Forwarded from MPSC Geography
9th Geography Short Notes By eMPSCkatta.pdf
5.1 MB
Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
Forwarded from MPSC Geography
🔹मान्सूनचक्राधारित समृद्ध वनसंपदा
अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच अतिशय दाट अशी वनसंपदा लाभली आहे. या जंगलात असलेल्या समृद्ध जैवविविधतेमुळे ही बेटे जगासाठी जैवविविधतेची प्रयोगशाळाच आहेत.
कित्येक लाख वर्षांपासून नियमित येणाऱ्या मान्सूनचक्राने बंगालच्या उपसागरातील बेटांना समृद्ध आणि असामान्य वनसंपदा लाभली आहे. अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच दाट जंगले लाभली आहेत. या बेटांवर नर्ऋत्य आणि ईशान्य दोन्ही मान्सून सक्रिय असतात, त्यामुळे वर्षांतून सरासरी आठ महिने या बेटांना पाऊस मिळतो. या बेटांवर उष्णकटिबंधीय आद्र्र सदाहरित वने, निमसदाहरित वने, दमट पानगळीची वने आणि समुद्रकिनाऱ्यातील दलदलीची वनेही आहेत. या सर्व वनांवर जगणारी जैवविविधताही तेवढीच समृद्ध आहे आणि म्हणूनच भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नकाशावर अंदमान आणि निकोबार बेटांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
संपूर्ण पृथ्वीच्या भूभागाचा विचार केल्यास जैवविविधतेचे प्रमाण उष्णकटिबंधीय भूक्षेत्रात (ट्रॉपिकल झोन) तुलनेने अधिक आहे. शीतकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये तुलनेने कमी आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये अत्यल्प प्रमाणात जैवविविधता आहे. म्हणूनच उष्णकटिबंधीय प्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या उष्णकटिबंधीय भूप्रदेशात असणाऱ्या वर्षांवनांमध्ये (ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट) जगातील सर्वात महत्त्वाची जैवविविधता आहे. आज पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या फक्त सात टक्के एवढेच क्षेत्र अशा वर्षांवनांनी व्यापलेले आहेत. जगातील निम्म्याहून अधिक जैवविविधता याच सात टक्के भूभागावर आहे आणि म्हणूनच ही वर्षांवने जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वपूर्ण आहेत.
भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे, आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. पृथ्वीवर उष्णकटिबंधीय क्षेत्रात असे १७ देश आहेत जे जैवविविधतेने समृद्ध आणि संपन्न आहेत. त्यातील भारतासह बारा देश हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज भारतामध्ये प्राण्यांच्या जवळजवळ ९८ हजार आणि वनस्पतींच्या ४८ हजार प्रजाती आहेत. ही जगभरातील संख्येच्या जवळजवळ सात टक्के एवढी आहे.
जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असणारे भारताचे चार प्रमुख प्रदेश आहेत; ईशान्य भारत, पश्चिम हिमालयन प्रदेश, पश्चिम घाट आणि अंदमान – निकोबार बेटं. या चारही क्षेत्रांमध्ये अंदमान – निकोबारचा सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ ८६ टक्के भूभाग वनांनी व्यापला आहे. यावरूनच आपल्याला या बेटांचे महत्त्व लक्षात येते. अंदमान बेटांवर निकोबारपेक्षा वन क्षेत्र मोठे आणि विस्तृत आहेत.
अंदमान मुख्यत: डोंगराळ प्रदेश आहे. इथे समुद्रकिनाऱ्यापासून ते डोंगरापर्यंतच्या जंगलांची प्रमुख्याने चार प्रकारांत विभागणी केली गेली आहे. किनाऱ्याला लागून आहे ते खारफुटीचे जंगल, त्यानंतर गवताळ प्रदेश, मग वर्षांवने आणि सगळ्यात शेवटी दमट पानगळीचा प्रदेश अशी ही विभागणी आहे, त्यात गवताळ प्रदेशाचे क्षेत्र फार कमी आहे. इथल्या जंगलांत २२०० हून जास्त प्रकाराच्या वनस्पतींची नोंद झाली आहे आणि त्यातील जवळजवळ १३०० वनस्पती देशाच्या इतर भागात नसण्याचीच शक्यता आहे. यातील काही विशिष्ठ वनस्पती काही विशिष्ट बेटांवरच आढळतात. अनेक बेटांवर तिथल्या स्थानिक विशिष्ट वनस्पती आहेत, ज्या इतरत्र मिळत नाहीत.
