉🏾 *पाच नदयाचा प्रदेश*
– पंजाब

👉🏾 *हजार तळ्यांचा देश*
– फिनलँड

👉🏾 *निर्जनतम बेट*
– ट्रिस्टन डी क्यूबा

👉🏾 *भारताचे व्हेनीस*
– अलेप्पी

👉🏾 *पाचूंचे बेट*
– श्रीलंका

👉🏾 *दक्षिणेतील ब्रिटन*
– न्यूझीलंड

👉🏾 *भारताचे उद्यान*
– बंगलोर

👉🏾 *भूकंपाचे शहर*
– फिलाडेल्फिया

👉🏾 *उत्तरेकडील व्हेनीस*
– स्टॉकहोम

👉🏾 *कमलपुष्पांचा देश*
– फ़्रान्स व कॅनडा

👉🏾 *अमर शहर*
– रोम

👉🏾 *मंदिरांचे माहेरघर*
– बनारस

👉🏾 *मेपल वृक्षांचा देश*
– कॅनडा

👉🏾 *काळा खंड*
– आफ्रिका

👉🏾 *श्वेत शहर*
– बेलग्रेड

👉🏾 *जगाचे छप्पर*
– पामीरचे पठार

👉🏾 *भारताचा मसाला मळा*
– केरळ

👉🏾 *भूमध्य समुद्राची किल्ली*
– जिब्राल्टर

👉🏾 *गोऱ्या माणसाची दफन भूमी*
– गिनीचा किनारा

👉🏾 *मोत्यांचे बेट*
– बहारीन

👉🏾 *राजवाडयांचे शहर*
– वॉशिंगटन

👉🏾 *अज्ञात खंड*
– आफ्रिका

👉🏾 *उंच इमारतीचे शहर*
– न्यूयार्क

👉🏾 *भव्य अंतराचे शहर*
– कोलकाता

👉🏾 *कांगारूंचा देश*
– ऑस्ट्रेलिया

👉🏾 *सूर्यास्ताचा देश*
– ब्रिटन

👉🏾 *उगवत्या सूर्याचा देश*
– जपान

👉🏾 *मध्यरात्रीच्या सूर्याचा देश*
– नॉर्वे


🏺🏺
Forwarded from Deleted Account
भूगोल:-
सह्याद्री तील सर्वात लहान खिंड- पलक्कड खिंड
कोका टेकड्या - भंडारा
कर्कवृत्ताला दोन वेळा छेदून जाणाऱ्या नद्या- मही, साउथ कोयल
भारतीय शीत वाळवंट स्थान- पीरपंजाल च्या पश्चिमेला
गोदावरी व महानदी या दरम्यान चा पर्वत/शिखर- महेंद्रगिरी(1501)
पंजाब हिमालयातील सर्वात उंच पर्वत- नंगा पर्वत (8126)
धातू कामासाठी प्रसिद्ध शहर - कटक (ओरिसा)
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
भारताच्या राज्य पुनर्रचनेचा काळानुसार बदलता नकाशा...

Join @MPSCGeography
#eMPSCkatta_Current_Affairs

🔹शेतीविकासाची प्रस्तावित 'नीती'

शेतीमध्ये क्रांती आणण्यासाठी आता 'नीती आयोग' सरसावला असून, त्या संदर्भातील व्यूहरचनाही प्रस्तावित करण्यात आली आहे. व्यापक विचारमंथन, व्यावहारिक व वास्तववादी प्रयत्नांच्या माध्यमातून त्याला आकार येऊ शकेल. शेतीची उत्पादकता, उत्पादन, लाभप्रदता वाढणे ही काळाची गरजच आहे. 


