MPSC Geography
139K subscribers
7.78K photos
82 videos
564 files
1.07K links
Download Telegram
🔴पुणे प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण  माहिती 🔴

1. पुणे जिल्हा

जिल्हयाचे मुख्य ठिकाण - पुणे        
         क्षेत्रफळ - 15,643 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 94,26,959 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 14 - जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती. 

सीमा - उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे. 

जिल्हा विशेष

 

'विधेचे माहेरघर' असे पुणे शहरास म्हणतात. याच ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या समाज-परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली. आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या नररत्नाचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी होय. 

राष्ट्रकूट, राजवटीत या गावाचा पुनवडी नावाने उलेख केला जाई. 'पुण्य'या शब्दावरून 'पुणे' हे नाव पडले असावे, अशी एक उपपती मांडली जाते. 

देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे 1971 पासून कार्यरत अष्टविनायकापैकी (1) श्री विघ्नेश्वर, ओझर (2) श्री गणपती, राजणगांव (3) गिरजात्मक, लेण्याद्री (4) चिंतामणी, थेऊर (5) मोरेश्वर, मोरगाव या पाच अष्टविनायकाचे स्थान या जिल्हात आहे. 

महत्वाची स्थळे

 

पुणे - मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. 

तसेच निगडी येथे 'अप्पूघर' हे करमणुकीचे केंद्र आहे. 

पिंपरी-चिंचवड - पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील 'अप्पूघर' हे एक करमणुकीचे केंद्र आहे. 

जुन्नर - जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता. 

आळंदी - हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. 

देहू - हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.

चाकण - येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे. 

लोणावळा - हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत. 

जेजूरी - महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे. 

आर्वी - आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे 'विक्रम' हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. 

राजगुरूनगर - हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे. 

भीमाशंकर - येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे. 

उरुळी कांचन - येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे. 

दौंड - दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते. 

वालचंदनगर - येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे. 

सासवड - हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे. सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. 

भोर - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत. 

वेल्हे - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत. 

वढू - येथे संभाजी महाराजांची समाधी आहे. 

पौंड - हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे. 

पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते. 

1997 पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे. 

ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे चालविले जाते. 

पुणे नागरी संकुल हे देशातील आठव्या व राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचेनागरी संकुल आहे. 

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भोसरी (पुणे) 

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय, पुणे 

राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे 

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे 

राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (NCL), पुणे 
भारतीय कृषि उधोग प्रतिष्ठान, उरळी कांचन (पुणे) 

महाराष्ट्र विकास प्राधिकरण (यशदा), पुणे 

सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन, खडकवासला 

फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टिट्यूट, पुणे 

नॅशनल डिफेन्स अकादमी, खडकवासला (पुणे)

 

2. सांगली जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सांगली  
               क्षेत्रफळ - 8,572 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 28,20,575 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 10 - खानापूर, कवठे महाकाळ, वाळवे, तासगाव, जत, शिराळे, आतपाडी, पलूस, मिरज, कडेगाव. 

सीमा - उत्ततेस व ईशान्येस सोलापूर जिल्हा, उत्तरेस व वायव्येस सातारा जिल्हा, पूर्वेस कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस व नैऋत्येस कोल्हापूर जिल्हा असून दक्षिणेस कोल्हापूर पर्यंत कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्हा.

जिल्हा विशेष -

 

1 ऑगस्ट 1949 रोजी सातारा जिल्हाचे विभाजन करून उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा असे दोन जिल्हे निर्माण केले. नंतर 23 नोव्हेंबर 1960 ला फेरफार करून दक्षिण सातारा जिल्ह्याचे रूपांतर सांगली जिल्ह्यात करण्यात आले. 

सांगली जिल्ह्याला कलावंताचा जिल्हा म्हणतात. 

हळद व द्राक्ष उत्पादनासाठी प्रसिद्ध. रबी ज्वारीला या जिल्ह्यात 'शाळू'म्हणून ओळखले जाते. 

प्रमुख स्थळे

 

सांगली - शहराच्या मध्यभागी गणेशदुर्ग हा किल्ला असून येथील गणेशमंदिर प्रसिद्ध आहे. 

मिरज - येथील भुईकोट किल्ला व मिरासाहेब अवलियाचा दर्गा प्रसिद्ध आहे. 

औंदुबर - या गावात दत्तात्रय मंदिर असून हे मंदीर नरसिंह सरस्वती यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले. ब्राम्हण कुटुंबात 1304 मध्ये जन्माला आलेले हे संत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. कृष्णा नदीच्या काठावर भवनेश्वरीचे मंदीर आहे. 

बहादूरवाडी - या गावात माधवराव पेशव्यांनी 1761 च्या सुमारास किल्ला बांधला. 

बेडग - ता. मिरजपासून 11 कि.मी. अंतरावर असलेले हे गाव अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. 

भोपाळगड - ता. खानपूरच्या दक्षिण पूर्वेस एक किल्ला असून तो शिवाजीच्या ताब्यात होता. 

भोसे - येथे दांडोबा महादेव गुफा प्रसिद्ध असून या गुहेत यादव राजा सिंघण यांचा शिलालेख आहे. 

देवराष्ट्र - हे गाव खानापूर तालुक्यातील असून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी होय. या गावात अनेक प्राचीन लेण्या आहे. 