खर म्हटलं तर उष्णकटिबंधीय वर्षांवने म्हणजे आपल्या पृथ्वीची फुप्फुसे आहेत. पृथ्वीच्या भूपृष्ठावर आढळणारी निम्म्याहून अधिक जीवसृष्टी या वर्षांवनांत जगते. या वर्षांवनांचा आणि इथल्या जैवविविधतेचा अजूनही पुरेसा अभ्यास झालेला नाही. काही संशोधनांप्रमाणे अजूनही आपल्याला अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेपकी फक्त २० टक्के एवढेच प्राणी, वनस्पती, आणि सूक्ष्मजीवांची माहिती आहे. अजूनही संशोधनातून नवीन नवीन प्रजाती जगासमोर येत आहेत.
निसर्गाने या बेटांना सर्व काही मुक्तहस्ताने दिलं आहे. मान्सूनच्या मार्गावर असणाऱ्या या बेटांवर निसर्गाची संपन्नता आणि वैविध्य दिसून येते. या बेटांवर ९६ वन्यजीव अभयारण्ये आहेत, तसेच नऊ राष्ट्रीय उद्याने, एक जैविक उद्यान आणि एक जैव संरक्षित क्षेत्र आहे. या बेटांवर जगातील सगळ्यात मोठे कासव (लेदर बॅक टर्टल) अंडी घालतात, तसेच खारफुटीच्या जंगलात खाऱ्या पाण्याच्या मगरी आपल्या पिल्लाचं संगोपन करतात.
इथल्या जैवविविधतेचा अजून एक मजबूत कणा म्हणजे इथली खारफुटीची जंगले. मुळात खारफुटीची जंगले ही एक नाजूक परिसंस्था आहे जिच्यावर अनेक लहान-मोठय़ा तसंच ेसूक्ष्मजीवांचा अधिवास असतो. समुद्रकिनाऱ्यावर खाडीच्या खाऱ्या पाण्यामध्ये या वनस्पती जगतात. अंदमान हे खारफुटी जैवविविधतेचे एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील जंगलांत राईजोफोरा म्युक्रोनाटा, ब्रुगिएरा कोंजुगेटा, एव्हीसीनिया ओफिशिनेलिस, सेरिअप्स टगल प्रामुख्याने आढळतात. खारफुटी जंगले, किनाऱ्याची उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, पूर, तसेच वेगवान वाऱ्यांपासूनही सागरी तटांचे रक्षण करतात. ही जंगले अनेक लहान-मोठय़ा प्राण्यांची घरेही आहेत.
भारतात आढळ
अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच अतिशय दाट अशी वनसंपदा लाभली आहे. या जंगलात असलेल्या समृद्ध जैवविविधतेमुळे ही बेटे जगासाठी जैवविविधतेची प्रयोगशाळाच आहेत.
कित्येक लाख वर्षांपासून नियमित येणाऱ्या मान्सूनचक्राने बंगालच्या उपसागरातील बेटांना समृद्ध आणि असामान्य वनसंपदा लाभली आहे. अंदमान निकोबारला मान्सूनमुळेच दाट जंगले लाभली आहेत. या बेटांवर नर्ऋत्य आणि ईशान्य दोन्ही मान्सून सक्रिय असतात, त्यामुळे वर्षांतून सरासरी आठ महिने या बेटांना पाऊस मिळतो. या बेटांवर उष्णकटिबंधीय आद्र्र सदाहरित वने, निमसदाहरित वने, दमट पानगळीची वने आणि समुद्रकिनाऱ्यातील दलदलीची वनेही आहेत. या सर्व वनांवर जगणारी जैवविविधताही तेवढीच समृद्ध आहे आणि म्हणूनच भारताच्याच नव्हे तर संपूर्ण जगाच्या नकाशावर अंदमान आणि निकोबार बेटांना अनन्यसाधारण महत्त्व आहे.
संपूर्ण पृथ्वीच्या भूभागाचा विचार केल्यास जैवविविधतेचे प्रमाण उष्णकटिबंधीय भूक्षेत्रात (ट्रॉपिकल झोन) तुलनेने अधिक आहे. शीतकटिबंधीय भूप्रदेशांमध्ये तुलनेने कमी आणि ध्रुवीय प्रदेशामध्ये अत्यल्प प्रमाणात जैवविविधता आहे. म्हणूनच उष्णकटिबंधीय प्रदेश हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या उष्णकटिबंधीय भूप्रदेशात असणाऱ्या वर्षांवनांमध्ये (ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट) जगातील सर्वात महत्त्वाची जैवविविधता आहे. आज पृथ्वीच्या एकूण भूभागाच्या फक्त सात टक्के एवढेच क्षेत्र अशा वर्षांवनांनी व्यापलेले आहेत. जगातील निम्म्याहून अधिक जैवविविधता याच सात टक्के भूभागावर आहे आणि म्हणूनच ही वर्षांवने जगातील जैवविविधतेच्या दृष्टीने अतिमहत्त्वपूर्ण आहेत.