नीती आयोग देशाच्या शेतीमध्ये दुसरी क्रांती आणण्यासाठी कटिबद्ध झालेला दिसतो. शेती हा विषय घटक राज्यांच्या अधिकार व कार्यक्षेत्रात असल्यामुळे नीती आयोग आपला कार्यक्रम व धोरण आराखडा कार्यवाहीसाठी घटक राज्यांच्या कार्यवाही व्यवस्थेकडे सोपवणार असे दिसते. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या जाहीर आश्‍वासनाच्या पार्श्‍वभूमीवर नीती आयोगाने भारतीय शेती मुक्त करण्यासाठी त्रिसूत्री व्यूहरचना प्रस्तावित केली आहे. 


आयोगाच्या मते 1) राज्य पातळीवर कृषी माल विपणन व्यवस्था सुधारणे, (2) जमीन खंडावर कसायला घेण्याच्या पद्धतीत बदल करणे, 3) जंगल सुधारणा - अशा तिहेरी सुधारणांमुळे (या सर्व बाबतीत घटक राज्यांनाच सुधारणा कराव्या लागतील.) भारतीय शेती व्यवस्था अधिक चैतन्यशील होऊन उच्चतर उत्पन्न वृद्धीदर गाठू शकेल. 


आयोगाचे सदस्य रमेशचंद यांनी शेतीतील सुधारणांसाठी पंतप्रधान कार्यालयास एक सविस्तर प्रस्ताव सादर केला होता. त्या सुधारणा राज्यांनी केल्यास शेतकऱ्यांना मोठे फायदे होतील, असे अपेक्षित आहे. सामान्य शेतकरी गरिबीच्या खाईतून बाहेर पडण्यास या नव्या शेती विकास प्रस्तावांचा हातभार लागेल व शेतकऱ्यांचे उत्पन्न पाच वर्षांच्या आत दुपटीने वाढेल, असे अभिप्रेत आहे. आयोगाची भावना अशी आहे, की प्रस्तावित बदल राज्य सरकारे सहज व त्वरित कार्यवाहीत आणू शकतील. 


*त्रिसूत्री व्यूहरचनेअंतर्गत घटकांचा विचार करता शेतीसंबंधी प्रस्तावित बदलातील प्रमुख मुद्दे साधारणतः पुढीलप्रमाणे आहेत.* 

1) जमीन खंडाने देण्याच्या कायद्यात सुधारणा करताना केंद्रीय कायद्यांना सुसंगत बदल करणे.

2) कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यात किमान 10 बदल करून सुधारित कायदा शेतकरी उत्पादकांच्या अधिक सोईचा करणे.

3) करार शेती कायदा सोपा करणे.

4) खासगी व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून माल खरेदी करू शकतील अशी व्यवस्था.

5) शेतकऱ्यांना थेट ग्राहकास माल विकण्याचे स्वातंत्र्य.

6) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करण्याचे एकच परवानापत्र देण्याची व्यवस्था.

7) एकबिंदू कर आकारणी (कर प्रपात परिणाम टाळण्यासाठी).

8) फळे व भाजीपाला यांना कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्याच्या बाहेर ठेवणे.

9) कृषी उत्पादनावरील कर आकारणीचे वाजवीकरण.

10) ई-पद्धतीच्या (online) शेतमाल खरेदी - विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी ई-नाम (Electronic national agricultural marketing) प्रोत्साहन.

11) कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापार करण्यासाठी त्या बाजार क्षेत्रात व्यापाऱ्याचे प्रत्यक्ष दुकान असलेच पाहिजे, ही अट रद्द करणे. 

येत्या काही दिवसांत नीती आयोग घटक राज्यांच्या कृषिमंत्री व कृषी खात्याच्या प्रमुख सचिवांशी चर्चा करणार आहे. आवश्‍यक त्या ठिकाणी पंतप्रधान कार्यालयाची मदत घेतली जाणार आहे, त्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला जाणार आहे. 


*प्रस्तावित बदलांमुळे :*

1) शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ येत्या पाच वर्षांत होईल.

2) शेतकऱ्यांचे दारिद्य्र कमी होईल.

3) शेतमाल खरेदी - विक्रीची थेट पद्धत मध्यस्थ नष्ट करेल.