कासबे दिग्रज - मिरज तालुक्यातील हे गाव पाच हिंदू मंदिरे व दोन जैन बस्तीसाठी प्रसिद्ध आहे. 

कुंडल - तासगाव तालुक्यातील या गावात हिंदूच्या लेण्या आहे. 

शिराळा - या तालुक्याच्या गावात देश-विदेशातील लोक नागपंचमीसाठी येथे येतात. 

मच्छिंद्रगड - कर्हाड तालुक्यातील उत्तरेस शिवाजीने हा किल्ला बांधला.

 

3.सातारा जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सातारा         
    क्षेत्रफळ - 10,480 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 30,03,922 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 

तालुके - 11 - खंडाळा, फलटण, वाई, माण, जावळी, लाख महाबळेश्वर, कोरेगांव, खटाव, सातारा, पाटण, कराड. 

सीमा - उत्तरेस पुणे जिल्हा, पूर्वेस सोलापूर जिल्हा, पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा असून वायव्येस रायगड जिल्हा आहे. 

जिल्हा विशेष -

 

रयत शिक्षण संस्थेच्या ज्ञानगंगेचा उदय याच जिल्ह्यात झाला. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1919 मध्ये कराड तालुक्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली 1924 मध्ये या शिक्षण संस्थेचे कार्यालय सातारा येथे नेण्यात आले. 

येथेच छत्रपती शाहूचा राज्यभिषेक 1708 मध्ये झाला. 

ऐतिहासिक शूरवीराचा जिल्हा. मराठा काळापासून या जिल्ह्याला लष्करी परंपरा लाभली आहे. 

प्रमुख स्थळे

 

सातारा - सातारा शहरामध्ये शिलाहार वंशातील राजा दूसरा भोज याने 1990 मध्ये 'अजिक्यतारा' हा किल्ला बांधला आहे. येथील छत्रपती वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. जवळच सज्जनगड या किल्यावर समर्थ रामदास स्वामींची समाधी आहे. 

महाबळेश्वर, पाचगणी - हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.महाबळेश्वर येथे महाबळेश्वराचे मंदीर. 

वाई - महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोषनिर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय येथे आहे. 

पाटण - येथे 'शिवाजीसागर' हा जलाशय आहे. 

कर्हाड - एथे कृष्णामाईचे मंदीर व यशवंतराव चव्हाणांची समाधी आहे. 

औंध - औंधचे वस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे. 

प्रतापगड - महाबळेश्वर तालुक्यात शिवरायांनी 1656 मध्ये या गडाची उभारणी केली. याच कडावर अफझलखानाचा वध झाला.

चाफळ - छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदासस्वामी याची भेट येथे झाली.

सज्जनगड - स्वामी समर्थ रामदास यांचे कार्यस्थान. यांच्या वास्तव्याने गडास 'सज्जनगड' असे नाव देण्यात आले आहे. 

म्हसवड - येथे 12 व्या शतकातील सिद्धनाथाचे मंदीर, कल्याणी चालुक्य राजा जगदेकमल्ला याचा शिलालेख मंदिरात आहे. 

माहुली - ता. सातारा पासून 5 कि.मी. अंतरावर पूर्वेस कृष्णा व वेन्ना या दोन नद्यांना संगम.

मसूर - ता. कराड येथे समर्थ रामदास स्वामींनी बांधलेले मारूतीचे मंदी
र.

निगडी - समर्थ रामदासांचे समकालीन संत रघुनाथ (रंगनाथ) यांचे गाव.

 

4. कोल्हापूर जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - कोल्हापूर        
     क्षेत्रफळ - 7,685 चौ. कि.मी.

लोकसंख्या - 38,77,015 (सन 2011 च्या जनगणनेनुसार) 

तालुके - 12 - शहुवाडी, हातकणगले, पन्हाळा, शिरोळ, करवीर, गगनबावडा, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, कागल, भुदगड (गारगोटी), राधानगरी.

सीमा - उत्तरेस सांगली जिल्हा, पूर्वेस व दक्षिणेस कर्नाटक राज्य, पश्चिमेस रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हे आहे. 

जिल्हा विशेष -

 

पुराणात अशी दंतकथा आहे कि महालक्ष्मीने हा परिसर आपल्या गदेने महापुरापासून वाचविला म्हणून या परिसरास 'करवीर' असे नाव पडले. दुसर्‍या एका दंतकथेनुसार एका टेकडीवर 'कोल्हासूर' नावाच्या दैत्याचा वध केला गेला यावरून कोल्हापूर हे नाव पडले. 

हा जिल्हा राजर्षी शाहुंची जन्मभूमी आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर याच जिल्ह्यातील आहेत. 

गुळाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध. अतिशय प्राचीन महालक्ष्मीचे मंदीर, हे मंदीर राजा कर्णदेव यांनी बांधले. 

प्रमुख स्थळे

 

कोल्हापूर - महालक्ष्मी मंदीर, रंकाळा तलाव, नवीन राजवाडा व शालिनी पॅलेस ही प्रक्षणीय स्थळे आहेत. 'कुस्तीगिरांची पंढरी' म्हणून ओळखले जाते. 'खासबाग' हे कुस्तीचे प्रसिद्ध मैदान येथेच आहे. अलीकडे या शहरास कलानगरी म्हणून ओळखले जाते. 