भारत हा उष्णकटिबंधीय देश आहे, आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अति महत्त्वाचा आहे. पृथ्वीवर उष्णकटिबंधीय क्षेत्रात असे १७ देश आहेत जे जैवविविधतेने समृद्ध आणि संपन्न आहेत. त्यातील भारतासह बारा देश हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आज भारतामध्ये प्राण्यांच्या जवळजवळ ९८ हजार आणि वनस्पतींच्या ४८ हजार प्रजाती आहेत. ही जगभरातील संख्येच्या जवळजवळ सात टक्के एवढी आहे.
जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असणारे भारताचे चार प्रमुख प्रदेश आहेत; ईशान्य भारत, पश्चिम हिमालयन प्रदेश, पश्चिम घाट आणि अंदमान – निकोबार बेटं. या चारही क्षेत्रांमध्ये अंदमान – निकोबारचा सर्वात जास्त म्हणजे जवळजवळ ८६ टक्के भूभाग वनांनी व्यापला आहे. यावरूनच आपल्याला या बेटांचे महत्त्व लक्षात येते. अंदमान बेटांवर निकोबारपेक्षा वन क्षेत्र मोठे आणि विस्तृत आहेत.
अंदमान मुख्यत: डोंगराळ प्रदेश आहे. इथे समुद्रकिनाऱ्यापासून ते डोंगरापर्यंतच्या जंगलांची प्रमुख्याने चार प्रकारांत विभागणी केली गेली आहे. किनाऱ्याला लागून आहे ते खारफुटीचे जंगल, त्यानंतर गवताळ प्रदेश, मग वर्षांवने आणि सगळ्यात शेवटी दमट पानगळीचा प्रदेश अशी ही विभागणी आहे, त्यात गवताळ प्रदेशाचे क्षेत्र फार कमी आहे. इथल्या जंगलांत २२०० हून जास्त प्रकाराच्या वनस्पतींची नोंद झाली आहे आणि त्यातील जवळजवळ १३०० वनस्पती देशाच्या इतर भागात नसण्याचीच शक्यता आहे. यातील काही विशिष्ठ वनस्पती काही विशिष्ट बेटांवरच आढळतात. अनेक बेटांवर तिथल्या स्थानिक विशिष्ट वनस्पती आहेत, ज्या इतरत्र मिळत नाहीत.
खर म्हटलं तर उष्णकटिबंधीय वर्षांवने म्हणजे आपल्या पृथ्वीची फुप्फुसे आहेत. पृथ्वीच्या भूपृष्ठावर आढळणारी निम्म्याहून अधिक जीवसृष्टी या वर्षांवनांत जगते. या वर्षांवनांचा आणि इथल्या जैवविविधतेचा अजूनही पुरेसा अभ्यास झालेला नाही. काही संशोधनांप्रमाणे अजूनही आपल्याला अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेपकी फक्त २० टक्के एवढेच प्राणी, वनस्पती, आणि सूक्ष्मजीवांची माहिती आहे. अजूनही संशोधनातून नवीन नवीन प्रजाती जगासमोर येत आहेत.
निसर्गाने या बेटांना सर्व काही मुक्तहस्ताने दिलं आहे. मान्सूनच्या मार्गावर असणाऱ्या या बेटांवर निसर्गाची संपन्नता आणि वैविध्य दिसून येते. या बेटांवर ९६ वन्यजीव अभयारण्ये आहेत, तसेच नऊ राष्ट्रीय उद्याने, एक जैविक उद्यान आणि एक जैव संरक्षित क्षेत्र आहे. या बेटांवर जगातील सगळ्यात मोठे कासव (लेदर बॅक टर्टल) अंडी घालतात, तसेच खारफुटीच्या जंगलात खाऱ्या पाण्याच्या मगरी आपल्या पिल्लाचं संगोपन करतात.
इथल्या जैवविविधतेचा अजून एक मजबूत कणा म्हणजे इथली खारफुटीची जंगले. मुळात खारफुटीची जंगले ही एक नाजूक परिसंस्था आहे जिच्यावर अनेक लहान-मोठय़ा तसंच ेसूक्ष्मजीवांचा अधिवास असतो. समुद्रकिनाऱ्यावर खाडीच्या खाऱ्या पाण्यामध्ये या वनस्पती जगतात. अंदमान हे खारफुटी जैवविविधतेचे एक अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील जंगलांत राईजोफोरा म्युक्रोनाटा, ब्रुगिएरा कोंजुगेटा, एव्हीसीनिया ओफिशिनेलिस, सेरिअप्स टगल प्रामुख्याने आढळतात. खारफुटी जंगले, किनाऱ्याची उष्णकटिबंधीय चक्रीवादळे, पूर, तसेच वेगवान वाऱ्यांपासूनही सागरी तटांचे रक्षण करतात. ही जंगले अनेक लहान-मोठय़ा प्राण्यांची घरेही आहेत.
भारतात आढळ