4) विपणन सुधारणेमुळे शेतीमाल व्यापारात खासगी व्यापारी मोठ्या प्रमाणात प्रवेश करतील, त्यामुळे शेतमालाच्या किमती सुधारतील.

5) शेतमालाच्या साठेबाजीवर नियंत्रण ठेवता येईल. 


खरा प्रश्‍न आहे तो शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून उत्पादकता व उत्पादन वाढविण्याचा. त्यासाठी शेतमालाच्या किमती वाढणे, शेतीची लाभप्रदता वाढणे आवश्‍यक आहे. या प्रस्तावित धोरणात शेतीसाठी लागणाऱ्या आदानाच्या (पाणी, वीज, खते, बियाणे, औषधे व यंत्रे) किमती व उपलब्धतेसंबंधी, विपणनासंबंधी उल्लेख नाही. शेतमालाच्या (विशेषतः नाशवंत) सुयोग्य साठवणूक व्यवस्थेच्या विकासाचाही उल्लेख नाही. शेती उत्पादनासाठी वाजवी विमा व्यवस्थेबद्दलही विचार होण्याची गरज आहे. शेतमालावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढविण्याकडे लक्ष देण्याचीही गरज आहे. शेती क्षेत्राच्या विकासासाठी जैविक परिचयाची सहकारी संघटन व्यवस्था सक्षम करावी लागेल. एकंदरीतच, प्रत्यक्ष जमिनीवर येऊन, शेतकऱ्यांशी चर्चा करून, फलदायी / उत्पादक उपाययोजना करण्यासाठी मंत्री व सचिव एवढ्याच पातळीला चर्चा करून चालणार नाही. उपक्रमशील शेतकरी, शेती अर्थतज्ज्ञ, कृषी शास्त्रज्ञ, कृषी माल व्यापारी, कृषी पतपुरवठा, कृषी आदान व्यापारी यांच्या समन्वित राज्य मंडळाबरोबर (तसे तयार करणे आवश्‍यक आहे) चर्चा करून व्यवहार्य प
्रस्ताव ठेवणे शहाणपणाचे ठरेल. 


प्रस्तावित व्यूहरचनेच्या अनुषंगाने काही अडचणीही लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली अडचण म्हणजे संघराज्यातील सर्व घटक राज्यांनी सुसंगत धोरण व कार्यक्रम प्राधान्याने राबवण्याची. दुसरा महत्त्वाचा मुद्दा दुर्लक्षित राहिला आहे तो शेती उत्पन्नावर अधिक प्रत्यक्ष कर आकारणीचा. प्रा. राज समितीचा कृषी धारणा कर (AHT) याबाबतीत लक्षात घेण्याची गरज आहे. नव्या धोरणातील जंगलविषयक सुधारणांचे स्वागत केले पाहिजे; पण त्यात वनवासी व आदिवासी लोकांच्या आर्थिक हक्कांना संरक्षण देण्याचा विचार झाला पाहिजे. कृषी माल विपणनाच्या बाबतीतील प्रस्तावित बदल वरकरणी शेती उत्पादकांना स्वातंत्र्य देणारे वाटले तरी त्याचा प्रत्यक्ष प्रभावी लाभ व्यापारी मध्यस्थच घेणार आणि शेतीचे भांडवलदारी 'व्यापारी'करण होणार, हाही धोका संभवतो. वाढीव किमतीचा लाभ उत्पादकाला नव्हे तर व्यापाऱ्यालाच अधिक होणार आणि तोही शेतकऱ्याच्या नावाने. या सर्व बाबींचा विचार करूनच ठरवायला हवे. 
🔹महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे :-