पन्हाळा - पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण असून पर्यटन केंद्र म्हणून विकसित झाले आहे. येथे पन्हाळगड हा किल्ला आहे. 

राधानगर - हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून येथे अभयारण्य आहे. ते राधानगरी अभयारण्य म्हणून ओळखले जाते. 

बाहुबली - हे ठिकाण जैन धर्मियांचे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे. 

आजरा - (तालुका स्थळ) रावळनाथ व रामलिंग मंदिरे व एक पडका किल्ला तसेच बॉक्साईटचे साठे यासाठी हा भाग प्रसिद्ध. रामलिंग मंदीर त्याच्या निसर्गरम्यते मुळे लोकांचे आवडते ठिकाण.

आळते - (ता. हातकणगले) लाल रंग म्हणजे आळता तयार करण्यासंबंधी हे गांव मध्ययुगात प्रसिद्ध होते. आजही काही प्रमाणात आळत्याची निर्मिती येथे होते. गुहेतील शिवमंदिर प्रसिद्ध. ही मुळची जैन धर्मीय गुहा. 

इचलकरंजी - (हातकणगले ता.) हातमागावरील साडया व इतर कपड्यांसाठी हे शहर प्रसिद्ध म्हणून या गावास मँचेस्टर म्हणत. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर हे प्रसिद्ध शास्त्रीय गायक याच गावातले. शास्त्रीय संगीत क्षेत्रात या गावाने मोठे योगदान दिले आहेत. 

कणेरी - (करवीर ता.) लिंगायतांचे पीठ, कडसिद्धे श्वराचा मठ यासाठी हे गाव प्रसिद्ध इ.स. 12 व्या शंतकापासून या मठाला इतिहास आहे. 

पन्हाळ्याच्या पाटील कुटुंबाकडे असलेल्या ताम्रपटात या मठाचा उल्लेख आढळतो. 

बालिंगे - (कात्यायनी पार्क) (करवीरा ता.) कात्यायनी मंदीर व निसर्ग यासाठी प्रसिद्ध. कात्यायनीचे एवढे मोठे क्षेत्र महाराष्ट्रात दुसरे नाही.

ज्योतिबा - (ता. पन्हाळा) 1730 मध्ये ज्योतिबाचे मंदीर राणाजीराव शिंदेंनी बांधले. येथे मोठी यात्रा भरते. 

वडगाव - हे गाव हातकणगले या तालुक्यात असून येथे धनाजी घोरपडेंची समाधी आहे. 

नरसिंहांची वाडी - यास नरसोबाची वाडी म्हणून ओळखतात. दत्त मंदिरासाठी प्रसिद्ध. 

हुपरी - हे गाव हातकणगले या तालुक्यात असून हे गाव चांदी व चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. 

महत्वाचे

 

कोल्हापूर जिल्ह्यात शेंगाचे तेल गाळण्याचे कारखाने जयसिंगपूर, इचलकरंजी, वडगांव तेथे आहे.  

कोल्हापूर जिल्ह्यात पातळे विणण्याचे माग इचलकरंजीत आहेत.  

हातकणगले तालुक्यात हुपरी येथे चांदीचे दागिने तयार करतात. 

कोल्हापूर जिल्ह्यातून पुणे-बेंगलोर (4) हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे.         

कोल्हापूर जिल्ह्यात हातकणगले या तालुक्यात पानमळे आहेत. 

कोल्हापुरी लोक बेंदराच्या सणाला बैलाची पुजा करतात. 

कोल्हापूर फेटा, चपला, पैलवान, गूळ इत्यादि बाबींसाठी प्रसिद्ध आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी व गगनबावडा तालुक्यात आश्रमशाळा आहेत. 

पन्हाळा किल्ला पन्हाळा तालुक्यात आहे. 

विशालगड किल्ला शाहूवाडी तालुक्यात आहे. 

सतीची समाधी विशालगड किल्ल्यावर आहे. 

राधानगरीचे धरण भोगावती नदीवर बांधले आहे. 

राधानगरीच्या धरणातील पाण्याच्या साठयाला लक्ष्मीसागर तलाव म्हणतात. 

शिवाजी विधापीठ कोल्हापूरला आहे. 

कोल्हापूरला खासबाग मैदान आहे. 

महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी औधोगिक वसाहत इचलकरंजीला आहे.

शालिनी पॅलेस कोल्हापूरला आहे. 

कोल्हापूर मालवण मार्ग हा गैबी खिंडीतून गेला आहे. 

कोल्हापूर मालवण हा मार्ग फोंडा घाटातून गेला आहे.

 

5. सोलापूर जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - सोलापूर           
 क्षेत्रफळ - 14,895 चौ.कि.मी. 

लोकसंख्या - 43,15,527 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके - 11 - करमाळे, बार्शी, माढे, माळशिरस, मोहोळ, पंढरपूर, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सांगोला, मंगळवेढे, अक्कलकोट. 

सीमा - उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद जिल्हा, पूर्वेस उस्म
ानाबाद जिल्हा, पश्चिमेस सातारा जिल्हा, दक्षिणेस सांगली जिल्हा व कर्नाटक राज्य असून वायव्येस पुणे जिल्हा आहे. 

जिल्हा विशेष -

 

हातमाग चादरी, ज्वारीचे कोठार व विठ्ठलाचे मंदीर (पंढरपूर) यासाठी प्रसिद्ध. मुळेगांव येथे कोरडवाहु शेती संशोधन केंद्र 1933 पासून कार्यरत आहे. 

भारतास स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी 1930 मध्ये एक अभूतपूर्व घटना सोलापूरच्या इतिहासात घडली. मे 1930 मध्ये ब्रिटीशांनी गांधीजींना अटक केल्यानंतर पोलीसाच्या गोळीबाराने प्रक्षुब्ध झालेल्या जनतेने शहरातील पोलीस व इंग्रज अधिकार्‍यांना पळवून लावले व तीन दिवस जिल्ह्याचा कारभार सभांळला. 

येथील मराठी लावणी सारस्वताचे एक लेणे ठरली आहे. 

प्रमुख स्थळे

 

सोलापूर - येथील चादरी 'सोलापुरी चादर' या नावाने विशेष प्रसिद्ध आहेत. 

पंढरपूर - पंढरपूर हे देशातील प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी एक आहे. येथे महाराष्ट्राचे दैवत विठ्ठल-रुखमिणीचे मंदीर असून आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो लोक दर्शनाला येतात. 

अक्कलकोट - स्वामी समर्थ यांचे मोठे मंदीर. 

करमाळे - येथील भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर प्रसिद्ध आहे. 

बेगमपुर - ता. मोहळ - येथे औरंगजेबाच्या मुलीची कबर आहे. 

ब्र्म्ह्पुरी - हे गाव मंगळवेढा या तालुक्यात येत असून येथे यादवकालीन सिद्धेश्वर मंदीर आहे. 

नान्नज - सोलापूरपासून 20 किमी. अंतरावर नान्नज हे ठिकाण वसले आहे. हरिणे व आकर्षक व दुर्मिळ अशा 'माळढोक' या पक्षांसाठी नान्नज येथील अभयारण्य प्रसिद्ध आहे. 

महत्वाचे

 

सोलापूर जिल्ह्याला महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार म्हणतात.

चादरीसाठी प्रसिद्ध शहर म्हणजे सोलापूर होय. 

सोलापूर जिल्ह्यातून भीमा, सिना, माण, भोगावती, बोरी या नद्या वाहतात.

सोलापूर जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती सोलापूर, कुर्डूवाडी, चिंचोळीयेथे आहे. 

सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने चादरी, हातमाग, तयार कपडे, तंबाखू, लोखंडी सामान हे आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातील लोहमार्ग मुंबई-पुणे-सोलापूर-मद्रास(ब्रोडगेज), सोलापूर-गदग(मिटरगेज), मिरज-कुर्डूवाडी-लातूर(नॅरोगेज).वैराग हे धार्मिक स्थळ सोलापूर जिल्ह्यात आहे. 

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पवित्र क्षेत्र आहे. 

सोलापूर जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते पुणे-सोलापूर-हैद्राबाद, सोलापूर-चित्रदुर्ग. 

चीन मधील युद्धकाळात 1938 ते 1942 या दरम्यान तेथे जाऊन रुग्णांची व गोरगरिबांची सेवा करणारे डॉ.व्दारकानाथ कोटणीस हे आंतराष्ट्रीय आदर्शव्यक्ती सोलापूरचे होत.           
🔹दाजीपूर अभयारण्य

दाजीपूर एक छोटस, इवलस नाव परंतु या दाजीपूरात रम्य, दाट कीर्द झाङी, वृक्ष-वल्ली, शेकडो नमुन्याचे प्राणी आणि पक्षी पाहिले कि, या आरण्यात नित्य व्यवहारातील सर्व औपचारीक दैनंदिन व्यवहार विसरून निसर्गाच्या कुशीत लपलेला एका छोट्या मुलासारखी माया मिळते.हे या गावाचे वैशिष्ट.
कोल्हापूर नगरीच्या राधानगरी तालुक्यातील हे रम्य गाव. अगदी २ ते ३शे. लोकवस्तीचे हे स्थान कोल्हापूर सावंतवाडीच्या हमरस्त्यावर एकाकी झालेल हे गांव गेल्या कांही दिवसापासुन पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. गेल्या कित्येक वर्षात गवारेडा हा हुम दांडग्या परंतु वैशिष्ट्यपुर्ण जनावरासाठी या अरण्याची महाराष्ट्रात ख्याती आहे.
या अरण्यात गव्यांचा कळपच्या कळप आढळतो त्याचबरोबर हरिण,सांबर,चितळ यांचे कळप ही दिसतील,कधी कधी लाल मातीत बिबळ्या वाघाचे चाललेले ठसे दिसतील.
जंगलात साळींदर,अस्वले,साप,नाग यांची ही रेलचेल सुरूच असते.महाराष्ट्र राज्याच्या जंगल खात्याने याक़डे खास लक्ष देऊन या अभयारण्याची चांगली जोपासना केली आहे.त्याबरोबर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने दाजीपुरचे पर्यटन विकास केंद्र म्हणुन लक्ष केंद्रीत केले आहे.येथील युवक गृहाचे जंगल निवास म्हणुन रूपांतर केले आहे.पर्यटकांसाठी तंबु निवास सुविधा केली आहे.भोजन उपहार गृहे याचीही स्वंतंत्र व्यवस्था आहे.
राज्य परिवहन मंडळाच्या थेट गाड्या कोल्हापूर ते दाजीपूर येथे पर्यंत जातात.तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ही स्वंतंत्र खास गाड्यांची व्यवस्था केली आहे.
राधानगरी जलाशयाचा नैसर्गिक उपयोग करून अद्यावत असे विश्रामगृह उभारण्याचे काम सुरू केले आहे. या परिसरात सिंधुदुर्ग जिल्हा गगनगिरी महाराज मठ याचा भाग असुन ३७२ स्क्वेअर मिटरचा हा परिसर पर्यटकांचे खास आकर्षण ठरला आहे.