🔘 *खनिज जिल्हे दगडी कोळसा* - सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी(यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
🔘 *बॉक्साईट* - कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
🔘 *कच्चे लोखंड* - रेड्डी (सिंधुदुर्ग)
🔘 *मॅग्नीज* - सावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा),
सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
🔘 *तांबे* - चंद्रपूर, नागपूर
🔘 *चुनखडी* - यवतमाळ
🔘 *डोलोमाईट* - रत्नागिरी, यवतमाळ
🔘 *क्रोमाई* - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
🔘 *कायनाईट* - देहुगाव (भंडारा)
🔘 *शिसे व जस्त* - नागपूर

" देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा- *३.९%* आहे, *१२.३३%* क्षेत्र खनिजयुक्त आहे. "

*महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे :-*

*औष्णिक केंद ठिकाण/जिल्हा*
🔴 *पारस* - अकोला
🔴 *एकलहरे* - नाशिक
🔴 *कोराडी,खापरखेडा* - नागपूर
🔴 *चोला (कल्याण)* - ठाणे
🔴 *बल्लारपूर* - चंद्रपूर
🔴 *परळीवैजनाथ* - बीड
🔴 *फेकरी (भुसावळ)* - जळगाव
🔴 *तुर्भे (ट्रॉम्बे)* - मुंबई
🔴 *भिरा अवजल (जलविद्युत)* - रायगड
🔴 *कोयना (जलविद्युत)* - सातारा
🔴 *धोपावे* - रत्नागिरी
🔴 *जैतापूर (अणुविद्युत)* - रत्नागिरी

*महाराष्ट्रातील प्रमुख लघुउद्योग :लघुउद्योग ठिकाण*
🔵 *हिमरुशाली* - औरंगाबाद
🔵 *पितांबरी व पैठण्या* - येवले (नाशिक)
🔵 *चादरी* - सोलापूर
🔵 *लाकडाची खेळणी* - सावंतवाडी
🔵 *सुती व रेशमी कापड* - नागपूर, अहमदनगर
🔵 *हातमाग साडय़ा व लुगडी*- उचलकरंजी
🔵 *विडीकाम* - सिन्नर (नाशिक), अहमदनगर,सोलापूर
🔵 *काचेच्या वस्तू* - तळेगाव, ओगलेवाडी
🔵 *रेशमी कापड* - सावळी व नागभीड (चंद्रपूर),
एकोडी (भंडारा)

*महाराष्ट्रातील प्रमुख संशोधन संस्था :*
🔶 *इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ जिओमॅग्नेटिझम* - मुंबई
🔶 *भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर*, - मुंबई
🔶 *टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस* - मुंबई
🔶 *इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पॉप्युलेशन स्टडीज* - मुंबई
🔶 *कॉटन टेक्नॉलॉजिकल रिसर्च लॅबोरेटरी* - मुंबई
🔶 *नॅशमल केमिकल लॅबोरेटरी* - पुणे
🔶 *नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी* - पुणे
🔶 *वॉटर अँड लॅण्ड मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट (वाल्मी)* - औरंगाबाद
🔶 *भारत इतिहास संशोधन मंडळ,* - पुणे
🔶 *भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर* - पुणे
🔶 *सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ कॉटन रिसर्च*- नागपूर
🔶 *महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था (मेरी)* - नाशिक
🔶 *अॅटोमिक एनर्जी कमिशनचे मुख्यालय* - मुंबई
🔶 *खार जमीन संशोधन केंद्र* - पनवेल.

संकलन - सोमनाथ माळी
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
20,000+ मेंबर्स ....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔹व्याघ्र प्रकल्प : पेंच व्याघ्र प्रकल्प

पेंच राष्ट्रीय उद्यान/व्याघ्र प्रकल्प हे भारतातील अशा अभयारण्यांपैकी एक आहे जे दोन राज्यांत विभागले गेले आहे. ते महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये विभागले गेले असून मध्यप्रदेशमधील जास्त भाग या अभयारण्याने व्यापलेला आहे.


मध्यप्रदेशातील या अभयारण्याचा बराचसा भाग सातपुडा रांगांच्या दक्षिण उतारावर स्थित आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये इंदिरा प्रियदर्शिनी पेंच राष्ट्रीय उद्यान आणि पेंच मोगली अभयारण्य यांचा समावेश होतो. या उद्यानाच नाव जीवनरेषा असलेल्या पेंच नदीवरून पडले आहे. अरण्यामधून नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते व पुढे जाऊन कन्हान नदीला मिळते. पेंच जेव्हा अरण्याच्या मधून वाहते तेथे ती सेओनी व छिंदवाडा या मध्यप्रदेशातील दोन जिल्ह्यांची सीमारेषा निर्माण करते.

येथे पेंच नदीवर मेघदूत धरण बांधण्यात आले आहे. त्याच्या जलाशयास तोतलाडोह असे नाव असून 72 किमी वर्ग एवढा पाणी साठवण क्षमता आहे.

मध्यप्रदेशमध्ये पेंच अभयारण्याचा कोअर भाग 411.33 km2 आणि बफर भाग 768.3 km2 सर्व मिळून 1179.63 km2 एवढा संरक्षित प्रदेश निर्माण झाला. कोअर भागामध्ये अरण्याचा मोगली पेंच वन्यप्राणी अभयारण्य याचा समावेश होतो. त्याने सुमारे 118.30 km2 एवढा भाग व्यापला आहे. बफर भागामध्ये संरक्षित जंगल, महसूल विभागाच्या जमिनी आहेत.


       व्याघ्र प्रकल्पाचा दक्षिण भाग महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्रामध्ये पेंच व्याघ्र प्रकल्पाचा कोअर भाग 257.3 km2 असून 483.96 km2 एवढा बफर भाग आहे. यामध्येच असलेले मानसिंगदेव अभयारण्य 741.2 km2एवढा संरक्षित क्षेत्र निर्माण करते.

पेंच व्याघ्र प्रकल्प हा मध्यभारतातील महत्त्वाचा व्याघ्र अधिवास आहे.

सोळाव्या शतकात देवगड राजांच्या कार्यकाळात हा परिसर नैसर्गिक संपदेने भरलेला होता. नैसर्गिक संपदा विपुल प्रमाणात होती. 17 व्या शतकात येथील वन्यप्राणी, पक्षी, वनस्पती व अन्य नैसर्गिक उपलब्धतेची मांडणी ब्रिटिश सरकारने केली आहे. उदा. ‘हायलँड्स ऑफ सेंट्रल इंडिया’ (1871). स्टेरंडेल(1887) आणि ब्रँडर(1923). यामध्ये स्थानिक प्राणी व वनस्पती यांचे वर्गीकरण करून माहिती दिली आहे.

लोकप्रिय कल्पीत साहित्यामध्ये रुदयार्ड किप्लींग, द जंगल बुक आणि द सेकंड जंगल बुक यामधील कथा या अभयारण्यावर आधारित आहेत, हेच कारण आहे पेंच हे मोगलीचे मूळ ठिकाण मानले जाते.


17 व्या शतकामध्ये गोंड आदिवासींनी या जंगालाचा बराचसा भाग शेतीखाली आणला. 1818 पर्यंत त्यांनी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली. मराठा साम्राज्य इंग्रजांच्या आधिपत्याखाली येईपर्यंत ही जंगलतोड चालू होती.

पेंच अभयारण्य 1977 मध्ये बनवण्यात आले. इंदिरा प्रियदर्शनी पेंच नॅशनल पार्क हा  भयारण्याचा भाग वेगळा 1933 मध्ये  करण्यात आला. 1992 मध्ये व्याघ्र प्रकल्प येथे राबविण्यात येऊ लागला.

अभयारण्यात अनेक प्रकारच्या वनस्पती, प्राणी, पक्षी व अन्य जीव आहेत. वनस्पतींमध्ये साग अभयारण्यात सर्वत्र आढळतो. बांबू ही वनस्पतीही येथे मोठ्या प्रमाणात आहे.