Join us @MPSCGeography
★|| eMPSCkatta ||★

जॉईन करा www.empsckatta.blogspot.in या ब्लॉग चे अधिकृत टेलिग्राम चॅनेल.

जॉईन करण्यासाठी @empsckatta यथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN या ऑप्शन वर क्लिक करा.

किंवा

Telegram.me/eMPSCkatta येथे क्लिक करा , चॅनेल ओपन होईल , त्यानंतर चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या JOIN ऑप्शन वर क्लिक करा.
________________________________________
आपल्या मित्रांनाही जॉईन करा.
महाराष्ट्र टाइम्स - जागृत ज्वालामुखी
वेण्णा नदी - Page 1
🔴- आदिवासी समुह लक्षणे व वैशिष्ट्ये


*🔻- लक्षणे -*---

१) आदिवासी समुह हा निश्चित भूप्रदेशात राहनारा एक सजातीय समुह आहे.

२) प्रत्येक आदिवासी समुहाला व जमातीला एक विशिष्ट असे नाव परंपरेनुल़सार प्राप्त झालेले असते.
उदा- गौंड, कोरकू, भिल्ल इत्यादी.

३) प्रत्येक आदिवासी जमातीची भाषा भिन्न असते. ती बोलीभाषा असु शकते किंवा लिपीबद्ध भाषा सुद्धा असु शकते. भारतात सुमारे ४०० पेक्षा अधिक बोलीभाषा बोलनारे आदिवासी समुह आहेत.

४) एकाच पुर्वजापासुन आपली निर्मिती झाली असे माननारा हा समुह आहे. म्हनजे तो रक्तबंध आणि विवाह नात्यावर आधारित असनारा समुह आहे.

५) पोषाख पद्धती, विवाह पद्धती, रितीरिवाज, इत्यादी बाबतवएकवआदिवासि समुह दुसऱ्या आदि़वासि समुहापेक्षा वेगळा असतो.

६) निरक्षरता हे आदिवासि समुहाचे ठळक वैशिष्ट्य अाहे.

७) जादूटोना व धर्म यांच्या आचरनाला आदिवीसि समुहात विशेष महत्व दिले जाते.

८) यंत्र सामुग्रीचा उपयोग, औद्योगीक विकास याबाबतित हा समुह अगदी प्राथमिक अवस्थेत असतो.

९) आदिवासी समुहातील लोक उपजिविकेल़साठी सभोवतालच्या नैसर्गिक पर्यावरनावर अवलंबून असतात. साधी अर्थव्यवस्था व सरळ व सोपी समाजव्यवस्था हे आदिवासी समुहाचे महत्वपुर्ण असे सामान्य लक्षन आहे.
=========
*🔻- आदिवासी समुह वैशिष्ट्य-*

१) *विशिष्ट भूप्रदेश*---
एका आदिवासी जमातीची एका विशिष्ट भूप्रदेशात वस्ती असते.
उदा - ठाणे जिल्ह्यातील डहानुचा परिसर सोजून अन्यत्र वारली आदिवासी जमातीची वस्ती आढळत नाहि.
कोरकू, कोलाम व अन्य आदिवासी समुहाची वस्ती एक विशिष्ट भूप्रदेशात असव्याचे दिसुन येते. कोनत्याही अडचनी आल्या तरा ते अापली वस्ती सोडून जान्यास तयार नसतात.

२) *समूहाचा आकार*---
आदिवासी समुहाचा आकार लहान असतो. आदिवासींच्या काहू गावांमध्ये वा वस्त्यांमध्ये २०-२५ घरे म्हनजेच १००-१५० लोक रहात असतात . दुर्गम परिसर व समुहाची सदस्य संख्या कमी यामुळे त्यांच्या सामाजिक संपर्काचे क्षेत्र अत्यंत मर्यादित असते.

३) *रक्त संबंधांवर आधारीत सजातीय समुह*---
आपला पुर्वज एकच आहे अशी धारना आसाऱ्या काही कुटुंबाचा एक गट म्हनजे कुळ होय. एकाच कुळातील सदस्यांमध्ये बंधुत्वाचे नाते असते. एका आदिवासी जमातीत वा समुहात कुळांची संख्या मर्यादित असते. स्वत:चे कुळ सोडून अन्य कुळातील वधुशी किंवा वराशी विवाहसंबंध जोडले जातात.

४) *विवाहपद्धती*---
विवाह हे केवळ वधू- वर या देन व्यक्तिंना जोडनारे बंधन नसुन ते देन कुटुंबांना व कुळांना जोडनारे साधन आहे.़,अशी आदिवासी समुहाची धारना आहे. या समुहात वधूपित्याला योग्य ते मुल्य देउन वधू प्राप्त केली जाते. वधूमुल्य देणे ही वधूजवळ असलेल्या पात्रतेची व गुनांची पावता हेय असे मानले जाते. विवाहापुर्वी मुलगी आर्थिक स्वरुपाची कार्य करत असते. यामुळे विवाहानंतर पतिचे आर्थिकनउत्पन्न वाढते व वडिलांचे कमि होते. म्हनुन वधूमुलिय देने योग्य आहे , असे आदिवासी समुहात मानले जाते.

५) *कुटुंबपद्धती*---
या समुहात सामान्यपने दोन पिढ्यांचे एकत्र कुटुंब असते. या कुटुंबात भावंडांचे एकमेकांवर वि़लक्षन प्रेमव असते. आदिवासी समुहात पितृसत्ताक कुटुंबपद्धती मोठ्या प्रमानावर आहे. तसेच काही मोजक्या समुहात मातृसत्ताक पद्धती आहे. या समुहात कुटुंबप्रमुखांचा अधिकार व नियंत्रण बिनातक्रार मान्य केले जाते. कुटुंबसदस्यांच्या आर्थिक, धार्मिक, राजकिय व सामाजिक वर्तनावर कुटुंबसंस्थेचे बारीक लक्ष असते.

६) *आर्थिक स्थिती*---
आदिवासींच्या जिवनावश्यक गरजा मर्यादित असुनदेखिल त्या पुर्ण करन्यासाठी त्यांना झगडावे लागते. आदिवासि कंदमुळे गैळा करने, शिकार, मासेमारी, पशुपालन ,शेती, मोलमजुरी यांसारख्या आर्थिक क्रिया करतात. वस्तीच्या सभोवती असनाऱ्या नैसर्गिक बक्यावरनावर त्यांनी कोनत्या आर्थिक क्रिया कराव्यात हे अवसंबुन असते. आर्थिक क्रिया करताना ते परंपरागत अवजारे व पद्धतिंचा वापर करतात.
उदा - भाला, धनुष्य बान , कोयता यांचा शिकार करन्यासाठी उपयोग करतात. नफा मिळवने हे त्यांचे ध्येय नाही. जीवनाश्यक मुलभूत गरजा भागविता येतिल एवढेच उत्पन मिळविन्याचा ते प्रयत्न करतात. परंतु तेवढे देखिल उत्पन त्यांवा मिळत नाही. यामुळेवजवळ जवळ सर्वच आजटदिवासी दारिद्य्रा खालिल जिवन जगतात.

७) *धर्म व जादूचा प्रभाव*---
आजिवासींच्या जिवनावर धर्म व जादूचा प्रभाव आहे. निसर्ग पुजा व पुर्वज पुजा हे दोन प्रकार त्यांच्यात दिसुन येतात. तेवस्वत:च्या शरिरावर कुसचिन्ह गौंदवून घेतात. तसेचवघरांवर ही कुलचिन्हांची चित्रे काढतात. यामळे शरिराचे व घराचे संरक्षन होते अशी त्यांची धारना आहे. भूत, पिशाच यांची बाधा झाल्यामळेच रोग होतात, असा त्यांचा विश्वास आहे. म्हनुनच सर्व आदिवासी समुहांमध्ये मात्रिकाला महत्वपुर्ण स्थान प्राप्त झाल्याचे दिसुन येते.

८) *शिक्षण व मनोरंजनाची साधने*---
दुर्गम भागात राहनाऱ्या आदिल़वासिंचे जिवन खडतर असते. नाचगाणी, नक
ला, खेळ, देवदेवतांचे उत्सव यामुळे त्यांच्या जिवनात एक वेगळेच चैतन्य निर्माण होते. युवागृहे किंवा शयनगृहे यांना त्यांच्या जिवनात खास महत्व आहे. वयाच्या चौथ्या वर्षी मुलांना व मुलींना युवागृह या संस्थेत दाखल करतात. विवाह होइपर्यंत मुले व मुली युवागृहाचे सदस्य असतात. जमातीचा इतिहास, प्रथा, परंपरा याची माहिती युवागृहे आपल्या सदस्यांना देतात. युवागृहाचे हे शैत्षनिक कार्य आदिवासी समुहासाठी अत्यंत महत्वाचे असते.

९) *स्त्रियांचा दर्जा*---
आदिवासी समुह आर्थिकदृष्ट्या अप्रगत असले तरीही या समुहांमध्ये स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीची वागनुक दिली जाते. बहुताश आदिवासी जमातींमध्ये स्त्रियांचा आर्थिक क्रियांनध्ये समावेश असतो. काही समुहांमध्ये स्त्रियांना पुरोहित म्हनुन विधी करन्याचा तसेत मृत कुटुंबसदस्याच्या प्रेताचा अग्निसंस्कार करन्याचा अधिकार आहे.

१०) *जीवनपद्धती*---
आदिवासी समुह सदस्यांचे परस्पर संबंध हे रक्तसंबंध व दर्जा यावर आधारलेले असतात. रुढी, परंपरा,श्रद्धा इत्यादींनी त्यांचे सामाजिक जिवन नियंत्रित केले जाते. त्यांचेवखाने- पिने, रहानीमान इत्यादींमध्ये एकरुपता असल्याचे दिसुन येते. दऱ्याखोऱ्यातील नैसर्गिक संकटांना तोंड देताना त्यांना परस्पराच्या सहकार्याची गरज लागते. त्यामुळेच त्यांच्या सामाजीक जिवनावर समुहभावनेचा प्रभाव अधिक प्कमानात असतो.
============================================