वाघ हा मुख्य प्राणी येथे मानला जातो. त्याचबरोबर बिबट, चितळ, ढोल, मांजर, अस्वल, तरस, लांडगा इ. प्राण्यांची येथे रेलचेल आहे.
Current Affair Shorts:
Nuclear/Thermal/Atomic Power Plant:

1.
Rihand Thermal Power Station
City: Sonebhadra
State: Uttar Pradesh

2.
Singrauli Super Thermal Power Station
City: Sonebhadra
State: Uttar Pradesh

3.
Anpara Thermal Power Station
City: Sonebhadra
State: Uttar Pradesh

4.
Obra Thermal Power Station
City: Sonebhadra
State: Uttar Pradesh

5.
Rosa Thermal Power Station
City: Shahjahanpur
State: Uttar Pradesh

6.
Udupi Thermal Power Plant
City: Udupi
State: Karnataka

7.
Bellary Thermal Power station
City: Bellary
State: Karnataka

8.
MetturTheral Power Station
City: Salem
State: Tamil Nadu

9.
Bellary Thermal Power station
City: Bellary
State: Karnataka

10.
Simhadri Super Thermal Power Plant
City: Vishakapatnam
State: Andhra Pradesh

11.
Chhabra Thermal Power station
City: Baran
State: Rajasthan

12.
Hirakud Captive Power Plant
City: Sambalpur
State: Odisha

13.
Talcher Super Thermal
City: Angul
State: Odisha

14.
Patratu Thermal Power Station
City: Ramgarh
State: Jharkhand

15.
Bokaro Thermal Power Station
City: Bokaro
State: Jharkhand

16.
Durgapur Thermal Power Station
City: Bardhaman
State: West Bengal

17.
Barauni Thermal Power Station
City: Begusarai
State: Bihar

18.
Vindhyachal Super Thermal Power Station
City: Singrauli
State: Madhya Pradesh

19.
Sant Singaji Thermal Power station
City: East Nimar
State: Madhya Pradesh

20.
Satpura Thermal Power Station
Betul
Madhya Pradesh

21
Sanjay Gandhi Thermal Power Station
City: Birsinghpur
State: Madhya Pradesh

22.
Mundra Thermal Power Station
City: Kutch
State: Gujarat

23.
Ukai Thermal Power Station
City: Tapi
State: Gujarat

24.
Sikka Thermal Power Station
City: Jamnagar
State: Gujarat

25.
Tirora Thermal Power Station
City: Gondia
State: Maharashtra

26.
Amravati Thermal Power Station
City: Amravati
State: Maharashtra

27.
Chandrapur Super Thermal Power Station
City: Chandrapur
State: Maharashtra

28.
Khaperkheda Thermal Power Station
City: Nagpur
State: Maharashtra

29.
Bhilai Expansion Power Plant
City: Durg
State: Chhattisgarh

30.
Sipat Thermal Power Plant
City: Bilaspur
State: Chhattisgarh

31.
Korba Super Thermal Power Plant
City: Korba
State: Chhattisgarh

32.
Kundakulam Nuclear Power Plant
City: Kundankulam
State:Tamil Nadu

33.
Kakrapar Nuclear power
City: Kakrapar
State: Gujarat

34.
Narora Nuclear Power Plant
City: Narora
State: Uttar Pradesh

35.
Tarapur Atomic power station
City: Tarapur
State: Maharashtra

36.
Jaitapur Nuclear Power Project
City: Madban
State: Maharashtra

37.
Kaiga Nuclear power station
City: Kaiga
State: Karnataka

38.
Gorakhpur Atomic Power Station
City: Fatehabad
State: Haryana

39.
Rajasthan Atomic Power Station
City: Rawatbhata
State: Rajasthan

40.
Mithivirdi nuclear power plant
City: Talaja Taluka
State: Gujarat
🔹महाराष्ट्रातील हवामान

महाराष्ट्रातील हवामान विशिष्टपूर्ण आहे. याचे कारण त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळतो.

महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप -

कोकण -
कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.

सह्यान्द्री -
समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.

महाराष्ट्र पठार -
महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान हे विषम आहे.

महाराष्ट्रातील ऋतू -
महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.

उन्हाळा -
२१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते.
महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे
अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे.

कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.

हवेचा दाब व वारे -
उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्यास साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि कोकण किनारपट्टीत समभार रेषा समांतर होत जातात. एप्रिल मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतसा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार उतार तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. आणि वायुभर उतार तीव्र होत जातो. अरबी समूद्रवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात.

पर्जन्य -
हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून
जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात महाराष्ट्रच्याही भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी
असे म्हणतात.

महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना -

सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग
व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.
कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त
म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते.
मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.

ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना -
या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.

हिवाळा -
मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सर
ासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो.

महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.

महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण -

जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🚫 सर्व सदस्यांसाठी टेलिग्राम विषयी काही महत्त्वाचे 🚫

बरेच दिवसापासून म्हणजे अगदी सुरवातीपासून ( चॅनेल्स सुरु झाल्यापासून ) मला एक प्रश्न विचारला जातोय
" टेलिग्राम वरील वाचून झालेले / मागील msg डिलीट कसे करायचे ? "

बरेच दिवस झाले याबद्दल लिहावं असं ठरवत होतो पण योग आला .
असो , मी हि चॅनेल्स सुरु करताना खूप पुढचा विचार करूनच सर्व Messaging Apps च्या पडताळणी नंतर , त्यामधील फीचर्स पाहूनच शेवटी टेलिग्राम हे ऍप आपल्या या सुविधेसाठी निवडले होते.

तर, आपल्या msg डिलीट करण्याच्या प्रश्नाबाबत बोलायचे तर , असे काही करण्याची गरज नाही , म्हणजे सोप्या भाषेत msg डिलीट करण्याच्या फंदात पडू नका, कारण असा कोणताही पर्याय तुमच्याकडे नाही आहे( तो पर्याय फक्त Admin कडे आहे).

मग उरतो प्रश्न कि, असा पर्याय का नाही?
तर टेलिग्राम ह्या ऍप वरील सर्व msg हे आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह न होता ते सर्वर वरती सेव्ह होतात( सोप्या भाषेत सांगायचे तर , ते online सेव्ह होतात). आता मोबाईल मध्ये सेव्ह होत नाहीत म्हणजे मोबाईल मधील मेमरी खात नाहीत.

बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की , टेलिग्राम वरील msg मुळे टेलिग्राम ऍप खूप जास्त जागा ( मेमरी ) घेते. पण असं काही नाही , माझी खात्री आहे की आपल्या मोबाईल मधील जास्तीत जास्त 60-80 Mb जागा हे ऍप घेत असेल.

तसेच टेलिग्राम सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही मीडिया ऑटो डाउनलोड , फोटो डायरेक्ट गॅलरी मध्ये सेव्ह करावेत कि नको हेही निवडू शकता. त्यामुळे या ऍप ची साईझ आणखी कमी होण्यास मदत होईल.

तुम्ही जसजसे मागील msg वाचत जाल तसतसे मागील msg लोड होत जातील, अगदी आम्ही केलेली पहिली पोस्टही तुम्ही पाहू शकता .

तेंव्हा आता msg डिलीट करायच्या फंदात पडू नका व अगदी निःसंकोचपणे आपल्या या सेवेचा लाभ घ्या .

आणि हो आपल्या या टेलिग्राम चॅनेल्स च्या सेवेमध्ये आपल्या सर्व मित्राना जॉईन करायला विसरू नका.

प्रशासक- @eMPSCkattaAdmin
--------------------------------------------

https://telegram.me/empsckatta
पीक उत्पादनात आघाडीवर असणारी राज्ये