*🔴- शेतकरी समुह अर्थ व स्थिती -*

*🔻- अर्थ-*---
शहरी क्षेत्रात श्रीमंत, मध्यम व गरिब असे तिन गट अाढळतात. आर्थिक स्थितीमधिल तफावतीमुळे या तीन्ही गटाची जिवनपद्धती वेगवेगळी असते. ग्रामिन क्षेत्रातही श्रीमंत वा बागायतदार शेतकऱ्यांचे मध्यम शेतकरी, अल्पभुधारक शेतकरी, व भुमिहीन शेतमदुर असे भिन्न गट आहेत. ग्रामीण समुहात जमिनविषयक संबंध अत्यंत महत्ल़वाचे आहेत. या समुहातुनच हे उपसमुह निर्मान झाले आहेत. या सर्व उपगटाची अार्थिक स्थिती भिन्न असली तरी आचार विचारांची पद्धती , जीवनविषयक दृष्टीकोन यांत काही फारसा फरक नसतो. सर्वात महत्वाचे म्हनजे या सर्वांच्या शेती या व्यवसायाचे स्वरुप. समान असते. निसर्गाची अवकृपा झाली की, त्याचा फटका लहान व मोठ्या शेतकऱ्यांना सारख्याच प्रमानात बसतो. शेतमजुरांची उपलब्धता ही मध्यम शेतकऱ्यांप्रमानेच बागायतदारामचीही समस्या होउ लागली आहे. शेतमालाच्या अल्प किंमती व उत्पादन खर्च जास्त याचा ताळेबंद जमत नसल्यामुळे "शेती करने परवडत नाही " ही ओरडवग्रामीन भागात सार्वत्रिक स्वरुपाची बनली आहे. या दृष्टीनेच आपन ग्रामीनक्षेत्रामधिल शेतकरी या विशाल आकाराच्या समुहाची ओळख करुन घेत आहोत.
======

*🔻- भारतिय शे़तकऱ्यांची जिवनविषयक स्थिती -*

विभिन्न शास्त्रांनधिल अध्ययन, सर्वेक्षन, नेत्याचे विचार यांसारख्या विविध माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनविषयक स्थितीचे चिन्ह पुढील प्रमाने मांडले जाते.
भारतीय शेतकरी कर्दबाजारी आहेत. तेनअल्पशिक्षित व कर्जबाजारी असून परंपरावादी व सनातनी वृतीचे आहेत. ते शेती व्यवसायाकडे व्यापारी दृष्टीतून पाहन्यापेक्षा पोट भरन्याचा एक मार्ग या दृष्टीने पाहतात. यामुळे शेतीव्यवसायातील उत्पन्न व उत्पादन सिमीत राहिले आहे. ते शासनाने ठरवलेल्या विकास योजनांचा मोकळ्या मवाने स्विकार करत नाहीत. उत्पादन वाढीसाठी खासवप्रयत्न करन्याची प्रेरना व वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अवलंब करन्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नाही.
शेती उत्पादनाची हेतु व उत्पादन तंत्र यांमध्ये सुधारना झाल्याशिवाय त्यांच्या आर्थिक व जीवनविषयक स्थितीमध्ये फारसा बदल घडून येने शक्य नाही.

*शेतकरी संघटना*---
सुमारे ७०% लोक शेतीव्यवसायाशि निगडित आहेत. असे असऩुन देखिल शेतकरी संघटित नाहीत. ब्रिचिश राजवटी पासुनचे चित्र गेल्या २०-२५ वर्षांपासुन बदलु लागले आहे. शेतीव्यवसायासी ल़संबंधित विविध प्रश्नानी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्मान झाला आहे. शेतकऱ्यांच्या या असंतोषातुनच अनेक राज्यांमध्ये आंदोलने सुरु झाली व त्यांच्या संघटना निर्माण झाल्या.
शासनाचे धोरन व निर्णय यांवर प्रभाव टाकनाऱ्या संघटित गटांना हितसंबंधि गट व दबाव गट संबोधले जाते. शेतकरी संघटनेच्या सामुहिक प्रयत्नातुन प्राप्त झाल़्ेल्या अनेक गौष्टींकडे नजर टाकली , की या संघटनेने दबाव गट म्हनुन आपले स्थान निर्मान करन्यास यश प्राप्त केले आहे.
औद्योगिक क्षेत्रातिल दबावगटांच्या तुलनेत शेतकरी संघटना या दबावगटाचा प्रभाव फारच कमी आहे. शेतकरी संघटनांची शक्ती व प्रभाव फारसा वृद्धींगत न होन्याची कराने कोनती, हे देखिल तपासुन पाहता येईल. फुमशेती,वनौषधी, जैविक शेति , करन्याकडे शेतकऱ्यांचे मन वळविने , ग्रामीन जीवनात सुधारना घडवून आननाऱ्या चळवळि घडवून आनने, यांसारखी अनेक विधायक काम करन्यास शेतकरी संघटनांना भरपूर वाव आहे असे म्हनता येईल. थोडक्यात , शेतकऱ्यांचे हितसंबंध व त्यांच्या मागन्या शासनासम
ोर सुस्पष्चपने मांडन्याचे आणि शेतकऱ्यांना संघटित करन्याचे महत्वपुर्ण कार्स शेतकरी संघटनांनी केले आहे. म्हनुनच शेतकरी संघटनेच्या राजकिय, आक्थिक व सामाजिक क्षेत्रामधिल कार्याला तसेच त्याच्या अध्ययनाला महत्व प्राप्तवझाले आहे असे म्हनता येईल.
--------------------------------------
Forwarded from  Shashi
जगातील सगळ्यात उंच ठिकाणे

1) माउंट एवरेस्टः नेपाळमध्ये सगरमाथा म्हटली जाणारी ही जगातले सगळ्यात उंच टोक आहे. 1955 मध्ये भारताकडून याचं सर्वेक्षण करण्यात आले होते. याची उंची 8,848 मीटर एवढी आहे. ब्रिटिश सर्वेक्षक सर जॉर्ज एवरेस्ट यांच्या सन्मानार्थ या पर्वताला माऊंट एवरेस्ट असे नाव देण्यात आले.

2) के 2: पाकिस्तान व्याप्त काश्मिरमध्ये येणारे कंचनजंघा 2 हे जगातले दुसर्‍या क्रमांकाचे उंच पर्वत आहे. के2 या नावाने ओळखले जाणारे हे पर्वत 8,611 मीटर उंच आहे.

3) कंचनजंघाः भारतातले सिक्किम आणि नेपाळच्यामध्ये कंचनजंघा हा पर्वत आहे. जगातले तिसर्‍या क्रमांकाचा हा पर्वत आहे. कंचनजंघाची उंची 8,586 मीटर आहे.

4) ल्होत्सेः हा पृथ्वीवरचा चौथ्या क्रमांकाचा पर्वत आहे. हा पर्वत दक्षिण कोलमार्गे माउंट एव्हरेस्टला जोडलेला आहे. ल्होत्सेचे सर्वोच्च शिखर समुद्रसपाटीपासून 8,516 मी उंच आहे. कंचनजंघासारखेच ल्होत्से पर्वतदेखील माउंट एव्हरेस्टच्या बाजूलाच आहे.

5) मकालूः माउंट एवरेस्टपासून फक्त 19 किलोमीटर अंतरावर हा मकालू पर्वत आहे. 8,485 मीटर उंच हा पर्वत नेपाळ आणि चीनच्यामध्ये आहे.

6) चोयुः 8,201 मीटर उंच असणारा हा पर्वत नेपाळ आणि चीनच्या सीमेवर आहे.

7) धौलागिरीः नेहमीच सफेद बर्फाच्या आच्छादनामध्ये असणारे हे धौलागिरी पर्वत नेपाळमध्ये आहे. 8,167 मीटर उंच असलेले हे पर्वत चढणं सगळ्यात कठीण मानलं जातं.

8) मनास्लुः 8,163 मीटर उंच असलेले हे पर्वतही नेपाळमध्ये आहे. चोयु पर्वताच्या बाजूला असलेल्या या मनास्लु पर्वतावर पहिल्यांदी माणुस 1956 मध्ये चढला होता.

9) नंगा पर्वतः पाकिस्तान व्याप्त काश्मिरच्या गिलगिट बालटिस्तानमध्ये हा पर्वत आहे. या पर्वताची उंची 8, 126 मीटर आहे. नंगा पर्वतवर चढणे खुप कठीण मानले जाते. या पर्वतावर चढणं एवढं कठीण आहे ही या पर्वताला ‘किलिंग माउंटन’ असेही म्हटले जाते.

10) अन्नपूर्णाः 8,091 मीटर उंचीचे हे अन्नपूर्णा पर्वत उत्तर मध्य नेपाळमध्ये आहे. माऊंट एवरेस्ट चढायला जाणारे अनेकदा अन्नपूर्णावर अभ्यास करतात.

11) नंदा देवीः 7,810 मीटर उंच नंदा देवी पर्वत हे भारतामधे असलेले सगळ्या मोठे पर्वत आहे. उत्तराखंडच्या गढवाल मंडलमध्ये येणारे हे पर्वत 1988 पासून जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळाले आहे.
★|| eMPSCkatta ||★
.
👉 भूकंप का होतात?
.
भूगर्भातील दोन खडक किंवा प्लेट्सचे एकमेकांवर जोरदार घर्षण होते. हे खडक प्लेट्स एकमेकांना ढकलत असतानाच प्रचंड दबावामुळे दुभंगतात. या प्रक्रियेचा पृथ्वीच्या पृष्ठभागावर जाणवणारा परिणाम म्हणजेच भूकंप होय.
.
हे खडक किंवा प्लेटची भूकंपादरम्यान आणि नंतरही पुन्हा एकत्र होईपर्यंत हालचाल होत राहते.
.
भूकंपाचे मोजमाप :
भूकंपाची नोंद घेणाऱ्या यंत्रास ‘सेस्मोग्राफ’ अथवा ‘सेस्मॉमीटर’ असे नाव आहे. तसेच भूकंपाची ’महत्ता’ मोजण्यासाठी ‘रिश्टर स्केल’ ह्या एककाचा वापर केला जातो. हे एक गणिती एकक आहे. पाच स्केलच्या भूकंपातून निर्माण होणारी ऊर्जा, चार रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या दहापट असते. भूकंपाची ’तीव्रता’ मापण्याचे एक वेगळे अ-गणिती स्केल आहे. त्याचा संबंध भूकंपाने होणाऱ्या नुकसानीशी निगडित असतो, ऊर्जेशी नसतो.
वाचा सविस्तर: http://empsckatta.blogspot.in/2015/05/blog-post_61.html?m=1
काही भूगोल विषयक ऑडिओ नोट्स: